मुख्य सामग्रीवर वगळा

life lessons..!

Life Lessons..! 

आयुष्याकडे फार काही अपेक्षा न ठेवताच जगण्यात स्वार्थ आहे असं अलीकडे वाटू लागलं. विचार केला तर आयुष्यात अन् मनात एकाचवेळी असंख्य वादळे उठले आहे. त्यांना सावरतांना वेळोवेळी पण हळूहळू आयुष्य देऊ करणारे तडाखे, एक दिवस आयुष्यातून उठून जायला कारणी ठरतील असे दिसू लागलं आहे.

नॉर्मल माणसांच्या आयुष्यात जसं सांज सरली की काळोख दाटून येतो. तसं माझ्या बाबतीत नाही माझ्या आयुष्यात सदैव काळोख दाटून आलेला  भासतो किंवा आहे. भर दिवसा शहरात कारण नसतांना अनवाणी भटकत राहतो, तितकंच रात्रीच्या गाढ झोपेतही.

शहरं ओळखीची वाटू लागतात अन् दिवसा असलेला शहरातील हा प्रकाश गाढ झोपेतही डोळे दिपवून टाकतो.

अलीकडे आयुष्य का जगतो किंवा जगण्याला कारण शोधत आहे. बऱ्याच गोष्टी नॉर्मल माणसांच्या आयुष्यासारखे एका सरळ रेषेत राहून आणि आयुष्याने समोर जे वाढून ठेवलं आहे ते स्वीकारून जगलो तर सगळं नॉर्मल आहे पण अश्या गोष्टीत मला स्वारस्य नाही.

मी आयुष्याला घेऊन आखून ठेवलेले काही माईलस्टोन आहे अन् ती सर करत आयुष्य जगण्याची मनाला अन् शरीराला दोघांनाही सवय झाली आहे. त्यामुळं काही माईलस्टोन सर करत असतांना आयुष्याची अन् माझी होणारी फरफट दिसून येत आहे.

अलीकडे जे माझ्यासाठी सर्वच खूप सहज होतं ते खूप अवघड होऊन बसलं आहे ; अन् खूप प्रयत्न करूनही आता वाटतं की थांबायला हवं एकतर आपल्या आपण निवडलेल्या आयुष्य जगण्याच्या वाटेवरून.

एका सरळ रेषेत आयुष्य जगायला शिकून घ्यावं ; पण तिथे मला जे हवं किंवा मला आयुष्यात जे काही साद्य करायचं आहे, ते साद्य होणार नाही. त्यामुळे ही फरफट अजून पुढे जितकी वर्ष चालेल तितकी वर्ष स्वीकारून चालत रहायचं आहे.

जगण्याला जर कारणच नाही भेटलं अन् आयुष्याच्या या मार्गावर येणारे अनेक माईलस्टोन सर नाहीच करता आली तर मग तिथच थांबून ही फरफट अनुभवत रहायची आहे,जोवर शक्य होईल तोवर. 

जितकं सहज आयुष्य थांबलं आहे, तितकंच सहज आता व्यक्त होणं थांबेल.

Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...