मुख्य सामग्रीवर वगळा

अन्... मी भटकत होतो,भटकत होतो....

हा विषय माझ्या खुप जवळचा आहे भावनिक दृष्ट्या किंवा काळाची गरज,मला जर कुणी म्हंटले चलतो मॉलमध्ये फिरायला जाऊ,तर मला ते आवडत नाही.....

मी एमआयडीसीमध्ये फिरायला जातो नेहमी, रिकामा असलोकी तिकडच भटकत असतो.प्रत्येक कंपनीचे बाहेरून निरीक्षण करत  फिरत असतो जे करायला मला खुप आवडते...

नेहमी प्रमाणे तो दिवस पेपर झाला,घरी जायला खुप वेळ होता म्हणुन मी काहीतरी नवीन माहिती भेटल म्हणुन एमआयडीसी एरियात फिरायला गेलो साधारण तीन महीन्यांपुर्वीची ही गोष्ट असेल...

मी रस्त्याने भटकत होतो इकडेतिकडे कावरी-बावरी नजर टाकत,आजू-बाजूला चालू असलेले संवाद ऐकत.आज का कुणास ठाऊक पण मला इथे खुप भयाण शांतशांत वाटत होते....

जिथे नेहमी वरदळ असते कंपन्यांमधला यंत्रांचा आवाज,भोंग्यांचा आवाजही आज ऐकु येत नव्हता.मी चालत-चालत बराच पुढे आलो,तशी ती शांतता अजुन वाढत गेली,पुढे रस्त्याने एक चिटपाखरू सुद्धा दिसेनासे झाले....

नेहमी आवडणारे दृश्य आता मला भीतीदायक वाटु लागले होते,उंचउंच इमारती त्यांना कांग्रेसच्या जंगलाने वेढले होते‌.आतमध्ये पूर्ण काळोख नजरेस पडत होता.कंपनीचा मरलेल्या माणसाचा जसा सापळा व्हावा तसा भास होत होता....

ज्या कंपनीत हजारो माणसे काम करत होते,ती आज जीव गेल्यासारखी शांत उभी होती.म्हणजे ती बंद पडली होती,हजारो गरीब लोकांचे पोट भरणारी ती कंपनी कायमची देशात आलेल्या मंदीच्या सावटात सापडुन बंद पडली होती...

मला हे बघुन राहावले नाही मी त्या मार्गाने आत काय चालु असेल कसे असेल,या ईर्षेने बघण्यासाठी तिकडे सरसावलो.गेटवर येताच एक पन्नाशीतले काका मला बघुन त्यांच्याकडे येण्यासाठी खुणावु लागले,मी गेलो अन् त्यांना या प्रकाराबद्दल विचारले....

जे अंदाज केले होते ते खरे झाले होते,मंदीच्या सावटात ही कंपनी सुध्दा बंद पडली होती इतर कंपन्यां प्रमाणेच.जी हजारो लोकांना रोजगार देत होती ती आज फक्त या सहा शिपाई लोकांना रोजगार देण्यास ही सफल ठरत नव्हती...

कंपनीचा मालकाने हताश होऊन इकडे येणे ही बंद केले होते.व त्याच्या इतर कंपन्या ज्यासुद्धा बंद पडेल या अवस्थेत होत्या त्यांना तो सावरत होता,हे सांगताना त्या काकांना राहवले नाही व नकळत त्यांच्या डोळ्यातुन अश्रु येत गेले....

त्यांच्याकडे बघुन मनात एक विचार येऊन गेला मी जे स्वप्न या एमआयडीसीमध्ये काम करण्याचे बघितले होते,ते मावळले होते की काय.मी मनातच खजील होऊन स्वत:ला सावरत राहीलो, पुढे खुप वेळ त्यांच्याशी बोलत राहिलो....

त्यांनी आत जाऊन मला कंपनी दाखवली आतमध्ये सर्वत्र जाळे पसरलेले,उंच उंच असलेले ते काळे पत्र,तो कायमचा बंद पडलेला कंपनीचा भोंगा मला खुणावू लागला होता....

मधल्या परीसरात दोन-तीन म्हाताऱ्या त्याकंपनीच्या परिसरात वाढलेल्या गवतास निंदत होत्या.त्यामात्र यामुळे खुश होत्या,कारण त्यांना कुठेतरी रोजगार भेटला होता.पण इतक्या लोकांचं पोट कसे भरणार आता,जे या कंपनीवर अवलंबुन होती,ही काळजी त्यांनाही वाटत होती....

केव्हापासुन त्या या विषयावर बोलत होत्या मला बघुन त्यांनी सावरले,त्यांना वाटले कुणी साहेबच आला की काय.त्या माऊलींना कुठे माहीत होते मी सुद्धा या मंदीच्या काळात भरडला जाणारा एक सुशिक्षित बेरोजगार होतो.मी त्यांच्या नजरेला चोरत काकांचा निरोप घेतला व चालता झालो....

पुढे रोडवर एक टपरी दिसली सकाळी काम करायला येणारे मुले जे घरून एक वेळचे जेवण आणु शकत नसायचे,ते येथे नाश्ता करून कंपनीत काम करत असायचे.पण गेल्या काही दिवसांपासुन त्या टपरीवरही कुणी फिरकले नव्हते ,एक बाई होती फक्त टपरीवर.चुलीवर केव्हा पासून चहा ठेवला होता,काय माहीत उकळून उकळून तो पूर्ण घट्ट झाला होता....

मी चहा घेत त्याबाईला परिस्थिती बद्दल विचारले, तसे ती बाई बोलती झाली आयुष्यातले सर्वात वाईट दिवस जगु लागलो आहोत इतकंच ती एका वाक्यात बोलली.नवरापण हल्ली बेरोजगारी मुळे परेशान होऊन दारू पिऊन भटकत असतो,ती सांगत होती.मला राहवले नाही चहा घेऊन पैसे देऊन उर्वरित पैसे वापस न घेता मी तिथून निघून गेलो....

थेट एमआयडीसीच्या चौकात येऊन दृष्य बघत बसलो,आधीचे दृश्य बघून मी पुर्णपणे आतुन थकलो होतो.त्राण राहीला नव्हताच शरीरात  चौकात माझ्यासारखी ते तरुण बेरोजगार मुलं बघुन त्रास होत होता.बिचारी कामाच्या शोधात वणवण करत भटकत होती,कुणी आता हळूहळू नशेच्या आहारी जाऊन आपली जीवनयात्रा हळू हळू संपवित होती....

कारण मंदीचे वादळ त्यांच्या जीवनात येऊन त्यांचे सुख त्यांच्यापासुन हिरावुन घेऊन गेलं होतं,ती तरुण मुलं मात्र कायमची हवालदिल झाली होती....

अन्... मी भटकत होतो,भटकत होतो....

#एम_आय_डी_सी_कामगार_अन_बंद_पडलेलं_वर्तमान....

लेखन:भारत लक्ष्मन सोनवणे,(सौमित्र).
(कन्नड जि औरंगाबाद).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...