मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्य निर्माल्य झाले..!

आयुष्य निर्माल्य झाले..!

वाहत्या नदीच्या किनाऱ्यावर कुणी निर्माल्य म्हणून देवाला वाहिलेल्या फुलांना नदीत वाहते टाकून पुढं निघून चालले होते.कुणी ते निर्माल्यरुपी असलेल्या कचऱ्याला नदीत वाहते टाकत असतांना शिवनामायचे हात जोडून विनवण्या करीत होते की,काही आपल्या मनातले शिवनामायला सांगत होते माहीत नाही अन् त्याला उत्तरही नव्हते.
हे सर्व खूप मनोभावे चालू होते,यापाठीमागे श्रद्धा होती ती माझ्या सारख्यांना उमजूनही काहीही कळत नसल्याने कळल्याचे सोंग आम्हाला आणायचे होते...

कुणी येतोय महादेवाच्या देऊळाकडे बघुन नदी किनाऱ्यावर उभे राहून महादेवाचे दर्शन घेतोय,कुणी पाण्यात डुबकी मारून आपलं पाप धुवून जाईल म्हणून त्यात डुबकी मारत होते.एका किनाऱ्याशी बेलाच्या पानांची दुकाने सजली होती,दहा रूपायाला एक १०८ पानांचा पुडा असे ते विकत होती,सोबत बेलाची फळसुद्धा होती....

विकणारी बारा-पंधरा वर्षांची ती लेकरं बघुन मी नदी किनाऱ्यावर बसून त्यांना न्याहाळत बसलो,एकीकडे व्यवहाराची गणितं शिकणारी ही मुलं होती ज्यांच्या चेहऱ्यावर न कुठला भाव होता की न कुठली श्रद्धा.फक्त आपण येथून किती पैसे घेऊन जाऊ इतकच ते विचार करत होते,बोलत होते...

त्यांचं हे व्यवहारी बोलणं बघुन मला माझा दशकापूर्वीचा काळ आठवत होता.नदीच्या या उंचवट्यावरून पेपरचा गठ्ठा बांधलेली सायकल लोटत घेऊन जातांना माझी होणारी अवस्था,सायकल चालून चालून बारीक झालेली कंबर,त्यातून निसटणारी माझी पॅन्ट हे सगळं आठवलं अन् डोळ्यासमोर ते क्षण येऊन गेले.या मुलांनी पैसा कमवण्याचा हा किती सोप्पा मार्ग शोधला आहे याचं अप्रूप वाटलं पण याही मागे मेहनत होती,व्यवहाराची जोड होती...

गेले चार-पाच दिवस नदीचा प्रवाह दिवस दर दिवस वाढत चालला आहे.काल-परवा नदीच्या पात्रात असलेलं पाणी आज महादेवाच्या मंदिरात असलेल्या गाभाऱ्यात होतं.सभामंडप संपूर्ण पाण्याखाली गेला होता,विनेकरी सावळीराम बाबांची विना वाहत्या पाण्यात शिवनेच्या प्रवाहात काल एकाकी वाहून गेली,आता ती तशीच वाहत गोदामाईच्या पात्रात वाहवत जाईल...
बरे झाले वेळीच लोकांना हलवल्यामुळे मंदिरातील आजोबा माय बाप ठीक होती...

वाहत्या पाण्यात अखेर दर्शन म्हणून किनाऱ्यावर उभा राहिलो,हाते जोडून काय मागितलं माहीत नाही पण पाण्याच्या बाहेर येऊन तसाच अनवाणी पायांनी वाळूतून मार्ग काढत घरच्या मार्गाला लागलो.नदीवर असलेल्या पुलावर काही बायका पूजा करत होत्या,नदीला पाणी खूप असल्यामुळे पुलावर होत असलेली पूजा जवळून बघितलेली...

पुलाच्या कठड्यावर वाहिलेली जाई,जास्वंदाची फुलं,बेलाची पानं अन त्यांच्यावर वाहीलेलं हळदी कुंकंम खुप सुंदर दिसत होतं,जळता कापुर विझु की मिनमिनु करत होता.नदीच्या वाहत्या पाण्यात श्रद्धा म्हणुन छोटुली जाईची फुलं वाहील्या जात होती,नदीच्या प्रवाहात त्यांच वाहणं मला माझ्या वाहत्या आयुष्यासारखं भासत होतं....
इथं माझं आयुष्य नदी झालं होतं अन मी त्या नदीच्या पाण्यात वाहणारं एक नाजुकसं फुल,नदीचं तेच वाहतं पाणी आता फुलाची परिक्षा घेत होतं.

याच विचारात मी घरी आलो,पुन्हा रात्रभर झालेला धुवाधार पाऊस आणि या पावसात सकाळी जेव्हा पुन्हा नदी कीनाय्रावर गेलो तेव्हा हातचं खुप काही वाहुन गेलं होतं.जाई,जुई,जास्वंदीची फुलं,बेलाची पानं पावसात थिजुन गेलेला कापुर सगळं आणि सगळं वाहुन गेलं होतं,पुलावर बघितलं तर तिथेही फक्त पाणी अन पाणी होतं...

आता मला माझं आयुष्य निर्माल्य भासत होत...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...