मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा..! भाग-४

शिवना मायच्या कथा..! भाग-४
 
मी एका हातात दूरडी घेऊन घराच्या वाटेला लागलो. थंडीचे दिवस असल्यानं गावात चौका-चौकात शेकोट्या पेटल्या होत्या. एखाद - दुसऱ्या गल्लीतून घराकडे जाताना एखाद्या घरातून काळ्या व्हरवंट्यावर वाटून केलेल्या भाजीला फोडणी देतानाचा येणारा तो सुगंध येत होता. अन् पोटाला लागलेली भूक अजून वाढत होती. गावच्या पिंपळ पारावर आलो तसं गावची बापूडी लोकं धरणीला धरून बसली होती. समोर शेकोटी पेटवलेली, तिच्या धुराचे लोट आसमंतात मिळत होते. इतकी मोठी शेकोटी होती की, सांजेला म्हसनात पेटलेलं एखादं मड आता निखाऱ्यात येईल.त्याच्या चहूबाजूंनी गावातली म्हातारी गावातल्या गप्पा हानीत बसली होती. गप्पा तरी काय त्यांच्या अमक्याच्या शेतात हे झालं तमक्याच्या शेतात ते झालं, या मालाला बाजारपेठ नाही, यंदाच्या उन्हाळ्यात पोरीचं लग्न करून टाकू, जावई चांगले आहे. शहराला नोकरी करत्यात, मोप जमीन हाय अश्या ठराविक विषयांच्या चौफेर त्यांच्या गप्पा असायच्या.मी जरावेळ गप्पा हाणल्या अन् तिथून काढता पाय घेतला.
 
मी गेल्यामुळे तिथं झोल्याआईचा विषय निघला अन् पुढं तो विषय बराचवेळ लोकं चघळत बसली. कारण झोल्याआई कामाशी काम करून सुखी होती. तिला एक आणा कुणाला, कुणासाठी ठेवायचा नव्हता की, तिला मागेपुढे कुणी नव्हतं. त्यामुळं तिचं सर्व ब्येस चालू आहे असं गावच्या हा लोकांना वाटत होतं.
 
मी घरात आलो तसं मायना आवाज दिला."का रं लका कुठं भटकत होतासा, काही पोटाला भाकर-तुकडा पाणी हाय का नाय..!
त्या गावच्या लोकांना काय भेटला नाय का..? शहराहून गावला आला की म्हाताऱ्या माणसांसारखं त्या गावच्या लोकांना भेटाया जात अस्तुया..!''
 
मी अंगणात असलेल्या रांजनातून डेचकीत पाणी घेऊन दगडावर जाऊन हातपाय धुवून, हात हिसळून घेतले आणि मायला बोलता झालो, "माय तुझं सबुत खरं हाय ग; पण शहराला गेलं की, मग कुठली भेटतीया ही माणसं बिचारी.
मग तेव्हडच गावला आलं की, त्यांच्या सुखादुःखाची विचारपूस. त्यांनाही आपलं दुःख ऐकून घेणार कुणी लागतच की. आजचीच गोष्ट घे, झोल्याआई संगतीने आज पारगभर गप्पा झाल्या. तिच्या जगण्यात असलेला दुष्काळ, तिचं सभोवताली असलेल्या माणसांच्या उपस्थितीतही एकटं आयुष्य तिला खायला उठतं अन् तिच्या जगण्याची केहना काय सांगावं अवघड आहे ग माय सगळं.''  तिनं संमध सांगितलं मला आज तिच्या आयुष्यातील दुष्काळ, तिचं पोरकेपण अगदी लुगड्याचा पदर डोळ्यांना लावत, तिनं आसवांना वाट मोकळी करून दिली अन् ती मोकळी होत राहिली माय माझ्या मोहरं, बोलत राहिली, "म्या काय केलं फक्त ऐकून घेतलं, त्याला काय पैका लागतो का..? पण तिला किती मोकळं वाटलं असल म्हणून गावला आलं की, हे भटकणं होतं माय.
शहराला गेलं की, गावच्या माणसांची किंमत कळते इतकंच.''
 
मी हातात असलेली दूरडी मायच्या हातात दिली. हातात देताच ती तिला न्याहाळत बोलू लागली,
झोल्याआईनं दिली का रे छोटे सरकार..?
हाव माय झोल्याआईनं दिली,
तू सांगितलं अस्तीला का तिला..?
 
हा पंधरधी झाली तेव्हा महादेवाच्या देऊळात भेटली अस्ता माझी तुटकी दूरडी पाहून बोलती झाली सा झोल्यामाय.
की, आक्का दूरडी पार तुटलीया, देवाला फुलाला चांगली दूरडी करून देतीया..!
पण पंधरधी सरली तसं कामं इतकी हाय का तिच्याकडे जाणं होईना.
 
मी गालातच हसत ती दूरडी बघू लागलो, अन् मायला म्हंटल
चल आता जेवाया भूक लागली हायसा.मला बापू कूठशिक हायसा.?
माय बोलू लई,
बापू गेलासा मगाशीच भाकर खाऊन सावत्या माळ्याच्या देऊळात हरिपाठ हायसा तिकडं टाळ कुटायला.
 
मी हसू लागलो,आईनं भाकरीचं टोपलं,कोडयासची कढई पुढं आणली अन् मला वाढून ती ही घेऊन जेवायला बसली. दिवसभर वावरात काय केलं ते ती मला सांगत होती अन् मी दिवसभर कुठं भटकंती केली ते मायला सांगत होतो.
 
पिठाच्या डब्ब्यावर ठेवलेला दिवा आमच्या गप्पा ऐकत असावा असा संथपणे जळत होता. त्यात माझा चेहरा अजूनच उजळून दिसू लागला होता की,आजच्या गावातल्या गावच्या माझ्या लोकांच्या भेटीने हे कळायला मार्ग नव्हता..!
 
मायच्या संगतीने मी भाकर खत बसलो होतो. बसल्याजागी जागी सावता माळ्याच्या मंदिरातला हरिपाठ ऐकू येत होता. बाहेर असलेल्या आमच्या बकऱ्या थंडीने कुडकुडत होत्या,त्यांना थंडी वाढल्यानं आता मध्ये बांधायला हवं म्हणून आईच्या अन् माझ्यामध्ये सल्लामसलत चालू होती.
 
भरीस भर म्हणून की काय सोसाट्याचा वारा सुटला होता अन् घराच्या पत्रावर आमच्या शेवग्याच्या झाडास असलेल्या शेंगा टपटप करून पत्रावर पडत होत्या. उद्याच्याला कोडयास म्हणून शेवग्याची काळी भाजी करूया म्हणून मी मायला सांगितले. माझं जेऊन झाल्यावर मी हात धूऊन खाटेवर येऊन अंगावर पांघरून घेऊन झोपलो होतो.
 
झोपल्या जागेवरून चुल्हीतला धूर मोडकळीस आलेल्या खिडकीतून बाहेर जात होता अन् घराला आग लागावी तसं दूरवरून दिसू लागलं होतं.
भाकरीचा लालबुंद झालेला तवा हळूहळू थंड होत होता, हळू हळू शांत होत विस्तव तव्याच्या खाली पडत आकाशातील तारा तुटल्यागत माझ्याकडे बघून हसत होता..!
क्रमशः.
 
भारत सोनवणे."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड