मुख्य सामग्रीवर वगळा

Freelancer and Content Writers या क्षेत्रातील माझी गणितं..!

Freelancer and Content Writers क्षेत्रातील माझी गणितं..!

साधारण आठ-दहा दिवसांपूर्वीची गोष्ट असावी.मी एका बड्या कंपनीसाठी ऑनलाईन माध्यमातून इंटरव्यू देत होतो,इंटरव्यू छान चालू होता.

Naukri.com वर असलेला माझा Resume बघत ते मला प्रश्न करत होते,मी ही त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत होतो.अनेकदा काही प्रश्नांचे उत्तरे येत नसल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर दडपण आल्याचे भावही त्यांनी बघितले असेलच.

एकूण त्या बड्या कंपनीतील ते एजआर विभागातील तिघेजण महत्त्वाच्या अन् अनुभवी व्यक्ती त्या असाव्या हे त्यांच्या बोलण्यातून सहज कळून जात होते.कारण माझाही तो फायनल राऊंड होता अन् यापूर्वी दोन राऊंड मी सहज सिलेक्ट होवून या राऊंडसाठी माझी निवड झाली होती..!

हे सर्व सांगायचं इथे काय कारण आहे..? किंवा का म्हणून मी हे सर्व सांगतो आहे..?

तर साधारण पंधरा मिनिटे इंटरव्यू झाला असेल अन् त्यांनी मला प्रश्न केला की,तू तुझ्या कामाच्या अनुभवात Freelance & Content Writer म्हणून जे काही लिहले आहे ते काय असतं..? अन् हे काम तर आपल्या फिल्डमध्ये कुठेही येत नाही मग हे काम नेमके काय असते अन् कामाचे स्वरूप कसे असते हे थोडक्यात आम्हाला सांग..!

मला इथे प्रश्न पडला की त्यांना खरच Freelance & Content Writer काय असते हे माहीत नसेल का..? कारण हाच प्रश्न मला आजवर कित्येकांनी केला आहे.त्यात अनेकदा सुशिक्षित लोकांचासुद्धा सहभाग होता मग यांना खरच माहीत नसेल का किंवा त्यांना याबद्दल अधिकचे जाणून घ्यायचे असेल..!

या सर्व गोष्टींचा विचार करत असतांना मला एका नवख्या लेखकाने काही महिन्यांपूर्वी तुम्ही Freelnacer आहात तर मग मला अमुक अमुक विषयवार लेख लिहून देणार का असा प्रश्न केला होता ते सर्व आठवलं.
मी त्यांचा विषय घेतला अन् त्यांना तीन दिवसांनी त्या विषयावर एक छान लेख लिहून दिला.पुढे त्यांनी Thanks म्हंटले अन् ते तिथून निघाले..!

मग मी त्यांना म्हंटले या तुम्ही दिलेल्या विषयावर मी जे लेखन केलं आहे त्यासाठी मी काही फिस आकारत असतो,ती तुम्ही मला दिली नाही.ते नवखे लेखक मला म्हंटले तुम्हीतर Freelancer आहात म्हणजे तुम्ही फ्री लिहतात,मग आता का फीस..!
आता मी त्यांना काय बोलणार होतो मी आपलं त्यांना म्हंटले राहू द्या..!
हे सगळं आठवून माझ्या चेहऱ्यावर इंटर्विव्ह चालू असतांना हास्यभाव आले अन् मी एजआर विभागाला त्यांनी मला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देऊ लागलो..!

Freelance & Content Writer म्हणजे नेमकं काय..!
Freelance Writer अशी व्यक्ती जी स्वतंत्ररीत्या Freelance वेबसाइट्सवरून स्वतःच्या वेळेनुसार काम करून ऑनलाईन पैसे कमवते.फ्रीलान्सर व्यक्ती स्वतःचे स्किल्स वापरून लॅपटॉप,अँड्रोइड मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे ऑनलाईन पैसे कमवतात.त्यासाठी त्यांना वेळेचे बंधन नसते.तसेच ते डॉलर,Pounds किंवा भारतीय Rupees मध्येसुद्धा पैसे कमवू शकतात..!

सोप्या भाषेत किंवा माझ्या नजरेतून सांगायचं झालं तर मी समोरच्या व्यक्तीकडून पैसे घेऊन त्यांना हव्या त्या विषयावर लेखन करून देणं इतकेच.अनेकजण स्वतःचा ब्लॉग चालवतात मग त्या ब्लॉगवर माझ्यासारख्या लेखकांडून समोरची व्यक्ती लेख विकत घेऊन तो तिच्या ब्लॉगवर पोस्ट करते.त्यानंतर अनेक वेबपोर्टल,वेबसाईट्ससाठी,वृत्तपत्र,मासिके,साप्ताहिक,सोशल मीडिया प्लॅटफॉर्म,विविध ब्लॉग्स,Etc यांच्यासाठी एक ठराविक रक्कम घेऊन लेखन करणे होय..!

मग ती ठराविक रक्कम किती हे कसे ठरते..?

तर ज्या प्लॅटफॉर्मसाठी आपण लेखन करतो त्याची मार्केटमध्ये असलेली चर्चा,रोज कितीजण त्या प्लॅटफॉर्मला भेट देता (ट्रॅफिक) किंवा तो किती प्रसिद्ध आहे यावर हे ठरते..!
एका ७००-१००० शब्दांच्या लेखासाठी हा दर २५०-२००० रुपये इतका आहे.(हे सर्व माझे दर आहे यात इतर ठिकाणी फरक असू शकतो.)

(हे सर्व सोप्प्या भाषेत अन् थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे.)

Bharat Sonwane.
MBA - (Production & Operation Management.)
(Freelancer & Content Writer.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड