मुख्य सामग्रीवर वगळा

पुस्तकाच्या कथा..!

पुस्तकाच्या कथा..!

कितीवेळ झाला खिडकीत बसून आहे.सकाळ दुपारच्या वेळेकडे ढळायला लागली की खिडकीत बसून बाहेरचं जग न्याहाळत रहायला आवडतं.अनोळखी माणसांत ओळखीची माणसं दिसू लागतात,घरात विस्कटलेली सर्वच पुस्तकं कित्येक दिवस तशीच पडून आहे.त्यांना आवरायला घ्यावं तर दिवस मावळतीला जातो..!

पुस्तकांच्या सहवासात जगणं आहे,त्यामुळं कॉटवर एखाद-दोन पुस्तकं अर्धवट वाचून गेली कित्येक दिवस सोडून दिली,जी तशीच पडून आहे.एक ६७ तर एक १८३ पान नंबर वर वाचायचं चालू आहे..!

काही लेखक मला भयंकर नकोसे वाटतात.मुळात त्यांनी पुस्तके फक्त प्रसिद्धीसाठी काढले की फक्त पैसा आहे अन् तो मार्गी लागेल म्हणून काढली.हे कोडं मला गेली काही दिवस सुटत नाहीये..!

काही महिन्यांपूर्वी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला भेट म्हणून एका विदेशातील मित्राने मला एक मराठी पुस्तक पाठवलं.त्याला माहित आहे मला इंग्रजी भाषेत काहीही एक कळत नाही म्हणून त्यानं मला ते मराठी पुस्तक पाठवलं असावं..!

मला वाटलं होतं तो इंग्रजी पुस्तक पाठवेल अन् मी तोडकंमोडकं का होईना समजून घेत ते वाचेल.काही दोन-चार दिवसांपूर्वी स्पष्टच झाले की मी फक्त अनुवादित पुस्तके वाचू शकतो.हे स्पष्ट झाले तेव्हा मी पुस्तक वाचत नव्हतो तो दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता.
आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात ही जाणीव होणं महाभयंकर वाईट्ट आहे..!

असो मित्राने जे पुस्तक पाठवलं ते अजुन पार्सल बंद आहे.लवकरच ते वाचून त्याला कळवायचे आहे,कदाचित माझा पुढचा वाढदिवस येऊन जाईल तोवर.तो त्याच्या आयुष्यात खूप व्यस्थ असल्यानं त्याला याचा विसर पडला असावा,मला वाचून त्याला सांगायला हवं आहे..!

काल-परवा आठ दिवसांनी घराबाहेर पडलो.तेव्हा दोन तास मी फक्त रस्त्यावर जुन्या पुस्तकांचा स्टॉल असलेल्या ठिकाणी जावून पुस्तकं न्याहाळत बसलो होतो.दोन पुस्तकं पसंतीस पडले पण खिश्यात पैसेच नव्हते,मग मनातच हसलो अन् मनाला म्हंटले जुने पुस्तकं खूप आहेत ते वाचून घेऊ,मग हे पुस्तकं घेऊ.
तोवर मला नाही वाटत की ते इथे विक्रीला उपलब्ध राहतील..!

माझ्या चेहऱ्यावरील उधारीचे भाव ओळखून सत्तरीतले उस्मान चाचा म्हंटले की,

पसंद है तो लेके चले जाओ यह कीताबे,हिसाब का बाद में लेख लेंगे..!
उन्हे दिलसे चाहनेवाला मिल जायेंगा,और धूल-मिट्टी में समीटी हुई यह किताबें प्यार करनेवालोंके घर मे चली जायेंगी..! नहीं तो एक दिन कबाड में रेहकरही सड जायेंगी,नहीं तो रद्दी मे चली जायेंगी..!

मी मानेनं नको म्हणत तिथून निघालो,त्यानं पुढचं वाक्य बोलून दाखवलं,
यंह कीताबे बेचनेवाले और कीताबे लेकर पडनेवाले दोनो पैसोंसे नंगे होते हैं..!
यह जमानेसे चलता आ रहा है,लेकीन दोनो पैसोंको लेकर (व्यवहार) ईमानी होते हैं और दिल के नेकदील इंन्सान होते है..!

मी आवरते घेत निघणार तितक्यात त्यांनी त्यांची बसायची लोखंडी खुर्ची मला दिली.जवळच असलेल्या चहावाल्या अली भाईला दोन चहा सांगितल्या.
चहा आलला,चहा घेतला. उस्मान चाच्याने निघायच्यावेळी बळजबरी मला हवी ती दोन पुस्तकं अन् एक त्यांच्याकडून भेट म्हणून अशी तीन पुस्तकं मला देऊ केली..!

मी माझ्या बॅगेत ते ठेवले आणि पैसे आठ दिवसांनी देईल म्हणत निघालो ते थेट घरी येऊन थांबलो.प्रश्न खूप होते,सत्तरीचे उस्मान चाचा फक्त पुस्तकं विकत नव्हते तर पुस्तकं जगत होते..!

आता हातात पुस्तक घेऊन बसलो पण आयुष्याची काही गणितं छळता आहे.त्यामुळे पुस्तक वाचनात मन लागत नाहीये,खिडकीतून बाहेरचं जग बघत बसलो आहे.मित्रानं पाठवलेलं पुस्तक वाचून त्याला सांगायचं आहे कसं वाटलं ते पुस्तक..!

कदाचित त्याला ते ऐकायचंही नसेल,कारण त्यानंतर कित्येकवेळा कॉलवर बोललो आम्ही पण पुस्तकाचा विषय काही त्यानं काढला नाही की मी वाचले नाही म्हणून मी ही नाही..!

त्यानं हजारो किमी दूर परदेशातून मला जर पुस्तक पाठवलं असेल तर ते कसे आहे,कसे वाटले हे त्याला सांगायला हवं आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...