मुख्य सामग्रीवर वगळा

The Alchemist..!

The Alchemist..!

दोन दिवसांपूर्वी "पाउलो कोएलो" लिखित "द अलकेमिस्ट" (किमयागार) हे "१३५" पानांचे डॉ.शुचिता नांदापूरकर यांनी अनुवादित केलेले पुस्तक वाचून संपवले.
खूप छोटे असे अन् ठरवून वाचायला बसले तर एका बैठकीत वाचून पूर्ण होणारे असे हे पुस्तक आहे..! 

हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर बुक म्हणून अनेकदा ठरलेलं आहे.आश्चर्य म्हणजे जेव्हा मुळ पोर्तुगिज भाषेमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा काही एका महिन्यात या पुस्तकाच्या फक्त दोन प्रती विकल्या गेल्या असतांना हे पुस्तक पुढे काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर बेस्ट सेलर बुक ठरले ज्याची एक अनोखी कथा आहे..! 

आजवर जगभरात ८० पेक्षा जास्त भाषेत हे पुस्तक अनुवादित झालेले आहे अन् जगभरातून वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे..!

"अ‍ॅन्डालुसिया" इथल्या "सॅन्टिआगो" नावाच्या एका मेंढपाळाची ही एक छोटीशी रंजक कथा आहे,जी आपल्याला जीवन जगतांना यशस्वीतेचे काही तत्वे सांगू बघते.खजिना भेटेल म्हणून स्वतःच्या मेंढ्या विकून स्पेनमधल्या त्याच्या जन्मभूमीपासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंतचा त्याचा हा प्रवास आपल्या मनाचा तळ ढवळून काढतो..!

पुढे काय होईल याची आपल्याला उत्कंठा लागून राहते,खजिना भेटेल का..?, काय भेटेल खजिन्यात असे अनेक प्रश्न आपल्याला कथानक पुढे सरकत असतांना पडत असतात...!

पिरॅमिड्सजवळ लपवलेल्या खजिन्याच्या शोधात निघालेल्या सॅन्टिआगोला प्रवासात एक जिप्सी स्त्री,स्वतःला राजा म्हणवून घेणारा वयोवृद्ध आणि एक किमयागार भेटतो.प्रत्येक जण या तरुणाला योग्य दिशा दाखवतो.तथापि,खजिना नेमका काय आहे हे कोणालाच माहीत नसतं..!

वाटेत येणार्‍या अडथळ्यांवर तरुण यशस्वीपणे मात करू शकेल का हेसुद्धा कोणाला सांगता येत नाही.भौतिक वस्तूंच्या शोधार्थ निघालेल्या सॅन्टिआगोला स्वतःच्या अंतरंगात दडलेल्या खजिन्याचा शोध लागतो.मानवतेच्या गाभ्याला स्पर्श करणारी अशी ही उत्कट आणि प्रेरक कथा आहे..!

या कथेमध्ये स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी  मिळालेली प्रेरणा,एका अनोळखी दिशेने सुरू असलेला प्रवास,सर्व काही गमावले तरी जग जिंकायची असलेली उर्मी,आपली जीवनसाथी मिळून ही तिच्या प्रेमापोटी स्वप्नांचा पाठलाग न थांबवण्याचा दिलेला सल्ला असे कितीतरी प्रसंग वाचकांना कथेशी जोडून ठेवतात..!
एकूण असा हा सर्व प्रवास आहे जो आपल्याला आयुष्याला घेऊन अनेक तत्व शिकवतो..!

थोडक्यात पुस्तकाबद्दल मला काय वाटते,
पुस्तक खूप एकांगी अन् पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टींचा पुस्तकात झालेला उल्लेख यामुळे पुस्तकात कुठेतरी एका पॉईंटला पुस्तक कंटाळवाणे वाटायला लागते..!

नक्कीच प्रवासवर्णन आणि लेखकाला आपल्याला जे काही सांगायचे आहे या नजरेतून जर पुस्तक वाचत असाल तर पुस्तक आपल्याला पुस्तकाशी खिळवून ठेवते.परंतु काही ठिकाणी असा प्रत्यय येतो की कुठेतरी लिखाणात बळजबरी काही पात्र येतात अन् नकळत गायब होवून जातात‌‌.नेमकं यातून लेखकाला काय साधायचं आहे हे ही कळत नाही..!

थोडक्यात पुस्तक छान आहे पण जरासे गुंतागुंतीचे आहे,आपण कोणत्या विचारांना घेऊन ते वाचू यावर पुस्तक कसे वाटते हे अवलंबून आहे.विद्यार्थीदशेत हे पुस्तक वाचले तर नक्कीच आपल्याला प्रेरणादायी वाटेल असे हे छोटेसे पुस्तक आहे..!

मराठी अनुवाद कुठेतरी गरबडल्या सारखा वाटतो जो अजून खूप छान पद्धतीने सरस होवू शकतो,ज्यामुळे मराठी वाचक या पुस्तकाला अजूनच आवडीने वाचतील..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...