मुख्य सामग्रीवर वगळा

औद्योगिक वसाहती अन् बरच काही..!

औद्योगिक वसाहती अन् बरच काही..!

सायंकाळ झाली की अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर माझं नॉर्मल आयुष्य मला अजूनच गुंतागुंतीचं वाटू लागतं. मग मी काळोखाला जवळ करत भटकत राहतो खाचखळगे असलेल्या आडवाटांना. शहरे ओळखीची झाली, काही अंशी शहरातील माणसंही ओळखीची झाली.

पण मला का कुणास ठाउक यातील कुणालाच जवळ करावंस वाटलं नाही,का.? हे गणित न उलगडणारे होते. शहरातील माणसं अन् त्यांच यंत्रवत असणं किंवा तसं आयुष्य जगणं मला नेहमीच जिव्हारी लागणारं होतं. पण पैसा माणसाला अक्कल शिकवतो अन् मग मी ही या यंत्रवत आयुष्याचा बळी पडलो.

होत काही नाही,
बस सेकंड शिफ्ट करून फ्लॅटवर आलं की, येताना औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या यंत्रांची घरघर अंगावर येते. आयुष्याला कंटाळलेले अन् गावाकडे पर्याय नाही म्हणून शहरात आलेल्या तरुणांचे रातदिवस अनवाणी पायांनी चालून, सेफ्टी शूजच्या पावलांनी गुळगुळीत झालेले रस्ते जवळची वाटू लागतात.

ऐन तारुण्यात लग्न जुळेना म्हणून गावच्या बक्कळ पोरांनी शहरं जवळ केली, पोरींच्या बापांनी पोरांची ही चालही ओळखली आणि पोरांचे जुळता जुळेना. 
मग अश्यात अनेकजन दारूच्या आहारी गेली, अनेकजण रात्रंदिवस १२-१६ तास ओव्हर टाईम काम करून छातीची खपाटी दिसेपर्यंत काम करत राहिली. काहींनी वेगळाच मार्ग अवलंबला. 

त्या वाटेला आजवर जाणं आलं नाही. पोरांनी वसाहतीच्या दोन कोस दूर असलेल्या विशेष भागात जाऊन आपली शरीराची भूक भागवली. पहाटेच फर्स्ट शिफ्टला जातांना पोरांनी तीच निरोधं रस्त्याच्या कुपाटीला फेकून दिली. येणारी-जाणारी प्रत्येक स्त्री,प्रत्येक पुरुष ती न्याहाळत राहिली. 

बेक्कार आयुष्य काय असावं यापेक्षा. १२-१६ तास ओव्हरटाईम काम करून छातीची खपाटी झालेली ही पोरं बघितली की, त्यांचं हे असं रोजचं थोडं-थोडं मरणं बघून आयुष्याला घेऊन आपण किती सिरियस विचार करतो हे कळून येतं. 

माझ्या वयाची पोरं याच मार्गाला जाऊन ऐन पंचविशीत अर्ध आयुष्य जगून बसली. जी नाही ती अजमावून, जी नाही ती संगत करून बसली. आम्हाला अजूनही "नामदेव ढसाळ" यांचा "गोलपिठा" अंगावर येतो.

संवेदनशील माणसांचं असच असावं असं हल्ली वाटू लागलं आहे, आणि हेच बरं असंही वाटून गेलं. कारण दोन-चार सालापूर्वी भर वसाहतीत भोसकून दिलेल्या मुलाला बघितलं. तेव्हा माणसं कुठल्या थराला जातील याचा अंदाज येऊन गेला.
अन् मी अंतर राखूनच राहू लागलो या शहराच्या लोकांपासून, नाईलाज म्हणून आलेल्या गावच्या या तरण्या पोरांपासून.

असो चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून शहर न्याहाळत असलो की जवळच असलेल्या एअरपोर्ट मधून जाणाऱ्या विमानाला हात लावासा वाटतो. त्याच्या आत बसावं वाटतं पण नशीब कुठलं आपलं, असो माणसच बसतात त्याच्यात पण तीही शहराकडची म्हणून तेही हल्ली नकोसं वाटतं. त्याची चमकणारी लाईट दूरपर्यंत जास्तोवर बघत रहायला डोळ्यांना आवडतं हल्ली.

काल मेसवाल्या ताई फुरसतीत असल्यानं बोलल्या दादा तुमची कथा वाचली कालची दैनिकात आलेली. गरिबीची, गरीब लोकांची कळ हाय तुम्हाला. तीला काय सांगणार होतो तिचं-माझं रोजचं आयुष्य, आयुष्यात येणं-जाणं करणारे क्षण त्या कथेतून मांडले होते.

तिनं त्या खुशीत दोन गुलाबजाम ताटात शिल्लक दिले अन् डोळ्यावर आलेली बट सावरली. हे सगळं माझ्या दैनिकात आलेल्या कथेसाठी नव्हतंच हे तेव्हाच कळून चुकलं. आता काय बोलायचं होतं, एकतर मेस या महिन्याच्या शेवटच्या दिवसाला सुटणार होती. नाहीतर माझं मेसवर जेवायला येणं बंद होणार होतं. 

तिची चूकी काही नव्हती, तिचाही दादला कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार होता. अन् मेसवर जेवायला येणारी बहुतांश मुलंही तीच दोन कोसावर जाऊन आपली शरीराची भूक भागवून घेणारी होती.
तिचाही गैरसमज झाला असावा, की मीही त्यातला असेल ; पण मला लोकांच्या या कथा जवळच्या वाटतात म्हणून मी तिथे जात राहिलो. अन् एक दिवस नकळत थांबून घेतलं.
अजून बरच काही..!

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड