मुख्य सामग्रीवर वगळा

मुसाफिर - संगतीने प्रवास

मुसाफिर - संगतीने प्रवास

काल सायंकाळी मिळालेलं एक सुंदर सरप्राईज..!

Patni,Syntel,L&T,Infotech,Apar,Disha अश्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असतांना ज्यांचा जगभराच्या अनेक कंपन्यांमध्ये पट वाढीसाठी सक्रिय हातभार होता.

Soft Excel Consultancy Services या कंपनीचे असलेले ते मॅनेजिंग डायरेक्टर.सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत,इंग्लंड आणि अमेरिका,जपान येथील जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत त्यांना ३२ वर्षांचा अनुभव आणि कामानिमित्त जगभरात १६० वेळा त्यांनी केलेला प्रवास..!

त्यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात केलेलं लेखन-स्तंभलेखन. "बोर्डरूम","नादवेध" "मुसाफिर","अर्थात" आणि 'किमयागार' ही आणि इतर बरीच त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके.विज्ञानाइतकीच ज्यांना तत्त्वज्ञान,भारतीय संगीत,इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे..!

टाटा मॅग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी संगणकावरची Oprating Systems,Data Communication & Networks,Web Technologies आणि Dimistifaing Computers या प्रत्येकी ५००-७०० पानी चार पाठ्यपुस्तकांचे लेखन.या पुस्तकांचे चिनीसकट जगातील अनेक भाषांत झालेला अनुवाद.आज जगभरात महाविद्यालयात या पुस्तकांना टेक्स्टबुक म्हणून मिळालेला मान..!
हे सर्व मी सांगतो आहे,
अलीकडे एक साध्या गोष्टीवर खूप विचार केला की आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला ई-मेल करतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला पुन्हा एकदा फोन करावा लागतो की मी ई-मेल पाठवला आहे तुम्ही बघून घ्या..!

तर "अच्युत गोडबोले" सरांचे मुसाफिर वाचून झाले आणि मनाशी ठरल्याप्रमाणे मला पुस्तक कसे वाटले यासाठीचा अभिप्राय म्हणून सरांना मी ई-मेल केला.मलाही खात्री होती की सर दोन-तीन दिवसांत आपल्या ई-मेलला उत्तर देतील.कारण त्यांनी अनेक वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात केलेलं काम अन् शिस्तप्रिय असणं,नियमबद्ध राहण्याची त्यांना लागलेली सवय..!

अखेर काल सायंकाळी सरांचा मला ई-मेल आला,माझ्यासाठी हे खूप भारी फिलिंग होते.मी दिलेला अभिप्राय सरांना इतका आवडला की सरांनी माझ्याशी बोलण्याची अन् पुढे भेटण्याचीसुद्धा इच्छा व्यक्त केली..!

आज काही वेळापूर्वी सरांशी कॉलवर बोलणं झालं.दिवसभर विचार करत होतो साहित्य क्षेत्रात,कॉर्पोरेट क्षेत्रात इतका अनुभव असलेल्या व्यक्तीशी आपण काय बोलाव.त्यात मी खूप कमी बोलणारा,त्यामुळं धाकधूक होती की सर माझ्यासारखेच कमी बोलणारे असेल तर काय होईल,अखेर फोन केला..!

अन् मग शिक्षण,करिअर,माझ्या क्षेत्रात असलेल्या संधी याबद्दल सर भरघोस बोलले,पुढे लवकरच सर त्यांचे पुस्तकही पाठवणार असेही म्हंटले.हे ऐकुन भारी वाटले कारण एका लेखकाचे पुस्तक त्याने आपल्याला अभिप्रायार्थ भेट द्यावे या पेक्षा एका वाचकाला अजून काय हवं असते.त्यांचे पुस्तकं कोण-कोणत्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे,स्वस्तात कसे मिळतील हे सर्व त्यांनी मला सांगितले 

त्यानंतर..!
सरांना जेव्हा मी सांगितले की मी औरंगाबाद येथील आहे तेव्हा सर म्हंटले मी तर कालच औरंगाबाद येथे होतो.तेव्हा सरांना भेटण्याची एक संधी आपण गमावली असं वाटून गेलं पण पुढे सर हे ही म्हंटले की आता कायम एकमेकांशी कनेक्ट राहू..!

पुढे औपचारिक गप्पा झाल्या अन् फोन ठेवल्या गेला,हे सर्व खूप भारी आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...