मुख्य सामग्रीवर वगळा

एक वेगळं आयुष्य..!

एक वेगळं आयुष्य..!


दहा-बारा वर्षांपूर्वीचा तो काळ काहीलीच्या उन्हात मी  फुल चड्डी घालून लाल मातीच्या फुफाट्यात चालत होतो.जिथवर नजर जाईल तिथवर लाल मातीचा फुफाटा,दूरपर्यंत डोळ्यांना दिसणाऱ्या पायवाटा,वाळलेले गवत,चपलीच्या आत घुसून पायाला टोचणारे कुसळ अन् डोक्यातून येणारे घामाचे ओघळ टिपत मी चाललो होतो..!

जसं एकदाचं गेटवर आलो तसा अंगाला थंडावा अनुभवयाला आला.क्षणभर घाम टिपून कॉलर नीट केली अन् लाल मातीत माखलेल्या चपलेला डांबरी रस्त्यावर आपटीत-आपटीत मी रस्त्याला लागलो. 

रस्त्याच्या दुतर्फा बाजूंनी मेहंदीची झाडं लावलेली होती,वेळोवेळी कटिंग केल्यानं ती मस्त उंचीला कमी अन् डेरेदार झाली होती.त्यांच्या सावलीत मी चालत होतो,तेरा वर्षांचा मी उंच असल्यानं त्या झाडांच्या वरच्या फाट्या माझ्या डोक्याला लागत होत्या अन् मी  त्या फाट्याला लागलेल्या कोवळ्या पानांचा मेहंदीचा सुगंध हुंगत हुंगत रस्त्याच्या कडेने चालत होतो..!

दूरवर कुठल्याश्या किड्याचा किर-किर असा आवाज येत होता,उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्यानं सगळी पोरं,सर लोकं घरी गेली होती..!

रस्त्यानं मी एकटा चालत होतो मला तरळ भरली अन् मी झाडाला लागून असलेल्या ठिबकच्या नळीतून उडणाऱ्या तूषारास तोंडात धरून ते पाणी पिऊ लागलो.दहा मिनिटं चाललो अन् विद्यालयाच्या कमानी गेटवर आलो,तिथं मस्त गुलाबाच्या फुलांचा बाग असावा अशी झाडं लावली होती..!

गेट जवळ एक तुटकी खुर्ची टाकलेली होती,तिथं एंट्री रजिस्टर होतं मी माझं नाव,गाव,काम सगळं लिहले अन् एक माझी सही हाणून दिली.निपचित त्या खुर्चीवर डोळे लावून पडून राहीलो..!
दहा-पंधरा मिनिटांनी बाकी पाच सहा पोरं आली सर आले अन् मी शाळेच्या पिवळ्या रंगाचा भिंती अन् पांढऱ्या रंगाच्या फरश्या न्याहाळीत त्या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या खाणाखुणा जागोजाग बघत चालू लागलो..!

पुन्हा एका कागदावर नाव,गाव लिहले अर्ज केला अन् त्यावर फुटू चिपकीला अन् मास्तर पुढं अन् आम्ही मागं करीत चालू लागलो.अखेरला भले मोठे कॉप्युटर असलेल्या रुममध्ये आम्ही आलो तिथं असलेला झावळा अंधुक प्रकाश सरांनी कुठलं बटण दाबले अन् कॉम्पुटर चालू झालं..!

पुढे सर दहा मिनिट काहीतरी सांगत राहिले अन् आम्ही रफ वहीत ते लिहून घेत राहिलmसरांनी मग सगळ्यांना एक-एक करून एका-एका कॉम्पुटरवर बसवलं.इंटरनेट चालू झालं अन् गुगल चालू करायला लावलं सर म्हंटले ते आम्ही करत होतो कॉम्युटरवर चित्र काढले,नाव काढले,सिव्हील इंजिनिअर सारखं दोन-चार घर बांधले अन् मग सर म्हंटले चित्र काढा..!

सर बाहेर गेले अन् आम्ही पृथ्वी असलेल्या चिन्हावर क्लिक करून मराठीत नासा टाईप केलं अन् असंख्य व्हिडिओ दिसू लागले गृह,तारे,यान,अन् माझं आजवर कल्पनेत असलेलं विश्व माझ्या डोळ्यासमोर दिसू लागलं,मी ते बघत बसलो..!

झावळा-अंधुक प्रकाश असल्यानं अंधारात हे सर्व बघण्यात भारी मज्जा होती,एकदमच लाईट गेली कॉम्प्युटर आपोआपच बंद पडले मग बटन दाबून बंद करायचे की आपोआपच बंद होवून जातात बटन हे मला काही कळलं नाही.काही दहा पाच मिनिटांनी सर आले..!

मग सर म्हंटले चला लाईट गेली आजचं प्रात्यक्षिक संपले,आता आपण थिअरी शिकू.
मग सरांनी दुसऱ्या वर्गात आम्हाला नेले,तिथे त्याच शाळेतील मुलांचे पेन,वही,कंपास,पुस्तक पडलेले होते सरांचे शिकवण्याकडे दुर्लक्ष करून आम्ही हे सर्व बघत बसलो.अखेर सरांनी पाठांतर म्हणून काही कॉम्प्युटरशी जोडून असलेले शब्द आम्हाला घरी अभ्यासाला दिले..!

CPU- Central Processing Unite.
MB-MegaByte.
GB-GigaByte.
TB-TeraByte.
गृहपाठ घेतला अन् वर्ग सुटला..!

आलेला रस्ता सोडून मी दुसऱ्या वाटेनं निघालो गुडघ्यापर्यंत वाळलेले गवत अन् त्यात असलेली पायवाट शोधत मी हापश्यावर पोहचलो.भलतीच तहान लागली होती हापश्याला हापसून पोटभर पाणी पिलो,हापश्याला लागून असलेल्या नाल्यात जावून न्याहाळत बसलो वाहणारं पाणी,हिरवं गवत,निळी,पिवळी गवतफुले अन् पंचवीस तीस मिनिट डोळे बंद करून झोपून राहिलो त्या गवतातच..!
अन् अश्या प्रकारे माझा कॉम्प्युटर शिकण्याचा पहिला अन् शेवटचा दिवस संपला..!

Written by
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...