मुख्य सामग्रीवर वगळा

अनोळखी शहर..!

अनोळखी शहर..!

माणसं जोडायला हवी,तुझ्या लिखाणाला दुःखाची किनार असल्याचं नेहमीच तुझ्या लिखाणाला वाचत असताना दिसून येतं.शहरात नव्याने जॉब शोधायला आलेल्या एका खेड्यातील सुशिक्षित मुलाची जी अवस्था व्हावी तशी तुझी अवस्था झाली आहे.
असा प्रत्यय तुझ्या लेखणीतून दरवेळा नव्यानं येतो..!

ज्याप्रमाणे माणसं जगायला हवी आहे,तसं तुझं हे व्यक्त होणं चालू रहायला हवं.कालचीच गोष्ट बघ मी शहराच्या एका नामांकित चौकात उभा होतो,माझं माणसांना न्याहाळणे चालू होते.उड्डाणपुलाखाली असलेल्या झाडाच्या आडोश्याला मी सावलीला उभा होतो..!

अनोळखी शहरात मी अनोळखी माणसांत आपल्या लोकांना शोधत असतो.कुणी मला बघून अलवार स्मित दिलं की मला तो ओळखीचा वाटू लागतो.मग आपल्या मनातल्या सर्वच गोष्टी त्याला सांगाव्या असं वाटू लागतं.परंतु दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती माझ्यापासून कितीक दूर निघून गेलेली असते अन् एरवी माझी कल्पनेत का होईना तिच्याशी भेट झालेली असते,संवाद खुलू लागलेला असतो..!

अश्या तऱ्हेनं माणसं बघायला लागलं की अनोळखी प्रत्येक तो माणूस आपल्याला ओळखीचा वाटू लागतो..!

मला आठवतं कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मी बऱ्याच रजिस्टरची लिखाणाला सुरुवात ही उलट दिशेनं केली होती.कारण कॉलेजमध्ये फारसे लिहायला लागत नाही,म्हणून मागील दहा-पाच पाने फाडून टाकले की आपल्याला नव्यानं रजिस्टर घ्यायची गरज नाही असा विचार त्यामागे होता.
मी माझी वही,रजिस्टर जीवापाड जपणारा होतो..!

पुढे कित्येक दिवस हेच रजिस्टरं बुकबाईंड करून मी वापरले.फायनल प्रॉजेक्टवेळी दिला जाणारा प्रॉजेक्ट त्याची गोल्डन-सिल्व्हर बाईंडींग बघून विद्यार्थीदशेतला हा माझा शेवटचा प्रॉजेक्ट असेल म्हणून किती हायसं वाटलेलं..!

असो..!
असं विचार करत असतांना माझ्यासमोरून तीन वेळा सिटीबस निघून गेली अन् एकवेळा मला कुठं जायचं हेच मी विसरून गेलो.टापटीप व्यवस्थित असलेलं माझं राहणीमान बघून मला कित्येक लोकं भुलतात.लोकांना काय माहित एकावेळी दोन आयुष्य जगणारी ही माणसं वरवर जरी नॉर्मल असली तरी त्यांच्या मनात असंख्य विचार एकावेळी चालू असतात..!

काल परवा भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक मी त्याच चौकात फावल्यावेळेत वाचत बसलो होतो.येणारी जाणारी माणसं मला बघत होती,त्यांच्या त्या नजरा बघून दुसऱ्या क्षणाला माझा मार्ग मी बदलवला अन् सभोवताल न्याहाळू लागलो..!

भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेल्या मार्गावर चालायला हे शहर किंवा हे माणसे कधी शिकतील हा विचार मनात येऊन गेला.मी आता सिग्नल लागला म्हणून थांबलो होतो.मी पायी होतो मग मी का थांबलो म्हणून लोकं मला बघत होती,काही क्षणांनी सिग्नल बंद झाला,गाड्या सुटल्या अन् मला बालकवी यांची आठवण येऊन गेली...!

बऱ्याच दिवसांच्या सहवासानंतर आता शहर ओळखीचं वाटू लागलं आहे.अनेक शहरातल्या लोकांनी गावाकडे असतांना शहराला आला की भेटू म्हणून सांगितलं होतं पण या भेटीसाठी मला करावी लागणारी बेरीज,वजाबाकी यांची गणितं अजुन जुळले नाही म्हणून मी अजुन तरी भेटी टाळतो आहे..!

काल परवा सायंकाळच्या उन्हात असाच शहराला आला की भेट असं खूप दिवसांपूर्वी सांगून ठेवलेला मित्र दिसला.मी सिग्नल बघत होतो,त्यानं मला बघितलं अन् ओळख दिली मी ओळख न देऊन काय करणार होतो.
बोलणं झालं,गप्पा झाल्या अनेक विषयांना घेऊन मला काय वाटतं हे त्यानं जाणून घेतलं.शेवटी एक वेळेला वाटून गेलं की तो माझा इंटर्विव घेतो आहे की काय इतके सर्व प्रश्न त्याने मला केले..!

नंतर वेळ झाली या वेळेत सहा वेळेस सिग्नल लाल होवून हिरवा झाला होता,तो निघून गेला अन् मी पुन्हा आता माझी आजची गणितं जुळवत बसलो होतो..!

जगण्याला घेऊन खूप विचार करायला लागलं की अश्या गोष्टी आपल्यासोबत घडत जातात अन् आपण शून्यात विचार करायला लागतो.
रस्ते,सिग्नल,माणसं,अनोळखी माणसं,वाहने,मित्र,मैत्रिणी,कैफात रममाण असलेला मी,झाडाची सावली,रजिस्टर,पुस्तकं,१८९ पान नंबर शेवटून तिसरी ओळ अन् बरच काही..!

Written by
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...