मुख्य सामग्रीवर वगळा

कल्याआईचं मंडळ..!

कल्याआईचं मंडळ..!

पहाटेचे आठ वाजले होते मी अजून अंथरुणात पडून होतो,आईची कामाला जायचं म्हणून काम आवरण्याची लगबग चालू होती.माझी झोप केव्हाच झाली होती पण मी लोळत पडलो होतो अंथरुणात.

आज मायला काम नव्हतं पण आईची जोडीदारीन कल्याआई मायला म्हणली होती की,दिनकर पाटलांच्या मळ्यात एखाद्या वखताला काम राहील काल पाटील मला चौकात भेटले तेव्हा सकाळी कामाचा खुलासा करतो म्हणून कल्याआईला सांगून गेले होते..!

कल्याआई मांगीन आईच्या टोळीची मुकरदंम होती,गावात शेतातली काही कामे असले की गावातले लोकं तिला सांगायची अन् ती तिचं वीस-पंचवीस बायकांचं मंडळ करून त्यांना कामाला घेऊन जायची.सुगीच्या दिवसांत गावात तिचा बोलबाला रहायचा,या दिवसांत गावातल्या सरपंचाला कुणी हुंगायच नाही पण कल्याआईला मात्र सारं गाव शोधत भटकत रहायचं.लोकांना कामासाठी कल्याआई अन् तिचं मंडळ नेहमी लागायचं,कारण कल्याआईची कामातली ईमानदारी,दिलेला शबुद ती पाळायची अन् वखुत पडला तर ती पैश्याला आठ-चार दिसांसाठी शिल्लक थांबायची..!

आईनं बिगीबीगी काम आवरलं अन् मी परसात जातो म्हणून आईला सांगून टरमळं घेऊन नदीच्या अंगाला गेलो.आईचं आवरलं आईला कल्याआई घरला आली अन् कामाचा खुलासा हावचा असला तर पटदिशी निघायला म्हणून दुपारची न्याहारी भाकर,मिरचीचा खर्डा,लोणचं फडक्यात गुंडाळून माय आमच्या कुडाच्या घराला असलेल्या उंबऱ्यावर बसून वेणीफणी करत बसली होती..!

मी परसातून आलो अन् चुल्हांगांवर ठेवलेलं घमील्याततलं पाणी इस्नाला आलं होतं मी ते पितळीच्या बांधलीत ओतलं अन् न्हाणीघरात जावून इसनाला रांजणमधून पाणी घेऊन अंघोळ करत बसलो.कडाक्याचा उन्हाळा असल्यानं अंघोळ करायला अजूनच भारी वाटत होतं,मी अंघोळ करत करत हिमेश रेशमियाच्या आवजातली गाणी म्हणत अंघोळ करत होतो..!

कल्याआई चौकातून बिगीबीगी आमच्या खोपटाकडे वळली तसं मायना मला हाक दिली,छोटे सरकार आवरा लवकर तुमचं बाळंतपण कामाचा सांगावा घेऊन मांगीन म्हातारी आली हायसा.कामाचा हवाला असल तर निघायला लागल..!

मी फटदिशी बादलीतलं सगळं पाणी अंगावर घेतलं अन् टायलानं अंग कोरडे करत आत खोपटात गेलो.तोवर कल्याआई अंगणात आली अन् आईला ओरडू लागली लक्षे अय लक्षे दिनकर पाटलांच्या कामाचा खुलासा आला हायसा..! 

सरकी येचायला पाशेरीवर बोलीले हाय काय करती जायचं का नाय..?
माय आरसा खुंटीला टांगून बाहेर आली अन् कल्याआईला बोलू लागली 
जायचं तुझं सबुद खरं हायसा मायव पण आता सर्कीच्या चार-चार येचण्या होवून गेल्या हाईत पाशेरीवर काय भाव खाईल माय त्यो कापूस रोज भी नाय निघायचा माय आपला..!

तुझं सबुद खरं हाय लक्षे पर आपल्याला बी कुठशिक काम हायसा आज मग जावूत की तेव्हडचं तेला-पाण्याला पैका होतील सौ-पचास,अन् पाटील बरसदीच्या दिसाला आपल्याला मोप काम देतूया मग जावा लागत असा,काय म्हणीस तू..?
मग ठीक हाय माय जावा लागीस,पर शांता,कोळ्याची सुमन,रखमा,कला बंजारीन सबिना आपा यांना संगतीला घे म्हणजे लवकर उरकून घ्यायला होईल कपास..!

अगं त्या यायला हायसा तुझाच खुलासा घ्यायला मी आली हाय मग चालस का तू लक्षे..?
हा चालस माय चालस..!
चल मग त्या बी निघाल्या हायसा,आपल्याला चौकात भेटतीला..!
माझी भाकर घे व लेकी लक्षे आज म्या केली नाय पहाटेला वखुत झाला मला उठायला,कल्याआई मायला म्हणली..!

मी भांग पाडला अन् बुटाड घालून गावात हिंडायला निघालो होतो,मायना कल्याआईची भाकर धुडक्यात बांधून घेतली अन् घराला कडी कोंडा घालून माय डोईवर भाकरीचे पेंडके घेऊन कल्याआई संगतीना निघाली.मायना उटळ माझ्याजवळ दिलं अन् मी ते करदुड्यात फाशी देऊन मायच्या मागमाग चौकात आलो,त्यांच्या मंडळातील रोजंदारनी आल्या होत्या..!

म्या कल्या याडीला बघून तिला म्हंटलं,
याडीये कशेर नंगाळ लामेलीछी तु दुपारेती बाटी खामेल..?
कल्यायाडी बंजारीन म्हंटली,
छोटं सरकार रिंगळा र नंगाळ अन् बोंभलार खुडी लामेलीछी..!

क्रमशः

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड