मुख्य सामग्रीवर वगळा

पुस्तकाच्या कथा..!

पुस्तकाच्या कथा..!

कितीवेळ झाला खिडकीत बसून आहे.सकाळ दुपारच्या वेळेकडे ढळायला लागली की खिडकीत बसून बाहेरचं जग न्याहाळत रहायला आवडतं.अनोळखी माणसांत ओळखीची माणसं दिसू लागतात,घरात विस्कटलेली सर्वच पुस्तकं कित्येक दिवस तशीच पडून आहे.त्यांना आवरायला घ्यावं तर दिवस मावळतीला जातो..!

पुस्तकांच्या सहवासात जगणं आहे,त्यामुळं कॉटवर एखाद-दोन पुस्तकं अर्धवट वाचून गेली कित्येक दिवस सोडून दिली,जी तशीच पडून आहे.एक ६७ तर एक १८३ पान नंबर वर वाचायचं चालू आहे..!

काही लेखक मला भयंकर नकोसे वाटतात.मुळात त्यांनी पुस्तके फक्त प्रसिद्धीसाठी काढले की फक्त पैसा आहे अन् तो मार्गी लागेल म्हणून काढली.हे कोडं मला गेली काही दिवस सुटत नाहीये..!

काही महिन्यांपूर्वी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला भेट म्हणून एका विदेशातील मित्राने मला एक मराठी पुस्तक पाठवलं.त्याला माहित आहे मला इंग्रजी भाषेत काहीही एक कळत नाही म्हणून त्यानं मला ते मराठी पुस्तक पाठवलं असावं..!

मला वाटलं होतं तो इंग्रजी पुस्तक पाठवेल अन् मी तोडकंमोडकं का होईना समजून घेत ते वाचेल.काही दोन-चार दिवसांपूर्वी स्पष्टच झाले की मी फक्त अनुवादित पुस्तके वाचू शकतो.हे स्पष्ट झाले तेव्हा मी पुस्तक वाचत नव्हतो तो दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता.
आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात ही जाणीव होणं महाभयंकर वाईट्ट आहे..!

असो मित्राने जे पुस्तक पाठवलं ते अजुन पार्सल बंद आहे.लवकरच ते वाचून त्याला कळवायचे आहे,कदाचित माझा पुढचा वाढदिवस येऊन जाईल तोवर.तो त्याच्या आयुष्यात खूप व्यस्थ असल्यानं त्याला याचा विसर पडला असावा,मला वाचून त्याला सांगायला हवं आहे..!

काल-परवा आठ दिवसांनी घराबाहेर पडलो.तेव्हा दोन तास मी फक्त रस्त्यावर जुन्या पुस्तकांचा स्टॉल असलेल्या ठिकाणी जावून पुस्तकं न्याहाळत बसलो होतो.दोन पुस्तकं पसंतीस पडले पण खिश्यात पैसेच नव्हते,मग मनातच हसलो अन् मनाला म्हंटले जुने पुस्तकं खूप आहेत ते वाचून घेऊ,मग हे पुस्तकं घेऊ.
तोवर मला नाही वाटत की ते इथे विक्रीला उपलब्ध राहतील..!

माझ्या चेहऱ्यावरील उधारीचे भाव ओळखून सत्तरीतले उस्मान चाचा म्हंटले की,

पसंद है तो लेके चले जाओ यह कीताबे,हिसाब का बाद में लेख लेंगे..!
उन्हे दिलसे चाहनेवाला मिल जायेंगा,और धूल-मिट्टी में समीटी हुई यह किताबें प्यार करनेवालोंके घर मे चली जायेंगी..! नहीं तो एक दिन कबाड में रेहकरही सड जायेंगी,नहीं तो रद्दी मे चली जायेंगी..!

मी मानेनं नको म्हणत तिथून निघालो,त्यानं पुढचं वाक्य बोलून दाखवलं,
यंह कीताबे बेचनेवाले और कीताबे लेकर पडनेवाले दोनो पैसोंसे नंगे होते हैं..!
यह जमानेसे चलता आ रहा है,लेकीन दोनो पैसोंको लेकर (व्यवहार) ईमानी होते हैं और दिल के नेकदील इंन्सान होते है..!

मी आवरते घेत निघणार तितक्यात त्यांनी त्यांची बसायची लोखंडी खुर्ची मला दिली.जवळच असलेल्या चहावाल्या अली भाईला दोन चहा सांगितल्या.
चहा आलला,चहा घेतला. उस्मान चाच्याने निघायच्यावेळी बळजबरी मला हवी ती दोन पुस्तकं अन् एक त्यांच्याकडून भेट म्हणून अशी तीन पुस्तकं मला देऊ केली..!

मी माझ्या बॅगेत ते ठेवले आणि पैसे आठ दिवसांनी देईल म्हणत निघालो ते थेट घरी येऊन थांबलो.प्रश्न खूप होते,सत्तरीचे उस्मान चाचा फक्त पुस्तकं विकत नव्हते तर पुस्तकं जगत होते..!

आता हातात पुस्तक घेऊन बसलो पण आयुष्याची काही गणितं छळता आहे.त्यामुळे पुस्तक वाचनात मन लागत नाहीये,खिडकीतून बाहेरचं जग बघत बसलो आहे.मित्रानं पाठवलेलं पुस्तक वाचून त्याला सांगायचं आहे कसं वाटलं ते पुस्तक..!

कदाचित त्याला ते ऐकायचंही नसेल,कारण त्यानंतर कित्येकवेळा कॉलवर बोललो आम्ही पण पुस्तकाचा विषय काही त्यानं काढला नाही की मी वाचले नाही म्हणून मी ही नाही..!

त्यानं हजारो किमी दूर परदेशातून मला जर पुस्तक पाठवलं असेल तर ते कसे आहे,कसे वाटले हे त्याला सांगायला हवं आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड