मुख्य सामग्रीवर वगळा

सायंकाळच्या गुजगोष्टी..!

सायंकाळच्या गुजगोष्टी..!

अस्तित्वाच्या पुसट झालेल्या खुणा शोधत मन सैरभैर करत इकभ टकंती करत असले की,आपसूकच आपल्याला हवीशी ही जवळची मित्र भेटत असतात.हल्ली मी माणसात,माणसांच्या गप्पात फार रमत नाही,निसर्ग सोबतीला हवाहवासा वाटतो मला.
अलिकडे फार काही अपेक्षा ठेवल्या नाहीये रोजच्या या दगदगीच्या आयुष्याकडे...

रोजची सांज अन् रोजचा अस्ताला जाणारा सूर्य यांच्या सानिध्यात मला बघायला भेटावा इतकंच वाटतं..होय इतकंच...! 
आयुष्याने न मागता खूप काही दिलं आहे अन् खूप काही दिलेलंही नाहीये पण जे आहे त्यात आता उद्याचा दिवस मी बघत असतो.वर सांगितल्याप्रमाणे माणसांचा सहवास मला आता नकोसा वाटतो,कारण अशी ही लहानगे भेटले की मग माझं संवेदनशील मन फारच विचार करायला लागतं...

इतकं बरं आहे की,ते मन अजून संवेदनशील भावना जागून काही व्यक्तींचा आयुष्यात विचार करत असतं,कुणासाठी हळवे होत असते.नाहीतर जगण्याच्या सीमा माझ्या समवेत त्यालाही कळल्या आहे,त्यामुळे फार अश्या गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टीत ते गुंतत नाही अन् मग भावनांचा होणारा गुंताही फार विस्कटल्या सारखा मला वाटत नाही....

अपेक्षा,ध्येपूर्तीसाठी आयुष्यभर झटणे याला कुठेतरी पूर्णविराम दिला आहे सध्या आयुष्यात.म्हणजे ही प्रश्न आयुष्यभर न सुटणारी आहे,त्यामुळं नैराश्येच्या गर्तेत जाण्यापेक्षा काही घटकेभरचा विसावा म्हणुन आयुष्याचा हा क्षणिक सोहळा साजरा करतो आहे बस...बाकी योग्य वेळ आली की ही आयुष्यभर न सुटणारी प्रश्न सोडायला प्रयत्न करायचे आहेच...

तोवर अस्ताला जाणारा सूर्य,सूर्यास्त अन् सोबतीला अशी ही छोटी दोस्त...

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...