मुख्य सामग्रीवर वगळा

तुझ्या आठवांचा दरवळ..!

तुझ्या आठवांचा दरवळ..!


माणसं जोडायला हवी आहे,आठवणींचे क्षण जेव्हा आठवांचे होवून डोळ्यासमोरून तरळून जातात तेव्हा आपसूकच तुझ्या आठवणींचा दरवळ माझ्या समीप येऊन मला भेटून जातो..!

काही व्यक्तींच्या आठवणी आपल्या आयुष्यात आपल्याला त्या प्रत्येक श्वासासम असतात.ज्या आपल्या जगण्याला कारणी असतात किंवा कारणी ठरतात..!
नेहमीसारखीच कालची पहाट तुझ्या आठवांचा दरवळ माझ्या साखरझोपेत घेऊन आली अन् कालची माझी पहाट त्या सुंदर दरवळात नखशिखांत न्हावून निघाली..!

कालचा संपूर्ण दिवस हा आठवांचा दरवळ माझ्या संगतीने होता,माझ्या मनावर रूढ झाला होता.चेहऱ्यावर खूप दिवसांनी पुन्हा एकदा अशी अनामिक का होईना तुझी भेट झाली त्यामुळं एक ग्लो होता.आपल्या अनामिक नात्यातील सर्वच कुठल्याही बंधनात न राहून जखडलेल्या सर्वच आठवणींना मी काल मोकळीक दिली होती..!

खरं सांगायचं तर आठवणींवर लिहायला घेतलं की मी आठवणींचा होवून जातो,त्यामुळे हल्ली या विषयवार गेले कित्येक वर्ष लिहायचं सोडून दिलं आहे.हे सर्वच आता इतकं अनोळखी वाटतं की लिहायला आता शब्दांची सोबत नसते..!

तुझ्या आठवणींचा दरवळ असतो,नसलेली तू सोबत असते,सोसाट्याच्या वाऱ्यात आपल्या ठरलेल्या ठिकाणांना भेटून येणं होतं पण या सर्वच गोष्टींना जेव्हा लिहायला घेतो तेव्हा मात्र माझे शब्द माझ्याशी फितूर होतात..!

मी हल्ली अनेक ठिकाणी जात असतो जिथं साहित्याला,लिखाणाला घेऊन बोललं जातं.बहुतेकांचा हा समज आहे किंवा अनेकांना असे वाटते की कवीची कविता करायला सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तो प्रथमतः कुणाच्या प्रेमात पडतो अन् लेखकाची लिखाणाला तेव्हाच सुरुवात होते जेव्हा तो प्रेम या शब्दाच्या पलिकडे त्याच्या व्याखेतून गेलेला असतो.थोडक्यात तो जेव्हा विरहाला जवळ करत असतो..!

हे नेहमीचं आहे अनेक ठिकाणी मी हे ऐकतो अन् अनेकांना हे सर्व पटते..!

असंच आठवते साधारण लॉकडाऊन होण्यापूर्वी एका  महाविद्यालयात एका छोटेखानी काव्य संमेलनात मला बोलावलेलं होतं.संमेलन झाले अपेक्षेपेक्षा छान प्रतिसाद मिळाला,शेवटी एका विद्यार्थ्याने मला प्रश्न केला माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान असावा..!

दादा तू ज्या काही दोन-तीन कविता आम्हाला ऐकवल्या त्यात फक्त आम्हाला दुःख नजरेस पडलं,कुठेतरी समाजभान,समाजाचे आपण काही देणं लागतो हे तुझ्या कवितेतून दिसून आलं पण तू प्रेमावर कधी कविता नाही केलीस का..? किंवा तुला नाही झालं कुणावर प्रेम ज्यासाठी त्या व्यक्तीवर तू कविता करावी..!

अन् खरच मी ही या प्रश्नाला काय उत्तर द्यावं असं मला झालं होतं कारण ज्या काही तोडक्यामोडक्या कविता मी आजवर केल्या होत्या त्यात प्रेम कुठेच नव्हते.कारण माझ्या कविता फक्त दुःखाला जवळ करणाऱ्या होत्या बस जसं लिहले आहे तसंच उत्तर देऊन मी निघालो..!

पुन्हा त्याच विद्यार्थ्याने माझा ऑटोग्राफ हवा म्हणून वही पुढे केली,आज पहिल्यांदा कुणीतरी आपला ऑटोग्राफ घेत आहे म्हणून मी ही खुशीत सही करून तिथून निघालो.त्या मुलाचा प्रश्न ज्याला मी तूर्तच उत्तर देऊन टाळले होते,त्याला मात्र मला माझ्या मनात अपेक्षित उत्तर जे हवं ते मी शोधत होतो..!

खरं सांगायचं तर दुःखाने इतकं जवळ केलं की प्रेमावरच्या कविता करायलाही घेतल्या तर त्या जमल्याच नाही.त्यातून आपोआपच दुःख प्रेमापेक्षा जवळचं वाटायला लागलं अन् त्या दुःखाच्या मी कविता करत बसलो.जिथं कुठं यमक जुळत नव्हतं,जिथं कुठं शब्दांची सांगड मला नीट घालता येत नव्हती अन् सगळंच बेफिकीर वाटल्यागत असायचं जे पानावर शब्दातून कैद व्हायचं..!

असो तुझ्या आठवांचा दरवळ सोबतीला अन् अनामिकच तुझी भेट म्हणून हे सर्व..!
अधुरे अधूरे वाटणारे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...