मुख्य सामग्रीवर वगळा

एमआयडीसी डायरी..!

एमआयडीसी डायरी..!


भर दुपारच्या उन्हात दीडच्या सुमारास हॉस्टेलरुमच्या खोलीत सेकंड शिफ्टसाठी कंपनीत जायची तयारी होत असते.अंगात त्राण नसतो,घामाचे ओघळ चेहऱ्यावर येत असतात त्यांना सावरत फ्रेश होवून कंपनीचा युनिफॉर्म घातला जातो.तो घातल्यावर आरश्यात बघितले की काळजाची धडधड वाढते,मग पुन्हा खूप जीवावर करत तो दीड किलो वजनाचा सेफ्टी बूट घालून त्याच्या लेसशी बराचवेळ खेळून झालं की पुन्हा एकदा आरश्यात बघून स्वतःला नीटनेटके आवरले आहे का हे बघून हॉस्टेल मधून निघतो.एरवी दोन वाजलेले असता,कंपनीत एक टाईम नाश्ता,जेवणाची सोय असल्यानं तेव्हढे टेन्शन कमी होते..!

एमआयडीसी परिसरातच हॉस्टेल असल्यानं पायीच कंपनीत जातो,या वीस मिनिटाच्या प्रवासात आयुष्याला घेऊन किती प्रश्न मी स्वतःला करतो याची गिणती नाही.डांबरी रस्त्याची वाट असल्यानं,रस्त्यावरील डांबर डोक्यातून येणाऱ्या घामाप्रमाणे त्याचे ओघळ सोडवत चमकत असतं,त्याचं हे चमकणेही जीवाला नकोसे वाटते,जीव घाबरा होतो.

रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी बेसुमार वाढलेलं कांग्रेजाचे जंगल त्याचा येणारा वास.तीस-चाळीस सेकंदाला माझ्यासारख्या एखाद्या मुलाची जुनी झालेली पण Condition मध्ये असलेली गाडी माझ्या जवळून हळुवार जाते.यांचं आयुष्य किंवा आयुष्यातील एक दशक तरी या कंपन्यामध्ये गेलेलं असतं म्हणून कुठलाही उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या गाडी चालवण्यात दिसत नाही.कुणी पल्सर,करिझमा,सी.बी.झेड,नवीन डिलक्स घेऊन जातांना दिसतो यातले सर्वच नवखे असतात जोराने गाडी दामटवत जातात..!

माझ्यासारखे पैसा वाचवायचा हेतू डोळ्यासमोर ठेवून येणारे मुलं अशीच रस्ते न्याहाळीत आयुष्याचा अन् दीड किलो असलेल्या सेफ्टी बुटाचा भार सोसत पायी चालत असतात.त्यात प्रत्येकाचं वेगळं विश्व असतं,जो तो ज्याच्या त्याच्या विश्वात रममाण असतो.तो चालत असतो रस्त्याच्या एका अंगाला,पुन्हा यात एमआयडीसीमध्ये मंदीच्या सावटाखाली येऊन बंद पडलेल्या कंपन्यांची वेगळी कथा असते.त्यांचे सांगाडे बघितले,त्यांच्या भिंती वर्षानुवर्ष पडीक राहून भिंतीवर उतरलेले जाळे कधी बघितले तर एखादा संवेदनशील मनाच्या माणसाला वेड लागेल इतकं भयाण,नकोसे वाटणारं हे त्या बंद पडलेल्या कंपन्यांचे विश्व अन् तो परिसर असतो..!

मी ही त्या बंद पडलेल्या कंपन्यांना रोज न्याहाळत माझ्या कंपनीची वाट जवळ करत असतो,कधीतरी मंदीच्या विळख्यात माझी कंपनी सापडून तिची घरघर कायमची बंद झाली तर कमीतकमी सहाशे कामगारांच्या आयुष्याची राखरांगोळी होईल या विचाराने वेड लागते..!

असे काहीबाही विचार करत मी चालत असतो,एरवी विन केलेला ड्रेस कधीच विनीच्या बाहेर येऊन डोकाऊ लागत असते.ढील्ला झालेला बेल्ट अन् खाली सरकनारी प्यांट चालू चालुमध्ये सावरत पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आणली जाते.असं दिवसभर कामाच्या वेळात हे असं कित्येकदा होत असते,कारण या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या निर्व्यसनी पोरांना कंबर असते की नाही माहीत नाही इतके ते बारीक झालेले असतात,व्यसनी पोरांचे अजून अलग विश्व आहे त्यांना कुठलेही सोयरसुतक नसते ते कधीतरी सांगेन..!

दुसऱ्या कंपन्यांना न्याहाळत मी चालत असतो बऱ्यापैकी उंची असल्यानं कंपनीच्या आत काय चालू आहे सगळं डोळ्यांना दिसत असते.कुण्या एका कंपनीत सेकंड शिफ्टसाठी कंत्राटी पद्धतीने कामावर आलेल्या पोरांना नख,डोळे,केस चेक करतांना supervisor कडून झापने चालू आहे.तर कुठे शिक्षा म्हणून सर्व मुलांच्या रिंगणामध्ये घेऊन त्याच्यासाठी टाळ्या वाजवून त्याला लाज वाटावी अन् उद्या तो व्यवस्थित येईल म्हणून लज्जास्पद वागणूक दिली जात आहे..!
हे बरोबरच आहे एमआयडीसीमधील कंपन्यांत काम करायचे असेल तर आधी तुम्हाला डीसीप्लेन असायला हवं,वेळेचं महत्त्व असायला हवं नाहीतर तुम्हाला घरी जाण्यासाठी कंपनीच्या वाटा कायम उघड्या असतात..!

साडेतीन वाजता सुरू होणाऱ्या सेकंड शिफ्टच्या कामासाठी तुम्हाला अडीच वाजताच कंपनीच्या गेटवर राहावे लागते तेही सर्व नियमात बसून,नाहीतर पुन्हा हॉस्टेलवर जायचं अन् रात्री साडेदहा वाजता गेटवर येऊन उभे रहायचे..!

Security Cabin मध्ये तपासणी करून झाली की तुमची सेकंड शिफ्ट सुरू होते एकतर कंपनीच्या आत आल्यावरच तुमचे हातपाय गळून जातात,तळपायाला घाम येतो अन् तो सोक्समध्ये चालताना आपल्याला जाणवतो सुद्धा मग फर्स्ट क्लास नाश्ता करायचा येताना केलेले सर्व विचार कंपनीच्या गेट बाहेर सोडून मस्त कामाला सुरुवात करायची..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...