मुख्य सामग्रीवर वगळा

"जननायक तंट्या भिल्ल" - "बाबा भांड".

"जननायक तंट्या भिल्ल" - "बाबा भांड".



"जननायक तंट्या भिल्ल" "बाबा भांड" लिखित हे १२७ पानांचे पुस्तक काल तीन तासात वाचून संपवले.खूप दिवसांची हे पुस्तक वाचण्याची इच्छा होती.
"लाल्या मांग" यांच्या स्मृतीस्थळाला काही दिवसांपूर्वी भेट दिली अन् त्यापूर्वी त्यांचे चरित्र मी वाचून होतोच,सोबतच अनेकवेळा ऐकूनही होतो की "लाल्या मांग" अन् "तंट्या भिल्ल" यांचे चरित्र अन् यांचे जीवन कुठेतरी एका सारख्याच कार्यासाठी त्यांनी वाहून घेतलेलं होतं..!

याचसाठी मलाही "तंट्या भिल्ल" यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती अन् काल या पुस्तकातून ती पूर्णत्वास आली.दोघांचा शेवट हृदयाला स्पर्शून अन् चटके लावून जाणारा असा आहे.

थोडक्यात पुस्तकाबद्दल अन् त्यांच्या आयुष्याबद्दल लिहण्याचा प्रयत्न करतो आहे.

तंट्या भिल्ल हा अठराशेच्या शतकातील आदिवासी नायक तो स्वभावाने खूप साधा- भोळा अन् मेहनती होता.त्याची वडिलोपार्जित जमीन कर्जापोटी पाटलाने बळकविली अन् पुढे कर्ज फेडू इच्छिणाऱ्या तंट्यास खोट्या गुन्ह्यात अडकवले,ज्यात तंट्यास एक वर्षाची शिक्षा झाली..!

शिक्षा भोगून आलेला तंट्या मोलमजुरी करू लागला परंतु पुन्हा गावकऱ्यांनी पाटलाच्या मुलीच्या प्रेम संबंधाचा आरोप करून त्याला हुसकावून लावले अन् दुसऱ्यावेळी पुन्हा खोटा आरोप ठेवून जेलमध्ये डांबलं..!

माणूस म्हणून शांत जीवन जगण्याची धडपड करणाऱ्या तंट्याला जमीन हडपणारे पाटील,मालगुजर,त्यांना साथ देणारे सावकार अन् पोलीस प्रशासन यंत्रणेने त्याचे जगणे असह्य केले होते.पुढे अन्यायाने पिचून गेलेला तंट्या बदलत गेला..!

आपल्या व्यवस्थेशी आणि बलाढ्य ब्रिटिश राजसत्तेशी त्याने लढा सुरू केला.अन् तो तात्याचा तंट्या झाला.त्याच्यावर होणारा अन्याय बघून काही मित्रांच्या संगतीने मग तो मालगुजरांच्या घरावर धाडी टाकू लागला,त्यांचे घरं लुटू लागला त्यातून गरिबांना मदत करू लागला.गरिबांना शेती कसण्यासाठी पैका देऊ लागला,शेती नसलेल्या गरिबांना धान्य देऊ लागला,दुष्काळात गरीब जनतेला मदत करू लागला,गरिबांच्या लेकीचे लग्न करून देण्यासाठी त्यांना मदत करू लागला..!

त्याच्यावर कुणी अन्याय केला की तो त्याच्या जोडीदारासोबत जावून रातोरात त्यांचे घरे जाळून टाकत असायचा,उभे आयुष्य त्याला त्रास देणाऱ्या पाटील,मालगुजरांच्या घरी जावून त्यांच्याकडून पैसे लुटू लागला अन् त्या पैशांतून तो गरिबांची मदत करू लागला.त्यामुळे गावात त्याच्याबद्दल एक आदर निर्माण झाला होता,पोलीस आले की त्याच्याबद्दल त्यांना कुणीही खरी माहिती सांगत नसायचे..!

खान्देश आणि नर्मदा खोऱ्यात असलेल्या दोनशे किलोमीटर डोंगर रांगेत तो दर्या,खोऱ्यात लपून राहू लागला.आपल्या आयुष्यातील ११ वर्ष तो सतत डोंगरवाटांनी पळत होता यामुळे या भागातील कोपरा अन् कोपरा वाट अन् वाट त्याला माहिती झालेली होती.वेशांतर करून पळून जाण्यास तो फार पटाईत होता..!

या सर्व त्याच्या कारवायांना कंटाळून तंट्याला पकडून देणाऱ्याला ब्रिटिश सरकार १०,५०० रुपयांचे आणि २५०० एकर शेती देण्याचे बक्षीस जाहीर करते.पोलिसांमध्ये "तंट्या दलाची" स्वतंत्र फौज निर्माण करते..!

जेव्हा वयाची चाळीशी पूर्ण झाली तेव्हा त्याला वार्धक्य आल्यासारखे होते आपले उभे आयुष्य तो पळत होता,आता त्याचे शरीर त्याला साथ देत नव्हते,त्याचे मन विचलित झाले होते,त्याला आता वाटू लागले होते की होळकरांच्या आश्रयाला जावून आता आपण चाकरी करावी मेहनत करावी,उर्वरित आयुष्य आपल्या कुटुंबासोबत जगावं यासाठी तो विचार करू लागतो..!

रक्षाबंधनच्या दिवशी तो त्याच्या मानलेल्या बहिणीकडे जातो अन् त्याच्या दाजीला हे सर्व सांगतो त्याचे दाजी पैशांच्या लालसेपोटी त्याला फसवतात अन् ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यात देतात..!

पुढे त्याच्यावर खटला भरवला जातो,खोट्या आरोपावर त्याला फाशीची शिक्षा सूनवली जाते अन् ३ डिसेंबर १८८९ रोजी त्याला जबलपूर येथील सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात येते..!

आदिवासी शेतकऱ्यांचा क्रांतीचा तंट्या पहिला नायक होतो,तंट्याने दोन्ही भागातील खान्देश आणि नर्मदा खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागवली होती..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड