मुख्य सामग्रीवर वगळा

शहर आणि माणसे..!

शहर आणि माणसे..!

आयुष्याची गणितं जुळवत असतांना जेव्हा कुठेच काही जुळत नसेल तेव्हा अशी वेळ साधून अनोळखी शहरात भटकंती करत आपण आपली वेळ साधायची..!

अलीकडे आयुष्याला घेऊन फार काही अपेक्षा ठेवलेल्या नाहीये.त्यामुळं अश्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये,त्या बघण्यामध्ये आनंद मिळतो.
खरंतर आयुष्याला घेऊन फार विचार केला की आयुष्यात आयुष्याला घेऊन न सुटणारी जी गणितं आहे ती आयुष्यभर नको सुटायला हवी आहे मला...!

कारण जोवर आयुष्यात फरफट आहे तोवर आयुष्यात सुख आहे,नंतर खूप सहज मिळणाऱ्या गोष्टींसाठी आपल्याला कुठलं सोयरसुतक नसते..!

भर मध्यरात्री असं शांत झालेलं,सिग्नलच्या तालावर ठेका धरून नाचणारं शहर यावेळी खायला उठते,तरीही ते हवेहवेसे वाटते.शांत झालेलं शहर,रस्त्याच्या एकांगाला निवारा शोधून गोधडीत पडलेलं कुणीतरी,रात्रीच्या वेळ कामाला म्हणून जाणारे कुणीतरी,इतक्या रात्रीही रस्त्यावर भुंकणारी कुत्रे,शहराच्या एखाद दुसऱ्या भागाला फिरणारी माझ्यासारखी भटकी माणसे..!

या सगळ्यांच्यामुळे काळोखाच्या राती शहर अजूनच भयाण,उद्वस्थ झालेलं वाटत असतं.त्याच माणसांमुळे दिवसभर शहर त्याची कथा लोकांना सांगत असते,काळोखाच्या वेळी माझ्यासारखे वाट चुकलेले मांणसे आपल्या दर्दी कहाण्या शहराला पायी भटकंती करत सांगत असतात..!

दिवसभर लोकांच्या मनोरंजन करणाऱ्या फ्लेक्स काळोख रात्री मात्र जमिनीवर येऊन आपल्याशी खेळू,बोलू लागतात अन् आपल्या आयुष्याचा खेळ करून टाकतात.तितक्याच सहज जितक्या त्या फ्लेक्सवर असलेल्या सुशांत सिंगच्या आयुष्याचा झाला,त्यामुळं शहरं अजूनच भयाण भासू लागतात अश्यावेळी..!

शहरात जोवर सांजेच्या वेळी असो की फिरायच्यावेळी शहरातील भटक्यांची अन् फिरणाऱ्यांची वजाबाकी,बेरीज जुळते आहे तोवर आयुष्याची अन् शहराची गणितं जुळत राहतील..!

एकदाका ही गणितं बिघडली त्या दिवशी हे शहर शहर नसेल इथे मग फक्त आयुष्यभर आयुष्याला घेऊन असणारी गणितं सोडवणारी माणसे असतील.ज्यांच्या जगण्याला दुःखाची किनार नसेल,सुख असूनही ते सुखाचा शोध घेत राहतील ठरल्यावेळी पुन्हा पुन्हा..!

त्यामुळे माणसे जोडायला हवी आहे,काळोखाच्या राती ही गणितं जुळवून बघायला हवी,जोवर गणितं नाही जुळत तोवर आयुष्य सुंदर आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड