मुख्य सामग्रीवर वगळा

गावकुसाच्या आठवणी

गावकुसाच्या आठवणी..!

पहाटेची कोवळी उन्हं अंगावर घेत असतांना चार वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवतो.तेव्हा मी एका फार्मा कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होतो,साधारण दोन महिने झाले होते कंपनी जॉईन करून.नेहमीप्रमाणे सकाळच्या फर्स्ट शिफ्टसाठी मी कामाला गेलो,काम सुरू झाले.साडेअकराच्या सुमारास जेवायला जायचं म्हणून मी प्रॉडक्शन्स डिपार्टमेंटमधून आमच्या प्रॉडक्शन मॅनेजर,सुपरवायझर,माझ्यासारखी तिघे कॅजूअल वर्कर यांच्या सोबतीने जेवायला निघालो..!

फार्मा कंपनी म्हंटले की तिथे बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये एसी कम्पल्सरी असतो किंवा कमीतकमी बाहेरच्या तापमानात आणि डिपार्टमेंटमध्ये असलेलं तापमान यात खूप फरक असतो,आतील तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा  खूप कमी असते.तर ते उन्हाळ्याचे दिवस होते,आम्ही जेवणाची सुट्टी केली सर्व उपकरणे बंद करून आम्ही सहा जण बाहेर "प्राईमयरी एरिया अँड ड्रेस चॅंजिंग रुम"मध्ये आलो,कंपनीचा विशेष युनिफॉर्म मी बदलवला आणि फ्रेश होवून ब्लॉकच्या मेन गेटवर आलो..!

कुठल्याही फार्मा कंपनीत गेले की तिथे शिस्त खूप महत्त्वाची असते,नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे असते.मेन गेटवर आलं की तो विशेष गेट असतो जो उघड-बंद केला की आपल्या संपूर्ण शरीरावर वरून हवेचा मारा केला जातो जेणेकरून आपल्या कपड्यांवर,शुजवर थोड्या प्रमाणात असलेली धूळ,डोळ्यांना न दिसणारे जिवाणू त्यामुळे बाहेर फेकले जातात..!

तर मी तो गेट उघडून बाहेर आलो अन् एकदमच आतील थंड तापमानातून मी बाहेरच्या उन्हाळ्याच्या खूप उष्ण तापमानात आल्यानं मला चक्कर आल्यासारखे झाले अन् मी त्या ओट्यावर चक्कर येऊन पडलो.पुढे काही क्षणांत कंपनीची Ambulance आलेली अन् मला कंपनीतल्या छोट्याश्या दवाखान्यात घेऊन गेली.काही प्रथमोपचार करून मला गोळ्या देऊन कँटीनमध्ये जेवणास घेऊन गेले आणि जेवण करून त्या दिवशी मला सुट्टी देऊन त्या दिवशी आराम करण्यास सांगितले..!

आज हे सर्व आठवण्याचे कारण हेच की अलीकडे दिवसेंदिवस वाढणारा तापमानाचा पारा.असं नाही की मी खूप नाजूक आहे शेतात या उन्हाळ्याच्या दिवसात दिवसदिवस लोकांच्या इथे रोजाने मक्का सोंगण्याचे काम मी केलं आहे,शेतात असलेली मेहनतीचे कामे मी केली आहे.परंतु येथील तापमान असो किंवा निसर्गातील हवा याचा कुठेतरी फरक पडतो इतकेच.पण हा अनुभव छान होता म्हणजे फार्मा कंपनीत एका सामान्य कामगाराची किती काळजी घेतली जाते हे तेव्हा किंवा त्याच्या आधीच मला कळलेले होते.त्यामुळेच फार्मा क्षेत्र आजवर माझं आवडतं क्षेत्र आहे काम करण्यासाठी..!

तर दिवसेंदिवस उन्हाचा वाढता पारा गावाला गेलं की दुपारच्याभरी गावात चक्कर टाकली की गाव शांत निपचित पडलेला असतो धरणीमातेशी,कुणी म्हातारे फेटा घालणारे आजोबा फेट्याची उशी करून देऊळाच्या सभामंडपात निपचित शांत झोपलेले असतात.जोडीला त्यांचा पिढीचे त्यांचे मित्र पडल्या पडल्या गप्पा हानीत असता..!

गावातली लग्नकार्य यावर्षी जोमात असल्यानं शेजारच्या माळ्याच्या मंगलकार्यात एक दिवस खाडा न होता भर उन्हात दुपारची लग्नं लागून राहिली आहे.वऱ्हाडाच्या पंगतीच पंगती जेवण करून उठून जात आहेत,गावात नवरदेवाच्या मिरवणुकीचा डीजे अन् त्याच्या तालावर त्याची दारू पिऊन थिरकणारी मित्र त्यांच्यातलाच कुणी रुसवा आल्यानं गावच्या वेशीला लागून असलेला नधडीत बेश्रमाच्या जाळीत गुतून पार उताना पडला आहे..!

गल्लीत जसजसा डीजे येतोय तसतसं गल्लीत माड्या असलेल्या घरातल्या तरुण पोरी अन् नुकतच लग्न झालेल्या सूना नवरदेवाचे गुनगान गात आहे.तमक्याच्या पोरीनी नशीब खोललं इतक्या मोठ्या घरात नांदायला चालली आहे म्हणून गावातल्या सतरा गप्पा आवरता आवरत नाहीये.काही जगाच्या विरहित काम करणाऱ्या बायकांचे पापड,कुरडया करण्याचे अन्  वऱ्हाडातील बेवड्या पोरांना नाव ठेवण्याचे कार्यक्रम सोबतच चालू आहे..!

गावातली तरुण पोरं आपल्या लग्नाला कुणी यावं म्हणून बळजबरी बायकांच्या पंगतीत वाढत हिंडत आहे,इकडं माणसांना प्यायला पाणी नाही.जमरू आण्णाला या सगळ्यांशी काही घेणंदेणं नाही.पहिल्या पंगतीला जेवण करून तो त्याच्या खपुड्या घेऊन त्यांना रानात चरायला घेऊन निघाला आहे..!

गावची राजकारणी मंडळीतील एकजण नवरीच्या बापाला सांगत आहे,दाजी लग्नाचा बार भारी उडीवला अन् आहेर न करता टावेल टोपी घेऊन तो त्याच्या फॉरव्हीलरमध्ये आमदार साहेबांची मीटिंग आहे असं खोटं सांगून गावच्या फाट्यावर असलेल्या बारवर प्यायला निघाला आहे चार लोकांना घेऊन.तितक्यात एक कार्यकर्ता आला अन् म्हणतो कसा साहेब एक फोटू होवू द्या..!

गावच्या लोकांच्या जगण्याच्या अनेक तऱ्हा आहे भाऊ गाव धड घोड्यावर चालू देत नाही अन् पाईही चालू देत नाही..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...