मुख्य सामग्रीवर वगळा

इंडस्ट्रिअल विश्व..!

इंडस्ट्रिअल विश्व..!

आज एका अश्याच मीटिंगला उपस्थित होतो. दिवसेंदिवस शहरं वाढत चालली आहे, जसजशी शहरं वाढीस लागली तसतशी शहरात रोजंदारी उपलब्ध होण्यासाठी विविध कंपन्या, मॉल्स, छोटे-मोठे उद्योग समूह निर्माण झाले. शहरात बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध झाला.

सुरुवातीला जवळच्या चार-दोन तालुक्यातील अन् आता हळूहळू जवळच्या तीन-चार जिल्ह्यातील, कामगार वर्ग औरंगाबाद शहर आणि शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करायला शहरात येऊ लागला.

पाच दशकं पूर्ण होऊन गेली शहरातील बऱ्याच घरातील दोन पिढ्यांची हयात या कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार वर्ग म्हणून निघून गेली. 
वेळोवेळी अनेक सोयी-सुविधा त्यांना उपलब्ध झाल्या अन् अनेकदा त्यांच्यावर अन्याय झाला. अनेकवेळा त्यांनी कामगार वर्गाची युनियन स्थापन करून प्रश्न मार्गी लावण्याचा विचार केला ; पण हे सर्व प्रश्न तितक्याच मर्यादित काळासाठी सुटले अन् पुन्हा जैसे थे अवस्था झाली.

मी काही कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार नाही ; आयुष्यात हे जगणं फक्त तीन महिने जगलो आहे. परंतु या माझ्या कामगार बांधवांचे खडतर आयुष्य मी जवळून बघितले आहे.

अन् त्यांचे कंपनीतील चटके सहन करून पोळलेले आयुष्य मी बघितले आहे. हे काही साल दोन साल चालणारं नाही, गेली पाच दशकं हे सर्व चालू आहे. परंतू या कामगार वर्गाचा वाली कुणी नाही, माझ्याच्याने मी एकटा काहीही करू शकत नाही हे ही मला माहित आहे.

कारण माझ्याच आयुष्यात नोकरीचा ठाव ठिकाणा मला अजून नाही. परंतु दोन अक्षरं लिहायला येतं म्हणून इतरांना ही जाणीव व्हावी म्हणून लिहायला घेतलं.
याबद्दल अनेकांशी बोललो आजवर अनेकांनी संबधित विषयाला घेऊन माझे असलेले लेख बघून मला कॉल केले भेटणं, बोलणं झालं.
पण काही मार्ग अवलंबले गेले हे आजवर दिसले नाही.

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांचं आयुष्य खूप भयाण अन् एकसंध असं असतं. आयुष्यभर रोटेशनल शिफ्ट करणं सोप्पं नाही, त्यात कधीतरी सोळा-सोळा तास ड्युटी करणं अन् त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम हे खूप भयाण आहे.

हल्ली शहरात भटकत असताना मला नॉर्मल आयुष्य जगणारी माणसं कमी आणि सेफ्टी शूजवर ठरल्या वेळेत नोकरीवर जाणारी माणसं माझ्या डोळ्यांना जास्त दिसतात. त्यामुळं त्यांच्यासाठी काहीतरी करायचं ही भावना आहे.

बघूयात काय होतं, त्यांचं दुःख इथे दोन-चार ओळीत मी लिहावं इतकं कमी किंवा इतकं सोप्पं, सहज नाही त्यामुळे टाळलं बरच काही लिहायचं.

Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...