मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्य निर्माल्य झाले..!

आयुष्य निर्माल्य झाले..!

वाहत्या नदीच्या किनाऱ्यावर कुणी निर्माल्य म्हणून देवाला वाहिलेल्या फुलांना नदीत वाहते टाकून पुढं निघून चालले होते.कुणी ते निर्माल्यरुपी असलेल्या कचऱ्याला नदीत वाहते टाकत असतांना शिवनामायचे हात जोडून विनवण्या करीत होते की,काही आपल्या मनातले शिवनामायला सांगत होते माहीत नाही अन् त्याला उत्तरही नव्हते.
हे सर्व खूप मनोभावे चालू होते,यापाठीमागे श्रद्धा होती ती माझ्या सारख्यांना उमजूनही काहीही कळत नसल्याने कळल्याचे सोंग आम्हाला आणायचे होते...

कुणी येतोय महादेवाच्या देऊळाकडे बघुन नदी किनाऱ्यावर उभे राहून महादेवाचे दर्शन घेतोय,कुणी पाण्यात डुबकी मारून आपलं पाप धुवून जाईल म्हणून त्यात डुबकी मारत होते.एका किनाऱ्याशी बेलाच्या पानांची दुकाने सजली होती,दहा रूपायाला एक १०८ पानांचा पुडा असे ते विकत होती,सोबत बेलाची फळसुद्धा होती....

विकणारी बारा-पंधरा वर्षांची ती लेकरं बघुन मी नदी किनाऱ्यावर बसून त्यांना न्याहाळत बसलो,एकीकडे व्यवहाराची गणितं शिकणारी ही मुलं होती ज्यांच्या चेहऱ्यावर न कुठला भाव होता की न कुठली श्रद्धा.फक्त आपण येथून किती पैसे घेऊन जाऊ इतकच ते विचार करत होते,बोलत होते...

त्यांचं हे व्यवहारी बोलणं बघुन मला माझा दशकापूर्वीचा काळ आठवत होता.नदीच्या या उंचवट्यावरून पेपरचा गठ्ठा बांधलेली सायकल लोटत घेऊन जातांना माझी होणारी अवस्था,सायकल चालून चालून बारीक झालेली कंबर,त्यातून निसटणारी माझी पॅन्ट हे सगळं आठवलं अन् डोळ्यासमोर ते क्षण येऊन गेले.या मुलांनी पैसा कमवण्याचा हा किती सोप्पा मार्ग शोधला आहे याचं अप्रूप वाटलं पण याही मागे मेहनत होती,व्यवहाराची जोड होती...

गेले चार-पाच दिवस नदीचा प्रवाह दिवस दर दिवस वाढत चालला आहे.काल-परवा नदीच्या पात्रात असलेलं पाणी आज महादेवाच्या मंदिरात असलेल्या गाभाऱ्यात होतं.सभामंडप संपूर्ण पाण्याखाली गेला होता,विनेकरी सावळीराम बाबांची विना वाहत्या पाण्यात शिवनेच्या प्रवाहात काल एकाकी वाहून गेली,आता ती तशीच वाहत गोदामाईच्या पात्रात वाहवत जाईल...
बरे झाले वेळीच लोकांना हलवल्यामुळे मंदिरातील आजोबा माय बाप ठीक होती...

वाहत्या पाण्यात अखेर दर्शन म्हणून किनाऱ्यावर उभा राहिलो,हाते जोडून काय मागितलं माहीत नाही पण पाण्याच्या बाहेर येऊन तसाच अनवाणी पायांनी वाळूतून मार्ग काढत घरच्या मार्गाला लागलो.नदीवर असलेल्या पुलावर काही बायका पूजा करत होत्या,नदीला पाणी खूप असल्यामुळे पुलावर होत असलेली पूजा जवळून बघितलेली...

पुलाच्या कठड्यावर वाहिलेली जाई,जास्वंदाची फुलं,बेलाची पानं अन त्यांच्यावर वाहीलेलं हळदी कुंकंम खुप सुंदर दिसत होतं,जळता कापुर विझु की मिनमिनु करत होता.नदीच्या वाहत्या पाण्यात श्रद्धा म्हणुन छोटुली जाईची फुलं वाहील्या जात होती,नदीच्या प्रवाहात त्यांच वाहणं मला माझ्या वाहत्या आयुष्यासारखं भासत होतं....
इथं माझं आयुष्य नदी झालं होतं अन मी त्या नदीच्या पाण्यात वाहणारं एक नाजुकसं फुल,नदीचं तेच वाहतं पाणी आता फुलाची परिक्षा घेत होतं.

याच विचारात मी घरी आलो,पुन्हा रात्रभर झालेला धुवाधार पाऊस आणि या पावसात सकाळी जेव्हा पुन्हा नदी कीनाय्रावर गेलो तेव्हा हातचं खुप काही वाहुन गेलं होतं.जाई,जुई,जास्वंदीची फुलं,बेलाची पानं पावसात थिजुन गेलेला कापुर सगळं आणि सगळं वाहुन गेलं होतं,पुलावर बघितलं तर तिथेही फक्त पाणी अन पाणी होतं...

आता मला माझं आयुष्य निर्माल्य भासत होत...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड