मुख्य सामग्रीवर वगळा

एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..!

एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..!

मानवजातीची एक गोष्ट मला खूप आवडते,ती ही की तो एकावेळी दोन आयुष्य जगत असतो.एक कल्पनेतील आयुष्य तर दुसरे वास्तवातील आयुष्य.
वास्तवातील आयुष्याला घेऊन समाधानी असा कुणी नाही,सर्व काही असूनही या वास्तव आयुष्यात आपण कुठल्यातरी एका त्या अनामिक गोष्टीचा शोधार्थ विचार करत असतो,भटकत असतो.त्यामुळं आपण नेहमीच एका उंचीला जावून विचार करत असतो..!

अश्यावेळी काही गोष्टी पूर्णत्वास येतात किंवा काही आपण पूर्णत्वास नेऊ शकत नसतो,ज्यांना अपूर्णत्व प्राप्त होते..!
माझ्या बाबतीत काही अश्याच गोष्टी आहेत की ज्यांच्यासाठी मी कल्पनेतील विश्व अन् त्याच्या वाटा मोकळ्या करून दिल्या आहेत,म्हणजे कधीतरी पुस्तकात असो किंवा इतरांच्या संवादातून मला माझ्या मनात मी निर्माण केलेल्या जागेबद्दल बोलणे झाले की ती समोरची जागा आपण जी संवादात बोलत आहोत तिची मनात ती ठरलेली आकृती निर्माण होते.माझ्या कल्पनेच्या विश्वात मी प्रवास करू करतो..!

हे कल्पनेतील जग खूप सुंदर अन् त्याला कुठलीही वास्तवाची झळ न लागलेलं असं आहे.त्यामुळे इथला माझा हा प्रवास खूप सुखाचा अन् रमणीय असा आहे,जेव्हा या कल्पनेतील जगाला किंवा ठिकाणांना मी वास्तवात भेट दिली तेव्हा मला भेटलेले ते ठिकाण माझ्या कल्पनेतल्या आकृतीपेक्षा फार असं वेगळं नव्हतं..!
अलीकडे कधीतरी निराशा हाती येते अन् भ्रमनिरास होतो काही गोष्टींच्या बाबतीत पण एक अनामिक समाधान हे चेहऱ्यावर अश्यावेळी आलेलं असतं..!

तर असेच काही महिन्यांपूर्वी "हर्मन मेलव्हील" यांचे "तैपी" हे पुस्तक वाचले.गेले काही महिने मी त्या पुस्तकातील हे जगणं कल्पनेत अनुभवत राहीलो.वास्तवात अगदी हुबेहूब तसच डोंगरदर्यात मांडीपर्यंत येणाऱ्या गवतात भटकत राहिलो,पुस्तकातील त्या जमातीचे नाही पण माझ्या जवळपास असलेल्या पाच-पन्नास किलोमीटरमधील आदिवासी जमातीतील माझ्या बांधवांचे जनजीवन अनुभवत राहिलो.
परिणाम हा होता की "हर्मन मेलव्हील"ने जे काही या पुस्तकातून आपल्या समोर उभे केले आहे,ते वर्णन अन् ते जीवन खूप सुंदर आहे.म्हणजे सामान्य व्यक्ती ते जीवन जगण्याचा विचार करणार नाही अन् केलाच तर त्या अवस्थेत असलेलं जीवन तो फार काळ जगू शकत नाही असे काही आहे..!
त्यामुळं आजवर वाचनात आलेलं हे सर्वाधिक आवडतं असं माझं पुस्तक आहे..!
हे झालं पुस्तकाची जोड घेऊन कल्पनेतील जगण्यात विहार करणं..!

असंच काहीसं मत माझं काही शहरांना अन् काही गावांना लोकांनी केलेल्या वर्णनातून मी मला काय वाटतं अन् माझ्या नजरेत ते कसं असेल हे मनात दडवून ठेवलं आहे.वेळोवेळी त्या ठिकाणांना मी कल्पनेत भेट देऊन येतो,स्वाभाविक बघता काहीसं विचित्र वाटणारं हे सर्व आहे पण त्याला मिळालेली कल्पनेची जोड हे जग अन् तो काल्पनिक सहवास अजूनच मला  समृध्द करतो किंवा हळवा करून जातो असं कधीतरी मला वाटते..!

अशी अनेक शहरे,प्रांत,अन् न बघितलेली ठिकाणं आहे की मी ज्यांची माझ्या कल्पनेच्या विश्वात एक आकृती निर्माण करून ठेवली आहे.तिथे कल्पनेतच मला काही चांगल्या वाईट माणसांचा सहवास लाभला आहे,त्यामुळं कित्येकदा ठरवूनही मी त्या ठिकाणांना भेट देणं वास्तवात टाळत राहिलो..!
कारण एकच होतं की,माझ्या मनात मी जे काही आकृतीबंध त्या ठिकाणाला घेऊन निर्माण केले आहेत त्यांना कुठेही हानी पोहचू नये.कारण तिथे अनपेक्षित असं काहीसं मिळालं की माझा होणारा भ्रमनिरास अन् मग मला नकोसा होणारा त्या ठिकाणाचा सहवास हे सगळं गुंतागुंतीचे आहे..!

तर असंच एक ठिकाण सांगतो की ज्याची माझ्या मनात मी तयार केलेली आकृती आहे,ते म्हणजे गोवा राज्य..!

गोवा जेव्हा माझ्या मनात येऊन जातो तेव्हा मला फार कमी क्षणांसाठी जो गोवा डोळ्यांना दिसतो तो जो की चैनीचा,मज्जा करत समुद्र किनाऱ्यावर सूर्य किरणांचे झरोखे अनुभवत निपचित पडून राहण्याचा असा आहे..!यापुढे बहुतांश वेळी मनातला गोवा कसा असेल तर समुद्र किनाऱ्याच्या चहूबाजूंनी डोंगर,दर्या,लगतच सहज चडून जाता येईल अश्या टेकड्या अन् टेकड्यांवर असलेली उंच उंच माडाची झाडं,सुपारीची झाडे.

नारळाच्या झाडावर चढून त्या तोडलेल्या नारळाला ATLAS सायकलला मधोमध असलेल्या दांडीवर ते नारळे काथीच्या दोरीने बांधून ते सायकल लोटत घेऊन येणारा तो धोतर घातलेला बाबा.किनाऱ्याला लागून असलेल्या दुकानांत मासे ठेवायचे छोटेसे असलेले डीफफ्रिज ज्यांच्यामध्ये बियरच्या बॉटल्स अन् त्यांना पित पोतड्यावर बसलेले कित्येक तरुण,म्हातारे जे की काळे अन् मजबूत बांध्याचे आहे.माझ्यासारखे नव्याने गोवा फिरायला आलेले लोकं या झोपड्या असलेल्या गल्ल्या फिरत आहे,असंख्य विक्रेते पण त्या ठिकाणी हालचालीत आलेलं हळुवारपण..!

सांजेच्या वेळी रापनीला जमा झालेले मासेमारी करणारे माणसं,कंदिलाच्या उजेडात जाळे मोकळे करत आहे,एकांगाला एका झोपडीवजा घरात चुल्हीवर मासे-भात शिजत आहे.एक म्हातारा बिडीचे झुरके घेत लाकडी तावदाण असलेल्या घराच्या उंबऱ्यावर बनियनवर अन् थ्रीफोर्थ चड्डीवर बसलेला आहे घरात पाणी सांडले आहे पण कुठे कुठे ते सुखलेले आहे,त्यावर माश्या गुणगुण करत आहे..!

सांज ढळली की माझ्या नजरेतील गोव्याच्या हालचाली या एकदम हळुवार होतात मला गोव्यातील पोर्तुगिजांच्या कालखंडातील फार जुने असलेले चर्चे खुणावू लागतात.तिथं जीवाला एक समाधान अन् शांतता मिळते म्हणून मी कितीवेळ चर्चेमध्ये एकटाच मंद प्रकाशात प्रार्थना करत बसलेलो असतो..!
सांजेच्या वेळी माझ्यामते गोव्यात रोज किनाऱ्यावर ढगाळ वातावरण अन् वारा असतो त्या वाऱ्यात अन् अंधुक प्रकाशात मी माझे उडणारे केस सावरत जॉकेटमध्ये हात घालून गोव्यातील जुने घरं न्याहाळत भटकत असतो असं खूप खूप काही आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड