मुख्य सामग्रीवर वगळा

आजची भेट :सिध्देश्वर महादेव मंदिर (रत्नेश्र्वर महादेव मंदिर),पिशोर.



आजची भेट :
सिध्देश्वर महादेव मंदिर (रत्नेश्र्वर महादेव मंदिर),पिशोर.

मित्रांनो खूप दिवसांनी आज फावला वेळ भेटला.तो भेटलेला वेळ सार्थकी लावायचा म्हणून खूप दिवसांपासून ज्या मंदिराला भेट देण्याची इच्छा होती परंतु वेळेअभावी जमत नसल्याने आजवर जावू शकत नव्हतो.अखेर आज योग जुळून आला अन् काही मित्रांच्या समवेत पिशोर येथील "सिध्देश्वर महादेव मंदिर" या ठिकाणी भेट दिली.
ज्यास "रत्नेश्र्वर महादेव मंदिर" या नावाने सुद्धा ओळखले जाते..!

"पिशोर" ही मोठी बाजारपेठ असलेलं असं गाव आहे."महाराष्ट्र" राज्यातील महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "औरंगाबाद" जिल्ह्यातील आणि त्यातच "औरंगाबाद" जिल्ह्यातील सर्वाधिक ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेल्या,निसर्ग सौंदर्याने नटलेल्या "कन्नड" या तालुक्यात राज्य महामार्गावर वसलेलं पिशोर हे गाव आहे अन् या गावात हे सुंदर असे मंदिर आपल्याला बघायला मिळते..!

हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील बांधणीचे असून,पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येते.परंतु जरासे आडवळणी असल्या कारणाने या मंदिरास फारसे भाविक,पर्यटक भेट देत नाही.त्यामुळे मंदिर खूप सुंदर अवस्थेत अन् बघतांना डोळ्यांचे पारणे फेडणारे असे आहे..!
मंदिर शिळांवर,खांबावर केलेले खूप सुंदर,सुबक अश्या शैलीत अन् खूप बारकाईने शिल्पकाम केलेले असल्याने मंदिर बघत असतानी खूप सुंदर अन् बघतच रहावेसे वाटणारे असे आहे..!

"पिशोर" शहराच्या पश्चिमेस एकांगाला उंच ओट्यावर हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेले असे हे मंदिर आहे.मंदिराचा इतिहास जाणून घेण्याचा विचार केला तर मंदिर हे देवगिरीच्या यादवांच्या काळातील म्हणजे इसवी सन १२५९ ते १२७४ या काळातील असावे असे वाटते.मंदिराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसल्याने अन् माहितीपर असा कुठलाही शीलालेख त्याठिकाणी उपलब्ध नसल्याने फारसा इतिहास या मंदिराबद्दल माहीत नाही..!

खूप जुना इतिहास लाभलेले मंदिर आजही सुस्थितीत आहे.कुठलीही तोडफोड किंवा भग्न अवस्थेत असलेल्या मूर्ती या ठिकाणी नाही.त्यामुळे हे मंदिर पुरातत्व विभागात काम करणाऱ्या नवोदितांना किंवा शिकावू विद्यार्थ्यांना एक पर्वणी ठरणारे आहे.मंदिराच्या सभोवतालचा परिसर खूप शांत असल्याने मन प्रसन्न अन् मंदिराबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याची,त्या मंदिरावर अभ्यास करण्याची आपली त्या ठिकाणी नक्कीच इच्छा होते..!
मंदिर रचना : 
मंदिराची रचना ही प्रवेशद्वार,सभामंडप,गर्भगृह अशी आहे.
मंदिर हे दगडांच्या उंच ओट्यावर बांधलेले आहे,प्रवेशद्वारास सहा खांब,सभामंडपास सहा खांब त्यानंतर गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असल्याने षटकोन आकाराचा भास करून देणारे आहे.मंदिराच्या खांबांवर,भिंतींवर आतील बाजूस व बाहेरील बाजूस खूप सुंदर असे शिल्पकाम केले आहे.पौराणिक देवीदेवता,प्राणी यांचे शिल्पकाम याठिकाणी दिसून येते..!


मंदिराच्या बाहेरील बाजूस हनुमानाची मूर्ती आहे,गर्भगृहात सिध्देश्वराची अखंड एका दगडावर कोरलेले पिंड आहे जिला चांदीचे अच्छादन केले आहे.सभामंडपाच्या एका खांबावर भगवान श्रीकृष्ण यांनी गोवर्धन पर्वत उचलल्याचे शिल्प आहे..!
याच मंदिराच्या पूर्वेस विठ्ठल-रखुमाई यांचे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर आहे,जेही सहा खांबा,भिंतींवर उभे आहे.परंतु काळाच्या ओघात पडझड झाल्याने पूरातत्व विभागाने यांची पुनर्बांधणी केल्याचे दिसून येते.विठ्ठल-रखुमाई मूर्तीच्या एकांगला रेणुकाआईची मूर्ती आहे जी की अंधारात सहज दिसून येत नाही असे तेथील आमचे मित्र यांनी सांगितले.हेमाडपंथी बांधणीचे मंदिर म्हणून एक उत्कृष्ट कलेचा नमुना ठरावा असे हे मंदिर आहे..!
मंदिर वर सांगितल्याप्रमाणे आडवळणी असल्याने नक्षीकाम,शिल्पकला श्रेणी यांची फारशी माहिती उपलब्ध नाहीये.पर्यटकांच्या नजरेतून सुटलेले असे हे मंदिर कन्नड तालुका पर्यटन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी पहावे असे मंदिर बघितल्यावर मलाही वाटून गेले..!
आपण या ठिकाणाला भेट देण्यासाठी येणार कसे..?

विमानाने येणार असाल तर औरंगाबाद येथील विमानतळावर आपण उतरला की तेथून प्रायव्हेट वाहने,एसटी महामंडळ यांची औरंगाबाद - कन्नड - पिशोर बससुद्धा उपलब्ध आहे.
रेल्वेने येणार असाल औरंगाबाद पर्यंत रेल्वे आहे व खान्देश भागातून येणार असाल तर चाळीसगांवपर्यंत रेल्वे अन् तिथून एस टी महामंडळ अन् खाजगी वाहन व्यवस्था उपलब्ध आहे..!
कन्नड ते पिशोर अंतर - २५ किमी.
औरंगाबाद ते पिशोर अंतर - ८५ किमी.
मार्ग-राज्य महामार्ग.
(पुरातत्व खात्यातील कुणी जाणकार व्यक्तींनी या मंदिरास भेट दिली असेल तर त्यांच्याकडून मला अजुन जास्तीत जास्त माहिती मिळाली तर छान होईल.कारण वर सांगितल्याप्रमाणे या मंदिराबद्दल आजवर कुठलेही लेखन झालेले नाही किंवा तसे दस्तावेज उपलब्ध नाही.)

Written by,
Bharat sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड