मुख्य सामग्रीवर वगळा

औद्योगिक वसाहती अन् बरच काही..!

औद्योगिक वसाहती अन् बरच काही..!

सायंकाळ झाली की अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर माझं नॉर्मल आयुष्य मला अजूनच गुंतागुंतीचं वाटू लागतं. मग मी काळोखाला जवळ करत भटकत राहतो खाचखळगे असलेल्या आडवाटांना. शहरे ओळखीची झाली, काही अंशी शहरातील माणसंही ओळखीची झाली.

पण मला का कुणास ठाउक यातील कुणालाच जवळ करावंस वाटलं नाही,का.? हे गणित न उलगडणारे होते. शहरातील माणसं अन् त्यांच यंत्रवत असणं किंवा तसं आयुष्य जगणं मला नेहमीच जिव्हारी लागणारं होतं. पण पैसा माणसाला अक्कल शिकवतो अन् मग मी ही या यंत्रवत आयुष्याचा बळी पडलो.

होत काही नाही,
बस सेकंड शिफ्ट करून फ्लॅटवर आलं की, येताना औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या यंत्रांची घरघर अंगावर येते. आयुष्याला कंटाळलेले अन् गावाकडे पर्याय नाही म्हणून शहरात आलेल्या तरुणांचे रातदिवस अनवाणी पायांनी चालून, सेफ्टी शूजच्या पावलांनी गुळगुळीत झालेले रस्ते जवळची वाटू लागतात.

ऐन तारुण्यात लग्न जुळेना म्हणून गावच्या बक्कळ पोरांनी शहरं जवळ केली, पोरींच्या बापांनी पोरांची ही चालही ओळखली आणि पोरांचे जुळता जुळेना. 
मग अश्यात अनेकजन दारूच्या आहारी गेली, अनेकजण रात्रंदिवस १२-१६ तास ओव्हर टाईम काम करून छातीची खपाटी दिसेपर्यंत काम करत राहिली. काहींनी वेगळाच मार्ग अवलंबला. 

त्या वाटेला आजवर जाणं आलं नाही. पोरांनी वसाहतीच्या दोन कोस दूर असलेल्या विशेष भागात जाऊन आपली शरीराची भूक भागवली. पहाटेच फर्स्ट शिफ्टला जातांना पोरांनी तीच निरोधं रस्त्याच्या कुपाटीला फेकून दिली. येणारी-जाणारी प्रत्येक स्त्री,प्रत्येक पुरुष ती न्याहाळत राहिली. 

बेक्कार आयुष्य काय असावं यापेक्षा. १२-१६ तास ओव्हरटाईम काम करून छातीची खपाटी झालेली ही पोरं बघितली की, त्यांचं हे असं रोजचं थोडं-थोडं मरणं बघून आयुष्याला घेऊन आपण किती सिरियस विचार करतो हे कळून येतं. 

माझ्या वयाची पोरं याच मार्गाला जाऊन ऐन पंचविशीत अर्ध आयुष्य जगून बसली. जी नाही ती अजमावून, जी नाही ती संगत करून बसली. आम्हाला अजूनही "नामदेव ढसाळ" यांचा "गोलपिठा" अंगावर येतो.

संवेदनशील माणसांचं असच असावं असं हल्ली वाटू लागलं आहे, आणि हेच बरं असंही वाटून गेलं. कारण दोन-चार सालापूर्वी भर वसाहतीत भोसकून दिलेल्या मुलाला बघितलं. तेव्हा माणसं कुठल्या थराला जातील याचा अंदाज येऊन गेला.
अन् मी अंतर राखूनच राहू लागलो या शहराच्या लोकांपासून, नाईलाज म्हणून आलेल्या गावच्या या तरण्या पोरांपासून.

असो चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून शहर न्याहाळत असलो की जवळच असलेल्या एअरपोर्ट मधून जाणाऱ्या विमानाला हात लावासा वाटतो. त्याच्या आत बसावं वाटतं पण नशीब कुठलं आपलं, असो माणसच बसतात त्याच्यात पण तीही शहराकडची म्हणून तेही हल्ली नकोसं वाटतं. त्याची चमकणारी लाईट दूरपर्यंत जास्तोवर बघत रहायला डोळ्यांना आवडतं हल्ली.

काल मेसवाल्या ताई फुरसतीत असल्यानं बोलल्या दादा तुमची कथा वाचली कालची दैनिकात आलेली. गरिबीची, गरीब लोकांची कळ हाय तुम्हाला. तीला काय सांगणार होतो तिचं-माझं रोजचं आयुष्य, आयुष्यात येणं-जाणं करणारे क्षण त्या कथेतून मांडले होते.

तिनं त्या खुशीत दोन गुलाबजाम ताटात शिल्लक दिले अन् डोळ्यावर आलेली बट सावरली. हे सगळं माझ्या दैनिकात आलेल्या कथेसाठी नव्हतंच हे तेव्हाच कळून चुकलं. आता काय बोलायचं होतं, एकतर मेस या महिन्याच्या शेवटच्या दिवसाला सुटणार होती. नाहीतर माझं मेसवर जेवायला येणं बंद होणार होतं. 

तिची चूकी काही नव्हती, तिचाही दादला कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार होता. अन् मेसवर जेवायला येणारी बहुतांश मुलंही तीच दोन कोसावर जाऊन आपली शरीराची भूक भागवून घेणारी होती.
तिचाही गैरसमज झाला असावा, की मीही त्यातला असेल ; पण मला लोकांच्या या कथा जवळच्या वाटतात म्हणून मी तिथे जात राहिलो. अन् एक दिवस नकळत थांबून घेतलं.
अजून बरच काही..!

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...