मुख्य सामग्रीवर वगळा

The Alchemist..!

The Alchemist..!

दोन दिवसांपूर्वी "पाउलो कोएलो" लिखित "द अलकेमिस्ट" (किमयागार) हे "१३५" पानांचे डॉ.शुचिता नांदापूरकर यांनी अनुवादित केलेले पुस्तक वाचून संपवले.
खूप छोटे असे अन् ठरवून वाचायला बसले तर एका बैठकीत वाचून पूर्ण होणारे असे हे पुस्तक आहे..! 

हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर बुक म्हणून अनेकदा ठरलेलं आहे.आश्चर्य म्हणजे जेव्हा मुळ पोर्तुगिज भाषेमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा काही एका महिन्यात या पुस्तकाच्या फक्त दोन प्रती विकल्या गेल्या असतांना हे पुस्तक पुढे काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर बेस्ट सेलर बुक ठरले ज्याची एक अनोखी कथा आहे..! 

आजवर जगभरात ८० पेक्षा जास्त भाषेत हे पुस्तक अनुवादित झालेले आहे अन् जगभरातून वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे..!

"अ‍ॅन्डालुसिया" इथल्या "सॅन्टिआगो" नावाच्या एका मेंढपाळाची ही एक छोटीशी रंजक कथा आहे,जी आपल्याला जीवन जगतांना यशस्वीतेचे काही तत्वे सांगू बघते.खजिना भेटेल म्हणून स्वतःच्या मेंढ्या विकून स्पेनमधल्या त्याच्या जन्मभूमीपासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंतचा त्याचा हा प्रवास आपल्या मनाचा तळ ढवळून काढतो..!

पुढे काय होईल याची आपल्याला उत्कंठा लागून राहते,खजिना भेटेल का..?, काय भेटेल खजिन्यात असे अनेक प्रश्न आपल्याला कथानक पुढे सरकत असतांना पडत असतात...!

पिरॅमिड्सजवळ लपवलेल्या खजिन्याच्या शोधात निघालेल्या सॅन्टिआगोला प्रवासात एक जिप्सी स्त्री,स्वतःला राजा म्हणवून घेणारा वयोवृद्ध आणि एक किमयागार भेटतो.प्रत्येक जण या तरुणाला योग्य दिशा दाखवतो.तथापि,खजिना नेमका काय आहे हे कोणालाच माहीत नसतं..!

वाटेत येणार्‍या अडथळ्यांवर तरुण यशस्वीपणे मात करू शकेल का हेसुद्धा कोणाला सांगता येत नाही.भौतिक वस्तूंच्या शोधार्थ निघालेल्या सॅन्टिआगोला स्वतःच्या अंतरंगात दडलेल्या खजिन्याचा शोध लागतो.मानवतेच्या गाभ्याला स्पर्श करणारी अशी ही उत्कट आणि प्रेरक कथा आहे..!

या कथेमध्ये स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी  मिळालेली प्रेरणा,एका अनोळखी दिशेने सुरू असलेला प्रवास,सर्व काही गमावले तरी जग जिंकायची असलेली उर्मी,आपली जीवनसाथी मिळून ही तिच्या प्रेमापोटी स्वप्नांचा पाठलाग न थांबवण्याचा दिलेला सल्ला असे कितीतरी प्रसंग वाचकांना कथेशी जोडून ठेवतात..!
एकूण असा हा सर्व प्रवास आहे जो आपल्याला आयुष्याला घेऊन अनेक तत्व शिकवतो..!

थोडक्यात पुस्तकाबद्दल मला काय वाटते,
पुस्तक खूप एकांगी अन् पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टींचा पुस्तकात झालेला उल्लेख यामुळे पुस्तकात कुठेतरी एका पॉईंटला पुस्तक कंटाळवाणे वाटायला लागते..!

नक्कीच प्रवासवर्णन आणि लेखकाला आपल्याला जे काही सांगायचे आहे या नजरेतून जर पुस्तक वाचत असाल तर पुस्तक आपल्याला पुस्तकाशी खिळवून ठेवते.परंतु काही ठिकाणी असा प्रत्यय येतो की कुठेतरी लिखाणात बळजबरी काही पात्र येतात अन् नकळत गायब होवून जातात‌‌.नेमकं यातून लेखकाला काय साधायचं आहे हे ही कळत नाही..!

थोडक्यात पुस्तक छान आहे पण जरासे गुंतागुंतीचे आहे,आपण कोणत्या विचारांना घेऊन ते वाचू यावर पुस्तक कसे वाटते हे अवलंबून आहे.विद्यार्थीदशेत हे पुस्तक वाचले तर नक्कीच आपल्याला प्रेरणादायी वाटेल असे हे छोटेसे पुस्तक आहे..!

मराठी अनुवाद कुठेतरी गरबडल्या सारखा वाटतो जो अजून खूप छान पद्धतीने सरस होवू शकतो,ज्यामुळे मराठी वाचक या पुस्तकाला अजूनच आवडीने वाचतील..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड