मुख्य सामग्रीवर वगळा

तुझ्या आठवांचा दरवळ..!

तुझ्या आठवांचा दरवळ..!


माणसं जोडायला हवी आहे,आठवणींचे क्षण जेव्हा आठवांचे होवून डोळ्यासमोरून तरळून जातात तेव्हा आपसूकच तुझ्या आठवणींचा दरवळ माझ्या समीप येऊन मला भेटून जातो..!

काही व्यक्तींच्या आठवणी आपल्या आयुष्यात आपल्याला त्या प्रत्येक श्वासासम असतात.ज्या आपल्या जगण्याला कारणी असतात किंवा कारणी ठरतात..!
नेहमीसारखीच कालची पहाट तुझ्या आठवांचा दरवळ माझ्या साखरझोपेत घेऊन आली अन् कालची माझी पहाट त्या सुंदर दरवळात नखशिखांत न्हावून निघाली..!

कालचा संपूर्ण दिवस हा आठवांचा दरवळ माझ्या संगतीने होता,माझ्या मनावर रूढ झाला होता.चेहऱ्यावर खूप दिवसांनी पुन्हा एकदा अशी अनामिक का होईना तुझी भेट झाली त्यामुळं एक ग्लो होता.आपल्या अनामिक नात्यातील सर्वच कुठल्याही बंधनात न राहून जखडलेल्या सर्वच आठवणींना मी काल मोकळीक दिली होती..!

खरं सांगायचं तर आठवणींवर लिहायला घेतलं की मी आठवणींचा होवून जातो,त्यामुळे हल्ली या विषयवार गेले कित्येक वर्ष लिहायचं सोडून दिलं आहे.हे सर्वच आता इतकं अनोळखी वाटतं की लिहायला आता शब्दांची सोबत नसते..!

तुझ्या आठवणींचा दरवळ असतो,नसलेली तू सोबत असते,सोसाट्याच्या वाऱ्यात आपल्या ठरलेल्या ठिकाणांना भेटून येणं होतं पण या सर्वच गोष्टींना जेव्हा लिहायला घेतो तेव्हा मात्र माझे शब्द माझ्याशी फितूर होतात..!

मी हल्ली अनेक ठिकाणी जात असतो जिथं साहित्याला,लिखाणाला घेऊन बोललं जातं.बहुतेकांचा हा समज आहे किंवा अनेकांना असे वाटते की कवीची कविता करायला सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तो प्रथमतः कुणाच्या प्रेमात पडतो अन् लेखकाची लिखाणाला तेव्हाच सुरुवात होते जेव्हा तो प्रेम या शब्दाच्या पलिकडे त्याच्या व्याखेतून गेलेला असतो.थोडक्यात तो जेव्हा विरहाला जवळ करत असतो..!

हे नेहमीचं आहे अनेक ठिकाणी मी हे ऐकतो अन् अनेकांना हे सर्व पटते..!

असंच आठवते साधारण लॉकडाऊन होण्यापूर्वी एका  महाविद्यालयात एका छोटेखानी काव्य संमेलनात मला बोलावलेलं होतं.संमेलन झाले अपेक्षेपेक्षा छान प्रतिसाद मिळाला,शेवटी एका विद्यार्थ्याने मला प्रश्न केला माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान असावा..!

दादा तू ज्या काही दोन-तीन कविता आम्हाला ऐकवल्या त्यात फक्त आम्हाला दुःख नजरेस पडलं,कुठेतरी समाजभान,समाजाचे आपण काही देणं लागतो हे तुझ्या कवितेतून दिसून आलं पण तू प्रेमावर कधी कविता नाही केलीस का..? किंवा तुला नाही झालं कुणावर प्रेम ज्यासाठी त्या व्यक्तीवर तू कविता करावी..!

अन् खरच मी ही या प्रश्नाला काय उत्तर द्यावं असं मला झालं होतं कारण ज्या काही तोडक्यामोडक्या कविता मी आजवर केल्या होत्या त्यात प्रेम कुठेच नव्हते.कारण माझ्या कविता फक्त दुःखाला जवळ करणाऱ्या होत्या बस जसं लिहले आहे तसंच उत्तर देऊन मी निघालो..!

पुन्हा त्याच विद्यार्थ्याने माझा ऑटोग्राफ हवा म्हणून वही पुढे केली,आज पहिल्यांदा कुणीतरी आपला ऑटोग्राफ घेत आहे म्हणून मी ही खुशीत सही करून तिथून निघालो.त्या मुलाचा प्रश्न ज्याला मी तूर्तच उत्तर देऊन टाळले होते,त्याला मात्र मला माझ्या मनात अपेक्षित उत्तर जे हवं ते मी शोधत होतो..!

खरं सांगायचं तर दुःखाने इतकं जवळ केलं की प्रेमावरच्या कविता करायलाही घेतल्या तर त्या जमल्याच नाही.त्यातून आपोआपच दुःख प्रेमापेक्षा जवळचं वाटायला लागलं अन् त्या दुःखाच्या मी कविता करत बसलो.जिथं कुठं यमक जुळत नव्हतं,जिथं कुठं शब्दांची सांगड मला नीट घालता येत नव्हती अन् सगळंच बेफिकीर वाटल्यागत असायचं जे पानावर शब्दातून कैद व्हायचं..!

असो तुझ्या आठवांचा दरवळ सोबतीला अन् अनामिकच तुझी भेट म्हणून हे सर्व..!
अधुरे अधूरे वाटणारे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...