मुख्य सामग्रीवर वगळा

तुझ्या आठवांचा दरवळ..!

तुझ्या आठवांचा दरवळ..!


माणसं जोडायला हवी आहे,आठवणींचे क्षण जेव्हा आठवांचे होवून डोळ्यासमोरून तरळून जातात तेव्हा आपसूकच तुझ्या आठवणींचा दरवळ माझ्या समीप येऊन मला भेटून जातो..!

काही व्यक्तींच्या आठवणी आपल्या आयुष्यात आपल्याला त्या प्रत्येक श्वासासम असतात.ज्या आपल्या जगण्याला कारणी असतात किंवा कारणी ठरतात..!
नेहमीसारखीच कालची पहाट तुझ्या आठवांचा दरवळ माझ्या साखरझोपेत घेऊन आली अन् कालची माझी पहाट त्या सुंदर दरवळात नखशिखांत न्हावून निघाली..!

कालचा संपूर्ण दिवस हा आठवांचा दरवळ माझ्या संगतीने होता,माझ्या मनावर रूढ झाला होता.चेहऱ्यावर खूप दिवसांनी पुन्हा एकदा अशी अनामिक का होईना तुझी भेट झाली त्यामुळं एक ग्लो होता.आपल्या अनामिक नात्यातील सर्वच कुठल्याही बंधनात न राहून जखडलेल्या सर्वच आठवणींना मी काल मोकळीक दिली होती..!

खरं सांगायचं तर आठवणींवर लिहायला घेतलं की मी आठवणींचा होवून जातो,त्यामुळे हल्ली या विषयवार गेले कित्येक वर्ष लिहायचं सोडून दिलं आहे.हे सर्वच आता इतकं अनोळखी वाटतं की लिहायला आता शब्दांची सोबत नसते..!

तुझ्या आठवणींचा दरवळ असतो,नसलेली तू सोबत असते,सोसाट्याच्या वाऱ्यात आपल्या ठरलेल्या ठिकाणांना भेटून येणं होतं पण या सर्वच गोष्टींना जेव्हा लिहायला घेतो तेव्हा मात्र माझे शब्द माझ्याशी फितूर होतात..!

मी हल्ली अनेक ठिकाणी जात असतो जिथं साहित्याला,लिखाणाला घेऊन बोललं जातं.बहुतेकांचा हा समज आहे किंवा अनेकांना असे वाटते की कवीची कविता करायला सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तो प्रथमतः कुणाच्या प्रेमात पडतो अन् लेखकाची लिखाणाला तेव्हाच सुरुवात होते जेव्हा तो प्रेम या शब्दाच्या पलिकडे त्याच्या व्याखेतून गेलेला असतो.थोडक्यात तो जेव्हा विरहाला जवळ करत असतो..!

हे नेहमीचं आहे अनेक ठिकाणी मी हे ऐकतो अन् अनेकांना हे सर्व पटते..!

असंच आठवते साधारण लॉकडाऊन होण्यापूर्वी एका  महाविद्यालयात एका छोटेखानी काव्य संमेलनात मला बोलावलेलं होतं.संमेलन झाले अपेक्षेपेक्षा छान प्रतिसाद मिळाला,शेवटी एका विद्यार्थ्याने मला प्रश्न केला माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान असावा..!

दादा तू ज्या काही दोन-तीन कविता आम्हाला ऐकवल्या त्यात फक्त आम्हाला दुःख नजरेस पडलं,कुठेतरी समाजभान,समाजाचे आपण काही देणं लागतो हे तुझ्या कवितेतून दिसून आलं पण तू प्रेमावर कधी कविता नाही केलीस का..? किंवा तुला नाही झालं कुणावर प्रेम ज्यासाठी त्या व्यक्तीवर तू कविता करावी..!

अन् खरच मी ही या प्रश्नाला काय उत्तर द्यावं असं मला झालं होतं कारण ज्या काही तोडक्यामोडक्या कविता मी आजवर केल्या होत्या त्यात प्रेम कुठेच नव्हते.कारण माझ्या कविता फक्त दुःखाला जवळ करणाऱ्या होत्या बस जसं लिहले आहे तसंच उत्तर देऊन मी निघालो..!

पुन्हा त्याच विद्यार्थ्याने माझा ऑटोग्राफ हवा म्हणून वही पुढे केली,आज पहिल्यांदा कुणीतरी आपला ऑटोग्राफ घेत आहे म्हणून मी ही खुशीत सही करून तिथून निघालो.त्या मुलाचा प्रश्न ज्याला मी तूर्तच उत्तर देऊन टाळले होते,त्याला मात्र मला माझ्या मनात अपेक्षित उत्तर जे हवं ते मी शोधत होतो..!

खरं सांगायचं तर दुःखाने इतकं जवळ केलं की प्रेमावरच्या कविता करायलाही घेतल्या तर त्या जमल्याच नाही.त्यातून आपोआपच दुःख प्रेमापेक्षा जवळचं वाटायला लागलं अन् त्या दुःखाच्या मी कविता करत बसलो.जिथं कुठं यमक जुळत नव्हतं,जिथं कुठं शब्दांची सांगड मला नीट घालता येत नव्हती अन् सगळंच बेफिकीर वाटल्यागत असायचं जे पानावर शब्दातून कैद व्हायचं..!

असो तुझ्या आठवांचा दरवळ सोबतीला अन् अनामिकच तुझी भेट म्हणून हे सर्व..!
अधुरे अधूरे वाटणारे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड