मुख्य सामग्रीवर वगळा

मुसाफिर - संगतीने प्रवास

मुसाफिर - संगतीने प्रवास

काल सायंकाळी मिळालेलं एक सुंदर सरप्राईज..!

Patni,Syntel,L&T,Infotech,Apar,Disha अश्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असतांना ज्यांचा जगभराच्या अनेक कंपन्यांमध्ये पट वाढीसाठी सक्रिय हातभार होता.

Soft Excel Consultancy Services या कंपनीचे असलेले ते मॅनेजिंग डायरेक्टर.सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत,इंग्लंड आणि अमेरिका,जपान येथील जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत त्यांना ३२ वर्षांचा अनुभव आणि कामानिमित्त जगभरात १६० वेळा त्यांनी केलेला प्रवास..!

त्यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात केलेलं लेखन-स्तंभलेखन. "बोर्डरूम","नादवेध" "मुसाफिर","अर्थात" आणि 'किमयागार' ही आणि इतर बरीच त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके.विज्ञानाइतकीच ज्यांना तत्त्वज्ञान,भारतीय संगीत,इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे..!

टाटा मॅग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी संगणकावरची Oprating Systems,Data Communication & Networks,Web Technologies आणि Dimistifaing Computers या प्रत्येकी ५००-७०० पानी चार पाठ्यपुस्तकांचे लेखन.या पुस्तकांचे चिनीसकट जगातील अनेक भाषांत झालेला अनुवाद.आज जगभरात महाविद्यालयात या पुस्तकांना टेक्स्टबुक म्हणून मिळालेला मान..!
हे सर्व मी सांगतो आहे,
अलीकडे एक साध्या गोष्टीवर खूप विचार केला की आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला ई-मेल करतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला पुन्हा एकदा फोन करावा लागतो की मी ई-मेल पाठवला आहे तुम्ही बघून घ्या..!

तर "अच्युत गोडबोले" सरांचे मुसाफिर वाचून झाले आणि मनाशी ठरल्याप्रमाणे मला पुस्तक कसे वाटले यासाठीचा अभिप्राय म्हणून सरांना मी ई-मेल केला.मलाही खात्री होती की सर दोन-तीन दिवसांत आपल्या ई-मेलला उत्तर देतील.कारण त्यांनी अनेक वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात केलेलं काम अन् शिस्तप्रिय असणं,नियमबद्ध राहण्याची त्यांना लागलेली सवय..!

अखेर काल सायंकाळी सरांचा मला ई-मेल आला,माझ्यासाठी हे खूप भारी फिलिंग होते.मी दिलेला अभिप्राय सरांना इतका आवडला की सरांनी माझ्याशी बोलण्याची अन् पुढे भेटण्याचीसुद्धा इच्छा व्यक्त केली..!

आज काही वेळापूर्वी सरांशी कॉलवर बोलणं झालं.दिवसभर विचार करत होतो साहित्य क्षेत्रात,कॉर्पोरेट क्षेत्रात इतका अनुभव असलेल्या व्यक्तीशी आपण काय बोलाव.त्यात मी खूप कमी बोलणारा,त्यामुळं धाकधूक होती की सर माझ्यासारखेच कमी बोलणारे असेल तर काय होईल,अखेर फोन केला..!

अन् मग शिक्षण,करिअर,माझ्या क्षेत्रात असलेल्या संधी याबद्दल सर भरघोस बोलले,पुढे लवकरच सर त्यांचे पुस्तकही पाठवणार असेही म्हंटले.हे ऐकुन भारी वाटले कारण एका लेखकाचे पुस्तक त्याने आपल्याला अभिप्रायार्थ भेट द्यावे या पेक्षा एका वाचकाला अजून काय हवं असते.त्यांचे पुस्तकं कोण-कोणत्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे,स्वस्तात कसे मिळतील हे सर्व त्यांनी मला सांगितले 

त्यानंतर..!
सरांना जेव्हा मी सांगितले की मी औरंगाबाद येथील आहे तेव्हा सर म्हंटले मी तर कालच औरंगाबाद येथे होतो.तेव्हा सरांना भेटण्याची एक संधी आपण गमावली असं वाटून गेलं पण पुढे सर हे ही म्हंटले की आता कायम एकमेकांशी कनेक्ट राहू..!

पुढे औपचारिक गप्पा झाल्या अन् फोन ठेवल्या गेला,हे सर्व खूप भारी आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...