मुख्य सामग्रीवर वगळा

शिवनामायच्या कथा..! भाग - १

शिवनामायच्या कथा..! भाग - १

पहाट सरायला, तसं मी गावच्या एकांगाला असलेल्या, महादेवाच्या देऊळात दर्शनाला म्हणून शिवनामायच्या अंगाला असलेली वाट जवळ करू लागलो. गावातली माय-बाप वडील माणसं पहाटेच काकड्याला म्हणून मंदिराची वाट जवळ करतात. मी बऱ्याच दिवसांच्या उपर गावाला आल्यानं आज देऊळात जावं, म्हणून देऊळाच्या वाटेला लागलो.
 
गावाला यंदाच्या सालाला चांगलीच बरसाद होवून गेली होती, म्हणून शिवनामाय दुथडी भरून वाहू लागली होती. शिवनामायच्या दोन्ही अंगाला बेसरमाची झाडं डोक्यावरून फिरली होती. त्यात अधूनमधून सापाची पिल्ल खेळतांना दिसायची.
गावची लहानगी मुलं सलगी करून पुलावरून त्यांचा हा खेळ बघत बसलेली असायची. गावचा सगळ्यात वयस्कर आजोबा सोन्या बाबा अजूनही बारा महिने नदीच्या पात्रात नहानं करतो. जोवर तो गावात हाय, जिंदा हाय तोवर गावाला दुष्काळ नाय असं गावची जुनी माणसं, बुडीबापुडे लोकं म्हणतात.  कारण विचारलं तर म्हणतात की, सोन्या बाबा म्हशीच्या डोहात उभे राहून दररोज बारा महिने सूर्याला पूर्वेस तोंड करून अर्ध्य देतो, म्हणून सूर्यदेवाची आपल्या गावावर किरपा हायसा. गावला रोगराई नाय की दुष्काळ नाय. अश्या अनेक कहान्या गावातल्या जुन्या लोकांनी गावाशी जोडल्या आहेत. 
 
मी अनवाणी पायानं देऊळाची वाट जवळ करत होतो. तितक्यात सोंग्या आक्काचा मुंज्याजवळ येत नाही, तोच मला सडकीच्या वाटेनं जयवंता नाना, आमचे गावचे पाटील येतांना दिसले. त्यांनी मला हात वर करत थांबायला सांगितले अन् मी थांबलो.
पांढऱ्याफट्ट धोतराचा सोंगा हातात धरून नाना माझ्याशी बोलते झाले.
"काय छोटे सरकार कशे हायसा..? अन् कव्हशीक आलासा गावाला..?"
( त्यांनी मला विचारलं..! )
"काय नाय संमध मजीत हायसा बघा नाना, काल आलो सांच्याला आठच्या महामंडळाच्या लाल डब्यानं. तुम्ही कशे हायसा नाना..? तब्येत भलतीच खराब केलीसा..!"
(मी नानाला म्हंटले)
"काय करतू लका, पिवळा कऊळ होवून गेलासा बघ पंधरधी सरली तेव्हा, पार पोटात शिरला होता.
मग काय चुना खाय, कात खाय, गावचे वैद सोमा आण्णाकडून कऊळ उतरून घे. अंगारे, धुपारे कर असं करून उतरून घेतलासा कऊळ लका. आता बरा लागून राहिला पण तब्येत बहेकली, ती बहेकलीच लेका. काही केल्या तालावर येईना झाली हायसा."
"चालतासा का देऊळाला..!" (मी विचारलं)
"नगो बाबा, आमचं काय रोजचं हाय..! ये तू जावून..!"
असं म्हणत जयवंता नाना पंचायतीच्या ओट्यावर गप्पा झोडायला गेले. मी सोंग्या आक्काच्या मुंज्याचे पाय पडून देउळाच्या वाटेनं निघालो.
 
पुलावरून तीतर-बितर नजरेने बघणारी लहानगी मुलं एरवी लंगडी खेळत, पळत खूप पुढे निघून गेली होती. सोन्याबाबा म्हशीच्या डोहातून त्यांच नहानं आवरून, एका हातात तांब्या अन् एका हातात वळकटी मारून बांधेललं धोतर धरून मंदिराच्या दिशेनं जातांना दुरूनच मला दिसत होते.
चार साल झाले तसा म्या शिक्षणाकरता गाव सोडला तो सोडलाच. दोन-तीन महिन्याला आलो की, मग सगळा गाव भटकून घेतो, डोळ्यात साठवून घेतो. मायच्या हातचं कोड्यास, भाकर मन भरून खावून घेतो. गावच्या जुन्या लोकांच्या गप्पा पोटभर ऐकून घेतो, तेव्हाच शहराची वाट जवळ करतो.
 
मी माझ्या विचारात तळपत्या उन्हात, गुलमोहराच्या झाडांच्या सावलीनं वाटेनं चालत-चालत महादेवाच्या देऊळात आलो. सोन्याबाबाचे दर्शन घेतले, त्यांच्याकडे असलेला पितळीचा तांब्या घेऊन शिवनामायमधून पाणी आणलं अन् महादेवाच्या पिंडीवर टाकून दर्शन घेतले.
देऊळाला लागूनच भामासाद महाराजांची समाधी आहे, तिचे पाय पडले. डोळे बंद करून ध्यानस्थ अवस्थेत कितीवेळ बसून राहिलो.
 
काही वेळाने शिवना मायच्या अंगाला करून, जवळ असलेल्या बाकड्यावर बसून मी शिवना मायला न्याहाळत होतो. तिचं निरंतर वाहणं डोळ्यात साठवून घेत होतो.
बाजूला असलेल्या लिंभाऱ्यावर चिमण्यांचा चिवचिवाट चालू होता, तो ऐकत बसलो होतो. शिवनामायच्या तीरावर पहाटेच बायकांची धुणे धुवायला म्हणून रीघ लागलेली होती, त्यांच्या गप्पा बसल्याजागी माझ्या कानावर येऊ लागल्या होत्या.
 
यंदाच्या सालाला गावात मोप पाऊस पडून गेल्यामुळे शिवना माय दुथडी भरून, परंतु संथपणाने वाहत होती. शिवना मायच्या तीरावर यशवंतराव चव्हाण दादा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्या सालाला त्यांनी असंख्य दगडी पूल बांधलेली होती. आजही ती चांगल्या स्थितीत होती.
 
आता गावच्या बायका तिथं रोजचं धुणे घेऊन धुवायला यायच्या, त्यांच्या पारगभर चालणाऱ्या गप्पा. गप्पा कसल्या आपल्याच बालपणीच्या आठवणी, माहेरच्या आठवणी एकमेकींना त्या सांगायच्या अन् घटकाभर तितकंच आपल्या कष्टाळू जगण्याचा त्यांना मग त्यातून विसर पडायचा.
- भारत लक्ष्मण सोनवणे.
 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...