मुख्य सामग्रीवर वगळा

पोलीस भरती अन् बरच काही ..!

पोलीस भरती अन् बरच काही..!

मला माहितीये हा लेख कुठलेही वृत्तपत्र प्रसिध्द करणार नाही, त्यामुळे इथे देतोय.

एक आवाहन सरकारला..!

काल सायंकाळची गोष्ट खूप दिवसानंतर माझ्या तालुक्याच्या गावाला गेलो असल्यानं माझ्या जून्या मित्रांची भेट झाली. हल्ली शहरात माझ्या वयाच्या मुलांमध्ये साधारण तीन-चार वर्षानंतर आलेल्या पोलीस भरती, अग्निपथ योजनेतून अग्नीवीर भरतीतून भारतीय सैन्य दलात भरती, केंद्रीय,राज्य पातळीवर निम लष्करी दलातून होणारी भरती आणि महाराष्ट्र वनविभागात वनरक्षक भरती होण्याच्या ध्येयाने शहरातील बहुतांश मुलं भरतीच्या तयारीला लागली आहे. 

जसजशी भरती जवळ येत आहे, तसतसे तरुणांची ही संख्या वाढत आहे. शहरातील सर्व छोटी-मोठी मैदाने तरुणांच्या गर्दीने फुलून गेली आहे. सर्वजण जीव तोडून सराव करता आहेत. पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत १८,००० जागांसाठी जवळजवळ वीस लाख फॉर्म मुलांनी भरले आहे. त्यामुळं यावर्षी इतक्या मोठ्या पदांची भरती असूनही चांगलीच स्पर्धा असणार आहे.

याऊपर खेडे गावातील मुलांची अवस्था तर खूप वाईट अशी आहे. खूप संघर्ष त्यांना भरती होण्यासाठी करावा लागत आहे. आज गावी येत असताना रस्त्याने येताना बरेच भावी पोलिस, सैनिक मैदानी सराव करतांना दिसलीत. खेडे गावावरची ती मुलं त्यांना लाखोंनी पैसे भरुन नोकऱ्या मिळवणं शक्य नसतं. म्हणुन बिचारे राञंदीवस ही अशी मेहनत घेत असतात.

रस्त्यांनी ५-६ कीमी रोज सकाळ-संध्याकाळ पळतात. का तर यांना शासनाने गावात कुठलीही सुविधा त्यांच्यासाठी केलेली नसते. व्यायाम शाळा, मोकळं मैदान नसते पण ते मुलं ध्येयवेडे असतात वर्दीसाठी, देशाच्या सेवेसाठी.

यांच्याकडे फारस कुणी लक्ष देत नाही, गावातली अतिहुशार लोकं यांना टूकार,वाया गेलेली मुलं समजतात. असो इतकं काही असुनही ही मुलं पुर्णपणे मेहनत घेतात,भरतीला जातात.

आज भेटलेल्या अश्याच तरुण मित्रांनी त्यांच्याबद्दल,त्यांना येणाऱ्या अडचणींबद्दल थोडेसे लिहायला लावले म्हणून हा लेख.
अपेक्षा काहीच नव्हती त्यांची, परंतु पुढे जे काही मांडले आहे त्या गोष्टींचा सरकारने विचार करावे इतकंच.

भरती करणारी बहुतांश मुलं ही गरिब घरातील असल्यामुळे भरतीला जातांना सोबत जेमतेमच पैसे असतात. ३००-४०० कीमी प्रवास करून मुलं मैदानी चाचणीसाठी ज्या शहरात असते तिथे जातात, तिथे ऐन भरतीच्या दिवशी पोहचणे अवघड असते. त्यामुळे आदीच्या दिवशी ही मुलं त्या ठिकाणी जातात.

अश्यावेळी त्यांना तिथे राहण्याची कुठलीही सोय नसते. ऐनवेळी मग जिथं घटकाभरचा आसरा भेटल तिथं ही मुलं वृत्तपत्रावर झोपून रात्र काढतात. कुणी रेल्वे स्टेशनवर तर कुणी एसटी स्टँडवर तर कुणी रस्त्याच्या कडेला जिथं आसरा भेटल तिथं ही मुलं झोपून जातात.

अश्यावेळी लाखोंच्या गर्दीत त्यांचे कागदपञे हरवतात, पुरेसा न भेटलेला आराम, अपुरे जेवन, प्रवासामुळे आलेला थकवा यांमुळे प्रचंड मेहनत घेउनही अनेकजण फक्त वेळीच न भेटलेल्या आरामामुळे मैदानावर मैदानी चाचणीत अपात्र ठरतात.
त्यांच्या पदरी घोर निराशा पडते, दोन-तीन वर्ष केलेली अफाट ढोरमेहनत चुटकी सरशी बेकार ठरते.

सांगायचा उद्देश हाच की, सरकाराने याची दखल घ्यावी.

पुढे काही महिन्याभरात पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू होणारा आहे. त्यावेळी भरती होणाऱ्या शहरांमध्ये या तरूणांची कमीतकमी त्यांना मैदानी चाचणी ज्या ठिकाणी होणार आहे अश्या ठिकाणी बस स्थानकांपासून, रेल्वे स्टेशनपासून सिटी बसच्या माध्यमातून सोडण्याची, रहाण्याची,जेवनाची तरी व्यवस्था असावी.

कारण हे तरुण भावी पोलिस, सैनिक होऊन देशसेवा करणार आहे. हे सर्व मी स्वतः अनुभवलं आहे.सोबतच माझ्यासोबत माझ्या पिढीच्या लाखो तरुणांनी अनुभवलं आहे.

त्यामुळे यावेळी होणाऱ्या भरतीच्या वेळेस सरकारने या वरील बाबींचा विचार करून या तरुण मुलांची मदत करावी. जेणेकरून हीच उद्याची भावी पिढी जी सीमेवर आपल्या देशाचं संरक्षण करणार आहे तिची मदत होईल.

जय हिंद..!

Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड