मुख्य सामग्रीवर वगळा

सायंकाळच्या गुजगोष्टी..!

सायंकाळच्या गुजगोष्टी..!

अस्तित्वाच्या पुसट झालेल्या खुणा शोधत मन सैरभैर करत इकभ टकंती करत असले की,आपसूकच आपल्याला हवीशी ही जवळची मित्र भेटत असतात.हल्ली मी माणसात,माणसांच्या गप्पात फार रमत नाही,निसर्ग सोबतीला हवाहवासा वाटतो मला.
अलिकडे फार काही अपेक्षा ठेवल्या नाहीये रोजच्या या दगदगीच्या आयुष्याकडे...

रोजची सांज अन् रोजचा अस्ताला जाणारा सूर्य यांच्या सानिध्यात मला बघायला भेटावा इतकंच वाटतं..होय इतकंच...! 
आयुष्याने न मागता खूप काही दिलं आहे अन् खूप काही दिलेलंही नाहीये पण जे आहे त्यात आता उद्याचा दिवस मी बघत असतो.वर सांगितल्याप्रमाणे माणसांचा सहवास मला आता नकोसा वाटतो,कारण अशी ही लहानगे भेटले की मग माझं संवेदनशील मन फारच विचार करायला लागतं...

इतकं बरं आहे की,ते मन अजून संवेदनशील भावना जागून काही व्यक्तींचा आयुष्यात विचार करत असतं,कुणासाठी हळवे होत असते.नाहीतर जगण्याच्या सीमा माझ्या समवेत त्यालाही कळल्या आहे,त्यामुळे फार अश्या गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टीत ते गुंतत नाही अन् मग भावनांचा होणारा गुंताही फार विस्कटल्या सारखा मला वाटत नाही....

अपेक्षा,ध्येपूर्तीसाठी आयुष्यभर झटणे याला कुठेतरी पूर्णविराम दिला आहे सध्या आयुष्यात.म्हणजे ही प्रश्न आयुष्यभर न सुटणारी आहे,त्यामुळं नैराश्येच्या गर्तेत जाण्यापेक्षा काही घटकेभरचा विसावा म्हणुन आयुष्याचा हा क्षणिक सोहळा साजरा करतो आहे बस...बाकी योग्य वेळ आली की ही आयुष्यभर न सुटणारी प्रश्न सोडायला प्रयत्न करायचे आहेच...

तोवर अस्ताला जाणारा सूर्य,सूर्यास्त अन् सोबतीला अशी ही छोटी दोस्त...

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...