मुख्य सामग्रीवर वगळा

Letter Writing Day..! ❤️

Letter Writing Day..! ❤️

तर आज पत्रलेखन दिवस,
दिवसभर आज असंख्य पत्र वाचली,पत्रासोबतच्या अनेकांच्या आठवणी वाचल्या.अनेकांच्या पत्राला सुखाची कीनार तर अनेकांच्या पत्रात दुःखाचे कारण  घटकेसर्शी दिलासा म्हणून पत्रातुन व्यक्त होणं.कारण काहीही असो पत्र लिहायला निमित्त लागत नाही की कारणही अन् वेळही किंवा कुठल्याही नात्याचे बंधनही.
आजचा दिवस भरभरून पत्रातून व्यक्त होणाऱ्या मनांची,व्यक्तींची पत्रविषयी असलेली जवळीक,प्रेम त्यांच्या लिखाणातुन दिसुन आले...

माझ्याबाबतीत सांगायचे तर मी पत्ररुपी पत्र फार कमीच म्हणजे अगदी नगण्य असे माझ्या आयुष्यात लिहले.परंतु,पत्ररुपी अर्ज हे शाळेत असल्यापासून ते आजतागायत लिहतो आहे,पाठवतो आहे...

आता अलीकडे नोकरी संदर्भात पत्र व्यवहार बरेच वाढले आहे,आजच्या डिजिटल युगात ही अर्जरूपी पत्र ही डिजिटल झाली अन् माझा डिजिटल पत्र व्यवहार ईमेलवरती मोठ्या प्रमाणात होवू लागला,हे काही दिवसांपूर्वी एक पोस्ट मधून मी आपणास सांगितलेच.अनेक पत्ररुपी अर्ज केलेत अगदी संपूर्ण विश्वात मी हे डिजिटल पत्र पाठवले आहे,कधी जॉबसाठी तर कधी फक्त पत्राप्रती असलेलं आकर्षण...
म्हणूनच मी अलिकडे संपूर्ण विश्वात कुठेही मी ईमेल पाठवत असतो,ईमेलचा रिप्लाय तितकाच आनंद देऊन जातो जितका पाच-सहा दिवस पत्र पाठवून झाले की ते आपल्या हातात जेव्हा येते...

शालेय वयात सुट्टीचा अर्ज हेच माझं पत्र,पत्ररूपी ग्रिटींग कार्ड दिवाळीच्या सणाला,न्यू इअरसाठी अनेक मित्र-मैत्रिणींना दिले.नंतर नकळत्या वयात आलेल्या जबाबदाऱ्या अन् मग हे सगळं दुरावत गेलं,मग मात्र पत्र फक्त परीक्षेत लिहल्या गेले पण ते खूप मनापासून इतके की,अनेकवेळा माझं पत्र भर वर्गात शिक्षकांनी वाचून दाखविले...

खूपवेळा वाटायचं आपणही कुणाला पत्र लिहावे पण तेव्हा ते मला परवडणारे नव्हते,मग अनेकदा मनात येऊनही मी ते टाळत राहायचो.आजही खूपवेळा पत्र लिहायचा विचार करत असतो,सर्वकाही ठीक असूनही हल्ली पत्र लिहायला मन धजावत नाही...
 
कॉलेज वयातही सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे कधी पत्राचा संबंध आला नाही किंवा कॉलेज फक्त परीक्षेच्या दिवशीच माहीत असल्यामुळे कुणाला पत्र लिहून द्यायचीसुद्धा वेळ आली नाही.हेच योग्य वाटतं की नाही लिहली त्यावेळी पत्र तेच बरे झाले,नाही तर आज इतकं लिहायला मला शक्य नसतं...
पुढे बी.एस.सी. झालं अन् एक दिवस लायब्ररीमध्ये असताना का कुणास ठावूक काय वाटले पत्र लिहावं वाटलं,तेव्हापासून डायरीत पत्र लिहून ठेवायला लागलो.पुढे तेही कंटाळवाणे वाटायला लागलं कारण पत्र लिहण्यात तेव्हाच मज्जा जेव्हा ते कुणीतरी वाचणारे असते,नशिबाने आजवर पत्ररुपी पत्र वाचणारे कुणी जवळचे नाही,त्यामुळे नाही लिहत आता पत्र...

इतकं मात्र आहे एकदा मात्र हा पत्रांचा प्रवास अनुभवायचा आहे,जरी पत्र लिहली नसेल.पत्रांचा हा प्रवास जवळून बघायचा आहे,कारण त्याचं खूप आकर्षण खूप लहानपणापासून आहे.डिजिटल पत्रांचा प्रवास अजून काही वर्ष आयुष्यात नित्याचा असणार आहे,त्यामुळे लिहत राहायचं आहे अन् समोरच्या व्यक्तीला पत्र भेटले की आपसूक चेहऱ्यावर येणारे भाव कल्पनेत अनुभवणे चालू ठेवायचे आहे...

कुणाला इच्छा असेल तर नक्कीच प्रयत्न करा,तुमचे पत्र वाचायला आवडेल मला...

#LetterWritingDay ...!
Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...