मुख्य सामग्रीवर वगळा

शिवनामायच्या कथा..! भाग-तीन

शिवनामायच्या कथा..! भाग-तीन
 
मी होकारार्थी मान हलविली अन् काथीने आवळलेले दोन बांबू ओढीतओढीत झोल्याआईच्या झोपडी पहूर घेऊन आलो. ती पण तीन बांबू ओढीतओढीत माझ्यामागून आली. बांबू अंगणात टाकून मी उभा राहिलो होतो, तितक्यात तिनं मला तिच्या झोपडीतून आवाज दिला..!
 
ऊ छोटे सरकार या वजेस झोपडी मई..!
मी आपल्याला कोरा चहा करतीसू..!
 
झोपडीची चौकट माझ्या खांध्याइतकी उंच असल्यानं मी वाकून झोपडीत आलो. झोल्याआईनं चुल्हांग्नात राकील ओतून चुल्हीला जाळ लावला, एका पितळी पातील्यात तुटक्या कानाच्या तीन कपांचा अंदाज घेत चहा ठेवला.
 
मी झोपडी न्याहाळत होतो. झोल्याआईच्या एव्हढ्याश्या झोपडीत एक पिवळा बल्ब चालू होता, एका घडोंचीवर पाच-सहा गोधड्यांची वळकटी करून त्या गोधड्या व्यवस्थित रचून ठेवलेल्या होत्या. चार माठांची उथळण रचलेली होती. एका झोपडीला आधार म्हणून असलेल्या लाकडाला जर्मलची कॅटली टांगलेली होती, एक छोटासा देव्हारा होता अन् त्यात दोन-चार फुटू होते.
 
चहाला उकळी आली होती तिचा सुगंध माझ्या बसल्याजागी मला येत होता. झोल्याआई तिला सांडशीत ते पातेलं धरून त्याला जाळावर हलवीत होती, तसतस चहा उकळी घेत होता. अखेरला तो चहा गाळणीत धरून मला एका तुटक्या कानाच्या कपात चहा देऊन झोल्याआई थाटलीमध्ये चहा ओतून पित बसली. अधून मधून आमच्या गप्पा चालू होत्या.
 
एरवी सूर्य अस्ताला गेला होता. रोजंदारीवर लोकांच्या वावरात कामाला जाणाऱ्या बायका, गडी लोकं घराच्या वाटा धरून घराच्या दिशेने आपापल्या वाटा जवळ करत होते. राखूळीला म्हणून राखूळ्या पहाटेच घेऊन गेलेल्या बकऱ्या, शेरडं गावच्या वेशीतून आत आली. रानातल्या रानवाटेनं त्यांच्या खुरानं उधळलेली माती मावळतीच्या प्रकाशात आसमंतात विरून जाताना दिसू लागली होती. त्या मूत्रट मातीचा वास साऱ्या पायवाटेनं माझ्या पहूर येत होता.
 
मी आता झोल्याआईच्या अंगणात तिनं ठेवलेल्या, मोडकळीस आलेल्या बाजेवर बसून हे सगळं न्याहाळत होतो. झोल्याआईनं सांज सरायला देवाला दिवाबत्ती केली अन् एक दिवा बाहेर मोडक्या क्यानीत लावलेल्या तुळशीच्या समोर ठेऊन तिनं अस्ताला गेलेल्या सूर्याच्या दिशेनं डोक्यावर पदर घेऊन काहीतरी पुटपुटत सूर्याला नमस्कार केला.
 
काही वेळापूर्वी केलेल्या चहाची भांडी अन् तिचं कोड्यास ठेवायचं कडीचं डबड अन् दोन-चार भांडी ती अंगणात घासायला घेऊन आली. चुल्हीतून राखुंडा काढून तिनं एक बोकना तोंडात टाकला अन् तो तोंडात दाबून ती नारळाच्या काथीनं भांडी घासायला लागली. एरवी सर्वदूर काळोख दाटून आला होता.
 
 
झोल्याआईच्या अन् माझ्या गप्पा चालू होत्या. झोल्याआई मला गावात घडणाऱ्या कथा सांगत होती, तिच्या बालपणीच्या आठवणी सांगत होती. गाव-गावच्या पारावर बसून तिनं विकलेली टोपले, दूरडी अन् या तिच्या तीस सालच्या धंद्यात तिला आलेले अनुभव ती मला सांगत होती.
 
हे सांगत असताना तीला अनेकदा गहिवरून यायचं. आयुष्यभर तिनं उपसलेली कष्ट अन् अजूनही म्हातारपणाला तिला सुखाची चतकुर भाकर मिळत नव्हती. तिची उभी हयात कष्ट करण्यात निघून गेली अन् अजूनही अठरा विश्व दारिद्य्र तिच्या पाचवीला पुजलेले होते.
 
हे दुःख ऐकून घेणारं तिचं हक्काचं व्यक्ती तिला कुणी नसल्यानं ती हे सगळं माझ्यापाशी रितं करत होती. बोलून आसवं गाळून मोकळं होत होती, मी ही तिला समजेल अश्या सोप्यात भाषेत शहराच्या माझ्या कहाण्या सांगत होतो.
 
शहरात येणारे अनुभव, नोकरीचा असलेला दुष्काळ. कंत्राटी पद्धतीने काम करणारी कामगार, त्यांचं हे हलखीचं आयुष्य, रात्रंदिवस असलेली त्यांची ढोर मेहनत. माझं चालू असलेलं शिक्षण, नोकरीसाठी या ना त्या कंपनीच्या गेटवर मी करत असलेलो भटकंती अन् या प्रयत्नांना अजूनही कुठं न आलेलं यश‌.
माझं दुःख मी झोल्याआईपाशी रितं करत होतो अन् ती माझ्यापाशी‌. पण ; पर्याय नव्हता घंटाभर या आमच्या गप्पात कधी निघून गेला समजलं नाही.
 
आता निघायला हवं माय-बाप भाकरी खायला ताटकळतील म्हणून मी झोल्याआईला येतूया म्हणलं. तिनंही डोळ्यातली आसवं लुगड्याच्या पदराला टिपली. अन् मला ये जा छोटं सरकार गावची वाट जवळ केली की या म्हातारीच्या घरी. म्हणून एक बांबवाच्या कमटीपासून केलेली एक दूरडी माझ्या हातात दिली. माझ्या मायला माझ्याजवळ सांगावा धाडला की,ही दुरडी पहाटच्याला देऊळात फुलं घेऊन जायला राहून दे म्हणा आक्का..!
मी होकारार्थी मान हलवून घराची वाट धरली..!
 
 
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...