मुख्य सामग्रीवर वगळा

History...!

HISTORY..!

जसं एखाद्याला अडगळीच्या अंधाऱ्या खोलीत बसून तासंतास इतिहासाची पुस्तक वाचायला आवडतात.त्या अंधारात त्या पुस्तकात घडून गेलेल्या काळात कल्पनेत विहार करायला आवडते,त्याबद्दल जाणुन घ्यायला खूप आवडते अश्या व्यक्तींशी माझी मैत्री खूप सहज जुळून येते...

इतिहास हा माझा अशक्य सुंदर इतका आवडता विषय आहे.अगदी इतका की मला एखाद्या जुन्या काही दशकांच्या बंद असलेल्या लायब्ररीमध्ये, जिथं फक्त नावाला प्रकाश अन कोंदट वातावरण असेल आणि इतिहासाची पुस्तके असतील अश्या ठिकाणी मी कितीही वेळ बसून ती इतिहासाची पुस्तके वाचू शकतो...

अगदी दुसरीला असताना असलेला अश्मयुगीन इतिहास मला जेव्हा आवडला तेव्हापासून मला हे सर्व खूप जवळचे वाटते, वर्गातही सर शिकवत असताना मी कल्पनेत अश्मयुगीन माणसांसोबत भ्रमंती करत असायचो.थोडं हास्यास्पद आहे पण खरच मला इतिहास खूप जवळचा अन् त्याबद्दल नेहमीच जाणून घेण्याची भूक असलेला मी आहे...

इतिहास म्हंटले की माझा सर्वाधिक आवडता इतिहास हा अश्मयुगीन काळातील इतिहास,नंतर मग संतांचा इतिहास,शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहास, स्वतंत्रपूर्व काळातील इतिहास हा फार किचकट असलेला इतिहास पण जरा मनापासून समजून घेतले की जवळचा वाटणारा नंतर स्वतंत्र नंतरचा इतिहास हे माझ्या मनाने मी केलेले इतिहासाचे टप्पे यात अजून बरेच असतील....

इतिहास म्हंटले की मग वाद येतोच मग खुद्द इतिहास म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचे उत्तर एक नाहीतर अनेक आहे अनेकांनी इतिहास कोणत्या नजरेतून बघितला त्यानुसार ही व्याख्या झाली...
यात मला सर्वात सोयीचे अन् सर्वात सोप्पी वाटली ती व्याख्या म्हणजे इतिहासाचे जनक "हिरोडोटस" यांची व्याख्या.पुढे ही अनेक जणांनी मान्यही केली पण याबद्दल नेहमीच चर्चा होत राहिली....

१)हिरोडोटस यांची व्याख्या-
भूतकालीन मनोरंजक,संस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास होय.
किती सहज अन् समजणारी ही व्याख्या.

२) जर्मन विचारवंत हर्डर यांची व्याख्या-  हर्डर यांच्यामते इतिहास म्हणजे घटनांची साखळी

३) धर्मानंद कोसंबी यांनी इतिहासाची व्याख्या-
   इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांचा संबंधातील एका अनुक्रमावर आधारित घटनाक्रम.

४) पंडित जवाहरलाल नेहरू यांची इतिहासाची व्याख्या-
   निरनिराळ्या युगात निसर्ग व पंचमहाभूते, वन्यपशू व अरण्य आणि शेवटी ज्या सजातियानी मनुष्याला पददलित ठेवण्याचा व आपल्या स्वार्थासाठी त्याचे शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वांच्या विरूद्ध त्याने केलेल्या संघर्षाची कहाणी म्हणजे इतिहास होय.

५)कार्ल मार्क्स यांची थोडीशी वेगळी व्याख्या-
   साम्यवादी विचारप्रणालीचा जनक म्हणजे कार्ल मार्क्स याने वर्गकलह म्हणजे मानवी इतिहास होय अशी वेगळी व्याख्या मत तयार केले.

१९ व २० या शतकात आर्थिक,सांस्कृतिक इतिहासाचे लेखन मोठ्या प्रमाणावर पाश्चात्य देशात झाले.सांस्कृतिक इतिहासाची उत्तम उदाहरणे म्हणून व्होलटेअरच्या THE HISTORY OF THE MARD'S AND CUSTOMS OF THE NATIONS आणि रेनॉल्डच्या HISTORY OF THE IDEAS या ग्रंथाचा उल्लेख केला जातो...

इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला त्याची काही मुद्दे समजून घ्यावी लागतात तेव्हाच आपल्याला इतिहास समजून घ्यायला सहज जातो.
Ex-१)PALEOGRAPHY (जुन्या हस्ताक्षरांचा अभ्यास करणारे शास्त्र.)
     २)PHILOLOGY (भाषाशास्त्र अनेक भाषांचा तौलनिक अभ्यास       करणारे शास्त्र).
     ३)GEOGRAPHY (भूगोल हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो परंतु इतिहास जाणुन घेताना त्या प्रदेशाची रचना,नैसर्गिक सीमा,डोंगर, दऱ्या,जंगले,समुद्र इत्यादी यांचा अभ्यास केला जातो म्हणून हे एक महत्वाचे अंग ठरते.)
   ४)ARCHAEOLOGY (पुरातत्व शास्त्र)
     पुरातत्व शास्त्र म्हणजे प्राचीन अवशेषांचा अभ्यास करणारे शास्त्र.
आणि असे मुद्धे आहेत की ज्यांचा उपयोग इतिहास जाणून घेण्यासाठी  केला जातो.

(काही दिवसांपूर्वी अश्याच आशयाचा एक लेख लिहलेला होता,माझासारख्या इतिहास प्रेमींना तो आवडेल म्हणून थोडक्यात येथे शेअर करतोय.)

भविष्यासाठी वर्तमानकाळात आपलं आयुष्य कसं सुखकर होईल,आयुष्याशी कोणत्या विचारांची लगट आपल्याला करावी लागेल यासाठी अनेक पुस्तकं संपूर्ण जगात भूतकाळात लिहल्या गेली.जी काही शतकांपूर्वी आताच्याही शतको पुढील वर्तमान काळातील वर्षांचा,स्थितीचा विचार करून लिहल्या गेली आहे,आजही ती लिहल्या जात आहेत....

हे लेखन सर्व गुंतागुंतीच वाटत असेल पण माझ्या लेखी "पुस्तक" या शब्दाची व्याख्या ही आहे की,
 "वर्तमान काळातील जीवन सुखकर करण्यासाठी आणि भविष्य काळातील कल्पनेतील जगण्यासाठी इतिहासाने उपयोगी ठरेल अश्या भूतकाळातील नोंदी ठेवण्याचं पुस्तक हे एक माध्यम"
कदाचित माझा कल हा इतिहास विषयाकडे जास्त असल्यामुळे मला तसे वाटत असावं,त्यामुळे विचारानुसार ही व्याख्या बदलत जाते...

आज घडीला अनेक पुस्तके,ग्रंथ हे आपल्याला जगण्यासाठी समृद्ध करत आहेत.आपला वैभवशाली इतिहास आपल्या समोर ठेवत आहे,इतिहासात अनेक लेखक होवुन गेले ज्यांनी आपल्या विचारधारा लिखाणातून व्यक्त करत जगाला एक समृद्ध जीवन कसे जगायचे याचा संदेश दिला.भारताचा इतिहास लिहणारे अनेक लेखक होऊन गेले,ज्यांनी अनेक पुस्तके,ग्रंथ आपल्या देशाच्या संस्कृतीशी,इतिहासाशी निगडीत लिहले.

१)जेम्स मिल- History of Birtish India. (खंड ३)
२)माल्कम- Political History of India.
३)व्हॅलेंटाईन चिरोल-Father of indian unrest.
४)राॅबट आर्म- Historical Frugments.
५)राधाकुमुध मुखर्ची-Ancient India, Ancient india Education,Gupta Empire, (Hindu Civilization),Nationalism in Hindu culture, Local Self Govt.in Ancient india.
६)के.पी.जैस्वाल -History of India.
७)सर जदुनाथ हरकार-Fall of Mughal Empire (खंड ४), Shivaji & His Time.
८)दादाभाई नौरोजी-Poverty of Birtish Rule in India.
९)जेम्स टाॅड- Annals and Antiquities of Rajasthan.
१०)ऐ.एस.अळतेकर-The Position of women in Hindu Civilization.
११)एडवर्ड सैद-Orientalism.
१२)लिओपोल्ड वाॅन रेंके- Princes of people of Southern Europe.
१३)हेगेल- Philosophy of Dialectic.(तत्त्वज्ञान)
१४)डॉ.के.एन.चिटणीस- Research Methodology in History.

Written by,
©®Bharat Sonwane .
(वरील लेख माझ्या नावासहित शेअर करायला माझी हरकत नाही)
क्रमशः
Written by,
Bharat Sonwane
MBA:Production and Operation.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड