मुख्य सामग्रीवर वगळा

JNV च्या आठवणी...


JNV च्या आठवणी...

भर उन्हाळ्याचे दिवस असायचे,सकाळची उन्हं सायकल चालवत असतांना पाठीशी पाठीवर पडायची अन् डोक्यातून घामाच्या धारा चेहऱ्यावर येऊ लागायच्या.
नदी,नाले,छोट्या-मोठ्या पाऊलवाटा पार करून दोन तासात सायकलच्या कॅरीयरला लावलेली दोनशे पेपर वाटून संपायला यायची.चड-उताराच्या लाल मातीच्या फुफाट्यात असलेल्या रस्त्यानं मग शेवटची नऊ-दहा पेपर टाकण्यासाठी दीड-दोन कि.मी.सायकलवर भटकंती व्हायची...

उन्हाळ्यात जवाहर नवोदय विद्यालयास सुट्टी लागली की तीच पेपरची संख्या तीन-चार पेपरवर येऊन जायची.मलाही नवोदयमध्ये जाण्यास कारण लागायचे म्हणून मी ही जायचो ते तीन चार पेपर घेऊन.
कारण का लागायचं..? येथे असं काय होतं ज्यासाठी मी इतका भटकंती करून शेवटचे पेपर नेमके या नवोदयमध्येच का टाकायचो..? किंवा पहिले पण टाकू शकत होतो मग शेवटच का..?

यालाही खूप कारणे होती,संपूर्ण पेपर टाकली की नवोदय विद्यालयात प्रवेश केला की रस्त्याने चढण लागायची.नवोदय विद्यालय आतील रस्ता संपूर्ण डांबरीकरन केलेला होता,रस्त्याच्या दोन्ही बाजूंना निळी-पिवळी फुलांची झाडे होती,गुलमोहराची झाडं होती,उन्हाळ्यात या रस्त्यांनी जातांना या सर्व झाडांची फुलं रस्त्यानं पडलेली असायची...

रस्त्याने संपूर्ण चहड असल्याने अन् उत्तरेला नवोदयच्या भिंती पलिकडे टेकडी,मोकळा परिसर असल्यामुळे चढ चढून जातांना सुद्धा गार हवा शरीराला अनुभवयाला यायची.घामाचे ओघळणारे थेंब अश्यावेळी शरीराला सहज जाणवायचे अन् एक सुखद गारवा त्यावेळी अनुभवयाला मिळायचा.इतक्यावरच थांबुन चालणार नाही काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाजुला मेहंदीची दाट झाडी होती,निलगिरीची उंच-उंच झाडं होती,यांचा सुगंध तर आजही नाकात दरवळतो....

झाडांना सतत पाणी पुरवठा म्हणून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाजुला ठिबक सिंचनाच्या लांबच लांब दोन नळ्यांनी प्रत्येक झाडाच्या खोडापाशी पाणी सोडलेले होते,त्यामुळं अजूनच गारवा अनुभवयाला मिळायचा.रस्त्याच्या एका वळणाला छोटासा पुल होता,तिथं ठरवून पाच-दहा मिनिटं बसून गुलमोहराच्या झाडाची सावली अनुभवयाला अन् आजच काम संपलं हे अनुभवयाला छान वाटायचं.रोजचा होणारा हा प्रवास यात कुणीही नसलेला सोबती अन् माझ्या या छोट्याश्या विश्वात खूष असलेलो मी.वय काही नाही बारा-तेरा वर्षाचा असेल जेमतेम तेव्हा पण छान वाटायचं हे सर्व रोज अनुभवणे...

मग नवोदयच्या विद्यालय असलेल्या इमारती जवळ आलं की तिथे टाकलेल्या लाकडी खुर्चीवर बसून रजिस्टरवर आपल्या नावाची एंट्री करणं नाव,आत येण्याचे कारण,किती वाजता आत आलो हे लिहणे,सही करणे खरंतर याची रोज येणाऱ्या आमच्या सारख्यांना काहीही एक गरज नव्हती.पण जेव्हा माझा हा प्रवास कायमचा इथे येण्याचा बंद होईल तेव्हा आपलीही या नवोदयच्या विश्वात कुठेतरी रोजची केलेली एक नोंद असेल,आठवण असेल म्हणून मी हे सर्व इथे लिहायचो...

पाणी प्यावेसे वाटले तर पिवून घ्यायचं अन् मग निघायचं रस्त्याच्या बाजूला असलेल्या रेतील्या पाऊलवाटेनं सायकल चालवत,मुलींच्या हॉस्टेल पलिकडे असलेल्या शिक्षकांच्या क्वार्टरमध्ये रस्त्यानं असलेली असंख्य बदामाची,जांभळाची झाडं इकडे लागायची.पहिला पेपर टाकला की नवोदयची ही इमारत न्याहाळत चालायचं सायकलवर,रोज काय बघायचं इतकं त्या इमारतीला या प्रश्नाचं माझ्याकडेही उत्तर नव्हतं,आजही नाही...

आजही कधीतरी गेलो की मी त्या सर्व इमारती न्याहाळत असतो बारकाईने,पुन्हा वळणे घेऊन नवोदयच्या एका खालच्या कोपऱ्यात काही शिक्षकांचे पेपर सायकल एक ठिकाणी सायकल लावून पायी चालत टाकायचे.पुन्हा इथून वरती बॉईज हॉस्टेलकडे वळायचं,रस्त्यात कॅन्टीन लागायचं तिथं मिळणारी चहा,दूध आजही आठवणीत आहे...

मग निलगिरीच्या झाडांच्यामध्ये असलेलं निलगिरी हाऊसमध्ये काही शिक्षकांचे पेपर चालू सायकलवर टाकायचे मग पुन्हा अजुन वरती जावून नवोदयच्या सोबतच शहराच्या उत्तरेकडील शेवटच्या घरात पेपर टाकून परतीच्या मार्गाला लागले की निवांत सायकलवर बसून राहायचे.सायकल उताराच्या दिशेने चालत राहायची,आपण अंगाला स्पर्श करून जाणारा वारा अनुभवयाचा अन् पुन्हा वापस जाताना रजिस्टरवरती एक एन्ट्री करून गुलमोहर,मेहंदी या झाडांच्या समवेत सायकलवर बसुन नवोदयच्या बाहेर पडायचं...

क्षणिक सुखाचा आनंद असायचा हा जो रोज अनुभवयाला भेटायचा...

ठिकाण- जवाहर नवोदय विद्यालय,कन्नड.औरंगाबाद.

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड