मुख्य सामग्रीवर वगळा

सीमांतनी..!

सीमांतनी..!


हळदीने हात पिवळे झाले,लग्न झाले अन् नवतीचे नऊ दिवस संपले.एकोनिशीची सिमांतीनी आता दिवसभर कामाच्या अन् तिच्या संसाराच्या गराड्यात गुंतून गेली होती.टिपिकल गावाकडल्या साल दोन साल लग्नाला झालेल्या बायकांप्रमाने तीही कामं करू लागली,दिवसभर रोजंदारीने लोकाच्या वावराला खुरपणी,निंदणी करू लागली...

ऐन तारुण्यात केलेलं पदार्पण अन् अंगावर संसार नावाच्या एका परंपरेत स्वतःला झोकून देऊन ती दिवसभर काम उपसायची अन् रात्री ऐन तारुण्यात आलेला तिचा दादला तिला घटकेभरचाही उसंत द्यायचा नाही...चार-सहा महिने मागे पडली,ऐन सुगीच्या दिवसात ती तीन महिन्याची पोटुशी असताना तिला कळलं अन् घरात आनंदाचा पारावर उरला नाही...

कुणाच्या मनात घटकेभरही हा प्रश्न आला नाही की एकोनिशीची सिमांतीनी या सर्व गोष्टींना सामोरे जाईल का..? तिला इतक्या लहान वयात आलेलं बाळंतपण झेपल का..? , तिचं शेवटच्या काही महिन्यात तिला स्वतःला सावरणे जमल का..? प्रश्न खूप होते पण सर्व प्रश्नांना एकच उत्तर होतं..!
ती काही जगाच्या पाठीवर न्यारी नाही,तिच्या मायला जमलं,तिच्या सासुला जमलं अन् आता तिच्या अठरा वर्षाच्या नंदेला जमलं.
मग तिला का नाही..?

दिवसा मागून दिवस जात होते सिमांतीनी आता सहा महिन्याची पोटूशी होती,एकोणाविसाव्या वर्षी वाळक्या अंगकाठीच्या सिमांतीनीच्या पोटाचा घेर नववा महिना चालू असल्यागत दिसत होता.चालताना फारवेळ चाललं की तिला आता धापा लागत असायच्या पण परसदारच्या छोट्या आडातून पाणी शेंदून आणणं तिला चुकायचे नाही.इतकाच काय तिला दिलासा भेटला होता की कंबरावर घेऊन येणारी कळशी आता तिला तिची सासूबाई आणून देत नव्हती,मात्र डोईवर असलेला हंडा मात्र काही केल्या तिच्या नशिबातून या अवस्थेलासुद्धा खाली पडला नव्हता....

सांजेच्या वेळी अंगणातील सारवासारव आवरली की सिमांतीनी हातपाय धुवून,वेनीफनी करून,डोक्यात भांगेच्या मधोमध सिंदुर भरून,चंद्रकोर टिकली कपाळावर लावत,अंगावर घातलेल्या काठ नववार लुगड्यासारख्या साडी चोळीत ती अक्षरशः सौंदर्यवती दिसायची अन् आता त्यास भर म्हणून पोटूशी असल्यामुळे पुढे आलेला पोटाचा घेर अगदी कुणाची नजर लागावी इतकी ती सुंदर दिसत होती.दिवसभर इतकं सर्व काम करूनही सिमांतीनी सांजेच्या या वेळेला अक्षरशः देवीच्या चेहऱ्यावर असलेलं तेच तिच्या चेहऱ्यावर घेऊन यायची...

अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनात तेलाचा दिवा ठेऊन तो सदैव तेवत राहील याची खात्री करून ती वृंदावनाभोवती तीन प्रदक्षिणा घालून अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमस्कार घालत आतल्या घरात यायची अन् सासू सासऱ्याचे पाय पडायची...

जसं अंधारून यावं तसं अग्निदेवी तिची जशी वाट बघत असावी अशी चुल्हांगण पेटवायला वाळलेली लाकडे घेऊन यायची अन् संसाराच्या या रहाटगाड्यात अगदी जाणत्या संसारी स्त्रीसारखी चुल्हीला पेटवायची.दादल्याला,सासू,सासऱ्याला कोऱ्या चहाचं आंधन चुल्हीवर ठेवायची,उकळून उकळून पार काळा झालेला चहा जवा ती कपात ओतायची तेव्हा त्यातून निघणारी वाफ साऱ्या घरात मिरायची अन् तो सुगंध साऱ्या घरात फेर धरायचा....

मग तिचं एका हातानं नथीचा झुबका सावरत चहा पिणं व्हायचं अन् तिच्या दादल्याचे तिला प्रेमानं न्याहाळणे...

(लेखन भरत सोनवणे नावे ©® कॉपी राईट असल्याने नावासहित शेअर करा...)

क्रमशः

Written by,
©®Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...