मुख्य सामग्रीवर वगळा

Evening Thought's..!

Evening Thought's..!


एकांताशी स्वगत जुळून येणं इतकं सोप्पं नाही की खूप सहज कुण्या आपल्याशी आपली केमिस्ट्री जुळून येणं,त्यासाठी त्या पाईक व्हावं लागतं...
भर उजेडात अंधार डोळ्यांना दिसू लागला की मग काही अंशी आपला एकांताशी स्वगत जुळून येणं या प्रक्रियेकडे प्रवास होवू लागतो,गर्दी अनोळखी वाटू लागते,आपली माणसे परकी भासू लागतात किंवा मग माणसाच्या गर्दीत ती हरवून जातात,आपल्याला दिसत नाहीत जरी दिसली तरी आपण त्यांना टाळू लागतो....

मग अश्या रिकाम्या खुर्च्या आवडायला लागतात,आपून बसलेल्या खुर्चीचे आपल्याला ओझे होवू लागते.डोळ्यांना खुर्ची समोरचा सुंदर निसर्ग दिसत असतो पण जाणिवेत तो जाणवत नाही.आपल्याला फक्त एकांत अन् आपलं एकटेपण अश्यावेळी जवळचे वाटायला लागते अन् आपले मनही मग त्यातच रमते,माणसांची सावलीसुध्दा मग काही काळाने आपल्याला नकोशी होवू लागते....

अस्ताला जाणारा सूर्य हवाहवासा वाटू लागतो,शेवटच्या किरणांना डोळ्यात सामावुन घ्यायला आवडतं,मग अंधारून आलं की आपल्याला चहूकडे उजेड दिसायला लागतो मग होणारी चिडचिड अन् स्ट्रीट लाईटचे बंद-चालू होणे यात कुठला फरक भासत नाही...
अश्यावेळी पुन्हा गर्दी नकोशी वाटू लागते,उजेडात असंख्य वाटा दिसू लागतात पण आपली वाट कोणती हे कळत नाही अन् मग भटकंती भटकंती अन् भटकंती होत राहते जीवाची....

पुन्हा सूर्योदय होतो अन् मग पुन्हा डोळ्यांसमोर अंधारून येतं,पहाटेचा गोंधळ असह्य होवू लागतो अन् मग पुन्हा पावले आपसूकच अनोळखी वाटा शोधू लागतात...
मिळेल त्या वाटेनं चालत राहायचं,जिथं माणसाचं अस्तित्व संपेल तिथं मग आपल्या अस्तित्वाच्या काही पुसट खुणा दिसू लागतात अन् मग आपल्यालाच ओझं झालेल्या खुर्चीवर पुन्हा घटकेभरचा विश्राम होतो....

पुन्हा सूर्यास्त,पुन्हा सूर्योदय,पुन्हा अस्तित्वाच्या पुसट झालेल्या खुणा, पुन्हा एकांताचा शोध आणि पुन्हा त्याच्या समीप आपलं येणं....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...