मुख्य सामग्रीवर वगळा

शिवनामायच्या कथा..! भाग-तीन

शिवनामायच्या कथा..! भाग-तीन
 
मी होकारार्थी मान हलविली अन् काथीने आवळलेले दोन बांबू ओढीतओढीत झोल्याआईच्या झोपडी पहूर घेऊन आलो. ती पण तीन बांबू ओढीतओढीत माझ्यामागून आली. बांबू अंगणात टाकून मी उभा राहिलो होतो, तितक्यात तिनं मला तिच्या झोपडीतून आवाज दिला..!
 
ऊ छोटे सरकार या वजेस झोपडी मई..!
मी आपल्याला कोरा चहा करतीसू..!
 
झोपडीची चौकट माझ्या खांध्याइतकी उंच असल्यानं मी वाकून झोपडीत आलो. झोल्याआईनं चुल्हांग्नात राकील ओतून चुल्हीला जाळ लावला, एका पितळी पातील्यात तुटक्या कानाच्या तीन कपांचा अंदाज घेत चहा ठेवला.
 
मी झोपडी न्याहाळत होतो. झोल्याआईच्या एव्हढ्याश्या झोपडीत एक पिवळा बल्ब चालू होता, एका घडोंचीवर पाच-सहा गोधड्यांची वळकटी करून त्या गोधड्या व्यवस्थित रचून ठेवलेल्या होत्या. चार माठांची उथळण रचलेली होती. एका झोपडीला आधार म्हणून असलेल्या लाकडाला जर्मलची कॅटली टांगलेली होती, एक छोटासा देव्हारा होता अन् त्यात दोन-चार फुटू होते.
 
चहाला उकळी आली होती तिचा सुगंध माझ्या बसल्याजागी मला येत होता. झोल्याआई तिला सांडशीत ते पातेलं धरून त्याला जाळावर हलवीत होती, तसतस चहा उकळी घेत होता. अखेरला तो चहा गाळणीत धरून मला एका तुटक्या कानाच्या कपात चहा देऊन झोल्याआई थाटलीमध्ये चहा ओतून पित बसली. अधून मधून आमच्या गप्पा चालू होत्या.
 
एरवी सूर्य अस्ताला गेला होता. रोजंदारीवर लोकांच्या वावरात कामाला जाणाऱ्या बायका, गडी लोकं घराच्या वाटा धरून घराच्या दिशेने आपापल्या वाटा जवळ करत होते. राखूळीला म्हणून राखूळ्या पहाटेच घेऊन गेलेल्या बकऱ्या, शेरडं गावच्या वेशीतून आत आली. रानातल्या रानवाटेनं त्यांच्या खुरानं उधळलेली माती मावळतीच्या प्रकाशात आसमंतात विरून जाताना दिसू लागली होती. त्या मूत्रट मातीचा वास साऱ्या पायवाटेनं माझ्या पहूर येत होता.
 
मी आता झोल्याआईच्या अंगणात तिनं ठेवलेल्या, मोडकळीस आलेल्या बाजेवर बसून हे सगळं न्याहाळत होतो. झोल्याआईनं सांज सरायला देवाला दिवाबत्ती केली अन् एक दिवा बाहेर मोडक्या क्यानीत लावलेल्या तुळशीच्या समोर ठेऊन तिनं अस्ताला गेलेल्या सूर्याच्या दिशेनं डोक्यावर पदर घेऊन काहीतरी पुटपुटत सूर्याला नमस्कार केला.
 
काही वेळापूर्वी केलेल्या चहाची भांडी अन् तिचं कोड्यास ठेवायचं कडीचं डबड अन् दोन-चार भांडी ती अंगणात घासायला घेऊन आली. चुल्हीतून राखुंडा काढून तिनं एक बोकना तोंडात टाकला अन् तो तोंडात दाबून ती नारळाच्या काथीनं भांडी घासायला लागली. एरवी सर्वदूर काळोख दाटून आला होता.
 
 
झोल्याआईच्या अन् माझ्या गप्पा चालू होत्या. झोल्याआई मला गावात घडणाऱ्या कथा सांगत होती, तिच्या बालपणीच्या आठवणी सांगत होती. गाव-गावच्या पारावर बसून तिनं विकलेली टोपले, दूरडी अन् या तिच्या तीस सालच्या धंद्यात तिला आलेले अनुभव ती मला सांगत होती.
 
हे सांगत असताना तीला अनेकदा गहिवरून यायचं. आयुष्यभर तिनं उपसलेली कष्ट अन् अजूनही म्हातारपणाला तिला सुखाची चतकुर भाकर मिळत नव्हती. तिची उभी हयात कष्ट करण्यात निघून गेली अन् अजूनही अठरा विश्व दारिद्य्र तिच्या पाचवीला पुजलेले होते.
 
हे दुःख ऐकून घेणारं तिचं हक्काचं व्यक्ती तिला कुणी नसल्यानं ती हे सगळं माझ्यापाशी रितं करत होती. बोलून आसवं गाळून मोकळं होत होती, मी ही तिला समजेल अश्या सोप्यात भाषेत शहराच्या माझ्या कहाण्या सांगत होतो.
 
शहरात येणारे अनुभव, नोकरीचा असलेला दुष्काळ. कंत्राटी पद्धतीने काम करणारी कामगार, त्यांचं हे हलखीचं आयुष्य, रात्रंदिवस असलेली त्यांची ढोर मेहनत. माझं चालू असलेलं शिक्षण, नोकरीसाठी या ना त्या कंपनीच्या गेटवर मी करत असलेलो भटकंती अन् या प्रयत्नांना अजूनही कुठं न आलेलं यश‌.
माझं दुःख मी झोल्याआईपाशी रितं करत होतो अन् ती माझ्यापाशी‌. पण ; पर्याय नव्हता घंटाभर या आमच्या गप्पात कधी निघून गेला समजलं नाही.
 
आता निघायला हवं माय-बाप भाकरी खायला ताटकळतील म्हणून मी झोल्याआईला येतूया म्हणलं. तिनंही डोळ्यातली आसवं लुगड्याच्या पदराला टिपली. अन् मला ये जा छोटं सरकार गावची वाट जवळ केली की या म्हातारीच्या घरी. म्हणून एक बांबवाच्या कमटीपासून केलेली एक दूरडी माझ्या हातात दिली. माझ्या मायला माझ्याजवळ सांगावा धाडला की,ही दुरडी पहाटच्याला देऊळात फुलं घेऊन जायला राहून दे म्हणा आक्का..!
मी होकारार्थी मान हलवून घराची वाट धरली..!
 
 
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड