मुख्य सामग्रीवर वगळा

रातराणीचे फुल..!

रातराणीचे फुल..!

पहाटेची कोवळी उन्हं अंगावर घेत विंडोग्रीलच्या पडद्याशी माझे अन् उन्हाचे खेळ चालू होते,मी ही सावलीशी खेळत बसलो होतो.खिडकीत असलेला रातराणीचा वेल बहरलेला आहे,त्याची रात्रीच उमललेली फुलं पहाटे सकाळीच सुखून पायाशी लोळण घेत चहूकडे सर्वदूर घरात पसरलेली आहे.

रात्रभराचा त्यांचा घरात असलेला सुगंध अन् पहाटेला अंगणात फुललेला प्राजक्त अन् त्याचा सुगंध हा खेळ मला माझ्या लेकीचा घरात ये-जा करत सर्व घरात घिरट्या घालत दुडू दुडू फिरणाऱ्या तिच्या पावलांच्या खेळाप्रमाणे भासतो..!

तशी ती आज गेल्या पावली खूप दिवसांनी तिच्या आजोळी पुन्हा येऊन गेली,पोलकं अन् केसांचा एक जिठ्ठु घालणारी लेक आता खूप मोठी भासायला लागली आहे.मामाच्या सवयी तीन वर्षांच्या लेकीला आता कळायला लागल्या आहे,त्यामुळं मामाने तिला तिच्या कलाने घ्यायला हवं तर ही तीन वर्षांची लेक आता तिच्या कलाने मामाला समजावते,लाड करून घेते..!
तिच्या आई इतकीच किंवा किंचित जास्तीच समजदार निघाली असे भास होतात हल्ली तिच्या वागण्या बोलण्यातून..!

गेल्या पावली आज पुन्हा आजोळी आली आजीच्या अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनाला घिरट्या घालू लागली तिच्या घुंगरांच्या पैंजनांचा आवाज रातराणीच्या सुगंधाप्रमाणे दरवळत माझ्यापर्यंत आला अन् लेक आली कळलं तसं तिला अलगद उचलून घेतलं अन् आता तिला मामाच्या कड्यावर आकाश ठेंगणं झालं होतं,आकाश अंगण एक झालं होतं,आकाशाशी ती गोष्टी करू लागली होती..!

एरवी सर्व घरात जिथली वस्तू तिथं अन् सर्व कसं नियमबद्ध असल्यासारखं असतं पण आज लेक आली अन् लंका झालेल्या घराचं गोकुळ करून गेली,लहान मुलं असावी प्रत्येक घरात ती याचसाठी.पैंजण घातलेले तीचे गोड पाय आज सर्व घरात छून-छून करत घिरट्या घालत होते मी न्याहाळत होतो तिला,कधीतरी मामाला बघून पडवीत लपून मामाला शोधायला बोलावणं तर कधी मामाच्या मागून येऊन डोळ्यांना नाजूक हातांनी बंद करत मी कोण आहे म्हणून प्रश्न करणं..!
हे सुख अनुभवायला लेक हवी असते..!

सांज झाली अन् परतीच्या वाटा खुणावू लागल्या,उद्याचे व्यवहार खुणावू लागले.तिचाही नको जायला म्हणुन चेहरा हिरमुसला अन् मला तर तिनं नको जाणं हवं होतं पण लेकीचे माहेरपण हे काही दिवसांचे तिला या वाटा काही घटकांसाठी खुल्या होतात अन् काही घटकांसाठी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघायला म्हणून खुल्या होवून खुणावू लागतात,उद्याचे कामे मग डोळ्यांना दिसू लागतात..!

दिवसभर सगळ्या घरात बागडून सांजेच्यावेळी झोपाळ्यावर झोपलेली लेक नको असतांना मग उठवावी लागते,तिला हवा असणारा मामाच्या हातांचा गंद-पावडर,टिकली होते,मामाच्या हाताने तिचे कुरळे केस फणीने विंचरून होतात,शिट्यांची बुटं पायात घातली जातात अन् परंतु दिवसभर सर्व घरात फिरून-फिरून पैंजनातील घुंगरू अस्ताला जाणाऱ्या सुर्याच्या कलेप्रमाणे निपचित शांत होतात..!

लेक पुन्हा आईच्या कड्यावर झोपी जाते,गंद पावडर केलेली लेक यावेळी विश्वातील सर्वात गोड लेकरू भासत असते.मी हातात बॅग घेऊन दारापर्यंत येतो पुन्हा झोपी गेलेली लेक,तिची आई सासरची वाट जवळ करायला म्हणून निघून जाते..!

आता अंगणात पडलेला प्राजक्तांच्या फुलांचा सडा सुखून गेलेला असतो,तितकाच जितका लेक गेल्यामुळे माझा चेहरा सुखलेला असतो.मी येरझऱ्या घालत असतो विंडोग्रीलच्या खोलीत अस्वस्थ वाटू लागत असतं,सूर्यही अस्ताला गेलेला असतो अन् रातराणीच्या फुलांचा सुगंध आता चहूकडे पसरलेला असतो..!

जसजशी रात्र सरत असते तसतशी रातराणीच्या फुलांची कळी खुलत असते अन् मी चिमणीच्या उजेडात सावलीशी खेळ करत भिंतीवर आलेल्या माझ्या प्रतिबिंबात माझ्या लेकीचा हात जो डोळ्यांवर असतो तो शोधत असतो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड