मुख्य सामग्रीवर वगळा

Letter Writing Day..! ❤️

Letter Writing Day..! ❤️

तर आज पत्रलेखन दिवस,
दिवसभर आज असंख्य पत्र वाचली,पत्रासोबतच्या अनेकांच्या आठवणी वाचल्या.अनेकांच्या पत्राला सुखाची कीनार तर अनेकांच्या पत्रात दुःखाचे कारण  घटकेसर्शी दिलासा म्हणून पत्रातुन व्यक्त होणं.कारण काहीही असो पत्र लिहायला निमित्त लागत नाही की कारणही अन् वेळही किंवा कुठल्याही नात्याचे बंधनही.
आजचा दिवस भरभरून पत्रातून व्यक्त होणाऱ्या मनांची,व्यक्तींची पत्रविषयी असलेली जवळीक,प्रेम त्यांच्या लिखाणातुन दिसुन आले...

माझ्याबाबतीत सांगायचे तर मी पत्ररुपी पत्र फार कमीच म्हणजे अगदी नगण्य असे माझ्या आयुष्यात लिहले.परंतु,पत्ररुपी अर्ज हे शाळेत असल्यापासून ते आजतागायत लिहतो आहे,पाठवतो आहे...

आता अलीकडे नोकरी संदर्भात पत्र व्यवहार बरेच वाढले आहे,आजच्या डिजिटल युगात ही अर्जरूपी पत्र ही डिजिटल झाली अन् माझा डिजिटल पत्र व्यवहार ईमेलवरती मोठ्या प्रमाणात होवू लागला,हे काही दिवसांपूर्वी एक पोस्ट मधून मी आपणास सांगितलेच.अनेक पत्ररुपी अर्ज केलेत अगदी संपूर्ण विश्वात मी हे डिजिटल पत्र पाठवले आहे,कधी जॉबसाठी तर कधी फक्त पत्राप्रती असलेलं आकर्षण...
म्हणूनच मी अलिकडे संपूर्ण विश्वात कुठेही मी ईमेल पाठवत असतो,ईमेलचा रिप्लाय तितकाच आनंद देऊन जातो जितका पाच-सहा दिवस पत्र पाठवून झाले की ते आपल्या हातात जेव्हा येते...

शालेय वयात सुट्टीचा अर्ज हेच माझं पत्र,पत्ररूपी ग्रिटींग कार्ड दिवाळीच्या सणाला,न्यू इअरसाठी अनेक मित्र-मैत्रिणींना दिले.नंतर नकळत्या वयात आलेल्या जबाबदाऱ्या अन् मग हे सगळं दुरावत गेलं,मग मात्र पत्र फक्त परीक्षेत लिहल्या गेले पण ते खूप मनापासून इतके की,अनेकवेळा माझं पत्र भर वर्गात शिक्षकांनी वाचून दाखविले...

खूपवेळा वाटायचं आपणही कुणाला पत्र लिहावे पण तेव्हा ते मला परवडणारे नव्हते,मग अनेकदा मनात येऊनही मी ते टाळत राहायचो.आजही खूपवेळा पत्र लिहायचा विचार करत असतो,सर्वकाही ठीक असूनही हल्ली पत्र लिहायला मन धजावत नाही...
 
कॉलेज वयातही सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे कधी पत्राचा संबंध आला नाही किंवा कॉलेज फक्त परीक्षेच्या दिवशीच माहीत असल्यामुळे कुणाला पत्र लिहून द्यायचीसुद्धा वेळ आली नाही.हेच योग्य वाटतं की नाही लिहली त्यावेळी पत्र तेच बरे झाले,नाही तर आज इतकं लिहायला मला शक्य नसतं...
पुढे बी.एस.सी. झालं अन् एक दिवस लायब्ररीमध्ये असताना का कुणास ठावूक काय वाटले पत्र लिहावं वाटलं,तेव्हापासून डायरीत पत्र लिहून ठेवायला लागलो.पुढे तेही कंटाळवाणे वाटायला लागलं कारण पत्र लिहण्यात तेव्हाच मज्जा जेव्हा ते कुणीतरी वाचणारे असते,नशिबाने आजवर पत्ररुपी पत्र वाचणारे कुणी जवळचे नाही,त्यामुळे नाही लिहत आता पत्र...

इतकं मात्र आहे एकदा मात्र हा पत्रांचा प्रवास अनुभवायचा आहे,जरी पत्र लिहली नसेल.पत्रांचा हा प्रवास जवळून बघायचा आहे,कारण त्याचं खूप आकर्षण खूप लहानपणापासून आहे.डिजिटल पत्रांचा प्रवास अजून काही वर्ष आयुष्यात नित्याचा असणार आहे,त्यामुळे लिहत राहायचं आहे अन् समोरच्या व्यक्तीला पत्र भेटले की आपसूक चेहऱ्यावर येणारे भाव कल्पनेत अनुभवणे चालू ठेवायचे आहे...

कुणाला इच्छा असेल तर नक्कीच प्रयत्न करा,तुमचे पत्र वाचायला आवडेल मला...

#LetterWritingDay ...!
Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...