मुख्य सामग्रीवर वगळा

Evening Thought's..!

Evening Thought's..!


एकांताशी स्वगत जुळून येणं इतकं सोप्पं नाही की खूप सहज कुण्या आपल्याशी आपली केमिस्ट्री जुळून येणं,त्यासाठी त्या पाईक व्हावं लागतं...
भर उजेडात अंधार डोळ्यांना दिसू लागला की मग काही अंशी आपला एकांताशी स्वगत जुळून येणं या प्रक्रियेकडे प्रवास होवू लागतो,गर्दी अनोळखी वाटू लागते,आपली माणसे परकी भासू लागतात किंवा मग माणसाच्या गर्दीत ती हरवून जातात,आपल्याला दिसत नाहीत जरी दिसली तरी आपण त्यांना टाळू लागतो....

मग अश्या रिकाम्या खुर्च्या आवडायला लागतात,आपून बसलेल्या खुर्चीचे आपल्याला ओझे होवू लागते.डोळ्यांना खुर्ची समोरचा सुंदर निसर्ग दिसत असतो पण जाणिवेत तो जाणवत नाही.आपल्याला फक्त एकांत अन् आपलं एकटेपण अश्यावेळी जवळचे वाटायला लागते अन् आपले मनही मग त्यातच रमते,माणसांची सावलीसुध्दा मग काही काळाने आपल्याला नकोशी होवू लागते....

अस्ताला जाणारा सूर्य हवाहवासा वाटू लागतो,शेवटच्या किरणांना डोळ्यात सामावुन घ्यायला आवडतं,मग अंधारून आलं की आपल्याला चहूकडे उजेड दिसायला लागतो मग होणारी चिडचिड अन् स्ट्रीट लाईटचे बंद-चालू होणे यात कुठला फरक भासत नाही...
अश्यावेळी पुन्हा गर्दी नकोशी वाटू लागते,उजेडात असंख्य वाटा दिसू लागतात पण आपली वाट कोणती हे कळत नाही अन् मग भटकंती भटकंती अन् भटकंती होत राहते जीवाची....

पुन्हा सूर्योदय होतो अन् मग पुन्हा डोळ्यांसमोर अंधारून येतं,पहाटेचा गोंधळ असह्य होवू लागतो अन् मग पुन्हा पावले आपसूकच अनोळखी वाटा शोधू लागतात...
मिळेल त्या वाटेनं चालत राहायचं,जिथं माणसाचं अस्तित्व संपेल तिथं मग आपल्या अस्तित्वाच्या काही पुसट खुणा दिसू लागतात अन् मग आपल्यालाच ओझं झालेल्या खुर्चीवर पुन्हा घटकेभरचा विश्राम होतो....

पुन्हा सूर्यास्त,पुन्हा सूर्योदय,पुन्हा अस्तित्वाच्या पुसट झालेल्या खुणा, पुन्हा एकांताचा शोध आणि पुन्हा त्याच्या समीप आपलं येणं....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...