मुख्य सामग्रीवर वगळा

मुसाफिर - संगतीने प्रवास

मुसाफिर - संगतीने प्रवास

काल सायंकाळी मिळालेलं एक सुंदर सरप्राईज..!

Patni,Syntel,L&T,Infotech,Apar,Disha अश्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असतांना ज्यांचा जगभराच्या अनेक कंपन्यांमध्ये पट वाढीसाठी सक्रिय हातभार होता.

Soft Excel Consultancy Services या कंपनीचे असलेले ते मॅनेजिंग डायरेक्टर.सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत,इंग्लंड आणि अमेरिका,जपान येथील जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत त्यांना ३२ वर्षांचा अनुभव आणि कामानिमित्त जगभरात १६० वेळा त्यांनी केलेला प्रवास..!

त्यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात केलेलं लेखन-स्तंभलेखन. "बोर्डरूम","नादवेध" "मुसाफिर","अर्थात" आणि 'किमयागार' ही आणि इतर बरीच त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके.विज्ञानाइतकीच ज्यांना तत्त्वज्ञान,भारतीय संगीत,इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे..!

टाटा मॅग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी संगणकावरची Oprating Systems,Data Communication & Networks,Web Technologies आणि Dimistifaing Computers या प्रत्येकी ५००-७०० पानी चार पाठ्यपुस्तकांचे लेखन.या पुस्तकांचे चिनीसकट जगातील अनेक भाषांत झालेला अनुवाद.आज जगभरात महाविद्यालयात या पुस्तकांना टेक्स्टबुक म्हणून मिळालेला मान..!
हे सर्व मी सांगतो आहे,
अलीकडे एक साध्या गोष्टीवर खूप विचार केला की आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला ई-मेल करतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला पुन्हा एकदा फोन करावा लागतो की मी ई-मेल पाठवला आहे तुम्ही बघून घ्या..!

तर "अच्युत गोडबोले" सरांचे मुसाफिर वाचून झाले आणि मनाशी ठरल्याप्रमाणे मला पुस्तक कसे वाटले यासाठीचा अभिप्राय म्हणून सरांना मी ई-मेल केला.मलाही खात्री होती की सर दोन-तीन दिवसांत आपल्या ई-मेलला उत्तर देतील.कारण त्यांनी अनेक वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात केलेलं काम अन् शिस्तप्रिय असणं,नियमबद्ध राहण्याची त्यांना लागलेली सवय..!

अखेर काल सायंकाळी सरांचा मला ई-मेल आला,माझ्यासाठी हे खूप भारी फिलिंग होते.मी दिलेला अभिप्राय सरांना इतका आवडला की सरांनी माझ्याशी बोलण्याची अन् पुढे भेटण्याचीसुद्धा इच्छा व्यक्त केली..!

आज काही वेळापूर्वी सरांशी कॉलवर बोलणं झालं.दिवसभर विचार करत होतो साहित्य क्षेत्रात,कॉर्पोरेट क्षेत्रात इतका अनुभव असलेल्या व्यक्तीशी आपण काय बोलाव.त्यात मी खूप कमी बोलणारा,त्यामुळं धाकधूक होती की सर माझ्यासारखेच कमी बोलणारे असेल तर काय होईल,अखेर फोन केला..!

अन् मग शिक्षण,करिअर,माझ्या क्षेत्रात असलेल्या संधी याबद्दल सर भरघोस बोलले,पुढे लवकरच सर त्यांचे पुस्तकही पाठवणार असेही म्हंटले.हे ऐकुन भारी वाटले कारण एका लेखकाचे पुस्तक त्याने आपल्याला अभिप्रायार्थ भेट द्यावे या पेक्षा एका वाचकाला अजून काय हवं असते.त्यांचे पुस्तकं कोण-कोणत्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे,स्वस्तात कसे मिळतील हे सर्व त्यांनी मला सांगितले 

त्यानंतर..!
सरांना जेव्हा मी सांगितले की मी औरंगाबाद येथील आहे तेव्हा सर म्हंटले मी तर कालच औरंगाबाद येथे होतो.तेव्हा सरांना भेटण्याची एक संधी आपण गमावली असं वाटून गेलं पण पुढे सर हे ही म्हंटले की आता कायम एकमेकांशी कनेक्ट राहू..!

पुढे औपचारिक गप्पा झाल्या अन् फोन ठेवल्या गेला,हे सर्व खूप भारी आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड