मुख्य सामग्रीवर वगळा

अर्थशास्त्र, अदानी समूह व हिंडेनबर्ग समूहाचा नेमका अहवाल..!

अर्थशास्त्र, अदानी समूह व हिंडेनबर्ग समूहाचा नेमका अहवाल..!


अर्थशास्त्र, अदानी समूह व हिंडेनबर्ग समूहाचा नेमका अहवाल..!

अदानी समूहासारख्या बलाढ्य कंपन्यांना त्यांचा चालणारा कारभार, आर्थिक उलाढाल यांचा सखोल अभ्यास करून तो जगासमोर आणून अडचणीत आणणारी "हिंडेनबर्ग" सारखी गुंतवणूक संशोधन संस्था नेमकं करते तरी काय ?

जाणून घेऊया हिंडेनबर्ग रिसर्च एल.एल.सी बद्दल. 

हिंडेनबर्ग रिसर्च एलएलसी ही एक न्यूयॉर्क शहरातील गुंतवणूक संशोधन संस्था आहे. हिंडेनबर्गची स्थापना २०१७ साली अमेरिकन नागरिक व हिंडेनबर्गचे संस्थापक "नाथन अँडरसन" यांनी केली आहे. ही संस्था विविध कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगवर,शेअर मार्केट मधील इतर उलाढाली तसेच कंपनीच्या माध्यमातून होणारे अनेक मोठमोठाले आर्थिक व्यवहार यांवर लक्ष केंद्रित करते.

हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी वरील सर्व बाबींचा अभ्यास करून तिच्या वेबसाइटद्वारे असा सार्वजनिक अहवाल तयार करत असते. ज्यात कॉर्पोरेट घोटाळा आणि गैरप्रकार केल्याचा आरोप समोरच्या कंपन्यांवर होऊ शकतो.

हिंडेनबर्ग रिसर्च ही आपल्या लक्ष्यित कंपनीचा सदर तपास अहवाल सहा किंवा अधिक महिन्यांत तयार करत असते. यासाठी ही कंपनी सदरील कंपन्यांच्या सार्वजनिक नोंदी, अंतर्गत कॉर्पोरेट दस्तऐवज तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांशी बोलून त्याचे विश्लेषण करत असते.

त्यानंतर हा अहवाल हिंडेनबर्गच्या मर्यादित भागीदारांना प्रसारित केला जातो, जे हिंडेनबर्गसह एकत्रितपणे ठरवलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करते. ठरवलेल्या कंपनीच्या शेअरची किंमत कमी झाल्यानंतर हिंडेनबर्ग आपला नफा कमवायला सुरुवात करते

अदानी समूह ही पहिली कंपनी नाही जिच्याबाबत हिंडेनबर्गने अहवाल दिला आहे. याआधीही त्यांनी अनेक बड्या कंपन्यांविरोधात असे अहवाल दिले आहेत. ही कंपनी कोणत्याही कंपनीला लक्ष्य करते आणि त्यातील त्रुटी दाखवते. या अहवालामुळे जेव्हा कंपनीचे शेअर्स घसरतात तेव्हा ती खरेदी करून हा नफा कमावते.

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानीचे शेअर्स २५ टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी समूहाच्या या अहवालापूर्वीही हिंडेनबर्गने अनेक कंपन्यांविरुद्ध असे अहवाल जारी केले आहेत. २०२० मध्ये असे सुमारे १६ अहवाल प्रसिद्ध करण्यात आले होते. या अहवालांमुळे कंपन्यांचे शेअर्स सरासरी १५ टक्क्यांनी घसरले.

हिंडेनबर्गने Nikola, SCWORX, Genius Brand, Ideanomic, Vince Finance, Genius Brands, SC Wrox, HF Food, Bloom Energy, Aphria, Twitter Ink या कंपन्यांविरुद्ध यापूर्वी अहवाल दाखल केला आहे.
या अहवालांमध्ये सदरील कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगच्या पद्धतीचा बचाव आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण यावर देखील अभ्यासपूर्ण विश्लेषण केले होते.

हा अहवाल काही ठोस अभ्यासावर आधारित असतो, ज्यात शेअर मार्केटमध्ये काही आर्थिक गैरव्यवहार होत आहे का.? तो कितपत योग्य,अयोग्य पद्धतीने होत आहे किंवा योग्य पद्धतीच्या अडून किती गैरमार्गाने तो होत आहे.? या अश्या वरील नामांकित मोठ्या कंपन्या आपल्या स्वतःच्या फायद्याकरता कंपनीच्या खात्यात चुकीच्या नोंदी किंवा गफलत करत आहेत का.? एखादी कंपनी स्वतःच्या फायद्याकरता शेअर मार्केटमध्ये चुकीच्या दुसऱ्या कंपन्यांच्या शेअर्सची पूर्वनियोजित बोली लावून कोणाचे हेतुपुरस्सर नुकसान तर करत नाही ना.?

अश्या अनेक बाबींचे अभ्यासपूर्ण संशोधन पूर्ण केल्यानंतर 'हिंडेनबर्ग रिसर्च' कंपनी एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध करते. जो अनेकदा सामान्य जनतेसाठी,तसेच संबंधित कंपनीत आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या छोट्या कंपन्यांसाठी धक्का देणारा असा असतो. अश्यावेळी सरळ मार्गे या कंपनीच्या अहवालाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून येत असतो. जसा काही दिवसांपूर्वी आपण अदाणी समूहाच्या बाबतीत सादर केलेल्या अहवालानंतर अनुभवला.

Written by,
Bharat Sonawane .
एम.बी.ए (उत्पादन आणि विपणन व्यवस्थापन).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड