मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्याची फरफट..!

आयुष्याची फरफट..!

माणसांच्या गर्दीत जेव्हा एकटं वाटायला लागतं,तेव्हा प्रत्येक त्या माणसाच्या आत मनाचा तळ गाठून त्याला भेटणं होतं.त्याचा चेहरा न्याहाळला जातो अन् असं पारखून मग आपल्याला हवासा माणूस आपल्या जवळ केला जातो.

अश्या जवळ केलेल्या माणसाने आपल्याला नाकारले की मग आयुष्याची बिनकामी फरफट होते.मग गर्दीतही आपण एकटे राहून जातो,माणसांच्या सहवासातसुद्धा आपल्याला एकाकी वाटायला लागतं..!

माणसं एकटे कधीच नसतात,जेव्हा एकटे असतात तेव्हाही ते त्यांना स्वतःला घेऊन साऱ्या आयुष्यात आलेल्या जवळच्या माणसांना घेऊन विचार करत असतात.त्यामुळं ती एकटी कधीच नसतात जरीही अवस्थेने ते एकटे दिसत असले..!

हे सर्व अश्या काळोखाच्या राती अजूनच स्पष्ट जाणवते,काही गोष्टींची खूप सहज न यावी इतकी सहज मग आठवण येऊ लागते.स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली सायकलवरून खाली जमिनीवर पडलेले वृत्तपत्र मी अंधारातच जमत करत आहे पण मला कोणी बघितले नाही ही खूप दिवसांची दिलासा देणारी आठवण मला अश्या काळोखात खूप सहज अन् नेहमी येऊन जाते..!

सध्या स्थिर असलेल्या आयुष्याला घेऊन मग मला आपलीच कित्येक प्रश्न करून होतात.काय हवं, कश्याशाठी,महत्त्वाचा म्हणजे मी का इतका वेळ घेतो आहे आयुष्यात स्थिर व्हायला किंवा कुठला तो एक निर्णय घ्यायला जिथं सध्या आयुष्याची दोन टोकांवर आयुष्य जगण्याची इतकी फरफट होत आहे तरीही..!

कधीतरी मला माझं सुखद भविष्य खुणावते,कधीतर वेळी-अवेळी भविष्यासाठी घेतलेले जे निर्णय आहे ते चुकले आहे.

अश्यावेळी जेव्हा स्पष्टच याची जाणीव होते,तेव्हा मात्र आजच मला माझ्या आयुष्यातील,भविष्यातील माझी होणारी फरफट दिसून येते अन् मी बेचैन होतो.तितकाच जितका पहाटे उजेडल्यावर माझे सायकलवरचे पेपर काही दहा वर्षांपूर्वी भर वस्तीत रस्त्यावर अस्थव्यस्थ पडले होते अन् मी ते भांबावल्यासारखे जमा करत होतो..!

अश्यावेळी बऱ्याच जुन्या गोष्टी आठवतात अन् काही काळ का होईना मला माझ्या भविष्याची चिंता सतावत नाही.म्हणून अलीकडे नेहमीच वाटतं की गर्दीतला तो प्रत्येक माणूस ओळखीचा असावा,ओळखीचा वाटावा..!

पहाटेच साडेपाचला शिकवणीसाठी गेलं की गुलमोहराच्या झाडाखाली मॅडमनी माझी घेतलेली सहाची शिकवणी.मॅडमची त्यांच्या नवऱ्याला नवीन ड्युटीवर लागल्याने त्यांना सकाळीच ड्युटीसाठी डब्बा करून देणे,त्यांचे आवरून देणे माझ्याकडे बघणे यात त्यांची होणारी फरफट आठवते..!

अन् मी तेव्हाही माझ्या भविष्याची काळजी म्हणून त्यांच्याकडे शिकवणी लावलेली होती..!

माझ्या आयुष्यात अजूनही काही गणितं सुटले नाही,माझी काही प्रश्नांना घेऊन अजूनही फरफट चालू आहे,असं एकाकीच स्ट्रीट लाईटच्या उजेडाखली बसलं की आधिकच जाणवते.
मी असो किंवा मॅडम असो किंवा माणसांच्या गर्दीत ओळखीचे वाटणारे चेहरे असो या सगळ्यांच्या आयुष्याची गणितं,प्रश्न सुटायला हवी.
नाहीतर जगण्याची अन् सोबत आपली होणारी फरफट खूप वाईट आहे..!

मग अश्यावेळी काळोखात असलेला रस्ता,स्ट्रीट लाईटचा उजेड,रस्त्यावर एकांगाला एकाकी टाकलेले एकाकी बाकडे यांचं आयुष्यात असणं जवळचं वाटायला लागतं.माणसांच्या सहवसापेक्षा एकांत जवळचा वाटायला लागतो,माणसांची भिती वाटायला लागते.निर्जीव वस्तूंवर प्रेम व्हायला लागते,त्यांच्याशी जवळीक करायला अन् तासंतास त्यांच्याशी बोलत रहायला त्यांचं सानिध्यात विचार करायला आवडतं..!

असो,जगण्याची गणितं सुटले की हे असं आयुष्य जगणं थांबेल,तोवर आयुष्याची फरफट अन् निर्जीव वस्तू जवळ करायच्या..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड