मुख्य सामग्रीवर वगळा

रूम पार्टनर..!

रूम पार्टनर..!

काल रात्री साडे अकराला कामाची शिफ्ट सुटली,कंपनीच्या गेटवर आलो तेव्हा जमिनीला साधळा लागेल असा पाऊस चालू होता.पुन्हा पाऊस वाढेल म्हणून अंधारातच धपाधप पावलं टाकत,जवळजवळ पळतच रस्त्यानं कामगार नगराच्या अन् माझ्या रुमच्या दिशेनं निघालो.एरवी हे रोजचं आहे,त्यामुळे याचं मला कुठलं सोयरसुतक नाही..!

दोन-अडीच कीमीची धावपळ करून अखेर रूमवर पोहचलो,अंगावर शर्ट घामाने की हळूवार पडणाऱ्या पावसाने ओलाचिंब झाला हे काही समजलं नाही.मित्र तिसऱ्या शिफ्टसाठी कंपनीत निघून गेला होता,दरवाज्याला घातलेली कडी खोलली आणि आल्या-आल्या कॉटवर पडलो..!

जीव दिवसभराच्या कामानंतर पार थकून गेला होता,पडल्या पडल्याच एका पायाने दुसऱ्या पायातील बुटाशी खेळ करून दोघांना काढले अन् पायानेच कॉटखाली लोटून दिले.सोक्स हाताने काढून गादीखाली खोचुन दिले अन् काही अर्धा तास निपचित पडून राहिलो,डोळे लावून शांत-शांत..!

खिडकीच्या तावदनातून हळूवार निवांत गार वारा वाहत माझ्यापर्यंत येत होता अन् निपचित पडल्या जागी अंगाला गारवा झोंबत होता.गारव्याने अंगावर शहारे येऊ लागले होते,काही पंधरा-वीस मिनिटांनी जरासे ताजेतवाने वाटले..!

अन् मग कॉफी करायला टाकून मी बेसिंगमध्ये तोंड धुवून मी फ्रेश झालो.काल सांजेला मित्राने एक वेळचा डब्बा वाचावा म्हणून आणलेले पावचे पॉकेट अर्धवट उरलेले होते,त्याच्या कॉटवर तसेच पडलेले दिसले.त्याला घेतले कॉफीचा कप हातात घेऊन कॉफीच्या संगतीने त्याला खात,खिडकीतून हळूवार पडणाऱ्या पावसाला मी न्याहाळत बसलो होतो..!

साडेबारा वाजले होते तिसऱ्या मजल्यावरून दिसणारं शहर शांत-शांत भासत होतं.अर्धा किमीच्या अंतरावर असलेल्या नारळाच्या बागेतील झाडांचा,नारळाच्या झावळ्यांचा वाऱ्याच्या झुळकेनं एक मंद आवाज माझ्यापर्यंत येत होता..!

का माहित नाही पण इतकं सुंदर वातावरण असुनही मला आतून हे सगळं नकोसं झालं होतं.आयुष्याला घेऊन उद्वस्थ होणं काय असावं ते हेच तर नाहीना हे विचार वेळोवेळी मनात येऊन जात होते.नकळतच हातातून खूप काही निसटून गेल्याची जाणीव होत होती..!

ते तितकंच खरंही होतं,कारण ही काळोखाची वेळ माझ्याशी रोजच असा संवाद साधत असते.जिथे मनाला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे ही वेळ मला देऊन जात असते.असं यंत्रवत जगणं आयुष्यभर वाट्याला आलं तर सुखाची झळही आपल्या पोळलेल्या आयुष्याला भेटणार नाही असे वेळोवेळी वाटून जाते.मग मी एव्हढा मोठा आवाका असलेल्या शहरात एका बिंदुसम असलेल्या मला शोधत राहतो..!

कॉफी पिवून झाली,आता बाहेर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसू लागला होता.झोपमोड तर विचारांनी केव्हाच केली होती पण आता जागं रहायला कारण भेटलं होतं.

माझ्या कॉटवर वाचन करतांना अर्धवट वाचलेलं अन् राग आला म्हणून पुन्हा कप्प्यात ठेवून दिलेलं "मॅक्झिम गोर्कीचं" "मदर" हे पुस्तक पडलं होतं.आपल्याच कथा सांगणारं हे पुस्तक कधीही वाचन न करणाऱ्या मित्राने चाळले होते कदाचित..!

कारण आठ दिवसांपूर्वी जेव्हा मी हे पुस्तक वाचायला घेतलं तेव्हा त्याला सांगितलं होतं आपल्या जगण्याच्या कथा या पुस्तकातून लेखकाने मांडल्या आहे.तितक्यात पुस्तकात गाय छापचा एक तुकडा १३८ पान क्रमाकांच्या पानावर सापडला,कदाचित या माझ्या खुळ्या मित्राला पुस्तक आवडलेले दिसते म्हणून तो वाचत असावा...!

मी ते पुस्तक तसेच बंद करून ठेवून दिले अन् पडून राहिलो पुन्हा निपचित..!

दिवसभर सी.एन.सी मशिन्सची,फॉरक्लिपची बेजार करणारी अन् सवयीची आवाजं अजूनही कानात गुणगुणत होती.पत्राला एका फळकटीच्या आधारे पाचर देऊन बांधलेल्या अन् बेरींग गेलेल्या पंख्याखाली झोपून गेलो होतो.
त्याचा तो विचित्र आवाज कानात पुन्हा-पुन्हा गुणगुणत होता अन् आज झोपणं अशक्य आहे असं वाटू लागले होते..!

"मदर" वाचावी असं वाटूनही गेलं पण का वाचावी जिच्या आतच आपल्या जगण्याच्या कथा मांडल्या आहेत,मग का वाचावी..? दुसरी पुस्तकं घेऊन वाचावी तर पैश्याचं सोंग आम्हाला आणता आलं नाही.मग अजून किती बेक्कार असावं आयुष्याने..!

विचाराने आता डोळे लागू लागले होते की,दिवसभराच्या ढोर मेहनतीने कळले नाही ; पण आता झोपल्या जागी निपचित पडून राहिलो होतो,माणूस मेल्यागत..!

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड