मुख्य सामग्रीवर वगळा

Women's feeling....

लहानपणा पासून सेक्स,पाळी,व्हर्जिनिटी ह्या विषयावर घरात कधी चर्चा झाल्या नाहीत.कारण समाजव्यवस्थेनं तयार केलेला टॅबु कौटुंबिक नात्यांना भेदत नसानसात शिरलाय,या बाबतीत माझे घरही त्याला अपवाद नाही.....

ह्या बाबत जे ही ऐकलंय ते मैत्रिणींकडून आणि चित्रपट,सिरीयल यांमधुनच.आता अलीकडच्या काळात सोशल मीडियाशी होणाऱ्या संबंधातुन बरीच माहिती मिळाली,म्हणजे ती मी मिळविण्याचा प्रयत्न केला....

मला या माहितीचा एक पुरुष म्हणुन काही एक  (शारीरिक)उपयोग होणार नव्हता,पण मला कुठेतरी ही माहिती मला हवी असे मनोमन वाटत होते.कारण समाजात या विषयी असलेले मतभेद तर मी नक्कीच बदलु शकतो....

म्हणजे डायरेक्ट बोलून हे पटवून देणे मला तरी अजुन शक्य वाटत नाही,जरी मी ते करूही शकलो असतो.पण आज जेव्हा जगातील बहुसंख्य स्त्रीया,मुली या सोशल नेटवर्किंग साईट वर वावर करत आहे त्याचा वापर करत आहे....

मग आपल्या छोट्याश्या लिखित स्वरूपाच्या पोस्टने जर त्यांना योग्य ती माहिती भेटत असेल तर काय हरकत आहे.आता याला काही मित्र-मैत्रिणी विरोधही करतील तु एक मुलगा आहे तुला या गोष्टीची,या विषयाची,असलं लिखाण करायची गरज नाही....

पण आपण हा विचार कधी नाही केला की ज्या प्रक्रियेतून सर्व विश्वाची निर्मिती झाली ती पाळी अजुन पुर्णपणे समाजातील काही स्त्रियांनाही पुर्णपणे समजली नाही. तेव्हा पुर्षांना,तरुणांना काय माहिती असेल....

अजुनही पाळी पुर्णपणे कळली नाहीये स्त्रियांना या बाबत थोडी फार माहिती असते,कारण तो त्यांच्या आयुष्याचा एक भाग असतो.पण ती माहिती कितपत योग्य आहे अन् कितपत चुकीची हे तिला अजूनही समजले नाही...

राहिला पुरषांचा प्रश्न त्यांना या विषयाचे ज्ञान देणे महत्त्वाचे आहेच,आनंद तर या गोष्टीचा वाटत आहे की आज समाजात अनेक पुरूष आपल्या घरातील स्त्री,तरुणींना योग्य माहिती तर देताच. तसेच या दिवसात तिच्या वरील मानसिक ताण,तणाव,तिला आराम कसा मिळेल याचा विचारही ते करतात.....

माझ्या लिखाणाचा एकच हेतु असेल याविषयी समाजातील स्त्री,पुरूषापर्यंत योग्य माहिती मी माझ्या लिखाणाच्या माध्यमातुन देईल.तर यासाठी जशी वेळ भेटल तसे मी लेख लिहीत राहिल,  समाजात याविषयी साक्षरता पसरावी हीच प्रामाणिक अपेक्षा आहे....

पुढील लेख लवकरच.....

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...