मुख्य सामग्रीवर वगळा

Women's feeling....

लहानपणा पासून सेक्स,पाळी,व्हर्जिनिटी ह्या विषयावर घरात कधी चर्चा झाल्या नाहीत.कारण समाजव्यवस्थेनं तयार केलेला टॅबु कौटुंबिक नात्यांना भेदत नसानसात शिरलाय,या बाबतीत माझे घरही त्याला अपवाद नाही.....

ह्या बाबत जे ही ऐकलंय ते मैत्रिणींकडून आणि चित्रपट,सिरीयल यांमधुनच.आता अलीकडच्या काळात सोशल मीडियाशी होणाऱ्या संबंधातुन बरीच माहिती मिळाली,म्हणजे ती मी मिळविण्याचा प्रयत्न केला....

मला या माहितीचा एक पुरुष म्हणुन काही एक  (शारीरिक)उपयोग होणार नव्हता,पण मला कुठेतरी ही माहिती मला हवी असे मनोमन वाटत होते.कारण समाजात या विषयी असलेले मतभेद तर मी नक्कीच बदलु शकतो....

म्हणजे डायरेक्ट बोलून हे पटवून देणे मला तरी अजुन शक्य वाटत नाही,जरी मी ते करूही शकलो असतो.पण आज जेव्हा जगातील बहुसंख्य स्त्रीया,मुली या सोशल नेटवर्किंग साईट वर वावर करत आहे त्याचा वापर करत आहे....

मग आपल्या छोट्याश्या लिखित स्वरूपाच्या पोस्टने जर त्यांना योग्य ती माहिती भेटत असेल तर काय हरकत आहे.आता याला काही मित्र-मैत्रिणी विरोधही करतील तु एक मुलगा आहे तुला या गोष्टीची,या विषयाची,असलं लिखाण करायची गरज नाही....

पण आपण हा विचार कधी नाही केला की ज्या प्रक्रियेतून सर्व विश्वाची निर्मिती झाली ती पाळी अजुन पुर्णपणे समाजातील काही स्त्रियांनाही पुर्णपणे समजली नाही. तेव्हा पुर्षांना,तरुणांना काय माहिती असेल....

अजुनही पाळी पुर्णपणे कळली नाहीये स्त्रियांना या बाबत थोडी फार माहिती असते,कारण तो त्यांच्या आयुष्याचा एक भाग असतो.पण ती माहिती कितपत योग्य आहे अन् कितपत चुकीची हे तिला अजूनही समजले नाही...

राहिला पुरषांचा प्रश्न त्यांना या विषयाचे ज्ञान देणे महत्त्वाचे आहेच,आनंद तर या गोष्टीचा वाटत आहे की आज समाजात अनेक पुरूष आपल्या घरातील स्त्री,तरुणींना योग्य माहिती तर देताच. तसेच या दिवसात तिच्या वरील मानसिक ताण,तणाव,तिला आराम कसा मिळेल याचा विचारही ते करतात.....

माझ्या लिखाणाचा एकच हेतु असेल याविषयी समाजातील स्त्री,पुरूषापर्यंत योग्य माहिती मी माझ्या लिखाणाच्या माध्यमातुन देईल.तर यासाठी जशी वेळ भेटल तसे मी लेख लिहीत राहिल,  समाजात याविषयी साक्षरता पसरावी हीच प्रामाणिक अपेक्षा आहे....

पुढील लेख लवकरच.....

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...