मुख्य सामग्रीवर वगळा

हरवलेल्या माझ्यासोबतचा तो एक

तो हल्ली काय करतो कुणास ठाऊक म्हणजे काल सकाळी मी अंघोळ करून थंडी वाजत
असल्यामुळं बाल्कनीत येऊन भांग पाडत होतो...

माझं असे आहे की मला मुलींपेक्षा जास्तवेळ लागतो भांग पाडायला,मी बसलो होतो समोरून सुर्य किरणांची तिरीप मस्त अंगावर पडत होती. आरसा छानपैकी सेट केल्यामुळे माझं चालले होते भांग पाडणे.बाजुला एका प्लास्टिकच्या डब्यात  पावडरचा डब्बा,क्रीम,अजुन दोन कंगवे,आईच्या गोल बारीक टिकलीचे पाकिटे त्यात होती...

मस्त भांग पाडून झाला अन मी आता त्याला न्याहाळत बसलो होतो,तो पण आता उठला होता तसा तो बाल्कनीत आला हात उंचावून आळस देत मला हात दिला....

अन म्हणाला काय लेखक साहेब बरे आहे का तुमचे काम ? मी म्हंटले हो भाऊ कसले लेखक अन् कसले काय,सुशिक्षित बेरोजगार म्हणा वाटले तर मला राग नाही येणार.

तो हसतच बोलला नाही रे छान लिहतो तु, तुझ्याकडे काहीतरी आहे कराण्यासारखे मी जर बेरोजगार झालोना तर,मला घरचे दोन वेळची भाकर देतील की नाही काय माहीत.अन् चेहरा पाडुन तो तिथुन निघुन गेला...

मी पण मनात हा प्रश्न घेऊन आता गेलो की तो मला अडवा बोला होता की,त्याचे काही विपरीत ? आईने तोवर गरम कॉफी टेबल वर आणुन ठेवलेली होती आरसा आटकवून,डब्बा नेहमीच्या जागी ठेऊन मी कॉफी पित बसलो होतो....

तितक्यात खिडकीच्या ग्रील मधुन तो जातांना दिसला,चेहर्यावर निराश झालेला अन शरीरातले त्राण सोडून कसल्या तरी विचारांच्या सावटाखाली तो चालत होता.त्याने मी मगाशी बसलेल्या बाल्कनी कडे बघितले अंन जोर्यात हात झटकले.मला प्रश्न पडला त्याला काही बोलायचे तर नसेलणा ? काही विपरीत तर घडले नसेलणा त्याच्यासोबत...

मी संध्याकाळी त्याच्या येण्याच्या टायमावर त्याची वाट पाहत बाल्कनीत घोडा करून भिंतीवर बसलो होतो,पण तो खुप वेळ झाला आलाच नाही....

मी आता घरात गेलो जेवण केले पुन्हा येऊन बसलो,अन् तो आला पार विस्कटलेले केस,विस्कटलेली शर्टिंग,अन् हातातली बॅग छाती जवळ घेऊन तो चालत होता...

मी त्याला आवाज दिला,हाय ब्रो... त्याने स्मितहास्य देत हाय केले... अन् बोला जेवलास का ?‌ मी हो म्हंटले अन् त्याला काही विचारणार तोच तो बोलून गेला चल येतो भाई हल्ली खूप थकुन जात आहे सवय नाही रे मला या कामाची...

अन् मला उत्तर भेटले,जे खरे होते की खोटे काय माहीत. मी काही न बोलता शरीरात त्राण नसल्या सारखा घरात झुलत आलो....

अन् बेडवर जाऊन मोबाईलवर त्याचे फेसबुक चेक करत बसलो तो लेफ्ट झाला होता कुठून ते नाही सांगू शकणार...

#हरवलेल्या_माझ्यासोबतचा_तो_एक...

लेखन-भारत लक्ष्मन सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ