मुख्य सामग्रीवर वगळा

अनोळखी शहर..!

अनोळखी शहर..!

माणसं जोडायला हवी,तुझ्या लिखाणाला दुःखाची किनार असल्याचं नेहमीच तुझ्या लिखाणाला वाचत असताना दिसून येतं.शहरात नव्याने जॉब शोधायला आलेल्या एका खेड्यातील सुशिक्षित मुलाची जी अवस्था व्हावी तशी तुझी अवस्था झाली आहे.
असा प्रत्यय तुझ्या लेखणीतून दरवेळा नव्यानं येतो..!

ज्याप्रमाणे माणसं जगायला हवी आहे,तसं तुझं हे व्यक्त होणं चालू रहायला हवं.कालचीच गोष्ट बघ मी शहराच्या एका नामांकित चौकात उभा होतो,माझं माणसांना न्याहाळणे चालू होते.उड्डाणपुलाखाली असलेल्या झाडाच्या आडोश्याला मी सावलीला उभा होतो..!

अनोळखी शहरात मी अनोळखी माणसांत आपल्या लोकांना शोधत असतो.कुणी मला बघून अलवार स्मित दिलं की मला तो ओळखीचा वाटू लागतो.मग आपल्या मनातल्या सर्वच गोष्टी त्याला सांगाव्या असं वाटू लागतं.परंतु दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती माझ्यापासून कितीक दूर निघून गेलेली असते अन् एरवी माझी कल्पनेत का होईना तिच्याशी भेट झालेली असते,संवाद खुलू लागलेला असतो..!

अश्या तऱ्हेनं माणसं बघायला लागलं की अनोळखी प्रत्येक तो माणूस आपल्याला ओळखीचा वाटू लागतो..!

मला आठवतं कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मी बऱ्याच रजिस्टरची लिखाणाला सुरुवात ही उलट दिशेनं केली होती.कारण कॉलेजमध्ये फारसे लिहायला लागत नाही,म्हणून मागील दहा-पाच पाने फाडून टाकले की आपल्याला नव्यानं रजिस्टर घ्यायची गरज नाही असा विचार त्यामागे होता.
मी माझी वही,रजिस्टर जीवापाड जपणारा होतो..!

पुढे कित्येक दिवस हेच रजिस्टरं बुकबाईंड करून मी वापरले.फायनल प्रॉजेक्टवेळी दिला जाणारा प्रॉजेक्ट त्याची गोल्डन-सिल्व्हर बाईंडींग बघून विद्यार्थीदशेतला हा माझा शेवटचा प्रॉजेक्ट असेल म्हणून किती हायसं वाटलेलं..!

असो..!
असं विचार करत असतांना माझ्यासमोरून तीन वेळा सिटीबस निघून गेली अन् एकवेळा मला कुठं जायचं हेच मी विसरून गेलो.टापटीप व्यवस्थित असलेलं माझं राहणीमान बघून मला कित्येक लोकं भुलतात.लोकांना काय माहित एकावेळी दोन आयुष्य जगणारी ही माणसं वरवर जरी नॉर्मल असली तरी त्यांच्या मनात असंख्य विचार एकावेळी चालू असतात..!

काल परवा भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक मी त्याच चौकात फावल्यावेळेत वाचत बसलो होतो.येणारी जाणारी माणसं मला बघत होती,त्यांच्या त्या नजरा बघून दुसऱ्या क्षणाला माझा मार्ग मी बदलवला अन् सभोवताल न्याहाळू लागलो..!

भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेल्या मार्गावर चालायला हे शहर किंवा हे माणसे कधी शिकतील हा विचार मनात येऊन गेला.मी आता सिग्नल लागला म्हणून थांबलो होतो.मी पायी होतो मग मी का थांबलो म्हणून लोकं मला बघत होती,काही क्षणांनी सिग्नल बंद झाला,गाड्या सुटल्या अन् मला बालकवी यांची आठवण येऊन गेली...!

बऱ्याच दिवसांच्या सहवासानंतर आता शहर ओळखीचं वाटू लागलं आहे.अनेक शहरातल्या लोकांनी गावाकडे असतांना शहराला आला की भेटू म्हणून सांगितलं होतं पण या भेटीसाठी मला करावी लागणारी बेरीज,वजाबाकी यांची गणितं अजुन जुळले नाही म्हणून मी अजुन तरी भेटी टाळतो आहे..!

काल परवा सायंकाळच्या उन्हात असाच शहराला आला की भेट असं खूप दिवसांपूर्वी सांगून ठेवलेला मित्र दिसला.मी सिग्नल बघत होतो,त्यानं मला बघितलं अन् ओळख दिली मी ओळख न देऊन काय करणार होतो.
बोलणं झालं,गप्पा झाल्या अनेक विषयांना घेऊन मला काय वाटतं हे त्यानं जाणून घेतलं.शेवटी एक वेळेला वाटून गेलं की तो माझा इंटर्विव घेतो आहे की काय इतके सर्व प्रश्न त्याने मला केले..!

नंतर वेळ झाली या वेळेत सहा वेळेस सिग्नल लाल होवून हिरवा झाला होता,तो निघून गेला अन् मी पुन्हा आता माझी आजची गणितं जुळवत बसलो होतो..!

जगण्याला घेऊन खूप विचार करायला लागलं की अश्या गोष्टी आपल्यासोबत घडत जातात अन् आपण शून्यात विचार करायला लागतो.
रस्ते,सिग्नल,माणसं,अनोळखी माणसं,वाहने,मित्र,मैत्रिणी,कैफात रममाण असलेला मी,झाडाची सावली,रजिस्टर,पुस्तकं,१८९ पान नंबर शेवटून तिसरी ओळ अन् बरच काही..!

Written by
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...