मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा..! भाग-सहा


शिवना मायच्या कथा भाग-सहा 

आज एकादस असल्यानं पहाटेच नेहमीप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या पालखीची फेरी गावातून निघाली होती. विठ्ठल रखुमाईच्या नामस्मरणात तल्लीन होऊन गावकरी, लहानगी पोरं पालखीच्या पुढे फेर धरून पावल्या घेत होती. 

एकादशीच्या दिवशी गावात एक जिवंतपणा असल्याची आगळी वेगळी जाणीव होत असते,जी आज होत होती. नाही तर एरवी पहाटेच्या दहाच्या सुमारास सारा गाव रानात कामाधंद्याला निघून गेलेला असतो.
अन् गावची म्हातारी माणसं गावच्या पारावर गप्पा झोडीत बसलेले असतात. गावातल्या म्हाताऱ्या आज्या घराच्या मोहरे असलेल्या ओट्यावर दळणदाना करत बसलेल्या असतात.

सकाळ दुपारच्या पाराकडे कलली की, मग गावच्या सरकारी झेडपीच्या शाळेतली लहानगी पोरं घराच्या दिशेने गावच्या मधल्या गल्लीने पळतच सुटतात. इतक्यावेळ निपचित पडलेलं गाव या लहानग्यांच्या आवाजाने अजून जिवंत होतं.

भर दुपारच्यावेळी नदी संथपणे वाहत राहते. गावात नव्यानं आलेल्या सूना डोक्यावरचा पदर सावरत धुणे घेऊन महादेवाच्या देऊळाजवळ नदी थडीला केलेल्या दगडी पुलावर धुणे धुवत बसतात. हाच काय त्यांना हक्काचा वेळ मग माहेरच्या आठवणींना उजाळा दिला जातो.

भरघोस गप्पा होता, एकमेकींना एकमेकींच्या दादल्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्या सहज देऊळात झोपलेल्या आजोबापर्यंत ऐकू जात असतात अन् तोही कुणी बोलायला नसल्यानं या गप्पामध्ये प्रत्यक्ष सहभाग न नोंदवता हे निपचित पडल्याजागी ऐकत बसलेल्या असतो.

पालखी मदरीच्या गल्लीतून, धोंडू नाना तेलीच्या गल्लीत आली. चौकात येऊन भाविक फेर रिंगण धरून पावल्या घेत होते. हे सगळं मी बसल्या जागेवरून बघत होतो.
पुढे चौकातून सर्व मंडळी सरळ सावत्या माळ्याच्या देऊळा मोहरच्या गल्लीतून देऊळाकडे निघाली.

ज्याच्या घरापाशी पालखी आली लोकं तिचे पाय पडून चिमुट चिमुट साखर देऊन आपल्या नित्याच्या कामाला लागत होती. विठू नामाच्या गजरात पालखी गावच्या एकांगाला असलेल्या महादेवाच्या देऊळाकडे निघाली होती. अन् हळू हळू गावातली लोकं नजरे आड झाली. गावात एकाकी शांतता पसरली.  

मी ही उठून बोकड्यागत वाढलेले केस मानेवर, चेहऱ्यावर येत होते, सावरत मी घराला लागून असलेल्या लिंभाऱ्याचा एक डगळा तोडून दातून करावं तसं घराला लागून असलेल्या आमच्या पाण्याच्या कुंडीवर उक्खड बसून दात घासत बसलो.

दगडू आज्जा हळूवार उठून ढुंगण खरडीत खरडीत त्याच्या लेवकानं बांधलेल्या लाकडी वाश्याच्या घरात येऊन बसून राहिला. घरात अंधार बुडूक असल्यानं दगडू आज्जा काही दिसंना झाला होता, त्याचं पांढर धोतर अन् त्यानं घातलेली मळकटलेली बंडी मात्र त्या अंधारातही मी बसलो त्या जागेवरून दिसत होती.
अन् अधूनमधून त्याचा खोकलण्याचा आवाज येत होता इतकंच.

मी गावातल्या येणाऱ्या जाणाऱ्याना न्याहाळत घंटाभर दात घासत बसलो. इसनाला आलेलं पाणी बादलीत घेऊन, कुंडीतून इसनाला थंड पाणी घेऊन न्हाणी घरात अंघोळीला येऊन बसलो. कव्हरभर माझा हा अंघोळीचा खेळ चालू होता. तो आवरून मी तुळशी वृंदावनात आरसा म्हणून खोचलेल्या फुटक्या काचेत माझा चेहरा न्याहाळत भांगपट्टी करू लागलो .

बोकड्यागत वाढलेले केसांच्या मधून कंगवा फिरावा तसं पाणी निथळत चेहऱ्यावर येत होतं. मी त्याला पालथ्या हाताने पुसत एकदाचा भांग पाडून, डोळ्याच्या दोन्ही भुवईच्या मधोमध अष्टगंध लाऊन मी परसदरच्या चौकटीत गार हवेचा झोका अनुभवत बसून राहिलो.

आता कुठे प्रसन्न वाटू लागलं होतं. काल केलेल्या दिवसभर भटकंतीमुळे रात्री झोपेत पाय ओढू लागले होते, जे आता बरे झाले होते. काहीवेळ काय करावं हा विचार करत बसल्यावर मी न्याहारी करायची म्हणून घरात आलो. शिंकेला लावलेली टोपली दुरूनच नजरेस पडत होती, अधूनमधून येणाऱ्या वाऱ्याच्या झोताने ती हलत होती.

मी घरात आलो शिंक्यापर्यंत हात पुरत नाही म्हणून पिठाचा डब्बा घेऊन मी त्यावर उभा राहिलो अन् बऱ्याच कसरतीने मी भाकरीचे टोपले काढून. खुंटीला टांगलेल्या कडीच्या डब्ब्यात असलेलं कोड्यास एका थाटलीत ओतलं अन् एक सवती भाकर चुरून खात बसलो.

भाकर खाऊन झाली अन् आता पुन्हा काय करावं या विचाराने मी परेशान झालो. दोन-चार दिवसच आहे घेऊ फिरून मग पुन्हा शहराच्या वाटा जवळ कराव्या लागतील. मग काय तेच कालीज, तीच कंपनी त्यामुळं आहे तोवर भटकून घेऊ म्हणून मी माझं आवरून. कोड्यास, भाकरी व्यवस्थित ठेऊन घराला असलेल्या दोन फाकाच्या दरवाज्याला कडीत अडकवून उटळे लावले अन् उटळे तुळशी वृंदावनाच्या खाली घालून मी भटकायला म्हणून डोंगराच्या पायथ्याशी घेऊन जाणाऱ्या वाटेनं निघालो.

गावातली लोकं विचारपूस करत होती, त्यांच्या रोजच्या गप्पांना मी आता कंटाळलो होतो. म्हणून गावच्या बाहेर असलेल्या एक दोघं मित्रांना घेऊन आम्ही डोंगराच्या वाटेनं लागलो. आम्ही वाटेनं कसलं सुधीनं चालतो कोणाच्या बांधावर बोराचं झाड दिसलं तर बोरच तोड, कुठं मक्का दिसली तर तीच तोड उसाचा फड दिसला तर दोन-चार उसाचे टिपरे घेऊन आम्ही खात खात निघालो होतो.


सोबत असलेला सलीम अन् अनवर माझे बालपणीचे सवंगडी होते पण ते सातवी करून पुढे शिकले नाही. आता घरची ढोरं घेऊन ते असे डोंगराच्या पायथ्याला ढोरं चारत असे म्हणून त्यांना या रानाच्या वाटा माहित झालेल्या होत्या, म्हणून अजूनच मज्जा येत होती. ती पुढे मी मागे कधी संगतीने आम्ही चालत होतो. छोटे मोठे ओढे लागले की पोटभर पाणी पिऊन घेत होतो अन् चालत होतो, चालत होतो...!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड