मुख्य सामग्रीवर वगळा

पुस्तकाच्या कथा..!

पुस्तकाच्या कथा..!

कितीवेळ झाला खिडकीत बसून आहे.सकाळ दुपारच्या वेळेकडे ढळायला लागली की खिडकीत बसून बाहेरचं जग न्याहाळत रहायला आवडतं.अनोळखी माणसांत ओळखीची माणसं दिसू लागतात,घरात विस्कटलेली सर्वच पुस्तकं कित्येक दिवस तशीच पडून आहे.त्यांना आवरायला घ्यावं तर दिवस मावळतीला जातो..!

पुस्तकांच्या सहवासात जगणं आहे,त्यामुळं कॉटवर एखाद-दोन पुस्तकं अर्धवट वाचून गेली कित्येक दिवस सोडून दिली,जी तशीच पडून आहे.एक ६७ तर एक १८३ पान नंबर वर वाचायचं चालू आहे..!

काही लेखक मला भयंकर नकोसे वाटतात.मुळात त्यांनी पुस्तके फक्त प्रसिद्धीसाठी काढले की फक्त पैसा आहे अन् तो मार्गी लागेल म्हणून काढली.हे कोडं मला गेली काही दिवस सुटत नाहीये..!

काही महिन्यांपूर्वी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला भेट म्हणून एका विदेशातील मित्राने मला एक मराठी पुस्तक पाठवलं.त्याला माहित आहे मला इंग्रजी भाषेत काहीही एक कळत नाही म्हणून त्यानं मला ते मराठी पुस्तक पाठवलं असावं..!

मला वाटलं होतं तो इंग्रजी पुस्तक पाठवेल अन् मी तोडकंमोडकं का होईना समजून घेत ते वाचेल.काही दोन-चार दिवसांपूर्वी स्पष्टच झाले की मी फक्त अनुवादित पुस्तके वाचू शकतो.हे स्पष्ट झाले तेव्हा मी पुस्तक वाचत नव्हतो तो दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता.
आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात ही जाणीव होणं महाभयंकर वाईट्ट आहे..!

असो मित्राने जे पुस्तक पाठवलं ते अजुन पार्सल बंद आहे.लवकरच ते वाचून त्याला कळवायचे आहे,कदाचित माझा पुढचा वाढदिवस येऊन जाईल तोवर.तो त्याच्या आयुष्यात खूप व्यस्थ असल्यानं त्याला याचा विसर पडला असावा,मला वाचून त्याला सांगायला हवं आहे..!

काल-परवा आठ दिवसांनी घराबाहेर पडलो.तेव्हा दोन तास मी फक्त रस्त्यावर जुन्या पुस्तकांचा स्टॉल असलेल्या ठिकाणी जावून पुस्तकं न्याहाळत बसलो होतो.दोन पुस्तकं पसंतीस पडले पण खिश्यात पैसेच नव्हते,मग मनातच हसलो अन् मनाला म्हंटले जुने पुस्तकं खूप आहेत ते वाचून घेऊ,मग हे पुस्तकं घेऊ.
तोवर मला नाही वाटत की ते इथे विक्रीला उपलब्ध राहतील..!

माझ्या चेहऱ्यावरील उधारीचे भाव ओळखून सत्तरीतले उस्मान चाचा म्हंटले की,

पसंद है तो लेके चले जाओ यह कीताबे,हिसाब का बाद में लेख लेंगे..!
उन्हे दिलसे चाहनेवाला मिल जायेंगा,और धूल-मिट्टी में समीटी हुई यह किताबें प्यार करनेवालोंके घर मे चली जायेंगी..! नहीं तो एक दिन कबाड में रेहकरही सड जायेंगी,नहीं तो रद्दी मे चली जायेंगी..!

मी मानेनं नको म्हणत तिथून निघालो,त्यानं पुढचं वाक्य बोलून दाखवलं,
यंह कीताबे बेचनेवाले और कीताबे लेकर पडनेवाले दोनो पैसोंसे नंगे होते हैं..!
यह जमानेसे चलता आ रहा है,लेकीन दोनो पैसोंको लेकर (व्यवहार) ईमानी होते हैं और दिल के नेकदील इंन्सान होते है..!

मी आवरते घेत निघणार तितक्यात त्यांनी त्यांची बसायची लोखंडी खुर्ची मला दिली.जवळच असलेल्या चहावाल्या अली भाईला दोन चहा सांगितल्या.
चहा आलला,चहा घेतला. उस्मान चाच्याने निघायच्यावेळी बळजबरी मला हवी ती दोन पुस्तकं अन् एक त्यांच्याकडून भेट म्हणून अशी तीन पुस्तकं मला देऊ केली..!

मी माझ्या बॅगेत ते ठेवले आणि पैसे आठ दिवसांनी देईल म्हणत निघालो ते थेट घरी येऊन थांबलो.प्रश्न खूप होते,सत्तरीचे उस्मान चाचा फक्त पुस्तकं विकत नव्हते तर पुस्तकं जगत होते..!

आता हातात पुस्तक घेऊन बसलो पण आयुष्याची काही गणितं छळता आहे.त्यामुळे पुस्तक वाचनात मन लागत नाहीये,खिडकीतून बाहेरचं जग बघत बसलो आहे.मित्रानं पाठवलेलं पुस्तक वाचून त्याला सांगायचं आहे कसं वाटलं ते पुस्तक..!

कदाचित त्याला ते ऐकायचंही नसेल,कारण त्यानंतर कित्येकवेळा कॉलवर बोललो आम्ही पण पुस्तकाचा विषय काही त्यानं काढला नाही की मी वाचले नाही म्हणून मी ही नाही..!

त्यानं हजारो किमी दूर परदेशातून मला जर पुस्तक पाठवलं असेल तर ते कसे आहे,कसे वाटले हे त्याला सांगायला हवं आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...