मुख्य सामग्रीवर वगळा

लोकांनी_वेडी_ठरवलेली_ती_अशोक_रुपी_माऊली

जेवण आटोपून मी देवळात तेलाचा दिवा घेऊन गेलो,एरवी अंधार झाला होता थंडी कापत होती शरीराला....

वेशीच्या बाहेर असलेलं ते देऊळ,दुरूनच टाळ मृदुंगाचा आवाज कानी पडला.सोबतीला माझ्या शिवनातीरच्या विठु माऊलींचा ही आवाज कानी पडत होता,तसा मी तिच्या जवळ जात होतो...

तसंतसं पावलांनी वेग वाढता घेतला,खुप दिवस झाले गावाकडे आलो होतो.माऊलीचे वेध लागलं होतू या भक्ताला,शिवनामाई तुडुंब भरली होती संथ वाहणारी शिवनाई भयाण रौद्ररूप धारण केलेली भासत होती....

स्मशानातही काल सोडुन गेलेल्या एकनाथ बाबाचं मडं जळत होतं,दुरुनच बघुन वाटेवरच हात जोडून एकनाथ बाबाचं दर्शन घेतलं.बापाच्या वयाचा असल्यानं बाप गेल्याचं दुःख व्हावं तसं झालं....

नकळत माऊलींच्या ओढीनं पावलं देवळाकडे वळाली,मला माझ्या सर्व माऊलींचे दर्शन झाले अन् धन्य झालो मी.ही माऊली पंढरीची नसुन माझी शिवनातीरावरची माझी पंढरीची माऊली समान मला ती होती....

गावातील सर्व वृद्ध,सायंकाळी हरिपाठ,भजनाला जमतातनां ती मायबापच माझी माऊली. आईबापा नंतर देव दिसला तो या माऊलींमध्येच मग नाही कधी पंढरीच्या वारीची आठवण झाली...

गावी येऊन एक अख्खी रात्र यांच्या सहवासात घालतो,आशिर्वाद घेतो.कुणास ठाऊक ही शेवटची भेट असेल एखाद्या माऊलीची,जशी कालची एकनाथ बाबांची भेट नाही होऊ दिली देवानं आज त्यांच्या प्रेताला बघुन शेवटचा राम राम घातला....

एकनाथ बाबा वैकुंठाला निघुन गेले,मी आहे माझी वृद्ध माऊली आहे.रात्री एकनाथ बाबांच्या आठवणीत अन माझ्यासाठी माऊलींनी मला बापानं शिकवलेला अभंग आम्ही म्हणलो, नाशिवंत देह जाणार सकळ...!अन मी भान हरवुन गेलो....

नव्हतो या जगात मी आठवणी फक्त डोळ्यांसमोर येऊ लागल्या,त्या येड्या अशोक नावाच्या गावातील एक गरीब पण बुध्दीने लहान राहिलेल्या वडील माणसाच्या.तो ही वैकुंठाला जाऊन खुप वर्ष झाले,आजही तसाच आठवतो हातात डफडं घेतलेला....

माझ्या बापाच्या मयताला मांग म्हणुन त्याला मौतीच्या पुढं डफडं वाजायला बोलावलं होत.तो डफडं वाजत होता,पण राहून राहून माझ्याकडे बघत होता.अन् तो त्याचा येडा खुळा चेहरा आयुष्भर डोक्यात कायमचा फिट्ट झाला,तो आजही आठवला की झोप नाही येत....

तो डफडं वाजुन थांबला,बिडी प्यायला लागला की लोक त्याला ए येड्या आश्या वाजव की म्हणून चिडवत होती.ते मला पटत नव्हतं तो बिचारा त्याच काम करत होता....

गंभीर होता माझा बाप गेल्याचं दुःख त्याला झालं होत,बापानं कधीपण गावी आलं की पारावर भेटल की त्याला इस्माईल बिडीचा एक कट्टा घेऊन द्यावा....

बापाच्या वयाचा होता,अन आज माझ्याच बापाच्याच मौतीला डफडं वाजवतोय हे त्याला अनावर नाही झालं अन् अखेरला अग्निडाव देतांना बिचार्यानं अश्रुंचा बांध मोकळा करून दिला....

बाप माझा वारला होता पण दुख मला त्याच्या अश्रुंसाठी झालं होतं, त्याच्या रुपात अक्षरक्षा माऊली बापाच्या मौतीला आली होती. मी रडत होतो....

त्याला दुःख अनावर झाले अन् तो मौत करून पुन्हा शिवनाथडीला येऊन स्मशानाकडं बघुन ढसाढसा रडला,हे फक्त मी पाहिलं होतं. यडा नव्हता तो लोकांनी त्याला येडं ठरवलं होतं...

नंतर मी शहराच्या आमच्या घरी राहायला येऊन गेलो.तसा त्याचा विसर पडला पण एकदा दोनदा गावात दिसला,मला बघुन मिस्किलपणे हसला कारण बाप गेल्यावर आम्ही बरंच दुखातुन सावरलो होतो आता याचा त्याला आनंद झाला होता...

एक दिवस सकाळी सकाळी शिवनातीरी असलेल्या संगमेश्वर महादेवाच्या मंदिरात भेटला. बिडी ओढत होता मला बघुन बोलावलं अन् बोला पितोस का ? मी नकारार्थी मान हलवली अन् तो बोलता झाला लेकरु बापावर नाय गेलं. तुझा बाप माझा मित्र होता असा म्हणला अन् एक एक पाऊल मागे टाकत मागे सरल अन् जे पळत सुटला नंतर कधी नाही भेटला....

काही दिवसांपूर्वी समजलं भद्द झालेलं पिसाळलेल कुत्रं त्याला डसलं अन् तो मरुन गेला बस....एक माऊली गेली सोडुन असे वाटलं अन् डोळ्यातुन अश्रु अन् फक्त अश्रु....‌

#लोकांनी_वेडी_ठरवलेली_ती_अशोक_रुपी_माऊली....

लेखक: भारत लक्ष्मन सोनवणे,(सौमित्र).
कन्नड,औरंगाबाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...