मुख्य सामग्रीवर वगळा

#मी_एक_Psycho_अनेक_विचारांसाठीचा

२०२० हे वर्ष सुरू झाले पहीली रात्र संपुन गेली आहे,ती मी भटकत,भटकत जगलो आहे.जरी शरीराने मी डांबलेलो आहे एका अंधाऱ्या खोलीत जिथे उजेडालाही भीती वाटत असते यायची,मग ती खोली मनातली की प्रत्येकक्षातली याला काही माझ्यालेखी तरी अर्थ नाही....

या वर्षाची पहीली रात्र अंधार खुप पडला होता, थंडीही खुप आहे,मी म्हणजे दुसरा कुणी नाही हो मीच आहे,सोबत माझ्या ते माझे Psycho विचार घेऊन निघालो आहे....

चहुकडे अंधार झाला आहे,रात्रीचा एक वाजून आठ्ठावीस मिनिटं होऊन काही क्षण वर झाले असेल,रस्ता नरकाची वाट भासतोय.मी एक-एक पाऊल झप,झप टाकत चालतोय,त्या विस्तीर्ण टेकडीच्या दिशेने.....

रस्त्यावरची खडी अनवाणी पायांना टोचते आहे, कधीतरी येणाऱ्या लाल मातीच्या फुफाट्यात पाय पडतो मग मात्र तळव्यांना मऊ स्पर्श होतो आहे. स्मशान सालं जागं आहे,त्याची भूक मिटवायला आज एकबी मडं आल नव्हतं मग ते मलाच खुणावत आहे,हसत आहे माझ्याकडे बघून,माझ्या अनवाणी पायांना बघुन....

गुडघ्यावर फाटलेली माझी चड्डी शिऊन घेतली नाही याचा पश्चाताप होत आहे,वारा झोंबतो आहे. मी चालतोय रस्ता मागे पडतो अन पुन्हा पुढे येतो आहे,बांबुच्या बेटांवर बसलेले ते उलटं घुबड यडं लागल्यासारखे ओरडत आहे,त्याला रात्री दिसतं त्यांना मी ऐकलं होते पण ते हुडुक माझ्या तोंडाला बघेणा पण झाले आहे.....

खांबावरचे लाईट चालू आहे मी वेडा की खुळा यावेळेला त्यांना बंद करून टाकतोय,दुरवरून कुणीतरी शिव्यांचा आवाज मला दिला,ही भाषा मला अवगत नाही म्हणून मी लाईट बंद ठेऊन अंधारातच चालतोय....

काही अंतरावर टपरी चालु दिसते,रात्री कोण येणार यांच्या टपरीकडे भटकायला,पण जवळ जाऊन पाहतो तर इथे माझ्यासारखे अनेक Psycho बसले आहे पब्जी खेळत.मी चुलीवर हात ठेवत शख घेत आहे,तो वाळलेला बाबा पार म्हसणात मडकं गेले त्याचे ते माझ्याकडे रागाने पाहत आहे,काय माहीत मी काय खुळा दिसलो की काय त्याला....

मग मी मोहरं निघालो भटकत,भटकत माझ्या रस्त्याला,रस्ता संपला आहे.रानवाट लागली तितक्यात लाल डोळ्याचे ते भोरे कुत्रे अंगावर आले,दगड भिरकावला अन सारे पळून गेले.एकाच्या पेटकात तो लागला ते इवळत बसलं आहे,उंच आवाज करून लांडगे ईवळत आहे....

इतक्या रात्री एक बाबा डब्बं घेऊन नदीला चालला आहे,मला बघुन तोंड लपुन चालत आहे जसं काय मी त्याचं डब्बड सांडुन देणार आहे.बाभळी लागल्या आहे रस्त्यानं अनवाणी पाय मंग काटा टोचु नये म्हणून मी रस्त्याच्या कडेना चालतो आहे.....

कीर...कीर...आवाज येत आहे दुसऱ्या क्षणाला माझ्या अंगावर एखादी फांदी पडावी अन मी त्या झाडाला उलटा लटकुन भूत होऊन जातो का काय असा भास होत आहे....

टेकडी जवळ आली आहे मी चढु लागलो आहे, वारा झोंबत आहे,मी चढत आहे,पायाला ठेच लागली याचे भान मला नाहीये.बोटातुन भळ-भळ रगत निघतं आहे,आता मी या विचारानं यडा झालो आहे की उंच टेकडीवरनं त्या खालच्या काळ्य पाण्याच्या खदानीत मला उडी मारायची आहे...

पण इथं वर पोहचताच माझ्यातला जुना विचार जागा झाला आहे,मी मोठ्यानं गाणं म्हणत आहे,''बाहो में बॉटल,बॉटल मे दारू दारू मैं हे मेरी नशा,एकबार जिसने थोडीसी पीलीं बेहोश ओ हो गया...! टिंग... टिंग...टिंग...''

तिथंच माझ्यातलं ते वेड जे भारत मातेचे सेवा करण्याचं आहे अहो रात्र अन् दीवस जे मी बघितलं आहे ते जागे होते,जिथं खुप घाम गाळुन या टेकडीला पळण्याचा सराव मी करत आलो आहे,त्या आठवणी जाग्या झाल्या अन् आता पुन्हा तेच सुरू करत रातच्याला मी पळत सुटलो आहे,वेड्यागत.....

#मी_एक_Psycho_अनेक_विचारांसाठीचा.....

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...