मुख्य सामग्रीवर वगळा

गाव अन् गावच्या आठवणी

गाव अन् गावच्या आठवणी..!


सकाळचा दहाचा सूर्य तळपत होता,तालुक्याचा पोस्टमन रानाच्या पायवाटेना बोडक्या टेकडीवर दहा-बारा घर असलेल्या ठाकर लोकांच्या वस्तीच्या दिशेनं सायकल लोटीत-लोटित येत होता.
लाल कापड,डोक्यावर लाल टोपी घातलेला तो अन् सायकलीला लाल पिशवी असलेली ती सायकल बहुदा पंक्चर झाली असावी...

मी टेकडीवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर बसून होतो,टेकडी गावच्या उंचावर असल्याने पाण्याच्या टाकीवरून सारा गाव नजरी पडायचा.उन्हं असल्यानं अंगाची लाहीलाही होत होती पण अधून-मधून येणारी वाऱ्याची झुळूक काही काळ सुखाचा स्पर्श अंगाला करून जात असायची.

दहा बारा घरांची ठाकरवस्ती असलेल्या वस्तीमध्ये चार-पाच तरुण पोरं शहराला औषधीच्या कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करायची.दहा पाच खेट्या केल्यानंतर सरपंच्याचा ओळखीने यांना लावून दिलं होतं.कधी महिना-पंद्रादिला त्यांचं पत्र यायचं त्यांची ख्यालीखुशाली कळायची,आईबापसांला महिन्याकाठी शे-दोनशे रूपडे पोरं पाठवायची म्हणून त्यांच्या घरची लोकं तालुक्याचा पोस्टमनची वाट देवागत बघत राहायची...

म्या काय चार बुक शिकलो नसल्यानं मी काय करू शकत नव्हतो,मग दहा बारा शेरड्या घेऊन मी दिसभर त्यांना या बोडक्या टेकडीवर घेऊन चारीत हिंडायचो,चार बुक शिकलं असते तर म्यापण शहराला गेलू अस्तू...
लहानपणी शेरड्या घेऊन रानाला जायला आवडू लागलं,गावच्या लोकांच्या आठ दहा शेरड्या,माझ्या दोन घेऊन मी या बोडक्या टेकडीवर घेऊन यायचो.घरी खायला दूध होवून जायचं अन् महिन्याकाठी हजार पाचशे रूपडे मग कश्याला शहराला जायचं,शाळा शिकलू नाय अन्  शेरड्या वळत राहिलो...

आता काय ना धड वाचता येईना झाले,शहराला ओळख मोप आहे पण फायदा काय आपलंच नांणं खोटं..! अशी गत झालीय माझी.
मलाही वाटतं चार-दोन पत्र लिहावी,गावच्या दोस्तांची विचारपूस करावी पण कसं लिहणार अडाणी जो राहिलो.मग काय आपली शेरडं अन् आपण पहाटच्याला निघालं की दिसभर सारे रान कोळपायचे सांच्याला आपलं घर भले अन् आपुन भले...

तालुक्याचा पोस्टमन बाबा एरवी सायकल लोटीत लोटीत टेकडीवर आला होता.मी पण टाकीवरून खाली आलो,पत्राचा गठ्ठा काडून त्यानं मला काही दहा-बारा नावं पुसली कोणी वस्तीला रहात होतं,कुणी गावात सारी पत्र लावून पोस्टमन बाबा मला म्हणाला पाणी दे तो का व थोडंसं..?
मी पिशितली शिशी काढून त्याच्यासमोर धरली,शिशीला चहकडून पोतडे गुंडाळले असल्यानं शिशीतले पाणी गार होतं.गटगट पाणी पिवून पोस्टमन बाबा शिशी देत मला म्हंटला कितवी पहूर शिकलासा..?
मी खाली मान घालत हाताची दोन बोटं दाखवत म्हंटल दुसरी पहूर...

पोस्टमन बाबा म्हंटला
मग एक,दोन येत अस्तीला..?
येत्या की शंभर तक येता पुढं नाय..!
पुढं का नाय येत रं लका..?
पुढं काय करायची पोस्टमन बाबा माझी दहा-बारा शेरड मोजत्या आली बहुत झालं..!

पोस्टमन बाबा हसला अन् शिवजी आप्पाच्या कुडाच्या झोपडीकडे निघून गेला...
सायकल पंक्चर होती,बाबा ती लोटीत होता मी दूरवर जास्तोवर त्याला बघत राहिलो,तो चालत होता,चालत होता..!
आता त्याचा लाल सदरा,लाल टोपी,लाल पिशी लाल टिपक्यागत दिसत होती...

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...