मुख्य सामग्रीवर वगळा

एमआयडीसी डायरी..!

एमआयडीसी डायरी..!


भर दुपारच्या उन्हात दीडच्या सुमारास हॉस्टेलरुमच्या खोलीत सेकंड शिफ्टसाठी कंपनीत जायची तयारी होत असते.अंगात त्राण नसतो,घामाचे ओघळ चेहऱ्यावर येत असतात त्यांना सावरत फ्रेश होवून कंपनीचा युनिफॉर्म घातला जातो.तो घातल्यावर आरश्यात बघितले की काळजाची धडधड वाढते,मग पुन्हा खूप जीवावर करत तो दीड किलो वजनाचा सेफ्टी बूट घालून त्याच्या लेसशी बराचवेळ खेळून झालं की पुन्हा एकदा आरश्यात बघून स्वतःला नीटनेटके आवरले आहे का हे बघून हॉस्टेल मधून निघतो.एरवी दोन वाजलेले असता,कंपनीत एक टाईम नाश्ता,जेवणाची सोय असल्यानं तेव्हढे टेन्शन कमी होते..!

एमआयडीसी परिसरातच हॉस्टेल असल्यानं पायीच कंपनीत जातो,या वीस मिनिटाच्या प्रवासात आयुष्याला घेऊन किती प्रश्न मी स्वतःला करतो याची गिणती नाही.डांबरी रस्त्याची वाट असल्यानं,रस्त्यावरील डांबर डोक्यातून येणाऱ्या घामाप्रमाणे त्याचे ओघळ सोडवत चमकत असतं,त्याचं हे चमकणेही जीवाला नकोसे वाटते,जीव घाबरा होतो.

रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी बेसुमार वाढलेलं कांग्रेजाचे जंगल त्याचा येणारा वास.तीस-चाळीस सेकंदाला माझ्यासारख्या एखाद्या मुलाची जुनी झालेली पण Condition मध्ये असलेली गाडी माझ्या जवळून हळुवार जाते.यांचं आयुष्य किंवा आयुष्यातील एक दशक तरी या कंपन्यामध्ये गेलेलं असतं म्हणून कुठलाही उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या गाडी चालवण्यात दिसत नाही.कुणी पल्सर,करिझमा,सी.बी.झेड,नवीन डिलक्स घेऊन जातांना दिसतो यातले सर्वच नवखे असतात जोराने गाडी दामटवत जातात..!

माझ्यासारखे पैसा वाचवायचा हेतू डोळ्यासमोर ठेवून येणारे मुलं अशीच रस्ते न्याहाळीत आयुष्याचा अन् दीड किलो असलेल्या सेफ्टी बुटाचा भार सोसत पायी चालत असतात.त्यात प्रत्येकाचं वेगळं विश्व असतं,जो तो ज्याच्या त्याच्या विश्वात रममाण असतो.तो चालत असतो रस्त्याच्या एका अंगाला,पुन्हा यात एमआयडीसीमध्ये मंदीच्या सावटाखाली येऊन बंद पडलेल्या कंपन्यांची वेगळी कथा असते.त्यांचे सांगाडे बघितले,त्यांच्या भिंती वर्षानुवर्ष पडीक राहून भिंतीवर उतरलेले जाळे कधी बघितले तर एखादा संवेदनशील मनाच्या माणसाला वेड लागेल इतकं भयाण,नकोसे वाटणारं हे त्या बंद पडलेल्या कंपन्यांचे विश्व अन् तो परिसर असतो..!

मी ही त्या बंद पडलेल्या कंपन्यांना रोज न्याहाळत माझ्या कंपनीची वाट जवळ करत असतो,कधीतरी मंदीच्या विळख्यात माझी कंपनी सापडून तिची घरघर कायमची बंद झाली तर कमीतकमी सहाशे कामगारांच्या आयुष्याची राखरांगोळी होईल या विचाराने वेड लागते..!

असे काहीबाही विचार करत मी चालत असतो,एरवी विन केलेला ड्रेस कधीच विनीच्या बाहेर येऊन डोकाऊ लागत असते.ढील्ला झालेला बेल्ट अन् खाली सरकनारी प्यांट चालू चालुमध्ये सावरत पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आणली जाते.असं दिवसभर कामाच्या वेळात हे असं कित्येकदा होत असते,कारण या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या निर्व्यसनी पोरांना कंबर असते की नाही माहीत नाही इतके ते बारीक झालेले असतात,व्यसनी पोरांचे अजून अलग विश्व आहे त्यांना कुठलेही सोयरसुतक नसते ते कधीतरी सांगेन..!

दुसऱ्या कंपन्यांना न्याहाळत मी चालत असतो बऱ्यापैकी उंची असल्यानं कंपनीच्या आत काय चालू आहे सगळं डोळ्यांना दिसत असते.कुण्या एका कंपनीत सेकंड शिफ्टसाठी कंत्राटी पद्धतीने कामावर आलेल्या पोरांना नख,डोळे,केस चेक करतांना supervisor कडून झापने चालू आहे.तर कुठे शिक्षा म्हणून सर्व मुलांच्या रिंगणामध्ये घेऊन त्याच्यासाठी टाळ्या वाजवून त्याला लाज वाटावी अन् उद्या तो व्यवस्थित येईल म्हणून लज्जास्पद वागणूक दिली जात आहे..!
हे बरोबरच आहे एमआयडीसीमधील कंपन्यांत काम करायचे असेल तर आधी तुम्हाला डीसीप्लेन असायला हवं,वेळेचं महत्त्व असायला हवं नाहीतर तुम्हाला घरी जाण्यासाठी कंपनीच्या वाटा कायम उघड्या असतात..!

साडेतीन वाजता सुरू होणाऱ्या सेकंड शिफ्टच्या कामासाठी तुम्हाला अडीच वाजताच कंपनीच्या गेटवर राहावे लागते तेही सर्व नियमात बसून,नाहीतर पुन्हा हॉस्टेलवर जायचं अन् रात्री साडेदहा वाजता गेटवर येऊन उभे रहायचे..!

Security Cabin मध्ये तपासणी करून झाली की तुमची सेकंड शिफ्ट सुरू होते एकतर कंपनीच्या आत आल्यावरच तुमचे हातपाय गळून जातात,तळपायाला घाम येतो अन् तो सोक्समध्ये चालताना आपल्याला जाणवतो सुद्धा मग फर्स्ट क्लास नाश्ता करायचा येताना केलेले सर्व विचार कंपनीच्या गेट बाहेर सोडून मस्त कामाला सुरुवात करायची..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड