मुख्य सामग्रीवर वगळा

लोकांनी_वेडी_ठरवलेली_ती_अशोक_रुपी_माऊली

जेवण आटोपून मी देवळात तेलाचा दिवा घेऊन गेलो,एरवी अंधार झाला होता थंडी कापत होती शरीराला....

वेशीच्या बाहेर असलेलं ते देऊळ,दुरूनच टाळ मृदुंगाचा आवाज कानी पडला.सोबतीला माझ्या शिवनातीरच्या विठु माऊलींचा ही आवाज कानी पडत होता,तसा मी तिच्या जवळ जात होतो...

तसंतसं पावलांनी वेग वाढता घेतला,खुप दिवस झाले गावाकडे आलो होतो.माऊलीचे वेध लागलं होतू या भक्ताला,शिवनामाई तुडुंब भरली होती संथ वाहणारी शिवनाई भयाण रौद्ररूप धारण केलेली भासत होती....

स्मशानातही काल सोडुन गेलेल्या एकनाथ बाबाचं मडं जळत होतं,दुरुनच बघुन वाटेवरच हात जोडून एकनाथ बाबाचं दर्शन घेतलं.बापाच्या वयाचा असल्यानं बाप गेल्याचं दुःख व्हावं तसं झालं....

नकळत माऊलींच्या ओढीनं पावलं देवळाकडे वळाली,मला माझ्या सर्व माऊलींचे दर्शन झाले अन् धन्य झालो मी.ही माऊली पंढरीची नसुन माझी शिवनातीरावरची माझी पंढरीची माऊली समान मला ती होती....

गावातील सर्व वृद्ध,सायंकाळी हरिपाठ,भजनाला जमतातनां ती मायबापच माझी माऊली. आईबापा नंतर देव दिसला तो या माऊलींमध्येच मग नाही कधी पंढरीच्या वारीची आठवण झाली...

गावी येऊन एक अख्खी रात्र यांच्या सहवासात घालतो,आशिर्वाद घेतो.कुणास ठाऊक ही शेवटची भेट असेल एखाद्या माऊलीची,जशी कालची एकनाथ बाबांची भेट नाही होऊ दिली देवानं आज त्यांच्या प्रेताला बघुन शेवटचा राम राम घातला....

एकनाथ बाबा वैकुंठाला निघुन गेले,मी आहे माझी वृद्ध माऊली आहे.रात्री एकनाथ बाबांच्या आठवणीत अन माझ्यासाठी माऊलींनी मला बापानं शिकवलेला अभंग आम्ही म्हणलो, नाशिवंत देह जाणार सकळ...!अन मी भान हरवुन गेलो....

नव्हतो या जगात मी आठवणी फक्त डोळ्यांसमोर येऊ लागल्या,त्या येड्या अशोक नावाच्या गावातील एक गरीब पण बुध्दीने लहान राहिलेल्या वडील माणसाच्या.तो ही वैकुंठाला जाऊन खुप वर्ष झाले,आजही तसाच आठवतो हातात डफडं घेतलेला....

माझ्या बापाच्या मयताला मांग म्हणुन त्याला मौतीच्या पुढं डफडं वाजायला बोलावलं होत.तो डफडं वाजत होता,पण राहून राहून माझ्याकडे बघत होता.अन् तो त्याचा येडा खुळा चेहरा आयुष्भर डोक्यात कायमचा फिट्ट झाला,तो आजही आठवला की झोप नाही येत....

तो डफडं वाजुन थांबला,बिडी प्यायला लागला की लोक त्याला ए येड्या आश्या वाजव की म्हणून चिडवत होती.ते मला पटत नव्हतं तो बिचारा त्याच काम करत होता....

गंभीर होता माझा बाप गेल्याचं दुःख त्याला झालं होत,बापानं कधीपण गावी आलं की पारावर भेटल की त्याला इस्माईल बिडीचा एक कट्टा घेऊन द्यावा....

बापाच्या वयाचा होता,अन आज माझ्याच बापाच्याच मौतीला डफडं वाजवतोय हे त्याला अनावर नाही झालं अन् अखेरला अग्निडाव देतांना बिचार्यानं अश्रुंचा बांध मोकळा करून दिला....

बाप माझा वारला होता पण दुख मला त्याच्या अश्रुंसाठी झालं होतं, त्याच्या रुपात अक्षरक्षा माऊली बापाच्या मौतीला आली होती. मी रडत होतो....

त्याला दुःख अनावर झाले अन् तो मौत करून पुन्हा शिवनाथडीला येऊन स्मशानाकडं बघुन ढसाढसा रडला,हे फक्त मी पाहिलं होतं. यडा नव्हता तो लोकांनी त्याला येडं ठरवलं होतं...

नंतर मी शहराच्या आमच्या घरी राहायला येऊन गेलो.तसा त्याचा विसर पडला पण एकदा दोनदा गावात दिसला,मला बघुन मिस्किलपणे हसला कारण बाप गेल्यावर आम्ही बरंच दुखातुन सावरलो होतो आता याचा त्याला आनंद झाला होता...

एक दिवस सकाळी सकाळी शिवनातीरी असलेल्या संगमेश्वर महादेवाच्या मंदिरात भेटला. बिडी ओढत होता मला बघुन बोलावलं अन् बोला पितोस का ? मी नकारार्थी मान हलवली अन् तो बोलता झाला लेकरु बापावर नाय गेलं. तुझा बाप माझा मित्र होता असा म्हणला अन् एक एक पाऊल मागे टाकत मागे सरल अन् जे पळत सुटला नंतर कधी नाही भेटला....

काही दिवसांपूर्वी समजलं भद्द झालेलं पिसाळलेल कुत्रं त्याला डसलं अन् तो मरुन गेला बस....एक माऊली गेली सोडुन असे वाटलं अन् डोळ्यातुन अश्रु अन् फक्त अश्रु....‌

#लोकांनी_वेडी_ठरवलेली_ती_अशोक_रुपी_माऊली....

लेखक: भारत लक्ष्मन सोनवणे,(सौमित्र).
कन्नड,औरंगाबाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...