मुख्य सामग्रीवर वगळा

Reading बुक्स..!

Reading बुक्स..!

माझा प्रवास वाचनाचा...!

साधारण चार वर्षांपासून माझा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. चार वर्षांच्या या काळात असंख्य कथा, कविता, ललित लेखन आणि इतर अश्या अनेक विषयांवर लेखन केलं.
परंतु चार वर्षांच्या या प्रवासात अलीकडे कुठेतरी मला वाटायला लागलं होतं की, आपल्या लिखाणात कुठेतरी तोचतोचपणा येतोय आणि एक ठराविक मर्यादपर्यंतच आपण लेखन करतोय. 

यात प्रगती होण्यासाठी आपल्या लिखाणाला आपल्याला योग्य तो आयाम देऊन. आपल्या मनाला जे लेखन हवं आहे ; जे वाचक वर्गाच्या मनावर भूरळ घालणारे ठरेल, अश्या लिखाणासाठी मला माझं एकूण जे थोडेफार वाचन आहे, ते मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल असा विचार मनात येऊन गेला. 

जेणेकरून मी या माझ्या मर्यादित लिखाणाच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक वेगळं साहित्य माझ्या हातून निर्माण होईल. जे मराठी वाचकांच्या मनाशी रुंजी घालू बघणारं अन् त्याना हवंहवंसं वाटू लागेल.

सोबतच समाजातील अनेक प्रश्न, घडामोडी, अश्या अनेक विषयांना घेऊन केलेलं लेखन मी वाचेल आणि या वाचनाच्या माध्यामतून चिंतन करेल. ज्यामुळे माझे विचार अजून प्रगल्भ होतील‌‌. अश्या या आणि अनेक विचारांना घेऊन साधारण दोन वर्षांपूर्वी माझा वाचनाचा प्रवास सुरू झाला.

आजतागात या दोन वर्षात मी आजवर जवळजवळ दीडशेच्या आसपास पुस्तके वेळ भेटेल तसे वाचन करून संपवले. हे पुस्तके मिळविण्यासाठी अनेक अडचणी मला येत गेल्या, परंतु वाचनाचं हे वेड मला शांत बसू देत नव्हते.

त्यामुळे माझा हा प्रवास कितीही अडथळे येत असतानाही आजवर चालूच आहे. 

माझी आर्थिक परिस्थिती नसतानाही माझ्या कुवतीनुसार मी पुस्तकं विकत घेत होतो. वाचनालयाच्या माध्यमातून काही पुस्तके वाचण्यासाठी मिळवत होतो. सोबतच अनेक पुस्तकं जे मला खरेदी करण्यासाठी आवाक्या बाहेरची असतील ती मी पीडीफ फॉरमॅटमध्ये असेल तर ती ही वाचत होतो. रद्दीच्या दुकानात जुन्या पुस्तकांच्या किंमतीत मला काही पुस्तके उपलब्ध होत गेली, जे दर्जेदार असो नसो ती मी वाचत गेलो.

पुढे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पुस्तकांच्या संदर्भात लेखन करू लागलो अन् अवघ्या महाराष्ट्रातून माझ्या या लिखाणाला उदंड प्रतिसाद भेटला. अनेकांनी या माझ्या थोडक्यात पुस्तक परिचय करून देण्याच्या कल्पनेचे स्वागत केले आणि अश्या पद्धतीने पुढे मला महाराष्ट्र भरातून अनेक लेखकांचे पुस्तकं अभिप्रायार्थ भेट म्हणून येऊ लागले. मी ही वेळोवेळी या पुस्तकांच्या बाबतीत मला काय वाटले हे पुस्तक वाचून लिहू लागलो. 

खऱ्या अर्थाने मग अश्या प्रकारे माझा हा पुस्तक वाचनाचा प्रवास सुरू झाला. चालू वर्षात या माध्यमातून मी बऱ्याच पुस्तकांना वाचले आणि यातील अनेक पुस्तकांचे परीक्षण सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक ब्लॉग माध्यमातून मांडले. या ब्लॉगच्या माध्यमातून माझे हे पुस्तक परीक्षण देश-विदेशातील अनेक मराठी वाचकांपर्यंत मी पोहचू शकलो.

अश्यावेळी मनात हे ही येऊन गेलं की मराठी वाचन चळवळ वाढविण्यासाठी या प्रकारे आपण प्रयत्न करू शकतो, त्या दिशेनं मग मी पावलं टाकण्यास सुरुवात केली.

या माध्यमातून आजच्या नवख्या वाचक वर्गाला नेमकं काय वाचावं..? वाचनाची सुरुवात कोणत्या पुस्तकांपासून करावी..? हे कळण्यासाठी मदत होऊ लागली. अश्या प्रकारे माझ्या पुस्तक परीक्षणातून असंख्य तरुण वाचक वर्गाशी मी जोडल्या गेलो.

ज्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली अन् या माझ्या वाचनाच्या प्रवासात माझ्यासारखे असंख्य तरुण वाचन करू लागले. यातील अनेकजण वेळोवेळी संबंधित विषयाला घेऊन माझ्याशी बोलू लागले.

अजून बरच काही आहे, निवांत शेअर करेल कधीतरी..!

असा हा थोडक्यात माझा वाचनप्रवास.

अलीकडे वाचलेली काही पुस्तके :

मुसाफिर, माळझरे, मदर - मॅक्झिम गोर्की, रुटस्, साखळीचं स्वतंत्र, सॅक्सोफोन वरातीत वाजवायचं वाद्य नव्हे, प्रांजल, शरणागत प्रपत्ती, हॉप इज द थिंग - एमिली डीकींन्सन, अॅडम, अलकेमिस्ट, जननायक तंट्या भिल, लज्जा-तस्लिमा नसरीन,लेटर्स फ्रोम जेल ,जहं जहं चरण पडे गौतम के - तिक न्यात हन्ह, बनगरवाडी, गाफील, टारफुला, अमृतवेल, माझी जन्मठेप, साद सागराची, फकिरा, रानसोबती, मलाला, तीन शिल्पकार, प्रिन्सेस डायना, कोल्हट्याचं पोर, मला उध्वस्थ व्हायचंय, शेतकऱ्याचा आसूड, एक होता कार्व्हर, केशवसुतांची कविता, अग्नीपंख, आक्रात आरक्षण आणि विक्रांत योद्धा, संमेलनाच्या मांडवाखालून, तैपी,चौदा पत्रे,द कलर पर्पल इत्यादी पुस्तके गेल्या काही दिवसांत वाचलेली आहेत.

Written by
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...