मुख्य सामग्रीवर वगळा

JNV च्या आठवणी...


JNV च्या आठवणी...

भर उन्हाळ्याचे दिवस असायचे,सकाळची उन्हं सायकल चालवत असतांना पाठीशी पाठीवर पडायची अन् डोक्यातून घामाच्या धारा चेहऱ्यावर येऊ लागायच्या.
नदी,नाले,छोट्या-मोठ्या पाऊलवाटा पार करून दोन तासात सायकलच्या कॅरीयरला लावलेली दोनशे पेपर वाटून संपायला यायची.चड-उताराच्या लाल मातीच्या फुफाट्यात असलेल्या रस्त्यानं मग शेवटची नऊ-दहा पेपर टाकण्यासाठी दीड-दोन कि.मी.सायकलवर भटकंती व्हायची...

उन्हाळ्यात जवाहर नवोदय विद्यालयास सुट्टी लागली की तीच पेपरची संख्या तीन-चार पेपरवर येऊन जायची.मलाही नवोदयमध्ये जाण्यास कारण लागायचे म्हणून मी ही जायचो ते तीन चार पेपर घेऊन.
कारण का लागायचं..? येथे असं काय होतं ज्यासाठी मी इतका भटकंती करून शेवटचे पेपर नेमके या नवोदयमध्येच का टाकायचो..? किंवा पहिले पण टाकू शकत होतो मग शेवटच का..?

यालाही खूप कारणे होती,संपूर्ण पेपर टाकली की नवोदय विद्यालयात प्रवेश केला की रस्त्याने चढण लागायची.नवोदय विद्यालय आतील रस्ता संपूर्ण डांबरीकरन केलेला होता,रस्त्याच्या दोन्ही बाजूंना निळी-पिवळी फुलांची झाडे होती,गुलमोहराची झाडं होती,उन्हाळ्यात या रस्त्यांनी जातांना या सर्व झाडांची फुलं रस्त्यानं पडलेली असायची...

रस्त्याने संपूर्ण चहड असल्याने अन् उत्तरेला नवोदयच्या भिंती पलिकडे टेकडी,मोकळा परिसर असल्यामुळे चढ चढून जातांना सुद्धा गार हवा शरीराला अनुभवयाला यायची.घामाचे ओघळणारे थेंब अश्यावेळी शरीराला सहज जाणवायचे अन् एक सुखद गारवा त्यावेळी अनुभवयाला मिळायचा.इतक्यावरच थांबुन चालणार नाही काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाजुला मेहंदीची दाट झाडी होती,निलगिरीची उंच-उंच झाडं होती,यांचा सुगंध तर आजही नाकात दरवळतो....

झाडांना सतत पाणी पुरवठा म्हणून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाजुला ठिबक सिंचनाच्या लांबच लांब दोन नळ्यांनी प्रत्येक झाडाच्या खोडापाशी पाणी सोडलेले होते,त्यामुळं अजूनच गारवा अनुभवयाला मिळायचा.रस्त्याच्या एका वळणाला छोटासा पुल होता,तिथं ठरवून पाच-दहा मिनिटं बसून गुलमोहराच्या झाडाची सावली अनुभवयाला अन् आजच काम संपलं हे अनुभवयाला छान वाटायचं.रोजचा होणारा हा प्रवास यात कुणीही नसलेला सोबती अन् माझ्या या छोट्याश्या विश्वात खूष असलेलो मी.वय काही नाही बारा-तेरा वर्षाचा असेल जेमतेम तेव्हा पण छान वाटायचं हे सर्व रोज अनुभवणे...

मग नवोदयच्या विद्यालय असलेल्या इमारती जवळ आलं की तिथे टाकलेल्या लाकडी खुर्चीवर बसून रजिस्टरवर आपल्या नावाची एंट्री करणं नाव,आत येण्याचे कारण,किती वाजता आत आलो हे लिहणे,सही करणे खरंतर याची रोज येणाऱ्या आमच्या सारख्यांना काहीही एक गरज नव्हती.पण जेव्हा माझा हा प्रवास कायमचा इथे येण्याचा बंद होईल तेव्हा आपलीही या नवोदयच्या विश्वात कुठेतरी रोजची केलेली एक नोंद असेल,आठवण असेल म्हणून मी हे सर्व इथे लिहायचो...

पाणी प्यावेसे वाटले तर पिवून घ्यायचं अन् मग निघायचं रस्त्याच्या बाजूला असलेल्या रेतील्या पाऊलवाटेनं सायकल चालवत,मुलींच्या हॉस्टेल पलिकडे असलेल्या शिक्षकांच्या क्वार्टरमध्ये रस्त्यानं असलेली असंख्य बदामाची,जांभळाची झाडं इकडे लागायची.पहिला पेपर टाकला की नवोदयची ही इमारत न्याहाळत चालायचं सायकलवर,रोज काय बघायचं इतकं त्या इमारतीला या प्रश्नाचं माझ्याकडेही उत्तर नव्हतं,आजही नाही...

आजही कधीतरी गेलो की मी त्या सर्व इमारती न्याहाळत असतो बारकाईने,पुन्हा वळणे घेऊन नवोदयच्या एका खालच्या कोपऱ्यात काही शिक्षकांचे पेपर सायकल एक ठिकाणी सायकल लावून पायी चालत टाकायचे.पुन्हा इथून वरती बॉईज हॉस्टेलकडे वळायचं,रस्त्यात कॅन्टीन लागायचं तिथं मिळणारी चहा,दूध आजही आठवणीत आहे...

मग निलगिरीच्या झाडांच्यामध्ये असलेलं निलगिरी हाऊसमध्ये काही शिक्षकांचे पेपर चालू सायकलवर टाकायचे मग पुन्हा अजुन वरती जावून नवोदयच्या सोबतच शहराच्या उत्तरेकडील शेवटच्या घरात पेपर टाकून परतीच्या मार्गाला लागले की निवांत सायकलवर बसून राहायचे.सायकल उताराच्या दिशेने चालत राहायची,आपण अंगाला स्पर्श करून जाणारा वारा अनुभवयाचा अन् पुन्हा वापस जाताना रजिस्टरवरती एक एन्ट्री करून गुलमोहर,मेहंदी या झाडांच्या समवेत सायकलवर बसुन नवोदयच्या बाहेर पडायचं...

क्षणिक सुखाचा आनंद असायचा हा जो रोज अनुभवयाला भेटायचा...

ठिकाण- जवाहर नवोदय विद्यालय,कन्नड.औरंगाबाद.

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...