मुख्य सामग्रीवर वगळा

लोकप्रभा - अंत एका पर्वाचा..!

लोकप्रभा अंत एका पर्वाचा..!


काल "लोकप्रभा" साप्ताहिक बंद पडल्याची माहिती मिळाली आणि माझं बालपण,बसस्टँडवर,स्टॉलवर बसून विकलेल्या वृत्तपत्रांच्या संगतीने विकलेले लोकप्रभा साप्ताहिक अन् ते सर्वच क्षण डोळ्यांसमोरून तरळून गेले..!

काय असतं आपल्या बालपणात आपण जेव्हा वाचायला शिकत असतो,तेव्हा आपल्याला एका गोष्टीचा ध्यास लागलेला असतो की आपल्याला जे काही नजरेस पडेल त्या शब्दांना आपण जोडून-जोडून वाचत असतो,त्याबद्दल मनात विचार करत असतो.लोकप्रभा साप्ताहिकाचा आणि माझा प्रवास माझ्या आयुष्यात इथपासून सुरु झालेला आहे,त्यामुळं या साप्ताहिकाशी एक नाळ जुळलेली होती..!

मला आठवतं स्टॉलवर मी पेपर विकायला बसलो की फावल्या वेळात करिअर मंत्र,स्मार्ट सोबती,हॅलो डॉक्टर,मुक्तरंग,मुक्तपीठ,मंथन,बालमित्र,कुबेर,मैत्र,दीशा,मधुरिमा,ऑक्सिजन या वारानुसार असलेल्या पुरवण्या वाचत बसायचो.त्या वेळच्या बालमनाला हे खाद्य खूप आवडायचं,एकवेळ मी वृत्तपत्र वाचणार नाही पण या पुरवण्या आवर्जून वाचत असायचो..!

वेळेनुसार या सर्व पुरवण्या किंवा यातील काही पुरवण्या बंद होत गेल्या अन् वृत्तपत्रात एक भकासपन अनुभवायला मिळाले.
मला आठवते ज्या दिवशी बालमित्र ही पुरवणी यायची तेव्हा-तेव्हा मी सायकलवर पेपर घेऊन गेलो की बऱ्याच घरातील लहान लहान मुलं ओट्यावर येऊन माझ्या हातून पेपर घेऊन ओट्यावर ती पुरवणी वाचत बसायची..!

हेच दिवस तरुण मुलं,मुलींच्या बाबतीत मी करिअर मंत्र आणि स्मार्ट सोबतीसाठी अनुभवले.मी स्वतः या दोन्ही पुरवण्या हाती पडल्या की पहिले त्या वाचून घेत असायचो अन् मग वृत्तपत्राचा वाटपाचा माझा रोजचा कार्यक्रम.एखाद्या शुक्रवारी एखाद्या वृत्तपत्रात हॅलो डॉक्टरची पुरवणी टाकायची राहून गेली तर वृद्ध आजी-आजोबांचे खाल्लेले बोलणे मला आजही आठवतात..!
मग ती पुरवणी मिळवून दुसऱ्या दिवशी त्या आजी-आजोबांना नेऊन दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असणारे समाधान खूप काही देऊ करणारे असायचे..!

गेले जवळजवळ सहा महिने मी वेळोवेळी दै.सकाळ वृत्तपत्राच्या "मैफल" या सदरासाठी लेखन करतो आहे.आज लेखन दिले की उद्या वाचकवर्गाचा मिळणारा भरघोस प्रतिसाद अनुभवणे हे सर्व खूप सुंदर आहे,त्यामुळं हा आनंद काही औरच असतो..!

काळाच्या ओघात प्रिंट मीडियातील अनेक अंक,मासिकं,साप्ताहिकं मागे पडली आणि त्यांची जागा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अनेक मासिकं,साप्ताहिकं यांनी घेतली.काही मासिकांनी काळाच्यासोबत पुढे जाणं पसंद केलं अन् आपलं रूप डिजिटल करून घेतलं परंतु तिथे मिळणारा प्रतिसाद हा फारसा असा खास नव्हता अन् मग इथेही अनेक मासिकं,साप्ताहिकं बंद झाली..!

आजमितीला अनेक वेब पोर्टलसाठी मी लेखन करतो,डिजिटल साप्ताहिकं अन् मासिकं यांच्यासाठी लेखन करतो.या ठिकाणी मिळणारा एक ठराविक प्रतिसाद बघितला की हे सर्व नकोसे वाटते अन् मीडिया क्षेत्राला एक वळण मिळाले असे वाटायला लागते..!

माझीही खूप दिवसांपासून "लोकप्रभा" साप्ताहिकासाठी लेखन करण्याची इच्छा होती पण सुरुवात कुठून करावी..? कशी करावी..? हे प्रश्न सोबतीला होते..!

तीन-चार दिवसांपूर्वी औरंगाबादेत एका जैष्ठ साहित्यिक,लेखकांची भेट झाली अन् त्यांच्यासोबत बराचवेळ लिखाणाच्या गप्पा रंगल्या.त्यांनी मला लोकप्रभा साप्ताहिकासाठी केलेलं लेखन,त्यांना मिळालेलं मानधन,संबंधित अनेक दस्तावेज अन् अनेक लोकप्रभाचे अंक त्यांनी मला दाखवले..!

"लोकप्रभा साप्ताहिक बंद होत आहे अन् आजवर तुम्ही केलेलं लेखन यासाठी लोकप्रभा आपले आभार मानते" हा त्याच रात्री त्यांना आलेला संदेश त्यांनी मला दाखवला अन् माझी "लोकप्रभा" साप्ताहिकासाठी लेखन करण्याची इच्छा तिथेच मावळतीला गेली..!

बरेच लेखन होईल अनेक सदरासाठी,वेब पोर्टलसाठी,डिजिटल अंकासाठी मी लेखन करत राहिल परंतु या अश्या साप्ताहिक आणि मासिकात लेखन करण्याची जी मज्जा आहे ती या माध्यमांना नाही,हे सतत जाणवत राहील..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...