मुख्य सामग्रीवर वगळा

Company rules ....

कंपन्यामध्ये काम करण्याचा माझा अनुभव जेमतेमच आहे,पण जो आहे तो खुप छान आहे.
शिस्त,वेळेचे महत्त्व,इत्यादी गुण आपल्याला रोजच्या जीवनात जर अनुभवायचे असेल तर खरच एकदा तरी हा अनुभव घेऊन बघावा....

मी आजवर काम केलेल्या कंपनीमध्ये मला आवडलेलं कंपनी क्षेत्र जर कोणते असेल तर ते फार्मा कंपनी.शिस्तबद्धता,वेळेचे नियोजन,अजुनही असंख्य नियम या कंपनीत काम करणाऱ्या सर्वांना लागु असतात....

अगदी House keeping मध्ये काम करणारा असो किंवा सर्वोच्च पदावर काम करणारे सर्वांसाठी सारखे नियम येथे असतात.तर थोडक्यात माहिती या कंपनींच्या नियमांबद्दल व येथे चालणारे काम कसे चालते याबद्दल....

फस्टशिप(सर्व शिपमध्ये असेच काम होत असते, फक्त कामाचे नियोजन व एमरजेंसीमध्ये यात वेळेनुसार बदल होत असतो)मध्ये जर तुम्ही काम करत असाल,तर कसे असते तुमचे एकुण 9.00 तासांचे कामाचे नियोजन ते खालीलप्रमाणे असते.फस्टशिपमध्ये काम करण्यासाठी तुमची वेळ असेल सकाळी 6.30 ते दुपारी 3.30....

सर्व प्रथम नियोजित वेळेवर तुम्ही कंपनीच्या मेन गेटवर असायला हवे. तुमचे राहणीमान दाढी,कटिंग व्यवस्थित असावं,नख कापलेली स्वच्छ असावी,गळ्यात ओळखपत्र,पायात सेफ्टी शुज,अंगावर असलेले कपडे फार तंग नसावे व स्वच्छ असावे,मोबाईल,व्यसनी,आम्लीपदार्थ कंपनी आवारात आणण्यासाठी सक्त बंदी घालण्यात आली आहे.तेव्हा हे आढळले तर डायरेक्ट नौकरीवरुन तुम्हास बडतर्फ केले जाते.शरीरावर कुठेही जखम झाली असेल तर सेक्युरीटी गार्डशी संबंधित विषयी बोलावे लागते,या नियमांनमध्ये बसत असल्यावरच कंपनीच्या मधील आवारात तुम्हाला प्रवेश भेटत असतो....

कंपनीच्या मेन गेटवर तुमची सेक्युरीटी गार्डकडुन तपासणी होते(वेळ7.00)आपण पात्र ठरलो.मग कंपनीच्या आत प्रवेश केल्यावर सर्व प्रथम आपण आपली हजेरी लावण्यासाठी ठरवुन दिलेल्या ब्लाॅकला जाऊन हजेरी मशिनवर हजेरी लावायची आहे.(येथुन आपला कामाचा कालावधी चालु होतो)...

सर्व प्रथम कंपनीच्या कॅन्टीनमध्ये जाऊन आपल्याला ब्रेकफास्ट करायचा असतो.(नियोजीत वेळ15मिनीटे)कॅन्टीनमध्ये गेल्यावर लाईनमध्ये शिस्तीत उभे राहुन,नंबर आला की प्लेट मध्ये दीलेला पदार्थ,सोबतीला असलेला चहा घेऊन आपण शिस्तीत टेबलवर बसून तो खायचा/प्यायचा आहे.मग आपली प्लेट,ग्लास बेसिनविंडो एरियात नेऊन ठेवायची,व्यवस्थित हात धुवून नंतर नियोजित कामाचा स्थळी ब्लाॅकला आपल्याला जायचे असते....

वेळ(7.15ते7.30)ब्लाॅक गेटसमोर असलेल्या रबर मॅटवर आपले शुज घासुन आत प्रवेश केल्यावर,सर्व प्रथम बाथरूममध्ये जाऊन आपण पुन्हा आपले हाथ धुवून स्वछ करायचे आहे.जनरल एरीयात गेले की आपण आपल्या ड्रोवरमध्ये आपली घड्याळ,पाॅकेट,इत्यादी काढुन ठेवायचं आहे....

मग प्रायमरी एरीयात जातांनी कंपनीचा विशेष गणवेश(फोटोत दाखवल्याप्रमाणे)घालून आपल्याला आत जायचं आहे.आत जातांनी आरशात आपण गणवेश व्यवस्थित वेअर केले आहे की बघावं,अन् पुन्हा एकदा जंतु विरहीत हात राहण्यासाठी ठेवलेल्या द्रावनाने स्प्रेने हात पुसुन घ्यायचे आहेव आत जायचे आहे....

आपल्या कामाची सुरुवात होते( वेळ7.30), नियोजुन दिलेल्या वेळेत सुपरवायझरची परवानगी घेऊन जेवन करण्यासाठी येताना,पुन्हा सर्व नियम पाळत आपल्याला प्रायमरी एरीयातुन जनरल एरीयात यायचं आहे.आल्यावर विशेष गणवेश योग्य पध्दतीने काढुन डजबीन मध्ये टाकुन ड्रोवर मधुन आपले साहित्य घेऊन पुन्हा बाथरूम मध्ये जाऊन तोंड,नाक,हात स्वच्छ धुवून फ्रेश व्हायचं आहे....

ब्लॉकच्या बाहेर येताना शिस्तीत यायचे आहे, गळ्यात ओळखपत्र घातलेले असावे.कॅन्टीनमध्ये आल्यावर व्यवस्थित रांगेत उभे राहायचे आहे, नंबर आल्यावर जितके लागेल तितके घेऊन मोठीप्लेट शिस्तीत हातात पकडायची आहे. अन् शिस्तीत टेबलवर बसून तीस मिनिटांमध्ये जेवण करायचे आहे.जेवण झाले की आपली प्लेट
बेसिन विंडोमध्ये ठेवायची आहे.अन् पुन्हा पाणी पिऊन ब्लॉकला कामाच्या स्थळी जायचे आहे.ज्या पद्धतीने आपण आधी आत गेलो आहे तसेच जायचे आहे....

कामाचा कालावधी समाप्त होतो.(वेळ3.15)आधी सांगितल्या प्रमाणे बाहेर येऊन पुन्हा बाथरूममध्ये फ्रेश व्हायचे आहे व आपल्या कॉन्ट्रॅक्ट  ज्यांचाकडे आपण काम करतो ज्यांचा आहे त्या ऑफिस वर येऊन थांबायचे आहे. दुसऱ्या दिवसाचे नियोजन घेऊन शिस्थिती रांगेत चालत हजेरी मशीनला कार्ड दाखवून(वेळ3.30)  गेटवर येऊन उभे राहायचे आहे. सेक्युरीटी पुन्हा आपली  तपासणी करेल व आपली सुट्टी होईल....

(वरील सर्व नियम कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्वांना अवलंबून असतात)....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...