मुख्य सामग्रीवर वगळा

Reading बुक्स..!

Reading बुक्स..!

माझा प्रवास वाचनाचा...!

साधारण चार वर्षांपासून माझा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. चार वर्षांच्या या काळात असंख्य कथा, कविता, ललित लेखन आणि इतर अश्या अनेक विषयांवर लेखन केलं.
परंतु चार वर्षांच्या या प्रवासात अलीकडे कुठेतरी मला वाटायला लागलं होतं की, आपल्या लिखाणात कुठेतरी तोचतोचपणा येतोय आणि एक ठराविक मर्यादपर्यंतच आपण लेखन करतोय. 

यात प्रगती होण्यासाठी आपल्या लिखाणाला आपल्याला योग्य तो आयाम देऊन. आपल्या मनाला जे लेखन हवं आहे ; जे वाचक वर्गाच्या मनावर भूरळ घालणारे ठरेल, अश्या लिखाणासाठी मला माझं एकूण जे थोडेफार वाचन आहे, ते मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल असा विचार मनात येऊन गेला. 

जेणेकरून मी या माझ्या मर्यादित लिखाणाच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक वेगळं साहित्य माझ्या हातून निर्माण होईल. जे मराठी वाचकांच्या मनाशी रुंजी घालू बघणारं अन् त्याना हवंहवंसं वाटू लागेल.

सोबतच समाजातील अनेक प्रश्न, घडामोडी, अश्या अनेक विषयांना घेऊन केलेलं लेखन मी वाचेल आणि या वाचनाच्या माध्यामतून चिंतन करेल. ज्यामुळे माझे विचार अजून प्रगल्भ होतील‌‌. अश्या या आणि अनेक विचारांना घेऊन साधारण दोन वर्षांपूर्वी माझा वाचनाचा प्रवास सुरू झाला.

आजतागात या दोन वर्षात मी आजवर जवळजवळ दीडशेच्या आसपास पुस्तके वेळ भेटेल तसे वाचन करून संपवले. हे पुस्तके मिळविण्यासाठी अनेक अडचणी मला येत गेल्या, परंतु वाचनाचं हे वेड मला शांत बसू देत नव्हते.

त्यामुळे माझा हा प्रवास कितीही अडथळे येत असतानाही आजवर चालूच आहे. 

माझी आर्थिक परिस्थिती नसतानाही माझ्या कुवतीनुसार मी पुस्तकं विकत घेत होतो. वाचनालयाच्या माध्यमातून काही पुस्तके वाचण्यासाठी मिळवत होतो. सोबतच अनेक पुस्तकं जे मला खरेदी करण्यासाठी आवाक्या बाहेरची असतील ती मी पीडीफ फॉरमॅटमध्ये असेल तर ती ही वाचत होतो. रद्दीच्या दुकानात जुन्या पुस्तकांच्या किंमतीत मला काही पुस्तके उपलब्ध होत गेली, जे दर्जेदार असो नसो ती मी वाचत गेलो.

पुढे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पुस्तकांच्या संदर्भात लेखन करू लागलो अन् अवघ्या महाराष्ट्रातून माझ्या या लिखाणाला उदंड प्रतिसाद भेटला. अनेकांनी या माझ्या थोडक्यात पुस्तक परिचय करून देण्याच्या कल्पनेचे स्वागत केले आणि अश्या पद्धतीने पुढे मला महाराष्ट्र भरातून अनेक लेखकांचे पुस्तकं अभिप्रायार्थ भेट म्हणून येऊ लागले. मी ही वेळोवेळी या पुस्तकांच्या बाबतीत मला काय वाटले हे पुस्तक वाचून लिहू लागलो. 

खऱ्या अर्थाने मग अश्या प्रकारे माझा हा पुस्तक वाचनाचा प्रवास सुरू झाला. चालू वर्षात या माध्यमातून मी बऱ्याच पुस्तकांना वाचले आणि यातील अनेक पुस्तकांचे परीक्षण सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक ब्लॉग माध्यमातून मांडले. या ब्लॉगच्या माध्यमातून माझे हे पुस्तक परीक्षण देश-विदेशातील अनेक मराठी वाचकांपर्यंत मी पोहचू शकलो.

अश्यावेळी मनात हे ही येऊन गेलं की मराठी वाचन चळवळ वाढविण्यासाठी या प्रकारे आपण प्रयत्न करू शकतो, त्या दिशेनं मग मी पावलं टाकण्यास सुरुवात केली.

या माध्यमातून आजच्या नवख्या वाचक वर्गाला नेमकं काय वाचावं..? वाचनाची सुरुवात कोणत्या पुस्तकांपासून करावी..? हे कळण्यासाठी मदत होऊ लागली. अश्या प्रकारे माझ्या पुस्तक परीक्षणातून असंख्य तरुण वाचक वर्गाशी मी जोडल्या गेलो.

ज्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली अन् या माझ्या वाचनाच्या प्रवासात माझ्यासारखे असंख्य तरुण वाचन करू लागले. यातील अनेकजण वेळोवेळी संबंधित विषयाला घेऊन माझ्याशी बोलू लागले.

अजून बरच काही आहे, निवांत शेअर करेल कधीतरी..!

असा हा थोडक्यात माझा वाचनप्रवास.

अलीकडे वाचलेली काही पुस्तके :

मुसाफिर, माळझरे, मदर - मॅक्झिम गोर्की, रुटस्, साखळीचं स्वतंत्र, सॅक्सोफोन वरातीत वाजवायचं वाद्य नव्हे, प्रांजल, शरणागत प्रपत्ती, हॉप इज द थिंग - एमिली डीकींन्सन, अॅडम, अलकेमिस्ट, जननायक तंट्या भिल, लज्जा-तस्लिमा नसरीन,लेटर्स फ्रोम जेल ,जहं जहं चरण पडे गौतम के - तिक न्यात हन्ह, बनगरवाडी, गाफील, टारफुला, अमृतवेल, माझी जन्मठेप, साद सागराची, फकिरा, रानसोबती, मलाला, तीन शिल्पकार, प्रिन्सेस डायना, कोल्हट्याचं पोर, मला उध्वस्थ व्हायचंय, शेतकऱ्याचा आसूड, एक होता कार्व्हर, केशवसुतांची कविता, अग्नीपंख, आक्रात आरक्षण आणि विक्रांत योद्धा, संमेलनाच्या मांडवाखालून, तैपी,चौदा पत्रे,द कलर पर्पल इत्यादी पुस्तके गेल्या काही दिवसांत वाचलेली आहेत.

Written by
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...