मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्य निर्माल्य झाले..!

आयुष्य निर्माल्य झाले..!

वाहत्या नदीच्या किनाऱ्यावर कुणी निर्माल्य म्हणून देवाला वाहिलेल्या फुलांना नदीत वाहते टाकून पुढं निघून चालले होते.कुणी ते निर्माल्यरुपी असलेल्या कचऱ्याला नदीत वाहते टाकत असतांना शिवनामायचे हात जोडून विनवण्या करीत होते की,काही आपल्या मनातले शिवनामायला सांगत होते माहीत नाही अन् त्याला उत्तरही नव्हते.
हे सर्व खूप मनोभावे चालू होते,यापाठीमागे श्रद्धा होती ती माझ्या सारख्यांना उमजूनही काहीही कळत नसल्याने कळल्याचे सोंग आम्हाला आणायचे होते...

कुणी येतोय महादेवाच्या देऊळाकडे बघुन नदी किनाऱ्यावर उभे राहून महादेवाचे दर्शन घेतोय,कुणी पाण्यात डुबकी मारून आपलं पाप धुवून जाईल म्हणून त्यात डुबकी मारत होते.एका किनाऱ्याशी बेलाच्या पानांची दुकाने सजली होती,दहा रूपायाला एक १०८ पानांचा पुडा असे ते विकत होती,सोबत बेलाची फळसुद्धा होती....

विकणारी बारा-पंधरा वर्षांची ती लेकरं बघुन मी नदी किनाऱ्यावर बसून त्यांना न्याहाळत बसलो,एकीकडे व्यवहाराची गणितं शिकणारी ही मुलं होती ज्यांच्या चेहऱ्यावर न कुठला भाव होता की न कुठली श्रद्धा.फक्त आपण येथून किती पैसे घेऊन जाऊ इतकच ते विचार करत होते,बोलत होते...

त्यांचं हे व्यवहारी बोलणं बघुन मला माझा दशकापूर्वीचा काळ आठवत होता.नदीच्या या उंचवट्यावरून पेपरचा गठ्ठा बांधलेली सायकल लोटत घेऊन जातांना माझी होणारी अवस्था,सायकल चालून चालून बारीक झालेली कंबर,त्यातून निसटणारी माझी पॅन्ट हे सगळं आठवलं अन् डोळ्यासमोर ते क्षण येऊन गेले.या मुलांनी पैसा कमवण्याचा हा किती सोप्पा मार्ग शोधला आहे याचं अप्रूप वाटलं पण याही मागे मेहनत होती,व्यवहाराची जोड होती...

गेले चार-पाच दिवस नदीचा प्रवाह दिवस दर दिवस वाढत चालला आहे.काल-परवा नदीच्या पात्रात असलेलं पाणी आज महादेवाच्या मंदिरात असलेल्या गाभाऱ्यात होतं.सभामंडप संपूर्ण पाण्याखाली गेला होता,विनेकरी सावळीराम बाबांची विना वाहत्या पाण्यात शिवनेच्या प्रवाहात काल एकाकी वाहून गेली,आता ती तशीच वाहत गोदामाईच्या पात्रात वाहवत जाईल...
बरे झाले वेळीच लोकांना हलवल्यामुळे मंदिरातील आजोबा माय बाप ठीक होती...

वाहत्या पाण्यात अखेर दर्शन म्हणून किनाऱ्यावर उभा राहिलो,हाते जोडून काय मागितलं माहीत नाही पण पाण्याच्या बाहेर येऊन तसाच अनवाणी पायांनी वाळूतून मार्ग काढत घरच्या मार्गाला लागलो.नदीवर असलेल्या पुलावर काही बायका पूजा करत होत्या,नदीला पाणी खूप असल्यामुळे पुलावर होत असलेली पूजा जवळून बघितलेली...

पुलाच्या कठड्यावर वाहिलेली जाई,जास्वंदाची फुलं,बेलाची पानं अन त्यांच्यावर वाहीलेलं हळदी कुंकंम खुप सुंदर दिसत होतं,जळता कापुर विझु की मिनमिनु करत होता.नदीच्या वाहत्या पाण्यात श्रद्धा म्हणुन छोटुली जाईची फुलं वाहील्या जात होती,नदीच्या प्रवाहात त्यांच वाहणं मला माझ्या वाहत्या आयुष्यासारखं भासत होतं....
इथं माझं आयुष्य नदी झालं होतं अन मी त्या नदीच्या पाण्यात वाहणारं एक नाजुकसं फुल,नदीचं तेच वाहतं पाणी आता फुलाची परिक्षा घेत होतं.

याच विचारात मी घरी आलो,पुन्हा रात्रभर झालेला धुवाधार पाऊस आणि या पावसात सकाळी जेव्हा पुन्हा नदी कीनाय्रावर गेलो तेव्हा हातचं खुप काही वाहुन गेलं होतं.जाई,जुई,जास्वंदीची फुलं,बेलाची पानं पावसात थिजुन गेलेला कापुर सगळं आणि सगळं वाहुन गेलं होतं,पुलावर बघितलं तर तिथेही फक्त पाणी अन पाणी होतं...

आता मला माझं आयुष्य निर्माल्य भासत होत...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...