मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणीतल्या दोघी..!

आठवणीतल्या दोघी..!


रात्रीच्या या अश्यावेळी स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात मुंबईचे रस्ते भटकायला लागलो की,काही वर्षांपूर्वी असाच ससेहोलपट करत असताना भेटलेल्या दोन मैत्रिणी आठवतात.एक साधारण तिशी-बत्तीशीतील तर एक माझ्या एव्हडी म्हणजे चोविशी-पंचिविशीतील...

मुंबई म्हंटले की तिला रात्र काय अन् दिवस काय सारखाच,मुंबई थांबत नाही याचा प्रत्यय प्रत्यक्षात आपण हे सर्व अनुभवले की मग येतोच.
तर आज सारखा त्याही दिवशी असाच भटकंती करत होतो,मला एकटा असलो की मग कुणी सोबत लागत नाही,जिकडे रस्ता घेऊन जाईल तिकडे मी भटकत असतो....

रस्ता दिवसापेक्षा हळुवार म्हणजे अती हळूच चालत होता,साधारण अर्धा एक मिनिटाच्या अंतरावर एखादी फॉर व्हीलर जवळून निघून जायची एखाद्या विशिष्ठ पॉईंटला कुठल्यातरी कॉलसेंटरची कॅब येऊन उभे राहायची,दोन तीन मुली उतरल्या की ती पुढे निघून जायची.
त्यांच्यासाठी हे रोजचं होतं पण माझ्यासाठी हे नवीनच,कुतूहल वाटायचं त्यात माझी कुठल्याही विषयाच्या खोलात जाऊन विचार करण्याची सवय मग हा सर्व प्रवास भारी वाटायचा....

मोठ मोठाले होर्डिंग्ज,चमकणारे बॅनर अन् ही माझ्या सारख्या एक्कलकोंड्याला भुलवणारी मुंबई.मला दिवसाच्या मुंबईपेक्षा ही रात्रीच्या सुमारास असलेली,जीवाला मोकळीक असल्याचा भास देणारी मुंबई खूप जवळची वाटली.त्यामुळं आजवर जे काही क्षण रात्रीच्या वेळी मुंबईत भटकंती करत अनुभवले ते आजही आठवणीच्या कप्प्यात तसेच साठवलेले आहेत....

तर त्या दोघींची झालेली भेट पुढे अजूनही कधीतरी वर्ष-सहा महिने झाले की त्यांना करत असलेला मेसेज अन् त्याला न चुकता येणारं उत्तर.हे आजही एका वर्तुळाप्रमाणे चक्र चालू असतं,काय करत होत्या..? इतक्या रात्री कुठं नोकरीला जात होत्या का..? असे असंख्य प्रश्न पहिल्या भेटीत पडलेले पण न बोलता अन् डोळ्यातील नरमाईची असलेली भावना दोघींच्या बाबतीत पडलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन गेली.तितक्याच सहजतेने जितक्या सहजतेने प्रश्न पडलेली मला....

मी चालत होतो कैफात माझ्या माझ्या विश्वात,भेट झाली त्यामागची कथा खूप मोठी पण थोडक्यात काय तर खूप काही चेहऱ्यावर असलेलं हसू दिवसभर लपवून त्यांच काम चालू असायचं अन् अश्या मध्य रात्री जेव्हा कॅब ठरल्या चौकात यायची त्यांना सोडायला तेव्हा त्या दिवसभर हास्य असलेल्या चेहऱ्यावर एक आयुष्याला जगण्याला कंटाळून गेल्याचा    भाव दिसून यायचा...

पण पुढे मैत्रीत जसं वर्षानुवर्ष भेटीचे,बोलण्याचे वर्तुळे पूर्ण होत होते तितकेच अन् तसेच सहज आयुष्य जगण्यासाठी रोजच होणारी पहाठ अन् मध्यरात्रसुद्धा होत होती.फार काही बदल नव्हते रोजची ठरलेली वेळ जॉब,घर,आयुष्याचे गणित इतकंच काय ते आयुष्य त्यांचं.

खोट्या रंगमंचावर एका खूप उंचीवर असलेल्या नटीचा मेकअप करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून त्या दोघी काम करायच्या.या विश्वात केव्हा आल्या..? कुणा आणलं..?  इतका जम कसा बसला..? हे मी ही कधी फार जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.इतकं मात्र नक्की होतं रंगमंचावर नटी आपली कलाकारी दाखवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत अन् तिच्यावर या दोघी मेहनत घेत असायच्या...

सिनेजगत असो किंवा रंगमंच या मला नेहमीच काळोख असलेला व्यवसाय,इंडस्ट्री वाटल्या.येथील कलाकारपासून तर स्पॉटबॉयपर्यंत सगळे दुहेरी आयुष्यं जगत असतात,यात काही जणांचा प्रत्यक्ष सहभाग असतो तर काही फक्त पडद्यामागे आपली भूमिका बजावत असतात...
खऱ्याखुऱ्या आयुष्यातसुद्धा खूप भूमिका त्या पार पाडत असतात,नशिबाने या लोकांचा सहवास मलाही थोडाफार लाभला,त्यांना माझ्यापाशी व्यक्त व्हावं वाटलं म्हणून हे रात्रीचं एक आगळं वेगळं जग अनुभवयाला मला भेटले...

फार काही नाही सांगणार कॅब आली दोघी कॅबमधून उतरल्या,दिवसभर त्या नटी सोबत राहून आपलं आयुष्य विसरून त्या आयुष्याला घेऊन खूष असल्याचा आव आणत चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन जगत असायच्या.अशीच एक मध्यरात्री कॅब आली अन् नंतर या हसऱ्या चेहऱ्या पलिकडे असलेल्या आयुष्याला घेऊन असलेल्या जखमा त्यांच्याकडून कळत गेल्या अन् इतकं कळले व्यक्ती एकाच वेळी दोन आयुष्यं जगत असते...

तेव्हापासून या रात्रीच्या जगाचे आकर्षण कायम वाटू लागले,ज्याच्यी त्याची एक आगळी वेगळी कथा जाणून घ्यायला मन मग तयारी व्हायचे भटकंती करायचे.मग बरेच कोडे उलगडले जायचे या अश्या रात्रीच्या वेळी अन् कित्येक आसवांचे बांध फुटल्या जायचे एकदा विश्वास संपादन केला की....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...