मुख्य सामग्रीवर वगळा

शहर आणि माणसे..!

शहर आणि माणसे..!

आयुष्याची गणितं जुळवत असतांना जेव्हा कुठेच काही जुळत नसेल तेव्हा अशी वेळ साधून अनोळखी शहरात भटकंती करत आपण आपली वेळ साधायची..!

अलीकडे आयुष्याला घेऊन फार काही अपेक्षा ठेवलेल्या नाहीये.त्यामुळं अश्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये,त्या बघण्यामध्ये आनंद मिळतो.
खरंतर आयुष्याला घेऊन फार विचार केला की आयुष्यात आयुष्याला घेऊन न सुटणारी जी गणितं आहे ती आयुष्यभर नको सुटायला हवी आहे मला...!

कारण जोवर आयुष्यात फरफट आहे तोवर आयुष्यात सुख आहे,नंतर खूप सहज मिळणाऱ्या गोष्टींसाठी आपल्याला कुठलं सोयरसुतक नसते..!

भर मध्यरात्री असं शांत झालेलं,सिग्नलच्या तालावर ठेका धरून नाचणारं शहर यावेळी खायला उठते,तरीही ते हवेहवेसे वाटते.शांत झालेलं शहर,रस्त्याच्या एकांगाला निवारा शोधून गोधडीत पडलेलं कुणीतरी,रात्रीच्या वेळ कामाला म्हणून जाणारे कुणीतरी,इतक्या रात्रीही रस्त्यावर भुंकणारी कुत्रे,शहराच्या एखाद दुसऱ्या भागाला फिरणारी माझ्यासारखी भटकी माणसे..!

या सगळ्यांच्यामुळे काळोखाच्या राती शहर अजूनच भयाण,उद्वस्थ झालेलं वाटत असतं.त्याच माणसांमुळे दिवसभर शहर त्याची कथा लोकांना सांगत असते,काळोखाच्या वेळी माझ्यासारखे वाट चुकलेले मांणसे आपल्या दर्दी कहाण्या शहराला पायी भटकंती करत सांगत असतात..!

दिवसभर लोकांच्या मनोरंजन करणाऱ्या फ्लेक्स काळोख रात्री मात्र जमिनीवर येऊन आपल्याशी खेळू,बोलू लागतात अन् आपल्या आयुष्याचा खेळ करून टाकतात.तितक्याच सहज जितक्या त्या फ्लेक्सवर असलेल्या सुशांत सिंगच्या आयुष्याचा झाला,त्यामुळं शहरं अजूनच भयाण भासू लागतात अश्यावेळी..!

शहरात जोवर सांजेच्या वेळी असो की फिरायच्यावेळी शहरातील भटक्यांची अन् फिरणाऱ्यांची वजाबाकी,बेरीज जुळते आहे तोवर आयुष्याची अन् शहराची गणितं जुळत राहतील..!

एकदाका ही गणितं बिघडली त्या दिवशी हे शहर शहर नसेल इथे मग फक्त आयुष्यभर आयुष्याला घेऊन असणारी गणितं सोडवणारी माणसे असतील.ज्यांच्या जगण्याला दुःखाची किनार नसेल,सुख असूनही ते सुखाचा शोध घेत राहतील ठरल्यावेळी पुन्हा पुन्हा..!

त्यामुळे माणसे जोडायला हवी आहे,काळोखाच्या राती ही गणितं जुळवून बघायला हवी,जोवर गणितं नाही जुळत तोवर आयुष्य सुंदर आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...