मुख्य सामग्रीवर वगळा

शहर आणि माणसे..!

शहर आणि माणसे..!

आयुष्याची गणितं जुळवत असतांना जेव्हा कुठेच काही जुळत नसेल तेव्हा अशी वेळ साधून अनोळखी शहरात भटकंती करत आपण आपली वेळ साधायची..!

अलीकडे आयुष्याला घेऊन फार काही अपेक्षा ठेवलेल्या नाहीये.त्यामुळं अश्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये,त्या बघण्यामध्ये आनंद मिळतो.
खरंतर आयुष्याला घेऊन फार विचार केला की आयुष्यात आयुष्याला घेऊन न सुटणारी जी गणितं आहे ती आयुष्यभर नको सुटायला हवी आहे मला...!

कारण जोवर आयुष्यात फरफट आहे तोवर आयुष्यात सुख आहे,नंतर खूप सहज मिळणाऱ्या गोष्टींसाठी आपल्याला कुठलं सोयरसुतक नसते..!

भर मध्यरात्री असं शांत झालेलं,सिग्नलच्या तालावर ठेका धरून नाचणारं शहर यावेळी खायला उठते,तरीही ते हवेहवेसे वाटते.शांत झालेलं शहर,रस्त्याच्या एकांगाला निवारा शोधून गोधडीत पडलेलं कुणीतरी,रात्रीच्या वेळ कामाला म्हणून जाणारे कुणीतरी,इतक्या रात्रीही रस्त्यावर भुंकणारी कुत्रे,शहराच्या एखाद दुसऱ्या भागाला फिरणारी माझ्यासारखी भटकी माणसे..!

या सगळ्यांच्यामुळे काळोखाच्या राती शहर अजूनच भयाण,उद्वस्थ झालेलं वाटत असतं.त्याच माणसांमुळे दिवसभर शहर त्याची कथा लोकांना सांगत असते,काळोखाच्या वेळी माझ्यासारखे वाट चुकलेले मांणसे आपल्या दर्दी कहाण्या शहराला पायी भटकंती करत सांगत असतात..!

दिवसभर लोकांच्या मनोरंजन करणाऱ्या फ्लेक्स काळोख रात्री मात्र जमिनीवर येऊन आपल्याशी खेळू,बोलू लागतात अन् आपल्या आयुष्याचा खेळ करून टाकतात.तितक्याच सहज जितक्या त्या फ्लेक्सवर असलेल्या सुशांत सिंगच्या आयुष्याचा झाला,त्यामुळं शहरं अजूनच भयाण भासू लागतात अश्यावेळी..!

शहरात जोवर सांजेच्या वेळी असो की फिरायच्यावेळी शहरातील भटक्यांची अन् फिरणाऱ्यांची वजाबाकी,बेरीज जुळते आहे तोवर आयुष्याची अन् शहराची गणितं जुळत राहतील..!

एकदाका ही गणितं बिघडली त्या दिवशी हे शहर शहर नसेल इथे मग फक्त आयुष्यभर आयुष्याला घेऊन असणारी गणितं सोडवणारी माणसे असतील.ज्यांच्या जगण्याला दुःखाची किनार नसेल,सुख असूनही ते सुखाचा शोध घेत राहतील ठरल्यावेळी पुन्हा पुन्हा..!

त्यामुळे माणसे जोडायला हवी आहे,काळोखाच्या राती ही गणितं जुळवून बघायला हवी,जोवर गणितं नाही जुळत तोवर आयुष्य सुंदर आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...