मुख्य सामग्रीवर वगळा

लोकप्रभा - अंत एका पर्वाचा..!

लोकप्रभा अंत एका पर्वाचा..!


काल "लोकप्रभा" साप्ताहिक बंद पडल्याची माहिती मिळाली आणि माझं बालपण,बसस्टँडवर,स्टॉलवर बसून विकलेल्या वृत्तपत्रांच्या संगतीने विकलेले लोकप्रभा साप्ताहिक अन् ते सर्वच क्षण डोळ्यांसमोरून तरळून गेले..!

काय असतं आपल्या बालपणात आपण जेव्हा वाचायला शिकत असतो,तेव्हा आपल्याला एका गोष्टीचा ध्यास लागलेला असतो की आपल्याला जे काही नजरेस पडेल त्या शब्दांना आपण जोडून-जोडून वाचत असतो,त्याबद्दल मनात विचार करत असतो.लोकप्रभा साप्ताहिकाचा आणि माझा प्रवास माझ्या आयुष्यात इथपासून सुरु झालेला आहे,त्यामुळं या साप्ताहिकाशी एक नाळ जुळलेली होती..!

मला आठवतं स्टॉलवर मी पेपर विकायला बसलो की फावल्या वेळात करिअर मंत्र,स्मार्ट सोबती,हॅलो डॉक्टर,मुक्तरंग,मुक्तपीठ,मंथन,बालमित्र,कुबेर,मैत्र,दीशा,मधुरिमा,ऑक्सिजन या वारानुसार असलेल्या पुरवण्या वाचत बसायचो.त्या वेळच्या बालमनाला हे खाद्य खूप आवडायचं,एकवेळ मी वृत्तपत्र वाचणार नाही पण या पुरवण्या आवर्जून वाचत असायचो..!

वेळेनुसार या सर्व पुरवण्या किंवा यातील काही पुरवण्या बंद होत गेल्या अन् वृत्तपत्रात एक भकासपन अनुभवायला मिळाले.
मला आठवते ज्या दिवशी बालमित्र ही पुरवणी यायची तेव्हा-तेव्हा मी सायकलवर पेपर घेऊन गेलो की बऱ्याच घरातील लहान लहान मुलं ओट्यावर येऊन माझ्या हातून पेपर घेऊन ओट्यावर ती पुरवणी वाचत बसायची..!

हेच दिवस तरुण मुलं,मुलींच्या बाबतीत मी करिअर मंत्र आणि स्मार्ट सोबतीसाठी अनुभवले.मी स्वतः या दोन्ही पुरवण्या हाती पडल्या की पहिले त्या वाचून घेत असायचो अन् मग वृत्तपत्राचा वाटपाचा माझा रोजचा कार्यक्रम.एखाद्या शुक्रवारी एखाद्या वृत्तपत्रात हॅलो डॉक्टरची पुरवणी टाकायची राहून गेली तर वृद्ध आजी-आजोबांचे खाल्लेले बोलणे मला आजही आठवतात..!
मग ती पुरवणी मिळवून दुसऱ्या दिवशी त्या आजी-आजोबांना नेऊन दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असणारे समाधान खूप काही देऊ करणारे असायचे..!

गेले जवळजवळ सहा महिने मी वेळोवेळी दै.सकाळ वृत्तपत्राच्या "मैफल" या सदरासाठी लेखन करतो आहे.आज लेखन दिले की उद्या वाचकवर्गाचा मिळणारा भरघोस प्रतिसाद अनुभवणे हे सर्व खूप सुंदर आहे,त्यामुळं हा आनंद काही औरच असतो..!

काळाच्या ओघात प्रिंट मीडियातील अनेक अंक,मासिकं,साप्ताहिकं मागे पडली आणि त्यांची जागा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अनेक मासिकं,साप्ताहिकं यांनी घेतली.काही मासिकांनी काळाच्यासोबत पुढे जाणं पसंद केलं अन् आपलं रूप डिजिटल करून घेतलं परंतु तिथे मिळणारा प्रतिसाद हा फारसा असा खास नव्हता अन् मग इथेही अनेक मासिकं,साप्ताहिकं बंद झाली..!

आजमितीला अनेक वेब पोर्टलसाठी मी लेखन करतो,डिजिटल साप्ताहिकं अन् मासिकं यांच्यासाठी लेखन करतो.या ठिकाणी मिळणारा एक ठराविक प्रतिसाद बघितला की हे सर्व नकोसे वाटते अन् मीडिया क्षेत्राला एक वळण मिळाले असे वाटायला लागते..!

माझीही खूप दिवसांपासून "लोकप्रभा" साप्ताहिकासाठी लेखन करण्याची इच्छा होती पण सुरुवात कुठून करावी..? कशी करावी..? हे प्रश्न सोबतीला होते..!

तीन-चार दिवसांपूर्वी औरंगाबादेत एका जैष्ठ साहित्यिक,लेखकांची भेट झाली अन् त्यांच्यासोबत बराचवेळ लिखाणाच्या गप्पा रंगल्या.त्यांनी मला लोकप्रभा साप्ताहिकासाठी केलेलं लेखन,त्यांना मिळालेलं मानधन,संबंधित अनेक दस्तावेज अन् अनेक लोकप्रभाचे अंक त्यांनी मला दाखवले..!

"लोकप्रभा साप्ताहिक बंद होत आहे अन् आजवर तुम्ही केलेलं लेखन यासाठी लोकप्रभा आपले आभार मानते" हा त्याच रात्री त्यांना आलेला संदेश त्यांनी मला दाखवला अन् माझी "लोकप्रभा" साप्ताहिकासाठी लेखन करण्याची इच्छा तिथेच मावळतीला गेली..!

बरेच लेखन होईल अनेक सदरासाठी,वेब पोर्टलसाठी,डिजिटल अंकासाठी मी लेखन करत राहिल परंतु या अश्या साप्ताहिक आणि मासिकात लेखन करण्याची जी मज्जा आहे ती या माध्यमांना नाही,हे सतत जाणवत राहील..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड