मुख्य सामग्रीवर वगळा

इंडस्ट्रिअल विश्व..!

इंडस्ट्रिअल विश्व..!

आज एका अश्याच मीटिंगला उपस्थित होतो. दिवसेंदिवस शहरं वाढत चालली आहे, जसजशी शहरं वाढीस लागली तसतशी शहरात रोजंदारी उपलब्ध होण्यासाठी विविध कंपन्या, मॉल्स, छोटे-मोठे उद्योग समूह निर्माण झाले. शहरात बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध झाला.

सुरुवातीला जवळच्या चार-दोन तालुक्यातील अन् आता हळूहळू जवळच्या तीन-चार जिल्ह्यातील, कामगार वर्ग औरंगाबाद शहर आणि शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करायला शहरात येऊ लागला.

पाच दशकं पूर्ण होऊन गेली शहरातील बऱ्याच घरातील दोन पिढ्यांची हयात या कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार वर्ग म्हणून निघून गेली. 
वेळोवेळी अनेक सोयी-सुविधा त्यांना उपलब्ध झाल्या अन् अनेकदा त्यांच्यावर अन्याय झाला. अनेकवेळा त्यांनी कामगार वर्गाची युनियन स्थापन करून प्रश्न मार्गी लावण्याचा विचार केला ; पण हे सर्व प्रश्न तितक्याच मर्यादित काळासाठी सुटले अन् पुन्हा जैसे थे अवस्था झाली.

मी काही कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार नाही ; आयुष्यात हे जगणं फक्त तीन महिने जगलो आहे. परंतु या माझ्या कामगार बांधवांचे खडतर आयुष्य मी जवळून बघितले आहे.

अन् त्यांचे कंपनीतील चटके सहन करून पोळलेले आयुष्य मी बघितले आहे. हे काही साल दोन साल चालणारं नाही, गेली पाच दशकं हे सर्व चालू आहे. परंतू या कामगार वर्गाचा वाली कुणी नाही, माझ्याच्याने मी एकटा काहीही करू शकत नाही हे ही मला माहित आहे.

कारण माझ्याच आयुष्यात नोकरीचा ठाव ठिकाणा मला अजून नाही. परंतु दोन अक्षरं लिहायला येतं म्हणून इतरांना ही जाणीव व्हावी म्हणून लिहायला घेतलं.
याबद्दल अनेकांशी बोललो आजवर अनेकांनी संबधित विषयाला घेऊन माझे असलेले लेख बघून मला कॉल केले भेटणं, बोलणं झालं.
पण काही मार्ग अवलंबले गेले हे आजवर दिसले नाही.

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांचं आयुष्य खूप भयाण अन् एकसंध असं असतं. आयुष्यभर रोटेशनल शिफ्ट करणं सोप्पं नाही, त्यात कधीतरी सोळा-सोळा तास ड्युटी करणं अन् त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम हे खूप भयाण आहे.

हल्ली शहरात भटकत असताना मला नॉर्मल आयुष्य जगणारी माणसं कमी आणि सेफ्टी शूजवर ठरल्या वेळेत नोकरीवर जाणारी माणसं माझ्या डोळ्यांना जास्त दिसतात. त्यामुळं त्यांच्यासाठी काहीतरी करायचं ही भावना आहे.

बघूयात काय होतं, त्यांचं दुःख इथे दोन-चार ओळीत मी लिहावं इतकं कमी किंवा इतकं सोप्पं, सहज नाही त्यामुळे टाळलं बरच काही लिहायचं.

Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...