मुख्य सामग्रीवर वगळा

अनोळखी शहर..!

अनोळखी शहर..!

माणसं जोडायला हवी,तुझ्या लिखाणाला दुःखाची किनार असल्याचं नेहमीच तुझ्या लिखाणाला वाचत असताना दिसून येतं.शहरात नव्याने जॉब शोधायला आलेल्या एका खेड्यातील सुशिक्षित मुलाची जी अवस्था व्हावी तशी तुझी अवस्था झाली आहे.
असा प्रत्यय तुझ्या लेखणीतून दरवेळा नव्यानं येतो..!

ज्याप्रमाणे माणसं जगायला हवी आहे,तसं तुझं हे व्यक्त होणं चालू रहायला हवं.कालचीच गोष्ट बघ मी शहराच्या एका नामांकित चौकात उभा होतो,माझं माणसांना न्याहाळणे चालू होते.उड्डाणपुलाखाली असलेल्या झाडाच्या आडोश्याला मी सावलीला उभा होतो..!

अनोळखी शहरात मी अनोळखी माणसांत आपल्या लोकांना शोधत असतो.कुणी मला बघून अलवार स्मित दिलं की मला तो ओळखीचा वाटू लागतो.मग आपल्या मनातल्या सर्वच गोष्टी त्याला सांगाव्या असं वाटू लागतं.परंतु दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती माझ्यापासून कितीक दूर निघून गेलेली असते अन् एरवी माझी कल्पनेत का होईना तिच्याशी भेट झालेली असते,संवाद खुलू लागलेला असतो..!

अश्या तऱ्हेनं माणसं बघायला लागलं की अनोळखी प्रत्येक तो माणूस आपल्याला ओळखीचा वाटू लागतो..!

मला आठवतं कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मी बऱ्याच रजिस्टरची लिखाणाला सुरुवात ही उलट दिशेनं केली होती.कारण कॉलेजमध्ये फारसे लिहायला लागत नाही,म्हणून मागील दहा-पाच पाने फाडून टाकले की आपल्याला नव्यानं रजिस्टर घ्यायची गरज नाही असा विचार त्यामागे होता.
मी माझी वही,रजिस्टर जीवापाड जपणारा होतो..!

पुढे कित्येक दिवस हेच रजिस्टरं बुकबाईंड करून मी वापरले.फायनल प्रॉजेक्टवेळी दिला जाणारा प्रॉजेक्ट त्याची गोल्डन-सिल्व्हर बाईंडींग बघून विद्यार्थीदशेतला हा माझा शेवटचा प्रॉजेक्ट असेल म्हणून किती हायसं वाटलेलं..!

असो..!
असं विचार करत असतांना माझ्यासमोरून तीन वेळा सिटीबस निघून गेली अन् एकवेळा मला कुठं जायचं हेच मी विसरून गेलो.टापटीप व्यवस्थित असलेलं माझं राहणीमान बघून मला कित्येक लोकं भुलतात.लोकांना काय माहित एकावेळी दोन आयुष्य जगणारी ही माणसं वरवर जरी नॉर्मल असली तरी त्यांच्या मनात असंख्य विचार एकावेळी चालू असतात..!

काल परवा भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक मी त्याच चौकात फावल्यावेळेत वाचत बसलो होतो.येणारी जाणारी माणसं मला बघत होती,त्यांच्या त्या नजरा बघून दुसऱ्या क्षणाला माझा मार्ग मी बदलवला अन् सभोवताल न्याहाळू लागलो..!

भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेल्या मार्गावर चालायला हे शहर किंवा हे माणसे कधी शिकतील हा विचार मनात येऊन गेला.मी आता सिग्नल लागला म्हणून थांबलो होतो.मी पायी होतो मग मी का थांबलो म्हणून लोकं मला बघत होती,काही क्षणांनी सिग्नल बंद झाला,गाड्या सुटल्या अन् मला बालकवी यांची आठवण येऊन गेली...!

बऱ्याच दिवसांच्या सहवासानंतर आता शहर ओळखीचं वाटू लागलं आहे.अनेक शहरातल्या लोकांनी गावाकडे असतांना शहराला आला की भेटू म्हणून सांगितलं होतं पण या भेटीसाठी मला करावी लागणारी बेरीज,वजाबाकी यांची गणितं अजुन जुळले नाही म्हणून मी अजुन तरी भेटी टाळतो आहे..!

काल परवा सायंकाळच्या उन्हात असाच शहराला आला की भेट असं खूप दिवसांपूर्वी सांगून ठेवलेला मित्र दिसला.मी सिग्नल बघत होतो,त्यानं मला बघितलं अन् ओळख दिली मी ओळख न देऊन काय करणार होतो.
बोलणं झालं,गप्पा झाल्या अनेक विषयांना घेऊन मला काय वाटतं हे त्यानं जाणून घेतलं.शेवटी एक वेळेला वाटून गेलं की तो माझा इंटर्विव घेतो आहे की काय इतके सर्व प्रश्न त्याने मला केले..!

नंतर वेळ झाली या वेळेत सहा वेळेस सिग्नल लाल होवून हिरवा झाला होता,तो निघून गेला अन् मी पुन्हा आता माझी आजची गणितं जुळवत बसलो होतो..!

जगण्याला घेऊन खूप विचार करायला लागलं की अश्या गोष्टी आपल्यासोबत घडत जातात अन् आपण शून्यात विचार करायला लागतो.
रस्ते,सिग्नल,माणसं,अनोळखी माणसं,वाहने,मित्र,मैत्रिणी,कैफात रममाण असलेला मी,झाडाची सावली,रजिस्टर,पुस्तकं,१८९ पान नंबर शेवटून तिसरी ओळ अन् बरच काही..!

Written by
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड