मुख्य सामग्रीवर वगळा

Industrial सुट्टी..!

Industrial सुट्टी..!

कालची सेकंड शिफ्ट करून फ्लॅटवर आलो अन् उद्या सुट्टी म्हणून उद्याच्या दिवस आराम याच कल्पनेत कंपनीतून सेक्युरिटी गार्डने चेकआऊट केलं अन् मी बाहेर पडलो.
जोडीदार मागेच होता, गाय छाप खाणारा आहे तो. शिफ्ट सुटली की मग बाथरूममध्ये जाऊन त्याची गाय छाप बुटाच्या आत घालतो, अन् मग सेक्युरिटी गार्डच्या चेकींग कॅबिनकडे तो वळतो. साधारण वर्षभरापासून माझा रूम पार्टनर आणि इथे कंपनीतही सोबती आहे.

दोन वेळा हजार-हजार रुपये फाईन भरून आणि पुढे गाय छाप जवळ सापडली तर कंपनीतून काढून टाकीन. या सुपरवायझरच्या धमकीलाही तो जुमानत नाही आणि बिनधास्त गाय छाप कंपनीच्या आत घेऊन येतो. त्याची ती तलफ आणि त्याचं ते गाय छाप लपवण्याचं कौशल्य बघितलं की, असं वाटतं इतकं डोकं त्याने कंपनीत वापरले असते तर नक्कीच सुपरवायझर झाला असता. आणि मग सगळ्या गाय छाप खाणाऱ्या पोरांना मोकाट सूट त्याने दिली असती.

असो मी बाहेर पडलो गेटच्या बाहेर तिसऱ्या शिफ्टसाठी मुलं कुडकुडत बाहेर कंपनीच्या गेटवर उभी होती. काही पाच-सहाजण नवखेच होते अन् कंपनीत काम भेटन या आशेनं ते आज दिवसभरातून तिसऱ्यांदा फर्स्ट,सेकंड आणि आता थर्ड शिफ्टमध्ये काम भेटेल म्हणून गेटवर उभे होते.

कंत्राटी पद्धतीने काम करायला आलेली ही मुलं बहुदा खेड्यापाड्यातील. रूम घेऊन नव्यानं त्यांनी संसार थाटलेला असतो त्यांचा एकट्याचा. कित्येक स्वप्न पाहून शहरे जवळ केली असतात, कित्येक सुपरवायझरचे पाय धरून काम मिळवलं असतं.

जेमतेम शिक्षण, अनुभव नाही त्यामुळे त्यांना लवकर कुणी कामावर घेत नाही. तेव्हा अश्या मुलांची पहिल्या महिनाभर वाईट अवस्था असते. कधीतर पार्ले बिस्कीट पुड्यावर दिवस काढणारे मित्र मी बघितले स्वतःही अनुभवले. यांचं स्ट्रगल वाईट्ट आहे. हे सर्व जवळून अनुभवले, बघितले असल्यानं वाईट वाटते या मुलांसाठी. त्या मुलांना आज काम भेटल की नाही हे बघण्यासाठी मी गेटवर दहा-पाच मिनिट थांबलो.

रोजची तिघं पोरं कामावर आलेली नव्हती मग त्यातली तीन पोरं सुपरवायझरने आत घेतली. कंपनीत आज त्यांचा काम करण्याचा पहिला दिवस असावा म्हणून ती खुशीत गेटच्या आत कार्ड दाखवून चेक इन करून आत गेले.
तिघे-चौघे रूमवर जाऊन तरी काय करणार म्हणून कंपनीच्या बाजूला असलेल्या आडवाटेला रात्री साडेबारा वाजता शेकोटी करून शेकत बसले.

आजही माझ्या मित्राची गाय छाप सेक्युरीटी गार्डकडून धरल्या गेली नाही आणि उद्या सुट्टी याचा त्याला काय मोप आनंद झाला म्हणून तो रस्त्यानं उड्या मारतच चालत होता. मी माझ्याच कंपनीच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीना खेटून चालत होतो, आत मशिनरी पुन्हा चालू झाल्या होत्या.

फॉर्कक्लीपचा धडकी भरणारा हॉर्न पुन्हा एकदा कंपनीत निनादत होता. प्यालेट धडाधड एकावर एक आदळत होती अन् कंपनीचं प्रॉडक्ट प्रॉडक्शन काढणे चालू झाले होते. कंपनीच्या आवारात असलेल्या उंचउंच चिमण्या अन् त्यातून निघणारा धूर काळोखात अजूनच औद्योगिक वसाहतीमध्ये काळोख निर्माण करत होता.

मधूनच कंपनीतील अॅबुलंन्स मोठ्याने आवाज करीत कंपनीच्या आवारात घुमत होती. विपरीत काही झालं असावं कंपनीत,त्या खबरा कधीच कंपनीच्या बाहेर येत नाही, तिथेच दाबल्या जातात.

असो हे सगळं दृश्य बघून मला माझे जुने दिवस आठवतात.
सीव्ही घेऊन मी औद्योगिक वसाहतीच्या प्रत्येक कंपनीच्या गेटवर भटकंती केली. कुठे माझी बारीक अंगकाठी बघून तर कधी मी खूप शिकलो आहे अन् शिक्षण बघता मला कंत्राटी कामगार म्हणून कामावर घेता येत नाही म्हणून गेटवरून कारणे देऊन मागारी पाठवण्यात आलं.
त्यामुळं हा कंपनीत काम करायला लागायचे म्हंटले की करावा लागणारा संघर्ष वाईट आहे.

साडेबारा वाजता फ्लॅटवर येऊन कॉटवर जे पडलो थकव्याने आपसुकच डोळे मिटले, पहाटे मित्राच्या हाकेसरशी जाग आली. अंघोळ वगैरे आवरून कामगार चौकात येऊन बसलो. माझ्यासारख्या असंख्य कामगारांच्या व्यथा इथे ऐकायला भेटतात, म्हणून इथे रोज येणं होतंच. 

पाचात सात कटिंग चहा होतात सिगारेट पिणारे आपला अंदाज दाखवत त्यांचे झुरके सोडवत चहा घेत राहतात. माझ्यासारखे चहाच्या टपरीतला पेपर शोधून तो वाचत बसतात. 

रविवार असला की सगळं कसं निवांत निवांत असतं. कुणी कंत्राटी कामगार पहाटेच देशी पिऊन चौकाच्या एकांगाला असलेल्या गल्लीत लोळत पडलेला असतो.

अश्यावेळी जे काही तो बोलतो ते सगळं वास्तव अन् त्याची करूण कहाणी सांगणारं असतं. बारा साडेबारा वाजले की पावलं मेसकडे वळतात, आज रविवार नॉनव्हेज मस्त चोपून हानायचे अन् फ्लॅटवर येऊन कॉटवर पडून रहायचं.
कुणी वाचत राहतं, कुणी आराम करते तर कुणी काय तर कुणी काय मी हे असं लिहत बसतो..!

Written by
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड