मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्य आणि गणितं..!

आयुष्य आणि गणितं..!

पहाटेच्या वेळी जितकं गाव रहाटीचं जग बोलकं असतं त्याच्या कैक पट सकाळच्या प्रहरी शहरात चालू असलेल्या घडामोडी बोलक्या असतात डोळ्यांना समजून घेण्याची कुवत असली, मनात त्याबद्दल विचार करण्याची अन् दृश्य निरीक्षण करून समजून घेण्याची कुवत असली की ; मग आपण आपले रोजचे कामधंदे सोडून व्यस्थ असलेल्या या लोकांच्या लाईफ स्टाईलचा भाग न होता शहरातील ही कॉर्पोरेट विश्र्वात जगणारी माणसं आणि गाव रहाटीचं जगणं जगणारी माणसं यांच्यामधील एक दुवा बनून जातो.

या मधल्या माणसांची आयुष्यभर फरफट होत असते. तो धड शहराचा नसतो की धड खेड्यातला अन् कदाचित त्यामुळेच तो दोघांपेक्षा अधिकच सहनशील झालेला असतो अश्यावेळी.

असो...!

असच काहीसं आयुष्य मला लाभलं असल्यानं, माझी तारेवरची होणारी कसरत अन् आयुष्यात क्षणिक सुखाचा सोहळा करणं आता मला बऱ्यापैकी जमायला लागलं आहे. यासाठी मला कुठली किंमत मोजावी लागत नाही की, कोणाशी बोलावं लागत नाही. हो इतकं मात्र करावं लागतं की, खूप भटकंती करून हे क्षण साधावे लागतात. हल्ली शहर काही दिवसांपूर्वी मागे सुटले, त्यामुळे आता शहराची तेथील माणसांचं मला असलेलं आकर्षण प्रकर्षानं जाणवू लागलं आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणं, कॉर्पोरेट क्षेत्रातील नियमांच्या आधीन राहून काम करणं असं एक छोटं स्वप्न आहे माझं. अनेकदा हे सर्व अनुभवलं अन् अनेकदा हे सर्व हुलकावणी देऊन आयुष्यात फरफट होणे काय असतं याचासुद्धा अनुभव देऊन गेलं. तर या मधल्या माणसांची आयुष्यभर असलेली फरफट त्याला प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने निरीक्षण करायला शिकवते.

पहाट झाली की शहरं आपल्याशी बोलू लागतात. शहराच्या लोकांना मात्र वेळ नसतो कुणाशी बोलायला. पहाटेच फ्रेश मूडमध्ये लोकांची आपलं ऑफीस जवळ करण्याची धावपळ चालू असते. अन् मला रिकामटेकड्यासारखं फिरत या लोकांना न्याहाळत रहायला आवडतं.

मी माझ्या गाडीचं पेट्रोल खर्च करून,नाहीतर कधीतरी ती ही सोबत नसेल तर दोन-चार सिग्नल पाईच फिरून या लोकांची हे रोजची पहाट मनात भरून घेतो. मला असं जग न्याहाळत रहायला खूप आवडतं.
कामे सगळ्यांना आहे पण आपलं रिकामपण सेलिब्रेट करता यायला हवं ; अन् ते मी असं रोज पहाटे सिग्नलवर भटकत कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांचं वेलसेटल्ड आयुष्य न्याहाळत साजरं करत असतो. 

अनेकांना हे विचित्र वगैरे वाटेल, कारण असं आयुष्य जगणारी लोकं शहरात एका हातावर मोजता येईल इतकीच असावी कदाचित, ती ही नसावी अशी शंका आहे. माझ्यासारखी देशभरात, जगभरात ही अवस्था लिहणारीसुद्धा काही दहा-वीस माणसच असावी. 

कारण रिकामपण कोणाला आहे अन् ज्यांना आहे त्यांना असं शहर न्याहाळणे किंवा इतकं संवेदनशील मनाचं होवून जगणं शक्य नाही. हे मी आजवर पारखलेला माणसांचा स्वभाव यावरून लक्षात येतय. ज्याप्रमाणे माणूस माणूसकी हरवून बसला आहे,त्याच्या कैक पटीने माणसांचं संवेदनशील असणं आता हरवलं आहे. नाहीतर पूर्वी चौका-चौकात अन् सिग्नल-सिग्नलवर अशी माणसं भेटायची.

काही वर्षांपूर्वी म्हणजे चार-पाच झाली असेल तेव्हा मी शहरात नवखाच होतो. असाच शहर न्याहळणारा पण आपल्या आयुष्यात यशाचं शिखर गाठलेला एक पस्तिशितील तरुण मला भेटला होता. मी विशीत होतो असंच एक दिवस सिग्नलवर छानपैकी तयार होवून बाईकवर शहर न्याहाळत पुढे-पुढे चालत होतो.

लोकं काय करता, लोकांच्या हालचाली अन् मनात काय चालू असेल, सभोवतालचा परिसर असं सगळं न्याहाळत होतो अन् ते मनात ठेवून माझं निरीक्षण करत होतो. अशी माणसं खूप कमी पण आपल्या पठडीतला माणूस त्यांना भेटला की ती आपसूकच सहज ओळखता एकमेकांना.

तर हा पस्तिशितील तरुण असंच त्याच्या होंडा सिटीमधून हे जगणं अनुभवत असताना त्याला मी दिसलो. त्याने साधारण पाच-दहा मिनिट माझा पाटलाग करून मला थांबवलं, या अनोळखी शहरात तेव्हा इतक्या मोठ्या गाडीमधून मला आवाज देवून थांबवणारा तोच पहिला.
ब्लेझर, टाय, ब्लॅक शूज घातलेला, उंचपुरा, गोरा सडसडीत बांधा असलेला हा तरुण बघितला तर पंचविशीचा वाटेल इतका छान दिसायचा.
मी थांबलो, जुजबी बोलणं झालं सामान्य माणसं जो प्रश्न करता तो प्रश्न आम्ही एकमेकांना केला अन् आमची तार जुळली.

मग माझी बाईक एक ठिकाणी पार्क करून आम्ही एका कॉफी कॅफेवर गेलो. पंधरा-वीस मिनिटांच्या गप्पा झाल्या अन् त्यात बोलण्यातून कळून चुकलं की, त्याचा जॉब गेला आहे.

यामुळे तो गेले काही दिवस डिप्रेशनमध्ये आहे अन् हा डोक्यातील त्रास, येणारे असंख्य निगेटिव्ह विचार कमी करण्यासाठी तो पहाटे असं त्याच्या होंडा सिटीमधून फिरत असतो.
कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा तरुण भासावा असं जगत लोकांना न्याहाळत, विचार करत, शहराचे त्याला असलेले प्रचंड आकर्षण अन् सर्वात महत्त्वाचं ब्लेझर, सूट, टाय, ब्लॅक शूज घालून त्याचं या आलिशान गाडीमधून फिरणं इतक्यासाठीच होतं की या लोकांना तो बेरोजगार युवक आहे अन् असं वेडखुळ डोक्यात घेऊन भटकत असतो हे कळू नये इतकंच.

पुढे वीस-पंचवीस दिवस पहाटे एक दीड-तास आम्ही असच भटकत राहायचो, पहाटे ठरल्या जागी तो मला घ्यायला यायचा. अन् आम्ही बसथांबे,सिग्नल,उड्डाण पुलावरून खाली दिसणारी ट्रॅफीक, त्यांच्या आयुष्यात व्यस्थ असलेली माणसे न्याहाळत हे सगळं आमच्या नजरेत कैद करून घ्यायचो. पुढे दिवसभर तो त्याच्या बंद खोलीत या विषयावर लॅपटॉपमध्ये काहीतरी टायपत बसायचा हे त्यानं मला सांगितलं होतं.

असच एक दिवस तो पहाटे भेटला अन् सांगून गेला उद्यापासून आपलं असं भेटणं होणार नाही. कारण पुण्यासारख्या शहरात त्याला कॉर्पोरेट क्षेत्राचं असलेलं त्याला आकर्षण अन् त्याच क्षेत्रात त्याला एका कंपनीत एका खूप मोठ्या पदावर भेटलेली नोकरी.
आम्ही त्याचं यश सेलिब्रेट केलं अन् त्यानंतर कधी भेटलो नाही, मी आजही चार वर्षानंतर हे सगळं जगणं सातत्याने अनुभवत आहे. पुढे मला त्याची कधी आठवण आली नाही, कारण त्याच्या माझ्यासारखी ही माणसं अशीच असतात त्यांना एकतर माणसांचा सहवास नकोसा वाटतो.

अन् आपल्या आयुष्यात कुणी आलं की कधी एकदा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते असं या माणसांना होतं. त्यामुळं मला त्याचं जाणं त्याला माझं जाणं याबद्दल आम्हाला एकमेकांना काही सोयरसुतक नव्हतंच हे माझ्यासाठी सांगतो अन् कदाचित त्यालाही नसेल.

कधीतरी लिहल आम्ही शहरात भटकंती करून नेमकं काय करायचो ते सविस्तर..!

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड