मुख्य सामग्रीवर वगळा

मुसाफिर..!

मुसाफिर.!

नेहमीप्रमाणे सायंकाळ होते अन् मी माझं नेहमीचं सायंकाळचे फिरायला घराच्या बाहेर पडतो.घरापासून असलेल्या सिमेंटच्या रस्त्याने मी चालत राहतो,सायंकाळ होण्यास बराचवेळ बाकी असल्यानं कॉलनीतील सर्वच घरांचे दरवाजे बंद असतात,कॉलनीत सामसूम वाटत असते.
माझ्या शुजचा आवाज अन् रस्त्यानं घरे,रस्त्यानं ये-जा करणारी माणसं,बंद-चालू होणारी स्ट्रीट लाईट न्याहाळत मी चालत असतो.काहीवेळ चाललो की लाल मातीच्या जमिनीवर मी चालायला लागतो,मग सिमेंटी रस्ते मागे पडतात.लाल मातीच्या रानात एका सरळ रेषेत चालून चालून तयार झालेल्या पायवाटेने मग मी चालत राहतो..!

आता घरे मागे पडलेली असतात,दूरवर नजर जाईल तिथवर फक्त लाल मातीचे रान अन् या पायवाटा.लाल मातीच्या फुफाट्यात पडलेल्या बुटांच्या अनेक नक्षी न्याहाळत नवीन बूट कोणता,चप्पल कोणती हे बघत मी चालत असतो.दूरवर कुत्र्यांचा सुळसुळाट त्यांचा भुकण्याचा आवाज ऐकू येत असतो.चीनच्या भिंतीप्रमाणे असलेल्या नवोदय विद्यालय अन् कॉलेजच्या भिंती पलिकडे असलेल्या निरगलिच्या झाडांच्या पानांचा सळसळ वाऱ्याच्या झुळकेने येणारा आवाज अन् त्याच वाऱ्यामुळे माझ्यापर्यंत येणारा त्या झाडांचा दरवळ.
मी एकटा आहे,एकटाच चालत असतो.आता लाल मातीच्या रानातली पायवाटा मागे पडून डांबरी रस्त्याला मी लागलेला असतो..!

आता थोडीबहुत माझ्यासारखी एक्कलकोंडी माणसे एकटी एकटीच बाहेर फिरायला निघालेली असतात,माझं त्यांना न्याहाळणे चालू असते.त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघून मनोमन विचार करणे चालू असते,तेही कदाचित हेच करत असावे कारण एक्कलकोंडी माणसे अशीच असतात.निरीक्षण करणे हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असतो.
डांबरी रस्त्याने दीड-दोन किमी चालले की येणारी-जाणारी माणसे,वाहने,उसतोडीच्या परतीच्या वाटेला लागलेल्या टायर गाड्या अन् पुन्हा ही एक्कलकोंडी माणसे मी न्याहाळत चालत असतो.साडेपाच झालेले असतात त्यामुळे बँक,फायनान्ससारख्या क्षेत्रात काम करणारी माणसे वैतागून वैतागलेला चेहरा घेऊन घरी परतीच्या वाटेनं घराकडे निघाली असतात,त्यांचा टापटीपपणा त्यांचा हुद्धा काय आहे हे ओळखायला सोप्पा करतो..!

इतके सर्व चालून झाले की मी रस्त्याच्या एकांगाला असलेल्या लाल मातीच्या अन् काळ्या खडकाच्या रानात खडकावर जावून एकटा बसून राहतो.माझ्यासारखी एक्कलकोंडी माणसे ज्याच्या-त्याच्या खडकावर बसून हे सर्व न्याहाळत असतात.दूरवर नुकतीच रिटायर्ड झालेल्या आजोबांची एक टीम त्यांच्या आठवणींना शब्दांनी उजाळा देत त्यांचे नोकरीचे अनुभव एकमेकांना सांगत असतात,दिसायला सगळे कसे टापटीप असतात..!

मी ही माझ्या खडकावर बसून रस्त्यानं जाणारी,येणारी माणसे बघत विचार करत बसलेलो असतो.मग ती व्यक्ती मला माझ्या नजरेला भेटते,जिचा मी रोज विचार करत असतो,वाट बघत असतो..!

होय तीच ती व्यक्ती,जी रस्त्यानं चालतांना मला रोज भेटत असते.गवंड्याच्या हाताखाली जाणारी ती व्यक्ती माझा फिरायला जायचा वेळ अन् तिचा दिवसभर काम करून,वाळूचे घमीले वाहून थकून पार वाकून गेलेली ती साठीतील व्यक्ती तिचा परतीच्या वाटेनं जायचा वेळ एकच असतो.
अलीकडे रोजच भेटतो तोही,एका हातात तीन तळी डब्बा अन् एका हातात कधी कधी कामावर घालायचे कपडे असलेली पिशवी घेऊन तो चालत असतो.शेजारच्या गावातला असल्यानं तो दिवसभर काम करून थकून जात असल्यानं रस्त्यानं हळू हळू चालत असतो..!

चालता चालता थांबून मागून येणाऱ्या गाडीला न्याहाळत असतो,त्याच्या गावातले कुणी ओळखीचे असले की त्यांना हातातला डब्बा वर करून थांबायला सांगत असतो.कुणीच थांबत नाही पण तो चालत असतो थांबत असतो,हात देत असतो अन् मी हे सर्व न्याहाळत असतो.रोजच त्याची अन् माझी या वेळेला भेट होत असते.कधी बोलणं नाही की कधी काही नाही पण हे आमचं भेटणं रोजचे असते.

एक गोष्ट मी त्याच्या या अश्या वागण्यातून कैद केली की,तो बळजबरी कुणाला त्यांच्या गाडीवर बसवून घ्यायला करत नाही किंवा आवाज देत नाही फक्त हात देतो.कुणी थांबले तर मुकाट्यानं खुश न होता गाडीवर बसतो अन निघून जातो,कारण त्याला माहीत आहे रोजचे आहे हे आपले.त्याचं एक विशेष अप्रूप यासाठीही वाटलं की तो टापटीप पोशाख असलेल्या गाडीवाल्यांना कधीच हात देत नाही किंवा लिफ्ट मागत नाही.
कारण मी समजू शकतो,एक अनामिक समाधान त्याला भेटलं की मला वाटते.त्यामुळे असं त्याचं रोजचं वाट बघणं असतं खडकावर बसून..!

दर सोमवारी बाजाराच्या दिवशी एखाद्या आठवड्याला त्याची भेट होत नाही पण एखाद्या सोमवारी झाली की त्या दिवशी तो खूप छान टापटीप असा असलेला भेटतो.त्याच्या हातात असलेली बाजाराची पिशवी घेऊन तो चालत असतो,त्याच गतीने ज्या गतीने तो रोज चालतो.लोकांना हात देतो कुणी भेटले की निपचित गाडीवर बसतो अन त्याच्या घराकडे निघतो.यात त्याला काहीही वाटत नाही कींवा कुठला आनंद,त्याला भेटलेली लिफ्ट मी बघितली की मला मात्र हल्ली आपसूकच आनंद होतो..!

मग मी विचार करत बसलेलो असतो त्याच खडकांवर येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना न्याहाळत..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड