मुख्य सामग्रीवर वगळा

इंडस्ट्रिअल विश्व अन् कंत्राटी कामगार..!

इंडस्ट्रिअल विश्व अन् कंत्राटी कामगार..!

चार वर्षांपूर्वीचा कंपनीतला पहिला दिवस आजही आठवला की आपसूकच अंगावर काटा येऊन जातो. कुठल्याही फार्मा कंपनीत लागायचं म्हंटले की साधं कॅजूअल वर्कर म्हणून लागायचं असेल तरीही अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतात.

डॉक्युमेंट्स, एक्साम, मेडिकल अन् मग डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अश्या सगळ्या गोष्टी पार करून झाल्या. मी पास झालो अन् अखेर एका कंपनीत 'कॅजूअल वर्कर' म्हणून सहा महिन्यांची कंत्राटी पद्धतीने नोकरी लागली. पहिल्याच दिवशी सेकंड शिफ्टसाठी कामावर बोलावले.

तालुक्याच्या गावात पूर्वी खूप कामं केली होती, पण इतक्या मोठ्या ठिकाणी पहिलेच. त्यामुळे एक अनामिक दडपण वाटायचं, छातीत धडधड व्हायची.
पहिला दिवस कंपनीच्या गेटमधून सुरू होणारी कित्येक नियमांची अंमलबजावणी करत अखेर मी कामावर आलो.

नियम साधे पण पाळणे आवश्यक असे होते. मग ते गळ्यात आयडी कार्ड असणे, सेफ्टी शूज असणे, दाढी, कटिंग, हाताची नखे व्यवस्थित असणे, आयडी कार्ड रजिस्टर असणे, ते नसेल तर मग कामाला घ्यायचे नाही.
अजून खूप नियम असायचे काम कमी अन् या नियमात राहून तिथे काम करणे,यातच माझ्यासारख्या नवख्या पोरांचा कसा दिवस निघून जाई कळायचे नाही.

पहिला दिवस असल्याने इतक्या मोठ्या कंपनीत मला काही माहीत नसल्याने सुपरवायझरने एक अनुभवी मुलांच्या ग्रुपमध्ये मला कामाला पाठवून दिले. तेही तेच सांगायचे काम कमी झाले तरी चालेल आपली काळजी, आपली सेफ्टी आपणच घ्यायची. कॅन्टीनमध्ये दिले जाते ते काही फुकटचे जेवण नाही,आपण त्याचे पैसे मोजतो तेव्हा पोटभर जेवायचे खूप काही..!

कामाचा पहिला दिवस कंपनीत असलेल्या पर्मनंट माणसाने त्या अनुभवी पोरांना त्यांचे नेहमीचे काम लावून दिले. आम्हाला आदी शिक्षण विचारून घेतले,त्यांच्यात सर्वाधिक शिकलेला मीच.
मग मला त्यांनी नवीन आलेल्या पॅकिंग स्टोअरमधील वस्तूंची नोंद घ्यायला लावली.

सोबत एक पर्मनंट व्यक्ती होती ती जे सांगायची ते आपण करायचं. ती बिचारी माझ्या सोबतची मुलं ते मटेरियल एका ब्लॉकमधून दुसरीकडे शिफ्ट करत तर कुणी फॉर्क क्लिपच्या सहाय्याने उंच उंच असलेल्या रॅकवरती ठेवत. त्यांचा या कामात असलेला शिस्तशीरपणा मला खूप आवडायचा.

मी ही आवडीने माझं काम करत होतो. अधूनमधून सोबत आलेली मुलं विचारपूस करायची पाणी प्यायला घेऊन जायची, पर्मनंट नोकरी करणारी तेथील माणसेही छान होती,समजून घ्यायची,सांगायची.
त्याची एकच अट असायची दिलेलं काम नियमात राहून वेळेत पूर्ण करायचे अन् मग तुम्ही जरावेळ आराम केला तरी त्यांना चालायचं.

अर्धी शिफ्ट संपली होती,कॅन्टीनमधून आम्ही जेवण करून आलो,आता फार काही काम नसल्यानं आम्ही दोघे नवीन मुलं बकेटमध्ये पाणी घेऊन ते उंचउंच रॅक हात पुरेल तिथपर्यंत डस्टरने ओले करून पुसत होतो.

हे सगळं करत असतांना मी अन् तो एक नवखा मित्र आम्ही दोघेच होतो सर्व ब्लॉकमध्ये. तो एका टोकाला अन् मी दुसऱ्या टोकाला काम चालू होते.बाहेर हळू हळू अंधारून येत होतं खिडकीच्या पलीकडे असलेला शहरातील महामार्ग दिसत होता मी त्याच्यावर ये-जा करणाऱ्या गाड्या न्याहाळत होतो. 

अन् आता एक अनामिक हुरहुर मनाला लागून जात होती हुंदका दाटून येत होता.कधीही सवय नसलेले ही कामे करत आहोत म्हणून की आज पहिला दिवस आहे म्हणून काही कळत नव्हतं,बाहेरचं जग आवडायला लागलं होतं.

पाणी प्यायला गेलं की त्या उंच-उंच टाक्या अन् त्या पाईपलाईन्स बघून मला भिती वाटायची भोपाळ वायू दुर्घटना,चॅरनोबील येथील दुर्घटना आठवायची मी अर्धवट पाणी प्यायचो अन् तिथून काढता पाय घ्यायचो.‌
अनेक गोष्टी घडायच्या कधी मज्जा यायची कधी एकटे वाटायचे. दुसऱ्या दिवशी कधी एकदा कंपनीत जातो असं व्हायचं कारण,हे जग हळूहळू सवयीचं झालं होतं.

आता मस्त कंपनीत रुळलो असल्याने स्वतःच्या राहणीमानात मी बदल करून घेतला होता. व्यवस्थित रहायचं,नियमात राहून काम करायचं यामुळे मला माझं काम प्रिय झालं होतं,अनुभव येत गेला तसे एक नियमितचे काम भेटले अन् मी तिथेच काम करू लागलो,कंपनीत मग फार भटकंती होत नसत.

पहाटेच्या गारव्यात कंपनी येणारा एक अनामिक सुगंध अनुभवत कामाची सुरुवात करण्याची आता शरीराला सवय झाली होती अन् अजून खूप काही लिहल कधी तरी..!

Written by
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड