मुख्य सामग्रीवर वगळा

आजची भेट :सिध्देश्वर महादेव मंदिर (रत्नेश्र्वर महादेव मंदिर),पिशोर.



आजची भेट :
सिध्देश्वर महादेव मंदिर (रत्नेश्र्वर महादेव मंदिर),पिशोर.

मित्रांनो खूप दिवसांनी आज फावला वेळ भेटला.तो भेटलेला वेळ सार्थकी लावायचा म्हणून खूप दिवसांपासून ज्या मंदिराला भेट देण्याची इच्छा होती परंतु वेळेअभावी जमत नसल्याने आजवर जावू शकत नव्हतो.अखेर आज योग जुळून आला अन् काही मित्रांच्या समवेत पिशोर येथील "सिध्देश्वर महादेव मंदिर" या ठिकाणी भेट दिली.
ज्यास "रत्नेश्र्वर महादेव मंदिर" या नावाने सुद्धा ओळखले जाते..!

"पिशोर" ही मोठी बाजारपेठ असलेलं असं गाव आहे."महाराष्ट्र" राज्यातील महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "औरंगाबाद" जिल्ह्यातील आणि त्यातच "औरंगाबाद" जिल्ह्यातील सर्वाधिक ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेल्या,निसर्ग सौंदर्याने नटलेल्या "कन्नड" या तालुक्यात राज्य महामार्गावर वसलेलं पिशोर हे गाव आहे अन् या गावात हे सुंदर असे मंदिर आपल्याला बघायला मिळते..!

हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील बांधणीचे असून,पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येते.परंतु जरासे आडवळणी असल्या कारणाने या मंदिरास फारसे भाविक,पर्यटक भेट देत नाही.त्यामुळे मंदिर खूप सुंदर अवस्थेत अन् बघतांना डोळ्यांचे पारणे फेडणारे असे आहे..!
मंदिर शिळांवर,खांबावर केलेले खूप सुंदर,सुबक अश्या शैलीत अन् खूप बारकाईने शिल्पकाम केलेले असल्याने मंदिर बघत असतानी खूप सुंदर अन् बघतच रहावेसे वाटणारे असे आहे..!

"पिशोर" शहराच्या पश्चिमेस एकांगाला उंच ओट्यावर हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेले असे हे मंदिर आहे.मंदिराचा इतिहास जाणून घेण्याचा विचार केला तर मंदिर हे देवगिरीच्या यादवांच्या काळातील म्हणजे इसवी सन १२५९ ते १२७४ या काळातील असावे असे वाटते.मंदिराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसल्याने अन् माहितीपर असा कुठलाही शीलालेख त्याठिकाणी उपलब्ध नसल्याने फारसा इतिहास या मंदिराबद्दल माहीत नाही..!

खूप जुना इतिहास लाभलेले मंदिर आजही सुस्थितीत आहे.कुठलीही तोडफोड किंवा भग्न अवस्थेत असलेल्या मूर्ती या ठिकाणी नाही.त्यामुळे हे मंदिर पुरातत्व विभागात काम करणाऱ्या नवोदितांना किंवा शिकावू विद्यार्थ्यांना एक पर्वणी ठरणारे आहे.मंदिराच्या सभोवतालचा परिसर खूप शांत असल्याने मन प्रसन्न अन् मंदिराबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याची,त्या मंदिरावर अभ्यास करण्याची आपली त्या ठिकाणी नक्कीच इच्छा होते..!
मंदिर रचना : 
मंदिराची रचना ही प्रवेशद्वार,सभामंडप,गर्भगृह अशी आहे.
मंदिर हे दगडांच्या उंच ओट्यावर बांधलेले आहे,प्रवेशद्वारास सहा खांब,सभामंडपास सहा खांब त्यानंतर गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असल्याने षटकोन आकाराचा भास करून देणारे आहे.मंदिराच्या खांबांवर,भिंतींवर आतील बाजूस व बाहेरील बाजूस खूप सुंदर असे शिल्पकाम केले आहे.पौराणिक देवीदेवता,प्राणी यांचे शिल्पकाम याठिकाणी दिसून येते..!


मंदिराच्या बाहेरील बाजूस हनुमानाची मूर्ती आहे,गर्भगृहात सिध्देश्वराची अखंड एका दगडावर कोरलेले पिंड आहे जिला चांदीचे अच्छादन केले आहे.सभामंडपाच्या एका खांबावर भगवान श्रीकृष्ण यांनी गोवर्धन पर्वत उचलल्याचे शिल्प आहे..!
याच मंदिराच्या पूर्वेस विठ्ठल-रखुमाई यांचे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर आहे,जेही सहा खांबा,भिंतींवर उभे आहे.परंतु काळाच्या ओघात पडझड झाल्याने पूरातत्व विभागाने यांची पुनर्बांधणी केल्याचे दिसून येते.विठ्ठल-रखुमाई मूर्तीच्या एकांगला रेणुकाआईची मूर्ती आहे जी की अंधारात सहज दिसून येत नाही असे तेथील आमचे मित्र यांनी सांगितले.हेमाडपंथी बांधणीचे मंदिर म्हणून एक उत्कृष्ट कलेचा नमुना ठरावा असे हे मंदिर आहे..!
मंदिर वर सांगितल्याप्रमाणे आडवळणी असल्याने नक्षीकाम,शिल्पकला श्रेणी यांची फारशी माहिती उपलब्ध नाहीये.पर्यटकांच्या नजरेतून सुटलेले असे हे मंदिर कन्नड तालुका पर्यटन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी पहावे असे मंदिर बघितल्यावर मलाही वाटून गेले..!
आपण या ठिकाणाला भेट देण्यासाठी येणार कसे..?

विमानाने येणार असाल तर औरंगाबाद येथील विमानतळावर आपण उतरला की तेथून प्रायव्हेट वाहने,एसटी महामंडळ यांची औरंगाबाद - कन्नड - पिशोर बससुद्धा उपलब्ध आहे.
रेल्वेने येणार असाल औरंगाबाद पर्यंत रेल्वे आहे व खान्देश भागातून येणार असाल तर चाळीसगांवपर्यंत रेल्वे अन् तिथून एस टी महामंडळ अन् खाजगी वाहन व्यवस्था उपलब्ध आहे..!
कन्नड ते पिशोर अंतर - २५ किमी.
औरंगाबाद ते पिशोर अंतर - ८५ किमी.
मार्ग-राज्य महामार्ग.
(पुरातत्व खात्यातील कुणी जाणकार व्यक्तींनी या मंदिरास भेट दिली असेल तर त्यांच्याकडून मला अजुन जास्तीत जास्त माहिती मिळाली तर छान होईल.कारण वर सांगितल्याप्रमाणे या मंदिराबद्दल आजवर कुठलेही लेखन झालेले नाही किंवा तसे दस्तावेज उपलब्ध नाही.)

Written by,
Bharat sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...