मुख्य सामग्रीवर वगळा

माझ्या बाबतीत थोडक्यात अन् माझी Interview Story..!

 बाबतीत थोडक्यात अन्  माझी Interview Story..!


साधारण आठ-दहा दिवसांपूर्वीची गोष्ट असावी.मी एका बड्या कंपनीसाठी ऑनलाईन माध्यमातून इंटर्विव्ह देत होतो,इंटर्विव्ह छान चालू होता.

Naukri.com वर असलेला माझा Resume बघत ते मला प्रश्न करत होते,मी ही त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत होतो.अनेकदा काही प्रश्नांचे उत्तरे येत नसल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर दडपण आल्याचे भावही त्यांनी बघितले असेलच.

एकूण त्या बड्या कंपनीतील ते एजआर विभागातील तिघेजण महत्त्वाच्या अन् अनुभवी व्यक्ती त्या असाव्या हे त्यांच्या बोलण्यातून सहज कळून जात होते.कारण माझाही तो फायनल राऊंड होता अन् यापूर्वी दोन राऊंड मी सहज सिलेक्ट होवून या राऊंडसाठी माझी निवड झाली होती..!

हे सर्व सांगायचं इथे काय कारण आहे..? किंवा का म्हणून मी हे सर्व सांगतो आहे..?

तर साधारण पंधरा मिनिटे इंटर्विव्ह झाला असेल अन् त्यांनी मला प्रश्न केला की,तू तुझ्या कामाच्या अनुभवात Freelance & Content Writer म्हणून जे काही लिहले आहे ते काय असतं..? अन् हे काम तर आपल्या फिल्डमध्ये कुठेही येत नाही मग हे काम नेमके काय असते अन् कामाचे स्वरूप कसे असते हे थोडक्यात आम्हाला सांग..!

मला इथे प्रश्न पडला की त्यांना खरच Freelance & Content Writer काय असते हे माहीत नसेल का..? कारण हाच प्रश्न मला आजवर कित्येकांनी केला आहे.त्यात अनेकदा सुशिक्षित लोकांचासुद्धा सहभाग होता मग यांना खरच माहीत नसेल का किंवा त्यांना याबद्दल अधिकचे जाणून घ्यायचे असेल..!

या सर्व गोष्टींचा विचार करत असतांना मला एका नवख्या लेखकाने काही महिन्यांपूर्वी तुम्ही Freelnacer आहात तर मग मला अमुक अमुक विषयवार लेख लिहून देणार का असा प्रश्न केला होता ते सर्व आठवलं.
मी त्यांचा विषय घेतला अन् त्यांना तीन दिवसांनी त्या विषयावर एक छान लेख लिहून दिला.पुढे त्यांनी Thanks म्हंटले अन् ते तिथून निघाले..!

मग मी त्यांना म्हंटले या तुम्ही दिलेल्या विषयावर मी जे लेखन केलं आहे त्यासाठी मी काही फिस आकारत असतो,ती तुम्ही मला दिली नाही.ते नवखे लेखक मला म्हंटले तुम्हीतर Freelancer आहात म्हणजे तुम्ही फ्री लिहतात,मग आता का फीस..!
आता मी त्यांना काय बोलणार होतो मी आपलं त्यांना म्हंटले राहू द्या..!
हे सगळं आठवून माझ्या चेहऱ्यावर इंटर्विव्ह चालू असतांना हास्यभाव आले अन् मी एजआर विभागाला त्यांनी मला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देऊ लागलो..!

Freelance & Content Writer म्हणजे नेमकं काय..!
Freelance Writer अशी व्यक्ती जी स्वतंत्ररीत्या Freelance वेबसाइट्सवरून स्वतःच्या वेळेनुसार काम करून ऑनलाईन पैसे कमवते.फ्रीलान्सर व्यक्ती स्वतःचे स्किल्स वापरून लॅपटॉप,अँड्रोइड मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे ऑनलाईन पैसे कमवतात.त्यासाठी त्यांना वेळेचे बंधन नसते.तसेच ते डॉलर,Pounds किंवा भारतीय Rupees मध्येसुद्धा पैसे कमवू शकतात..!

सोप्या भाषेत किंवा माझ्या नजरेतून सांगायचं झालं तर मी समोरच्या व्यक्तीकडून पैसे घेऊन त्यांना हव्या त्या विषयावर लेखन करून देणं इतकेच.अनेकजण स्वतःचा ब्लॉग चालवतात मग त्या ब्लॉगवर माझ्यासारख्या लेखकांडून समोरची व्यक्ती लेख विकत घेऊन तो तिच्या ब्लॉगवर पोस्ट करते.त्यानंतर अनेक वेबपोर्टल,वेबसाईट्ससाठी,वृत्तपत्र,मासिके,साप्ताहिक,सोशल मीडिया प्लॅटफॉर्म,विविध ब्लॉग्स,Etc यांच्यासाठी एक ठराविक रक्कम घेऊन लेखन करणे होय..!

मग ती ठराविक रक्कम किती हे कसे ठरते..?

तर ज्या प्लॅटफॉर्मसाठी आपण लेखन करतो त्याची मार्केटमध्ये असलेली चर्चा,रोज कितीजण त्या प्लॅटफॉर्मला भेट देता (ट्रॅफिक) किंवा तो किती प्रसिद्ध आहे यावर हे ठरते..!
एका ७००-१००० शब्दांच्या लेखासाठी हा दर २५०-२००० रुपये इतका आहे.(हे सर्व माझे दर आहे यात इतर ठिकाणी फरक असू शकतो.)

(हे सर्व सोप्प्या भाषेत अन् थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे.)

Bharat Sonwane.
MBA - (Production & Operation Management.)
(Freelancer & Content Writer.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...