मुख्य सामग्रीवर वगळा

सायंकाळच्या गुजगोष्टी...

सायंकाळच्या गुजगोष्टी...


नेहमीप्रमाणे आजही सायंकाळ झाली अन् पावले रोजच्या सायंकाळी ज्या वाटेनं मी फिरायला जातो त्या वाटेला निघाली.गेले काही दिवस शहरात बऱ्यापैकी पाऊस होवून गेल्यामुळे घरापासून फिरस्तीच्या मोकळ्या मैदानापर्यंत सर्वदूर हिरवे गवत,विविध झाडे वाढीस लागली आहे. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे शेवटचे किरणं जेव्हा दव पडलेल्या गवतावर पडतात तेव्हा चमकणारे दव दिवसभराचा असलेला मानसिक त्रास,मनाचे हजारो प्रश्न यांना विसरायला भाग पाडतो...

त्यामुळे अलिकडे सायंकाळची फिरायला जाण्याची वेळ फारशी मी चुकवत नाही,आयुष्यात फार विशेष असे काही चालू नसल्यामुळे ती ही फार चुकत नाही.घड्याळाच्या काट्यावर सध्या माझं आयुष्य बघायचं तर तास काट्यावर चालू आहे असं समजुयात,इतकं सर्व आयुष्यात हळुवार चालू आहे.

असो जे आहे ते तूर्तच छान आहेअजून काही दिवस माझ्यासाठी तरी,कारण मनासारख्या गोष्टी नाही घडल्यातर माझ्यावर होणारा परिणाम खूप वाईट आहे.जो गेले काही दिवस अनेकदा अनुभवला,त्यामुळं आता फारसे विचार करत नाही,माझ्या आयुष्याच्या पलिकडे सुद्धा सर्व अस्थिर आहे त्यामुळं हे असावं कदाचित पण काही वेळा खूप काही चुकल्यासारखे वाटते....

तर पावलं आपल्या रोजच्या वाटेनं चालत होती,चहूकडे वाढलेली झाडे,तन यामुळे पाऊलवाट स्पष्ट अशी डोळ्यांना दिसत होती.दूरवर असलेला गाई म्हशींची रखवाली करायला म्हणून असलेल्या काळया-निळ्या झोपड्या डोळ्यात मावतील इतक्याश्या होवून दिसत होत्या,अधून मधून छोटी छोटी नाले,खडकातून पाझरणारे पाणी,खळखळ वाहणारे पाणी अन या सर्व गोष्टींना डोळ्यात साठवत माझं विचार करत चालणे चालू होते...

दूरवर डोंगरदर्याच्या रांगा,नजरेत मावतील इतक्या अंतरावर असलेल्या टेकड्या,त्यातून झऱ्यातुन,गवतातून वाट काढत माझ्यापर्यंत आलेलं वाहते पाणी अजून खूप दूरवर वाहत चालले होते.
मेंढ्यांचा कळप आपल्या विश्वात मग्न होवून गवताला फस्त करतोय,मेंढपाळ शिळ फुंकत त्यांना वळत आहे,त्याही खूप आज्ञाधारक असल्यासारखे त्यांच्या मागे मागे फिरत आहे.
स्थानिक शेतकरी त्यांची जनावरे या मोकळ्या रानात चारायला सोडता त्यामुळं,मेंढ्यांचे या रानात चरणे त्यांना योग्य वाटत नाही मग दोन-चारशे मीटर वरून त्या मेंढपाळांना झिडकारून, हातवारे करून त्यांच्या रानातुन धुडकावून लावत आहेत...

माझ्या या फिरस्तीच्या वेळेपर्यंत कुणीही फिरायला फारसं निघत नाही,त्यामुळं माझं असं निसर्गाला न्याहाळणे चालू असते.निसर्ग आपल्याला भरभरून देतो फक्त ते नजरेला न्याहाळता आलं पाहिजे अन् हे गेले काही वर्ष मला उमगल्यामुळे मला माणसांचा सहवास नकोसा वाटतो.माझ्या विश्वात रममाण राहणं,येणाऱ्या जाणाऱ्याला वाक्य दोन वाक्य ओळख आहे इतपत दाखवण्यापुरते मी संवाद करतो नंतर मग माझं विश्व अन् मी ...

रोजच्या जागी पोहचलो,दूर दूर काळे खडक असल्यामुळे मस्त बसण्यासारख्या खडकावर बसून आपलं येणारा जाणारा बघत राहायचं,निसर्ग न्याहाळत रहायचं त्याला जोडून विचार करत राहायचं,आयुष्याशी वयाची वजाबाकी,बेरीज करत राहायचं,ग्रेसच्या कविता ऐकायच्या,गालीबची शायरी ऐकायची,भिमराव पांचाळे यांच्या गझल ऐकायचं अन् अस्तित्वाच्या पुसट झालेल्या खुणांना शोधत राहायचं आपल्या आयुष्यात...

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...