मुख्य सामग्रीवर वगळा

हरवलेल्या माझ्यासोबतचा तो एक

तो हल्ली काय करतो कुणास ठाऊक म्हणजे काल सकाळी मी अंघोळ करून थंडी वाजत
असल्यामुळं बाल्कनीत येऊन भांग पाडत होतो...

माझं असे आहे की मला मुलींपेक्षा जास्तवेळ लागतो भांग पाडायला,मी बसलो होतो समोरून सुर्य किरणांची तिरीप मस्त अंगावर पडत होती. आरसा छानपैकी सेट केल्यामुळे माझं चालले होते भांग पाडणे.बाजुला एका प्लास्टिकच्या डब्यात  पावडरचा डब्बा,क्रीम,अजुन दोन कंगवे,आईच्या गोल बारीक टिकलीचे पाकिटे त्यात होती...

मस्त भांग पाडून झाला अन मी आता त्याला न्याहाळत बसलो होतो,तो पण आता उठला होता तसा तो बाल्कनीत आला हात उंचावून आळस देत मला हात दिला....

अन म्हणाला काय लेखक साहेब बरे आहे का तुमचे काम ? मी म्हंटले हो भाऊ कसले लेखक अन् कसले काय,सुशिक्षित बेरोजगार म्हणा वाटले तर मला राग नाही येणार.

तो हसतच बोलला नाही रे छान लिहतो तु, तुझ्याकडे काहीतरी आहे कराण्यासारखे मी जर बेरोजगार झालोना तर,मला घरचे दोन वेळची भाकर देतील की नाही काय माहीत.अन् चेहरा पाडुन तो तिथुन निघुन गेला...

मी पण मनात हा प्रश्न घेऊन आता गेलो की तो मला अडवा बोला होता की,त्याचे काही विपरीत ? आईने तोवर गरम कॉफी टेबल वर आणुन ठेवलेली होती आरसा आटकवून,डब्बा नेहमीच्या जागी ठेऊन मी कॉफी पित बसलो होतो....

तितक्यात खिडकीच्या ग्रील मधुन तो जातांना दिसला,चेहर्यावर निराश झालेला अन शरीरातले त्राण सोडून कसल्या तरी विचारांच्या सावटाखाली तो चालत होता.त्याने मी मगाशी बसलेल्या बाल्कनी कडे बघितले अंन जोर्यात हात झटकले.मला प्रश्न पडला त्याला काही बोलायचे तर नसेलणा ? काही विपरीत तर घडले नसेलणा त्याच्यासोबत...

मी संध्याकाळी त्याच्या येण्याच्या टायमावर त्याची वाट पाहत बाल्कनीत घोडा करून भिंतीवर बसलो होतो,पण तो खुप वेळ झाला आलाच नाही....

मी आता घरात गेलो जेवण केले पुन्हा येऊन बसलो,अन् तो आला पार विस्कटलेले केस,विस्कटलेली शर्टिंग,अन् हातातली बॅग छाती जवळ घेऊन तो चालत होता...

मी त्याला आवाज दिला,हाय ब्रो... त्याने स्मितहास्य देत हाय केले... अन् बोला जेवलास का ?‌ मी हो म्हंटले अन् त्याला काही विचारणार तोच तो बोलून गेला चल येतो भाई हल्ली खूप थकुन जात आहे सवय नाही रे मला या कामाची...

अन् मला उत्तर भेटले,जे खरे होते की खोटे काय माहीत. मी काही न बोलता शरीरात त्राण नसल्या सारखा घरात झुलत आलो....

अन् बेडवर जाऊन मोबाईलवर त्याचे फेसबुक चेक करत बसलो तो लेफ्ट झाला होता कुठून ते नाही सांगू शकणार...

#हरवलेल्या_माझ्यासोबतचा_तो_एक...

लेखन-भारत लक्ष्मन सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...