मुख्य सामग्रीवर वगळा

लोकांनी_वेडी_ठरवलेली_ती_अशोक_रुपी_माऊली

जेवण आटोपून मी देवळात तेलाचा दिवा घेऊन गेलो,एरवी अंधार झाला होता थंडी कापत होती शरीराला....

वेशीच्या बाहेर असलेलं ते देऊळ,दुरूनच टाळ मृदुंगाचा आवाज कानी पडला.सोबतीला माझ्या शिवनातीरच्या विठु माऊलींचा ही आवाज कानी पडत होता,तसा मी तिच्या जवळ जात होतो...

तसंतसं पावलांनी वेग वाढता घेतला,खुप दिवस झाले गावाकडे आलो होतो.माऊलीचे वेध लागलं होतू या भक्ताला,शिवनामाई तुडुंब भरली होती संथ वाहणारी शिवनाई भयाण रौद्ररूप धारण केलेली भासत होती....

स्मशानातही काल सोडुन गेलेल्या एकनाथ बाबाचं मडं जळत होतं,दुरुनच बघुन वाटेवरच हात जोडून एकनाथ बाबाचं दर्शन घेतलं.बापाच्या वयाचा असल्यानं बाप गेल्याचं दुःख व्हावं तसं झालं....

नकळत माऊलींच्या ओढीनं पावलं देवळाकडे वळाली,मला माझ्या सर्व माऊलींचे दर्शन झाले अन् धन्य झालो मी.ही माऊली पंढरीची नसुन माझी शिवनातीरावरची माझी पंढरीची माऊली समान मला ती होती....

गावातील सर्व वृद्ध,सायंकाळी हरिपाठ,भजनाला जमतातनां ती मायबापच माझी माऊली. आईबापा नंतर देव दिसला तो या माऊलींमध्येच मग नाही कधी पंढरीच्या वारीची आठवण झाली...

गावी येऊन एक अख्खी रात्र यांच्या सहवासात घालतो,आशिर्वाद घेतो.कुणास ठाऊक ही शेवटची भेट असेल एखाद्या माऊलीची,जशी कालची एकनाथ बाबांची भेट नाही होऊ दिली देवानं आज त्यांच्या प्रेताला बघुन शेवटचा राम राम घातला....

एकनाथ बाबा वैकुंठाला निघुन गेले,मी आहे माझी वृद्ध माऊली आहे.रात्री एकनाथ बाबांच्या आठवणीत अन माझ्यासाठी माऊलींनी मला बापानं शिकवलेला अभंग आम्ही म्हणलो, नाशिवंत देह जाणार सकळ...!अन मी भान हरवुन गेलो....

नव्हतो या जगात मी आठवणी फक्त डोळ्यांसमोर येऊ लागल्या,त्या येड्या अशोक नावाच्या गावातील एक गरीब पण बुध्दीने लहान राहिलेल्या वडील माणसाच्या.तो ही वैकुंठाला जाऊन खुप वर्ष झाले,आजही तसाच आठवतो हातात डफडं घेतलेला....

माझ्या बापाच्या मयताला मांग म्हणुन त्याला मौतीच्या पुढं डफडं वाजायला बोलावलं होत.तो डफडं वाजत होता,पण राहून राहून माझ्याकडे बघत होता.अन् तो त्याचा येडा खुळा चेहरा आयुष्भर डोक्यात कायमचा फिट्ट झाला,तो आजही आठवला की झोप नाही येत....

तो डफडं वाजुन थांबला,बिडी प्यायला लागला की लोक त्याला ए येड्या आश्या वाजव की म्हणून चिडवत होती.ते मला पटत नव्हतं तो बिचारा त्याच काम करत होता....

गंभीर होता माझा बाप गेल्याचं दुःख त्याला झालं होत,बापानं कधीपण गावी आलं की पारावर भेटल की त्याला इस्माईल बिडीचा एक कट्टा घेऊन द्यावा....

बापाच्या वयाचा होता,अन आज माझ्याच बापाच्याच मौतीला डफडं वाजवतोय हे त्याला अनावर नाही झालं अन् अखेरला अग्निडाव देतांना बिचार्यानं अश्रुंचा बांध मोकळा करून दिला....

बाप माझा वारला होता पण दुख मला त्याच्या अश्रुंसाठी झालं होतं, त्याच्या रुपात अक्षरक्षा माऊली बापाच्या मौतीला आली होती. मी रडत होतो....

त्याला दुःख अनावर झाले अन् तो मौत करून पुन्हा शिवनाथडीला येऊन स्मशानाकडं बघुन ढसाढसा रडला,हे फक्त मी पाहिलं होतं. यडा नव्हता तो लोकांनी त्याला येडं ठरवलं होतं...

नंतर मी शहराच्या आमच्या घरी राहायला येऊन गेलो.तसा त्याचा विसर पडला पण एकदा दोनदा गावात दिसला,मला बघुन मिस्किलपणे हसला कारण बाप गेल्यावर आम्ही बरंच दुखातुन सावरलो होतो आता याचा त्याला आनंद झाला होता...

एक दिवस सकाळी सकाळी शिवनातीरी असलेल्या संगमेश्वर महादेवाच्या मंदिरात भेटला. बिडी ओढत होता मला बघुन बोलावलं अन् बोला पितोस का ? मी नकारार्थी मान हलवली अन् तो बोलता झाला लेकरु बापावर नाय गेलं. तुझा बाप माझा मित्र होता असा म्हणला अन् एक एक पाऊल मागे टाकत मागे सरल अन् जे पळत सुटला नंतर कधी नाही भेटला....

काही दिवसांपूर्वी समजलं भद्द झालेलं पिसाळलेल कुत्रं त्याला डसलं अन् तो मरुन गेला बस....एक माऊली गेली सोडुन असे वाटलं अन् डोळ्यातुन अश्रु अन् फक्त अश्रु....‌

#लोकांनी_वेडी_ठरवलेली_ती_अशोक_रुपी_माऊली....

लेखक: भारत लक्ष्मन सोनवणे,(सौमित्र).
कन्नड,औरंगाबाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ