मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणीतल्या दोघी..!

आठवणीतल्या दोघी..!


रात्रीच्या या अश्यावेळी स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात मुंबईचे रस्ते भटकायला लागलो की,काही वर्षांपूर्वी असाच ससेहोलपट करत असताना भेटलेल्या दोन मैत्रिणी आठवतात.एक साधारण तिशी-बत्तीशीतील तर एक माझ्या एव्हडी म्हणजे चोविशी-पंचिविशीतील...

मुंबई म्हंटले की तिला रात्र काय अन् दिवस काय सारखाच,मुंबई थांबत नाही याचा प्रत्यय प्रत्यक्षात आपण हे सर्व अनुभवले की मग येतोच.
तर आज सारखा त्याही दिवशी असाच भटकंती करत होतो,मला एकटा असलो की मग कुणी सोबत लागत नाही,जिकडे रस्ता घेऊन जाईल तिकडे मी भटकत असतो....

रस्ता दिवसापेक्षा हळुवार म्हणजे अती हळूच चालत होता,साधारण अर्धा एक मिनिटाच्या अंतरावर एखादी फॉर व्हीलर जवळून निघून जायची एखाद्या विशिष्ठ पॉईंटला कुठल्यातरी कॉलसेंटरची कॅब येऊन उभे राहायची,दोन तीन मुली उतरल्या की ती पुढे निघून जायची.
त्यांच्यासाठी हे रोजचं होतं पण माझ्यासाठी हे नवीनच,कुतूहल वाटायचं त्यात माझी कुठल्याही विषयाच्या खोलात जाऊन विचार करण्याची सवय मग हा सर्व प्रवास भारी वाटायचा....

मोठ मोठाले होर्डिंग्ज,चमकणारे बॅनर अन् ही माझ्या सारख्या एक्कलकोंड्याला भुलवणारी मुंबई.मला दिवसाच्या मुंबईपेक्षा ही रात्रीच्या सुमारास असलेली,जीवाला मोकळीक असल्याचा भास देणारी मुंबई खूप जवळची वाटली.त्यामुळं आजवर जे काही क्षण रात्रीच्या वेळी मुंबईत भटकंती करत अनुभवले ते आजही आठवणीच्या कप्प्यात तसेच साठवलेले आहेत....

तर त्या दोघींची झालेली भेट पुढे अजूनही कधीतरी वर्ष-सहा महिने झाले की त्यांना करत असलेला मेसेज अन् त्याला न चुकता येणारं उत्तर.हे आजही एका वर्तुळाप्रमाणे चक्र चालू असतं,काय करत होत्या..? इतक्या रात्री कुठं नोकरीला जात होत्या का..? असे असंख्य प्रश्न पहिल्या भेटीत पडलेले पण न बोलता अन् डोळ्यातील नरमाईची असलेली भावना दोघींच्या बाबतीत पडलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन गेली.तितक्याच सहजतेने जितक्या सहजतेने प्रश्न पडलेली मला....

मी चालत होतो कैफात माझ्या माझ्या विश्वात,भेट झाली त्यामागची कथा खूप मोठी पण थोडक्यात काय तर खूप काही चेहऱ्यावर असलेलं हसू दिवसभर लपवून त्यांच काम चालू असायचं अन् अश्या मध्य रात्री जेव्हा कॅब ठरल्या चौकात यायची त्यांना सोडायला तेव्हा त्या दिवसभर हास्य असलेल्या चेहऱ्यावर एक आयुष्याला जगण्याला कंटाळून गेल्याचा    भाव दिसून यायचा...

पण पुढे मैत्रीत जसं वर्षानुवर्ष भेटीचे,बोलण्याचे वर्तुळे पूर्ण होत होते तितकेच अन् तसेच सहज आयुष्य जगण्यासाठी रोजच होणारी पहाठ अन् मध्यरात्रसुद्धा होत होती.फार काही बदल नव्हते रोजची ठरलेली वेळ जॉब,घर,आयुष्याचे गणित इतकंच काय ते आयुष्य त्यांचं.

खोट्या रंगमंचावर एका खूप उंचीवर असलेल्या नटीचा मेकअप करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून त्या दोघी काम करायच्या.या विश्वात केव्हा आल्या..? कुणा आणलं..?  इतका जम कसा बसला..? हे मी ही कधी फार जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.इतकं मात्र नक्की होतं रंगमंचावर नटी आपली कलाकारी दाखवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत अन् तिच्यावर या दोघी मेहनत घेत असायच्या...

सिनेजगत असो किंवा रंगमंच या मला नेहमीच काळोख असलेला व्यवसाय,इंडस्ट्री वाटल्या.येथील कलाकारपासून तर स्पॉटबॉयपर्यंत सगळे दुहेरी आयुष्यं जगत असतात,यात काही जणांचा प्रत्यक्ष सहभाग असतो तर काही फक्त पडद्यामागे आपली भूमिका बजावत असतात...
खऱ्याखुऱ्या आयुष्यातसुद्धा खूप भूमिका त्या पार पाडत असतात,नशिबाने या लोकांचा सहवास मलाही थोडाफार लाभला,त्यांना माझ्यापाशी व्यक्त व्हावं वाटलं म्हणून हे रात्रीचं एक आगळं वेगळं जग अनुभवयाला मला भेटले...

फार काही नाही सांगणार कॅब आली दोघी कॅबमधून उतरल्या,दिवसभर त्या नटी सोबत राहून आपलं आयुष्य विसरून त्या आयुष्याला घेऊन खूष असल्याचा आव आणत चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन जगत असायच्या.अशीच एक मध्यरात्री कॅब आली अन् नंतर या हसऱ्या चेहऱ्या पलिकडे असलेल्या आयुष्याला घेऊन असलेल्या जखमा त्यांच्याकडून कळत गेल्या अन् इतकं कळले व्यक्ती एकाच वेळी दोन आयुष्यं जगत असते...

तेव्हापासून या रात्रीच्या जगाचे आकर्षण कायम वाटू लागले,ज्याच्यी त्याची एक आगळी वेगळी कथा जाणून घ्यायला मन मग तयारी व्हायचे भटकंती करायचे.मग बरेच कोडे उलगडले जायचे या अश्या रात्रीच्या वेळी अन् कित्येक आसवांचे बांध फुटल्या जायचे एकदा विश्वास संपादन केला की....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड