मुख्य सामग्रीवर वगळा

बुकशेल्फमधल्या गोष्टी..!

बुकशेल्फमधल्या गोष्टी..!



भर दुपारची वेळ दरवाज्याला असलेला पडदा हलतो,उन्हाच्या झळा,किरणे घराच्या आत येतात.पुन्हा पडदा वाऱ्याच्या संगतीने हलतो पुन्हा घरात काही काळ ओझरता काळोख येतो,गारवा येतो.भर दुपार ही अशीच ऊन सावलीचा खेळ करत निघून जायला येते..!

आईची कामे आवरले की आई पंख्याच्या गारव्याखाली जुनाट झालेल्या कपड्यांचे गाठोडे काढते अन् फाटलेली,अंगाला आपरी झालेली कापडं जोडून आई गोधडी शिवायला घेते.मी आईला सुई ओवून देतो,साडीचं माप काढुन देतो,शिवताना शिवलेले एका ओळीत यावे म्हणून फोडलेल्या बोळक्याचा खडू करून त्या साडीवर रेषा पाडून देतो अन् आई जुन्या ओव्या म्हणत शिवत राहते गोधडी..!

दिवसभर मी सुई ओवून देतो,आई शिवत राहते.मी बसलेलो असतो विंडोग्रीलच्या शेजारी असलेल्या कॉटवर हातात पुस्तक घेऊन,पुस्तकातील एक एक पान वाचून होत राहतं,आईची दर तिसऱ्या पानाला गोधडी शिवायची एक ओळ पूर्ण होत राहते.माझ्या मनात असंख्य विचार चालू असतात,आईच्या ओव्या माझ्या विचारागानिक बदलत असतात..!

आई गोधडी शिवत असते,मी पुस्तक वाचत असतो,आई ओव्या गात असते,मी कवितांना घेऊन विचार करत असतो.जगण्यात आलेल्या हळुवारपणाला घेऊन मी पुन्हा विचार करत असतो.
विंडोग्रीलच्या पल्ल्याड असलेल्या जगात कुंडीत लावलेल्या रातराणीच्या वेलीजवळ चिमण्यांचा घरटे बांधण्याचा खेळ चालू असतो,ती चिमणी कुठून कचरा,काड्या,कापूस जमा करून तिचं घरटं विनवत असते,आई गोधडी शिवत असते,आई आईचं घरटं विनत असते,आई आईचा संसार फुलवत असते..!

मी पुस्तक वाचत असतो,बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्या ईसमास न्याहाळत असतो.अनोळखी माणसांचे चेहरे वाचत असतो,त्यांच्यात ओळखीचा माणूस शोधत असतो,ओळखीचे माणसे दिसत असतात पण त्यांच्या आपल्याला बघून अनोळखी झालेल्या नजरा अन् त्यात मला पडलेल्या प्रश्नांना मी उत्तर शोधत असतो..!

चारची वेळ होते मी ट्रेमध्ये चहाचा कप,ग्लासात पाणी घेऊन आई समोर उभा असतो,आईच्या चेहऱ्यावर माझे गोधडी शिवत असतांना सापडलेले बालपणीचे कपडे बघून माझं बाळ किती मोठं झालं हा भाव असतो.आई गोधडी शिवत असते बाहेर चिमणी तिच्या पिल्लांसाठी घरटं बांधत असते..!

पाचच्या ठोक्याला आई सांजेच्या झाडझुडीला लागते मी पुस्तकाचं एक पान अलगद दुमडवून पुस्तकाला बुकशेल्फमध्ये ठेऊन फ्रेश होवून सायंकाळच्या भटकंतीसाठी निघतो.

दूरदूर लाल मातीच्या वाटा,अनोळखी माणसांचा सहवास असतो,मी पावलागणिक स्वतःचा,आयुष्याचा विचार करत चालत असतो.समोरून ओळखीत असलेले मित्रही येऊन जात आहे,मी चेहऱ्यावर स्मित हास्य आणत त्यांनाही येतो म्हणून चालत राहतो,वयस्कर आजी,आजोबांचा एकमेकांना या वयात आधार होवून चालत राहतात.माझ्याच वयाची एखाददुसरी तरुण मुलगी जी रोजच दिसते,नजरेला नजर भिडवून तीही अलवार स्मित हास्य करून जवळून निघून जात असते.

मी माझ्या विचारात गर्क असतो,रोजचीच ही अनोळखी माणसे यावेळी इथे भेटणारी पण त्यांचा त्या स्मित हास्याने ओळखीची वाटू लागतात,मी त्यांचा विचार करू लागतो,पुढे वळणावर काही क्षणांचा विसावा घेऊन मी पुन्हा चालू लागतो..!

पुढे याच वळणांच्या रस्त्याने पस्तिशितील दोन नुकतेच दोन-अडीच वर्षांपूर्वी बाप झालेले तरुण बाप भेटतात,एकाला एक अडीच वर्षांची मुलगा आहे तर एकाला दोन वर्षांची मुलगी.दोघेही नुकतेच चालायला लागले असल्यानं,बापाच्या करंगळीत आपला इवलुसा हात घालून या वळणांच्या रस्त्याने चालत असतात,दोघे बाप एकमेकांना बोलत असतात..!

दोन्ही मुलांच्या बोबड्या प्रश्नांचे उत्तर देत असतात,रस्त्यानं गाडी आली की आपल्या गप्पा आवरत्या घेऊन त्यांच्या मुलांना सावरून पुन्हा जवळ घेत असतात,मी ही त्यांच्या माघारी त्या इवलुश्या बुटांच्यामधल्या पायांना चालतांना बघत चालत असतो..!

सूर्य अस्ताला जातो मी पुन्हा घराच्या ओढीने परतीच्या वाटेला लागतो,हातचे असेल तर सोसायटीमधले स्ट्रीट लाईटचे स्विच चालू करूत येतो.ते आजोबा,आजी,ती तरुण मित्र,ती मैत्रीण,ते दोन बाप,ती दोन लहानगे सर्व मागे पडते अन मी घर जवळ करतो,घरी चिमणीची चिवचिव ऐकू येत नाही,रस्त्यानं अनोळखी माणसे दिसतात पण ती ओळखीची वाटून गल्लत होते..!

घरात येतो आईनं अधुरी शिवलेली गोधडी वळकटी करून उदयाला ठेवलेली असते,आई देव्हाऱ्यात,तुळशी वृंदावनात दिवा लावत असते.मी फ्रेश होवून पुन्हा विंडीग्रीलमधून बाहेरचं जग न्याहाळत विचार करत असतो,विचार करत असतो.आता आईनं कॉफीचा मग हातात आणून दिलेला असतो अन् मी पुन्हा दिवसभराचा विचार करत असतो..!

तितक्यात बुकशेल्फमधल्या पान दुमडून ठेवलेल्या पुस्तकाची आठवण येते,आयुष्यात आजच्या दिवसाचे एक पान दुमडून पुन्हा आयुष्याच्या बुकशेल्फमध्ये ठेवल्या जातं..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...