मुख्य सामग्रीवर वगळा

Company rules ....

कंपन्यामध्ये काम करण्याचा माझा अनुभव जेमतेमच आहे,पण जो आहे तो खुप छान आहे.
शिस्त,वेळेचे महत्त्व,इत्यादी गुण आपल्याला रोजच्या जीवनात जर अनुभवायचे असेल तर खरच एकदा तरी हा अनुभव घेऊन बघावा....

मी आजवर काम केलेल्या कंपनीमध्ये मला आवडलेलं कंपनी क्षेत्र जर कोणते असेल तर ते फार्मा कंपनी.शिस्तबद्धता,वेळेचे नियोजन,अजुनही असंख्य नियम या कंपनीत काम करणाऱ्या सर्वांना लागु असतात....

अगदी House keeping मध्ये काम करणारा असो किंवा सर्वोच्च पदावर काम करणारे सर्वांसाठी सारखे नियम येथे असतात.तर थोडक्यात माहिती या कंपनींच्या नियमांबद्दल व येथे चालणारे काम कसे चालते याबद्दल....

फस्टशिप(सर्व शिपमध्ये असेच काम होत असते, फक्त कामाचे नियोजन व एमरजेंसीमध्ये यात वेळेनुसार बदल होत असतो)मध्ये जर तुम्ही काम करत असाल,तर कसे असते तुमचे एकुण 9.00 तासांचे कामाचे नियोजन ते खालीलप्रमाणे असते.फस्टशिपमध्ये काम करण्यासाठी तुमची वेळ असेल सकाळी 6.30 ते दुपारी 3.30....

सर्व प्रथम नियोजित वेळेवर तुम्ही कंपनीच्या मेन गेटवर असायला हवे. तुमचे राहणीमान दाढी,कटिंग व्यवस्थित असावं,नख कापलेली स्वच्छ असावी,गळ्यात ओळखपत्र,पायात सेफ्टी शुज,अंगावर असलेले कपडे फार तंग नसावे व स्वच्छ असावे,मोबाईल,व्यसनी,आम्लीपदार्थ कंपनी आवारात आणण्यासाठी सक्त बंदी घालण्यात आली आहे.तेव्हा हे आढळले तर डायरेक्ट नौकरीवरुन तुम्हास बडतर्फ केले जाते.शरीरावर कुठेही जखम झाली असेल तर सेक्युरीटी गार्डशी संबंधित विषयी बोलावे लागते,या नियमांनमध्ये बसत असल्यावरच कंपनीच्या मधील आवारात तुम्हाला प्रवेश भेटत असतो....

कंपनीच्या मेन गेटवर तुमची सेक्युरीटी गार्डकडुन तपासणी होते(वेळ7.00)आपण पात्र ठरलो.मग कंपनीच्या आत प्रवेश केल्यावर सर्व प्रथम आपण आपली हजेरी लावण्यासाठी ठरवुन दिलेल्या ब्लाॅकला जाऊन हजेरी मशिनवर हजेरी लावायची आहे.(येथुन आपला कामाचा कालावधी चालु होतो)...

सर्व प्रथम कंपनीच्या कॅन्टीनमध्ये जाऊन आपल्याला ब्रेकफास्ट करायचा असतो.(नियोजीत वेळ15मिनीटे)कॅन्टीनमध्ये गेल्यावर लाईनमध्ये शिस्तीत उभे राहुन,नंबर आला की प्लेट मध्ये दीलेला पदार्थ,सोबतीला असलेला चहा घेऊन आपण शिस्तीत टेबलवर बसून तो खायचा/प्यायचा आहे.मग आपली प्लेट,ग्लास बेसिनविंडो एरियात नेऊन ठेवायची,व्यवस्थित हात धुवून नंतर नियोजित कामाचा स्थळी ब्लाॅकला आपल्याला जायचे असते....

वेळ(7.15ते7.30)ब्लाॅक गेटसमोर असलेल्या रबर मॅटवर आपले शुज घासुन आत प्रवेश केल्यावर,सर्व प्रथम बाथरूममध्ये जाऊन आपण पुन्हा आपले हाथ धुवून स्वछ करायचे आहे.जनरल एरीयात गेले की आपण आपल्या ड्रोवरमध्ये आपली घड्याळ,पाॅकेट,इत्यादी काढुन ठेवायचं आहे....

मग प्रायमरी एरीयात जातांनी कंपनीचा विशेष गणवेश(फोटोत दाखवल्याप्रमाणे)घालून आपल्याला आत जायचं आहे.आत जातांनी आरशात आपण गणवेश व्यवस्थित वेअर केले आहे की बघावं,अन् पुन्हा एकदा जंतु विरहीत हात राहण्यासाठी ठेवलेल्या द्रावनाने स्प्रेने हात पुसुन घ्यायचे आहेव आत जायचे आहे....

आपल्या कामाची सुरुवात होते( वेळ7.30), नियोजुन दिलेल्या वेळेत सुपरवायझरची परवानगी घेऊन जेवन करण्यासाठी येताना,पुन्हा सर्व नियम पाळत आपल्याला प्रायमरी एरीयातुन जनरल एरीयात यायचं आहे.आल्यावर विशेष गणवेश योग्य पध्दतीने काढुन डजबीन मध्ये टाकुन ड्रोवर मधुन आपले साहित्य घेऊन पुन्हा बाथरूम मध्ये जाऊन तोंड,नाक,हात स्वच्छ धुवून फ्रेश व्हायचं आहे....

ब्लॉकच्या बाहेर येताना शिस्तीत यायचे आहे, गळ्यात ओळखपत्र घातलेले असावे.कॅन्टीनमध्ये आल्यावर व्यवस्थित रांगेत उभे राहायचे आहे, नंबर आल्यावर जितके लागेल तितके घेऊन मोठीप्लेट शिस्तीत हातात पकडायची आहे. अन् शिस्तीत टेबलवर बसून तीस मिनिटांमध्ये जेवण करायचे आहे.जेवण झाले की आपली प्लेट
बेसिन विंडोमध्ये ठेवायची आहे.अन् पुन्हा पाणी पिऊन ब्लॉकला कामाच्या स्थळी जायचे आहे.ज्या पद्धतीने आपण आधी आत गेलो आहे तसेच जायचे आहे....

कामाचा कालावधी समाप्त होतो.(वेळ3.15)आधी सांगितल्या प्रमाणे बाहेर येऊन पुन्हा बाथरूममध्ये फ्रेश व्हायचे आहे व आपल्या कॉन्ट्रॅक्ट  ज्यांचाकडे आपण काम करतो ज्यांचा आहे त्या ऑफिस वर येऊन थांबायचे आहे. दुसऱ्या दिवसाचे नियोजन घेऊन शिस्थिती रांगेत चालत हजेरी मशीनला कार्ड दाखवून(वेळ3.30)  गेटवर येऊन उभे राहायचे आहे. सेक्युरीटी पुन्हा आपली  तपासणी करेल व आपली सुट्टी होईल....

(वरील सर्व नियम कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्वांना अवलंबून असतात)....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...