मुख्य सामग्रीवर वगळा

Letter Writing Day..! ❤️

Letter Writing Day..! ❤️

तर आज पत्रलेखन दिवस,
दिवसभर आज असंख्य पत्र वाचली,पत्रासोबतच्या अनेकांच्या आठवणी वाचल्या.अनेकांच्या पत्राला सुखाची कीनार तर अनेकांच्या पत्रात दुःखाचे कारण  घटकेसर्शी दिलासा म्हणून पत्रातुन व्यक्त होणं.कारण काहीही असो पत्र लिहायला निमित्त लागत नाही की कारणही अन् वेळही किंवा कुठल्याही नात्याचे बंधनही.
आजचा दिवस भरभरून पत्रातून व्यक्त होणाऱ्या मनांची,व्यक्तींची पत्रविषयी असलेली जवळीक,प्रेम त्यांच्या लिखाणातुन दिसुन आले...

माझ्याबाबतीत सांगायचे तर मी पत्ररुपी पत्र फार कमीच म्हणजे अगदी नगण्य असे माझ्या आयुष्यात लिहले.परंतु,पत्ररुपी अर्ज हे शाळेत असल्यापासून ते आजतागायत लिहतो आहे,पाठवतो आहे...

आता अलीकडे नोकरी संदर्भात पत्र व्यवहार बरेच वाढले आहे,आजच्या डिजिटल युगात ही अर्जरूपी पत्र ही डिजिटल झाली अन् माझा डिजिटल पत्र व्यवहार ईमेलवरती मोठ्या प्रमाणात होवू लागला,हे काही दिवसांपूर्वी एक पोस्ट मधून मी आपणास सांगितलेच.अनेक पत्ररुपी अर्ज केलेत अगदी संपूर्ण विश्वात मी हे डिजिटल पत्र पाठवले आहे,कधी जॉबसाठी तर कधी फक्त पत्राप्रती असलेलं आकर्षण...
म्हणूनच मी अलिकडे संपूर्ण विश्वात कुठेही मी ईमेल पाठवत असतो,ईमेलचा रिप्लाय तितकाच आनंद देऊन जातो जितका पाच-सहा दिवस पत्र पाठवून झाले की ते आपल्या हातात जेव्हा येते...

शालेय वयात सुट्टीचा अर्ज हेच माझं पत्र,पत्ररूपी ग्रिटींग कार्ड दिवाळीच्या सणाला,न्यू इअरसाठी अनेक मित्र-मैत्रिणींना दिले.नंतर नकळत्या वयात आलेल्या जबाबदाऱ्या अन् मग हे सगळं दुरावत गेलं,मग मात्र पत्र फक्त परीक्षेत लिहल्या गेले पण ते खूप मनापासून इतके की,अनेकवेळा माझं पत्र भर वर्गात शिक्षकांनी वाचून दाखविले...

खूपवेळा वाटायचं आपणही कुणाला पत्र लिहावे पण तेव्हा ते मला परवडणारे नव्हते,मग अनेकदा मनात येऊनही मी ते टाळत राहायचो.आजही खूपवेळा पत्र लिहायचा विचार करत असतो,सर्वकाही ठीक असूनही हल्ली पत्र लिहायला मन धजावत नाही...
 
कॉलेज वयातही सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे कधी पत्राचा संबंध आला नाही किंवा कॉलेज फक्त परीक्षेच्या दिवशीच माहीत असल्यामुळे कुणाला पत्र लिहून द्यायचीसुद्धा वेळ आली नाही.हेच योग्य वाटतं की नाही लिहली त्यावेळी पत्र तेच बरे झाले,नाही तर आज इतकं लिहायला मला शक्य नसतं...
पुढे बी.एस.सी. झालं अन् एक दिवस लायब्ररीमध्ये असताना का कुणास ठावूक काय वाटले पत्र लिहावं वाटलं,तेव्हापासून डायरीत पत्र लिहून ठेवायला लागलो.पुढे तेही कंटाळवाणे वाटायला लागलं कारण पत्र लिहण्यात तेव्हाच मज्जा जेव्हा ते कुणीतरी वाचणारे असते,नशिबाने आजवर पत्ररुपी पत्र वाचणारे कुणी जवळचे नाही,त्यामुळे नाही लिहत आता पत्र...

इतकं मात्र आहे एकदा मात्र हा पत्रांचा प्रवास अनुभवायचा आहे,जरी पत्र लिहली नसेल.पत्रांचा हा प्रवास जवळून बघायचा आहे,कारण त्याचं खूप आकर्षण खूप लहानपणापासून आहे.डिजिटल पत्रांचा प्रवास अजून काही वर्ष आयुष्यात नित्याचा असणार आहे,त्यामुळे लिहत राहायचं आहे अन् समोरच्या व्यक्तीला पत्र भेटले की आपसूक चेहऱ्यावर येणारे भाव कल्पनेत अनुभवणे चालू ठेवायचे आहे...

कुणाला इच्छा असेल तर नक्कीच प्रयत्न करा,तुमचे पत्र वाचायला आवडेल मला...

#LetterWritingDay ...!
Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड